Tuesday, March 24, 2026

JITO Premier League 2026 Franchise Auction Sets New Benchmark for Community Cricket in India

 JITO Premier League 2026 Franchise Auction Sets New Benchmark for Community Cricket in India

Mumbai:* The JITO Premier League (JPL) 2026 has successfully concluded its landmark Franchise Owners Auction, marking a defining moment in the evolution of community-driven cricket in India.

Addressing the occasion, Mr. Vicky Oswal, Chairman JPL, said:* “This auction is not just about owning teams, it is about building a vision for the future of community cricket. The overwhelming response and the scale at which franchises were acquired reflect the belief our community has in this platform. JPL is here to create real opportunities, nurture talent, and take our players to the next level.

The evening witnessed exceptional energy, strategic bidding, and strong participation from Jain business leaders and entrepreneurs across the country. What stood out was not just the competitive spirit, but the shared commitment to be part of a larger movement that blends sport, community, and opportunity.

In a historic first for India, a community-led league conducted a full-scale franchise auction where teams were acquired at remarkable and unprecedented valuations, setting a new benchmark for similar initiatives nationwide.

A total of 12 franchises were successfully taken up, each representing key cities and regions across India. Each team now carries the responsibility of developing talent and strengthening the sporting ecosystem within the community.

Franchises & Team Owners:

Chennai Tuskars – Mr. Rajesh Chandan

Maharashtra Peshwas – Mr. Ujjwal Pagaria, Pagaria Group

Indore Eklavyas – Mr. Prateek Surya & Mr. Mayank Doshi

Gujarat Warriors – Mr. Nitin Jain (Surat)

Mumbai Falcons – Mr. Jayent Jain, Mr. Jayesh Bhansali & Team

Bengaluru Eagles – Mr. Mahendra Bafna, Mr. Vishal C. Jain & Team

Kolkata Thunders – RDB Group – Mr. Vinod Dugar

Pune Tigers – Mr. Vijay Bhandari, Mr. Vishal Chordia & Team

Rajasthan Rakshaks – JYF Infinity & Team

Delhi Imperials – Pavna Sports & Entertainment – Mr. Swapnil Jain

Hyderabadi Marfa – Mr. Gautam Sehlot

Mumbai SOBO Stars – JYF Friends & Team

The auction featured several high-intensity bidding moments, showcasing the strong confidence stakeholders have in the league’s long-term vision and impact.

The initiative stands guided by the visionary leadership of Mr. Prithviraj Kothari, Chairman JITO Apex and is driven by the bold vision and powerful execution of Mr. Vicky Oswal, Chairman JITO Sports & JPL, whose efforts have been instrumental in transforming this long-standing dream into reality.

The event was graced by esteemed JITO leaders including:

Mr. Vijay Bhandari (President Apex, Mr. Kamlesh Sajotia (Vice President Apex), Mr. Lalit Dangi (Secretary General Apex), Mr. Sampat Chaplot (Treasurer – Apex), Mr. Jinendra Kumar Munot (Director In-Charge – Sports), and Mr. Bhavik Sakaria (Chief Secretary – Sports), along with members of the Apex body and JITO Sports Committee.

Adding further inspiration to the evening, the event was attended by Sahil Parakh, a promising young Indian cricketer associated with the Delhi Daredevils (IPL 2026), who is also a product of the JITO Sports Professional Program — highlighting the league’s commitment to nurturing real talent.

At its core, the JITO Premier League is built to provide a structured, professional platform for youth from the community to showcase their cricketing abilities and progress to higher levels of the sport.

With the successful completion of the franchise auction, JPL 2026 now moves into its next phase — team building, player auctions, and season preparations, leading up to what promises to be a highly competitive and impactful tournament. JITO Premier League 2026 is not just a cricket league, it is a movement to create opportunities, build connections, and elevate community talent onto bigger platforms. 

Sunday, March 22, 2026

फिटनेसच्या बाबतीत देवदत्त नागेचा रोल मॉडेल कुशल बद्रिके!

