Monday, February 2, 2026

*खवैय्ये आवडत्या चिकनक्रिस्परचा आस्वाद घेऊ शकतात, केवळ 99 रुपयांत*

*खवैय्ये आवडत्या चिकनक्रिस्परचा आस्वाद घेऊ शकतात, केवळ 99 रुपयांत*

KFC इंडियाचे चिकन क्रिस्पर मील आता फक्त 99 रुपयांत

चिकनप्रेमी फ्राईज आणि पेप्सीसह त्यांच्या आवडत्या चिकनक्रिस्परचा आस्वाद घेऊ शकतात, केवळ 99 रुपयांत~

India, 2025: या वर्षाची अखेर आणखीनच कुरकुरीत, खुसखुशीत आणि चविष्ट झाली आहे!

KFC आपल्या खवैय्यांचे आवडते चिकन क्रिस्परच्या रूपातले जेवण केवळ 99 रु. इतक्या अशक्यप्राय किंमतीत घेऊन आले आहे. 

चिकनप्रेमी खवैय्ये एका मऊ तिळाच्या बनमध्ये रसाळ पेरी पेरी चिकन स्ट्रिप्स, क्रीमी, टँगी सॉस आणि लेट्यूस ठेऊन बनवलेले आपले आवडते चिकन क्रिस्पर आणि जोडीला कुरकुरीत, सोनेरी फ्राईज आणि थंडगार पेप्सीचा मनमुराद आस्वाद घेऊ शकतात.

केवळ 99 रु. किंमतीचे चिकन क्रिस्पर मील आता महाराष्ट्र (मुंबई वगळून), चंदीगड ट्रायसिटी आणि हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील निवडक शहरांमध्ये डाईन-इन आणि टेकअवे या दोन्ही पर्यायात उपलब्ध आहे.

KFC मध्ये डाईन-इन करतानाच तुम्ही KFC अॅपवर प्री-ऑर्डर करून झटपट तुमचे आवडते चिकन क्रिस्पर मील मागवू शकता आणि केवळ 99 रुपयांत आपल्या आवडत्या चिकन क्रिस्पर मीलवर ताव मारू शकता.

डॅशिंग जोडीच्या प्रेमाचा संघर्ष सांगणारे ‘रुबाब’चे शीर्षक गीत प्रदर्शित

डॅशिंग जोडीच्या प्रेमाचा संघर्ष सांगणारे ‘रुबाब’चे शीर्षक गीत प्रदर्शित 

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेत असलेल्या ‘रुबाब’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाचे शीर्षक गीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या डॅशिंग जोडीच्या प्रेमकथेची झलक याआधीच प्रेक्षकांनी आधीच्या गाण्यांमधून अनुभवली. आता या शीर्षकगीतातून त्यांच्या नात्यातील नवा टप्पा उलगडतो. प्रेमात आलेले अंतर, बदललेली परिस्थिती आणि तरीही न डगमगणारी भावना या गाण्यात पाहायला मिळते. 

परिस्थितीमुळे एकमेकांपासून दूर गेले असले, तरी त्यांचे प्रेम मात्र तितकेच ठाम आणि आत्मविश्वासाने भरलेले आहे. आपले प्रेम पुन्हा मिळवण्यासाठी, कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही मार्गाने आपले प्रेम मिळवायचे, हा निर्धार या शीर्षकगीतातून ठळकपणे समोर येतो. रोमान्ससोबतच ॲटिट्यूड, ठामपणा आणि रुबाब यांचा मिलाफ या गाण्यात पाहायला मिळतो. 

‘रुबाब हा प्रेम जगण्याचा’ ही ओळ गाण्याचा आत्मा ठरते. ठामपणे, अभिमानाने आणि स्वतःच्या अटींवर जगणे म्हणजे प्रेम ही भावना या एका ओळीतून प्रभावीपणे मांडण्यात आली आहे. या ओळीमुळे संपूर्ण गाण्याला एक वेगळी ओळख मिळते. या शीर्षकगीतात डॅशिंग जोडीचे प्रेम क्षणांपुरते मर्यादित न राहाता, त्यामागील ठामपणा, आत्मविश्वास सादर करणारे आहे. 

या गाण्याला मुकुंद सुर्यवंशी यांचा प्रभावी आवाज लाभला असून, चिनार - महेश यांनी संगीत दिले आहे. गाण्याचे आशयपूर्ण बोल मंगेश कांगणे यांनी लिहिले आहेत. शब्द, संगीत आणि गायन यांचा अचूक मेळ साधत हे शीर्षक गीत चित्रपटाच्या एकूण भावविश्वाला अधिक गहिरे बनवते.  

चित्रपटाचे दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे म्हणतात,  '' 'रुबाब' हा चित्रपट एक विचार आहे. हे शीर्षकगीत चित्रपटाचा सार सांगतो. प्रेम कसे असावे, ते कसे जगावे आणि त्यात असलेला आत्मसन्मान किती महत्त्वाचा आहे, हे या गाण्यातून आम्ही सांगायचा प्रयत्न केला आहे. या शीर्षकगीतातून नायक आणि नायिकेमधील अंतर, संघर्ष आणि तरीही न संपणारी भावना दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रेक्षकांना हे गीत नक्कीच भावेल.” 

झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित ‘रुबाब’ या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन शेखर बापू रणखांबे यांनी केले असून संजय झणकर आणि गौरी झणकर हे चित्रपटाचे निर्माते आहेत. उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर यांनी चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. या चित्रपटात संभाजी ससाणे आणि शितल पाटील प्रमुख भूमिकेत झळकणार असून, ही नवी जोडी प्रेक्षकांसाठी नक्कीच उत्सुकतेचा विषय ठरणार आहे. ६ फेब्रुवारीपासून ‘रुबाब’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.डॅशिंग जोडीच्या प्रेमाचा संघर्ष सांगणारे ‘रुबाब’चे शीर्षक गीत प्रदर्शित 

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेत असलेल्या ‘रुबाब’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाचे शीर्षक गीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या डॅशिंग जोडीच्या प्रेमकथेची झलक याआधीच प्रेक्षकांनी आधीच्या गाण्यांमधून अनुभवली. आता या शीर्षकगीतातून त्यांच्या नात्यातील नवा टप्पा उलगडतो. प्रेमात आलेले अंतर, बदललेली परिस्थिती आणि तरीही न डगमगणारी भावना या गाण्यात पाहायला मिळते. 

परिस्थितीमुळे एकमेकांपासून दूर गेले असले, तरी त्यांचे प्रेम मात्र तितकेच ठाम आणि आत्मविश्वासाने भरलेले आहे. आपले प्रेम पुन्हा मिळवण्यासाठी, कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही मार्गाने आपले प्रेम मिळवायचे, हा निर्धार या शीर्षकगीतातून ठळकपणे समोर येतो. रोमान्ससोबतच ॲटिट्यूड, ठामपणा आणि रुबाब यांचा मिलाफ या गाण्यात पाहायला मिळतो. 

‘रुबाब हा प्रेम जगण्याचा’ ही ओळ गाण्याचा आत्मा ठरते. ठामपणे, अभिमानाने आणि स्वतःच्या अटींवर जगणे म्हणजे प्रेम ही भावना या एका ओळीतून प्रभावीपणे मांडण्यात आली आहे. या ओळीमुळे संपूर्ण गाण्याला एक वेगळी ओळख मिळते. या शीर्षकगीतात डॅशिंग जोडीचे प्रेम क्षणांपुरते मर्यादित न राहाता, त्यामागील ठामपणा, आत्मविश्वास सादर करणारे आहे. 

या गाण्याला मुकुंद सुर्यवंशी यांचा प्रभावी आवाज लाभला असून, चिनार - महेश यांनी संगीत दिले आहे. गाण्याचे आशयपूर्ण बोल मंगेश कांगणे यांनी लिहिले आहेत. शब्द, संगीत आणि गायन यांचा अचूक मेळ साधत हे शीर्षक गीत चित्रपटाच्या एकूण भावविश्वाला अधिक गहिरे बनवते.  

चित्रपटाचे दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे म्हणतात, '' 'रुबाब' हा चित्रपट एक विचार आहे. हे शीर्षकगीत चित्रपटाचा सार सांगतो. प्रेम कसे असावे, ते कसे जगावे आणि त्यात असलेला आत्मसन्मान किती महत्त्वाचा आहे, हे या गाण्यातून आम्ही सांगायचा प्रयत्न केला आहे. या शीर्षकगीतातून नायक आणि नायिकेमधील अंतर, संघर्ष आणि तरीही न संपणारी भावना दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रेक्षकांना हे गीत नक्कीच भावेल.” 

झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित ‘रुबाब’ या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन शेखर बापू रणखांबे यांनी केले असून संजय झणकर आणि गौरी झणकर हे चित्रपटाचे निर्माते आहेत. उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर यांनी चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. या चित्रपटात संभाजी ससाणे आणि शितल पाटील प्रमुख भूमिकेत झळकणार असून, ही नवी जोडी प्रेक्षकांसाठी नक्कीच उत्सुकतेचा विषय ठरणार आहे. ६ फेब्रुवारीपासून ‘रुबाब’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आई–मुलींच्या नात्याचा हळुवार प्रवास सांगणारं सोनू निगम यांचे ‘हास जराशी’ गाणं प्रदर्शित

आई–मुलींच्या नात्याचा हळुवार प्रवास सांगणारं सोनू निगम यांचे ‘हास जराशी’ गाणं प्रदर्शित 

'तिघी'मधील भावस्पर्शी गाणं प्रेक्षकांच्या भेटीला 


आई आणि मुलींचं नातं हे केवळ जन्माने जोडलेलं नसतं, तर ते आयुष्यभर साठत गेलेल्या आठवणींनी, संस्कारांनी, न बोललेल्या भावनांनी आणि एकमेकांसाठी असलेल्या मूक समजुतींनी घडलेलं असतं. कधी त्या नात्यात हसरे, हलके क्षण असतात, तर कधी अपेक्षा, वेदना आणि अंतरही… तरीही मनाच्या खोल कुठेतरी हे नातं कायम घट्ट गुंफलेलं असतं. अशाच भावनांचा, नात्यांच्या नाजूक छटांचा हळुवार वेध घेणारा आगामी मराठी चित्रपट म्हणजे ‘तिघी’. या चित्रपटातील ‘हास जराशी’ हे भावनिक गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून, अल्पावधीतच ते मनाला स्पर्श करून जात आहे. आई आणि मुलींच्या नात्यातील हळवे, आनंदी, कधी वेदनांनी ओथंबलेले, तर कधी आशेने उजळलेले क्षण या गाण्यात सुंदरपणे उलगडताना दिसतात. दुःख आणि सुख, अंतर आणि आपुलकी या सगळ्यांचा एक भावनिक प्रवास हे गाणं मांडतं.

जितेंद्र जोशी यांच्या संवेदनशील आणि अर्थपूर्ण शब्दांना अद्वैत नेमळेकर यांचं हृदयाला भिडणारं संगीत लाभलं असून, सोनू निगम यांच्या जादुई आवाजामुळे हे गाणं अधिकच भावस्पर्शी झालं आहे. भारती आचरेकर, सोनाली कुलकर्णी आणि नेहा पेंडसे बायस या तिघींवर चित्रित झालेलं हे गाणं त्यांच्या नात्यातील भावनिक बंध, हसरे क्षण आणि न बोललेली वेदना प्रभावीपणे समोर आणतं.

चित्रपटाच्या दिग्दर्शिका जीजिविषा काळे सांगतात, '' ‘हास जराशी’ हे गाणं आई आणि मुलींच्या नात्यातील अतिशय नाजूक भावविश्व उलगडतं. या गाण्यात मोठे प्रसंग नाहीत, परंतु आयुष्य घडवणारे छोटे क्षण आहेत. एकमेकांसाठीचं न बोललेलं प्रेम, मनात दडवलेली वेदना, आणि तरीही कठीण काळात एकमेकांसाठी उभं राहाण्याची ताकद. या तिघींचं नातं कधी मैत्रीचं वाटतं, कधी संघर्षाचं, तर कधी फक्त एक शांत आधार बनून राहातं. ‘हास जराशी’ हे गाणं म्हणजे या नात्याचा एक हळवा श्वास आहे, जो प्रेक्षकांच्या मनाला नकळत स्पर्श करून जातो.”

सुप्री मीडिया प्रस्तुत आणि कोक्लिको पिक्चर्स निर्मित ‘तिघी’ या चित्रपटात भारती आचरेकर, सोनाली कुलकर्णी आणि नेहा पेंडसे बायस यांच्या प्रमुख भूमिका असून, चित्रपटाची कथा व दिग्दर्शन जीजिविषा काळे यांनी केलं आहे. निर्मितीची धुरा निखिल महाजन, सुहृद गोडबोले, स्वप्निल भंगाळे आणि नेहा पेंडसे बायस यांनी सांभाळली आहे. आई–मुलींच्या नात्याकडे प्रगल्भ, संवेदनशील आणि वेगळ्या नजरेतून पाहाणारा ‘तिघी’ हा चित्रपट येत्या ६ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, त्याआधीच ‘हास जराशी’ हे गाणं प्रेक्षकांच्या मनात खास जागा निर्माण करत आहे.

Saturday, January 31, 2026

India leads a ‘Global Vision for Patient Safety’ at Day 1 of Apollo Hospitals International Health Dialogue 2026

 India leads a ‘Global Vision for Patient Safety’ at Day 1 of Apollo Hospitals International Health Dialogue 2026

Hyderabad, 31 January 2026: International Health Dialogue (IHD) 2026 opened today in Hyderabad, bringing together clinicians, patient safety leaders, accreditation experts, and health system policymakers from India and abroad. With the theme Global Voices. One Vision. Day 1 centred patient safety where it truly belongs, as a leadership and governance priority, shaped by equity and enabled by responsible digital transformation. The discussions reflected a clear direction across geographies: India’s lived experience of delivering care at scale, while steadily strengthening standards and accountability, is increasingly informing how the world thinks about patient safety and trust. 

Opening the conference, Dr. Sangita Reddy, Joint Managing Director, Apollo Hospitals Group, recalled the founding purpose of IHD as a platform built for sharing learning that should not remain confined to individual systems. “So much innovation is happening within our hospitals, within our systems. We are learning every day. But why is this knowledge staying within our own ecosystem? Why are we not sharing it more openly?” she said, adding that the intent has always been to “take what we have learned and make it useful for others.” Reflecting the expanding global relevance of the platform, she noted that IHD 2026 received over 5,000 registrations, 300+ paper submissions, and 120+ award entries from 75+ institutions worldwide.

Setting the tone for outcomes that work in real life, Dr Jayesh Ranjan, Special Chief Secretary for the Industries & Commerce (I&C) and Information Technology (IT) Departments, Government of Telangana, highlighted why equity must sit at the centre of patient safety design. “When we talk about sharing learning and improving systems, we have to start with the truth that patients are not homogeneous. Different patients live in different worlds, and safety means different things in each,” he said. “An equity lens forces a design lens. If we want patient safety to hold up in the real world, we must design for those who are most vulnerable, and we must plan for continuity, access, and how people actually behave,” he added. On digital inclusion, he observed, “The digital divide is not only infrastructure. Often, the mindset divide is bigger.”

Across the day, speakers converged on one practical point: patient safety outcomes increasingly depend on how well the ecosystem works as a coordinated whole, across regulators, accreditors, providers, and technology partners. In the opening plenary, Dr. Madhu Sasidhar, President and Chief Executive Officer, Hospitals Division, Apollo Hospitals Enterprise Limited, emphasised shared ownership and organisational accountability. “Patient safety cannot be solved by one stakeholder alone. It requires regulators, governments, accreditors, providers, and technology firms to work as one. Patient safety is not a departmental responsibility. It is in fact an organisational leadership responsibility.”

From a global quality and safety lens, Dr. Carsten Engel, CEO, International Society for Quality in Health Care (ISQua), reflected on the gap between sustained attention and on-ground improvement. “Patient safety has been on the agenda for decades, but we still have to say we are not there yet,” he said. He cautioned against adding activity without impact, noting, “We risk creating safety clutter, procedures and activities done in the name of safety that do not improve safety.” He urged leaders to adopt a systems view of behaviour and context: “Don’t ask why people didn’t do what they should have done. Ask why it made sense for them to do what they did.”

On standards and execution, Dr. Atul Mohan Kochhar, CEO, National Accreditation Board for Hospitals & Healthcare Providers (NABH), underlined urgency with an implementation-first approach. “Patient safety is not only a technical issue. It is a moral, social, and economic imperative. Policies alone do not improve safety. Implementation efficiency does,” he said. Reinforcing ambition in measurable terms, he added, “We must be ambitious when it comes to patient safety. Zero harm is the only number that can be accepted for patient safety risk.”

Building on this emphasis on implementation, accountability, and measurable safety outcomes, Apollo Hospitals also signed a Memorandum of Understanding with Roche Diagnostics India as part of Day 1 proceedings to explore the integration of advanced artificial intelligence into clinical decision-making. The collaboration will focus on translating AI-enabled insights into practical, clinician-friendly support across care pathways, strengthening consistency in clinical judgement, earlier risk identification, and safer, more standardised care delivery at scale.

Apollo’s emphasis on culture-led transformation was articulated by Dr. Rohini Sridhar, Chief of Medical Services, Apollo Hospitals, who stressed that systems improve only when clinical teams move together with the organisation. “Unless clinicians walk with you, zero harm cannot be achieved. If one unit experiences harm, every unit must learn immediately. Technology accelerates learning, but culture determines action.”

Later in the day, IHD 2026 hosted a dedicated spotlight session for the newly launched digital health startup community, with a curated set of startups pitching to investors. The session focused on solutions grounded in real clinical and operational gaps, including safer workflows, decision support, early risk identification, improved documentation, and scalable patient engagement. The segment reinforced IHD’s emphasis on translating innovation into validated, implementable tools that strengthen safety, outcomes, and trust.

IHD 2026 continues on January 31 in Hyderabad with further sessions and showcases focused on patient safety, digital transformation, healthcare operations, and clinical learning.

For further information contact :- Rajesh Dabhade 9594061617, Adfactors PR

अंकुश चौधरीच्या वाढदिवसानिमित्त ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

                             थोडी प्रतीक्षा…                                     मोठीधमाल! ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’           आता १३ फेब्रुवारीला

अंकुश चौधरीच्या वाढदिवसानिमित्त ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

३० जानेवारी रोजी प्रदर्शित होणारा ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट आता पुन्हा एकदा तेवढ्याच जोशाने आणि तेवढीच धमाल घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट आता १३ फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार असून, दिग्दर्शक अंकुश चौधरी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रदर्शनाची नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे थोड्या प्रतीक्षेनंतर, लवकरच कुरळे बंधूंची धमाल आणि गोंधळ प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे.

'पुन्हा एकदा साडे माडे तीन’ हा चित्रपट रतन, मदन, चंदन आणि बबन या वेगवेगळ्या स्वभावांच्या चार जणांच्या आयुष्यात घडणाऱ्या गोंधळाची, गैरसमजांची आणि अनपेक्षित वळणांची धमाल सांगणार आहे. सतत बिघडत जाणारी परिस्थिती, छोट्या गोष्टींमधून मोठा गोंधळ आणि त्यातून निर्माण होणारा विनोद हा या कथेचा  केंद्रबिंदू आहे. या सगळ्या गोंधळात रिंकू राजगुरूची एन्ट्री त्यांच्या आयुष्यात एक वेगळंच वळण घेऊन येणार आहे. ती या चौघांच्या आयुष्यात का आली आणि तिच्या येण्याने सगळ्यांची गडबड का उडाली, याची उत्तरं चित्रपट पाहूनच मिळणार आहेत. या सगळ्यात बबनचा खोडकरपणा, मदनचा विनोदी अंदाज, चंदनची निरागसता आणि रतनचा ताठर स्वभाव प्रेक्षकांना पुन्हा एकदा प्रेमात पाडणार आहे. 

चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत अमेय विनोद खोपकर पिक्चर्सचे अमेय खोपकर म्हणतात, ''माननीय अजितदादा पवार यांच्या अकाली जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली होती. हा आघात अत्यंत वेदनादायी असून, या दुःखात आम्हीही सहभागी आहोत. अशा काळात कोणत्याही प्रकारचा आनंदोत्सव साजरा करणे आम्हाला योग्य वाटले नाही. त्यामुळे संवेदनशीलतेची जाणीव ठेवत आम्ही ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. तसेच इतर चित्रपटांच्या प्रदर्शनावर कोणताही परिणाम होऊ नये, याचीही काळजी घेत आम्ही हा चित्रपट १३ फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित करत आहोत. संवेदनशीलतेला प्राधान्य देत घेतलेला हा निर्णय प्रेक्षकांकडूनही समजून घेतला जाईल, असा विश्वास आहे.''

या चित्रपटात अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, आणि रिंकू राजगुरू यांच्या प्रमुख भूमिका असून संजय नार्वेकर यात पाहुणे कलाकार म्हणून झळकणार आहेत. सुशीलकुमार अग्रवाल आणि अल्ट्रा मीडिया ॲण्ड एंटरटेनमेंट प्रस्तुत, उषा काकडे प्रॉडक्शन्स, ईओडी. मीडिया उदाहरणार्थ निर्मित आणि अमेय विनोद खोपकर पिक्चर्स यांच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अंकुश चौधरी यांनी केले आहे. तसेच उषा काकडे, पुष्कर यावलकर, सुधीर कोलते, स्वाती खोपकर आणि निनाद नंदकुमार बत्तीन हे निर्माते आहेत. मोहसिन खान, यशराज टिळेकर, सौरभ ललवाणी आणि धनविक एंटरटेनमेंट सहनिर्माते असून स्मिथ पीटर तेलगोटे सहायक निर्माता आहेत. चित्रपटाचे छायाचित्रण प्रसिद्ध छायाचित्रकार संजय जाधव यांनी केले आहे.

स्क्रिप्ट असतानाही स्क्रिप्टशियाव घडला रुबाब! अनोख्या मेकिंग स्टोरीने ‘रुबाब’ चर्चेत

स्क्रिप्ट असतानाही स्क्रिप्टशियाव घडला रुबाब! अनोख्या मेकिंग स्टोरीने ‘रुबाब’ चर्चेत

झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित ‘रुबाब’ या आगामी मराठी चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. ‘तुझ्यासारखी नको, तूच पाहिजे’ ही चित्रपटाची टॅगलाईन सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, चित्रपटातील रुबाबदार जोडीही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. तसेच चित्रपटाच्या ट्रेलरलाही प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. मात्र सध्या हा चित्रपट एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. या चित्रपटाच्या मेकिंगमधील एक अनोखी बाब समोर आली आहे. 

ट्रेलरमध्ये चित्रपटाच्या कथेची झलक पाहायला मिळते, तसेच कलाकारांचा जबरदस्त अभिनयही दिसतो. कलाकारांच्या दमदार अभिनयामागे एक वेगळीच गोष्ट आहे. या चित्रपटासाठी कलाकारांना स्क्रिप्टच देण्यात आले नाही. कलाकारांनी २३ दिवस वेगवेगळ्या लोकेशन्सवर जाऊन रिहर्सल करून, वर्कशॉप करून या चित्रपटाचे शूटिंग केले मात्र, स्क्रिप्ट असूनही त्यांना स्क्रिप्ट मिळाले नाही. याचे कारण असे की, दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे यांनी प्रत्येक प्रसंग, संवाद आणि भावनिक पट त्यांच्या मार्गदर्शनातून सविस्तरपणे स्पष्ट केला, ज्यामुळे कलाकारांनी प्रत्यक्ष अनुभवातून सीन साकारले. या वेगळ्या कार्यपद्धतीमुळे सेटवर सतत संवाद, चर्चा आणि सर्जनशील देवाणघेवाण सुरू होती. परिणामी, स्क्रिप्टपेक्षा समज, अनुभव आणि रिहर्सलवर आधारित अभिनयाची एक नवी प्रक्रिया ‘रुबाब’च्या निर्मितीत पाहायला मिळाली. 

झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित ‘रुबाब’ या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन शेखर बापू रणखांबे यांनी केले असून संजय झणकर आणि गौरी झणकर निर्माते आहेत तर उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर प्रस्तुतकर्ता आहेत. या चित्रपटात संभाजी ससाणे व शितल पाटील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. येत्या ६ फेब्रुवारीपासून हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Friday, January 30, 2026

रोहिणी हट्टंगडी – मुक्ता बर्वे पुन्हा एकत्र!

 रोहिणी हट्टंगडी – मुक्ता बर्वे पुन्हा एकत्र!

‘माया’मध्ये अनुभवायला मिळणार स्वतंत्र स्त्रीमनाचा प्रगल्भ आविष्कार

मराठी रंगभूमीवर माय–लेकीचं नातं अत्यंत संवेदनशीलतेनं मांडणाऱ्या गाजलेल्या ‘चारचौघी’ या नाटकातून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या रोहिणी हट्टंगडी आणि मुक्ता बर्वे या दोन दिग्गज अभिनेत्री पुन्हा एकदा एकत्र येत आहेत. यावेळी त्या रंगभूमीवर नव्हे, तर मोठ्या पडद्यावर ‘माया’ या आगामी मराठी चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहेत.

‘चारचौघी’सारख्या स्त्रीप्रधान नाटकानंतर आता ‘माया’ या चित्रपटातही या दोघी स्वतंत्र विचारांच्या, स्वाभिमानी आणि आत्मभान असलेल्या स्त्री व्यक्तिरेखा साकारणार आहेत. अनुभव आणि अभिनयातील परिपक्वतेचा संगम असलेली ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावणारी ठरत आहे.

रोहिणी हट्टंगडी यांचा अभिनय म्हणजे सूक्ष्मतेतून मोठे भाव उलगडणारी प्रक्रिया, तर मुक्ता बर्वे ही आधुनिक स्त्रीचं सशक्त प्रतिनिधित्व करणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. त्यामुळे 'माया' मध्ये त्यांचा केवळ अभिनय नाही तर, स्त्रीमनाच्या विविध छटांची प्रगल्भ मांडणी पाहायला मिळणार आहे. 

रोहिणी हट्टंगडी म्हणतात, ''मुक्तासोबत पुन्हा काम करणं हा एक अत्यंत समाधान देणारा अनुभव आहे. ती एक संवेदनशील, विचारशील आणि स्वतःच्या अभिनयाबाबत प्रचंड प्रामाणिक अभिनेत्री आहे. तिच्यासोबत काम करताना समोरची व्यक्तिरेखा अधिक सखोल होते. अभिनय म्हणजे केवळ संवाद बोलणं नसून, तो जगण्याचा अनुभव असतो आणि मुक्ताकडे तो अनुभव मनापासून स्वीकारण्याची क्षमता आहे. तिच्यासोबतचा प्रत्येक सीन मला अभिनेत्री म्हणून अधिक समृद्ध करून जातो.'' 

मुक्ता बर्वे आपल्या अनुभवाबद्दल बोलते, ''रोहिणी ताईंसोबत पुन्हा काम करणं, ही माझ्यासाठी शिकण्याचीच एक प्रक्रिया आहे. त्यांच्या अनुभवातून येणारी शांतता, प्रसंग समजून घेण्याची दृष्टी आणि अभिनयातील प्रगल्भता सतत प्रेरणा देते. सेटवर त्यांच्यासोबत असताना अभिनय सहज घडतो. त्यांनी आयुष्य आणि अभिनय दोन्ही खूप खोलवर अनुभवलं आहे आणि ते त्यांच्या प्रत्येक भूमिकेत दिसून येतं. अशा कलाकारासोबत काम करणं हे खरं तर भाग्य आहे.”

शालिनी सिनेमाज आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन निर्मित ‘माया’ या चित्रपटाचे निर्माते डॉ. सुनील दातार, अलका मधुकर दातार आणि नितीन प्रकाश वैद्य आहेत. आदित्य इंगळे दिग्दर्शित या चित्रपटात मुक्ता बर्वे, रोहिणी हट्टंगडी यांच्यासह गिरीश ओक, सिद्धार्थ चांदेकर आणि विजय केंकरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. येत्या २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणारा ‘माया’ हा चित्रपट त्याच्या पोस्टरमुळे आधीच चर्चेत असून, नात्यांच्या गुंत्यातून उमटणारी, स्त्रीमनाच्या स्वातंत्र्याची आणि आत्मशोधाची ही कथा प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच भिडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

*खवैय्ये आवडत्या चिकनक्रिस्परचा आस्वाद घेऊ शकतात, केवळ 99 रुपयांत*

*खवैय्ये आवडत्या चिकनक्रिस्परचा आस्वाद घेऊ शकतात, केवळ 99 रुपयांत* KFC इंडियाचे चिकन क्रिस्पर मील आता फक्त 99 रुपयांत चिकनप्रेमी फ्राईज आणि ...