 फिटनेसच्या बाबतीत देवदत्त नागेचा रोल मॉडेल कुशल बद्रिके!

मनोरंजनसृष्टीतील दमदार अभिनेता देवदत्त नागे आपल्या प्रभावी भूमिकांसोबतच त्याच्या फिटनेससाठीही ओळखला जातो. मात्र स्वतः फिटनेसकडे लक्ष देताना त्याला प्रेरणा मिळते ती त्याचा जिवलग मित्र, लोकप्रिय अभिनेता कुशल बद्रिके याच्याकडून. अभिनयासोबतच फिटनेसकडेही लक्ष देणाऱ्या या दोघा कलाकारांची मैत्री आणि एकमेकांना दिलेले प्रोत्साहन चाहत्यांमध्येही चर्चेचा विषय ठरत आहे.

मित्रांकडून मिळणारी प्रेरणा आयुष्याला नवी ऊर्जा देणारी ठरते. अभिनेता देवदत्त नागे यांच्यासाठी फिटनेसच्या बाबतीत कुशल बद्रिके खऱ्या अर्थाने ‘रोल मॉडेल’ असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी ‘घबाडकुंड’ चित्रपटाच्या फर्स्ट लूक लाँचच्या शानदार सोहळ्यात देवदत्त नागे यांनी हा खुलासा केला.

चित्रीकरणादरम्यान सहकलाकारांसोबत घडलेल्या विविध आठवणींना उजाळा देताना त्यांनी सेटवरील धमाल, मस्ती आणि गमती-जमतींचा उल्लेख केला.  पहाटे दिव्याच्या प्रकाशात कुशलसोबत केलेला व्यायाम, त्यानंतरचा फक्कड गुळाचा चहा आणि चमचमीत मॅगी या सगळ्या खास क्षणांची रंगतदार कहाणी सांगताना देवदत्तने कुशलला ‘माझा फिटनेस आयडॉल’ हा किताब देत त्याची फिरकी घेतली. यावर कुशलनेही तितक्याच विनोदी अंदाजात प्रतिसाद देत, ‘हा व्हिडिओ सगळीकडे नक्की टॅग करा!’ असं आव्हान दिलं. कुशल बद्रिके तसेच संदीप पाठक यांच्यासोबतची ही भावनिक आणि अविस्मरणीय सफर कायम स्मरणात राहील, असं सांगत देवदत्त नागेने यावेळी सर्वांचे मनापासून आभार मानले.‘घबाडकुंड’ चित्रपटातील रहस्याचा पडदा उघडण्यासाठी आम्ही सज्ज आहोत असं त्यांनी म्हटलं आहे. 

दिग्दर्शक प्रीतम एस. के. पाटील,  निर्माते रसिक कदम यांच्या साथीने सस्पेन्स थ्रिलर जॉनर प्रेक्षकांसाठी घेऊन आले आहेत. अ‍ॅक्शन, विनोद, रहस्य असा सगळा भरगच्च मसाला असलेला मराठीतला पहिला युनिव्हर्स चित्रपट ‘घबाडकुंड’ १९ जूनला प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होत आहे.

शेलार मामा फाऊंडेशनच्या वतीने चैत्र नवरात्रोत्सवाचा

 शेलार मामा फाऊंडेशनच्या वतीने चैत्र नवरात्रोत्सवाचा  जागर


चैत्र महिन्यात येणाऱ्या चैत्र नवरात्रीला हिंदू संस्कृतीत विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा, म्हणजेच गुढीपाडवा, या दिवशी या नवरात्रोत्सवाची मंगलमय सुरुवात होते. या पवित्र उत्सवाचा जागर करण्यासाठी शेलार मामा फाऊंडेशनने पुढाकार घेतला असून, अभिनेता सुशांत शेलार आणि पत्नी सौ. साक्षी सुशांत शेलार यांच्या विद्यमाने लोअर परेल येथे  १९ मार्चपासून  ते २७ मार्च  या कालावधीत  ‘कुलस्वामिनी भैरी भवानी’ चैत्र नवरात्रोत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा होतोय.  


माननीय उपमुख्यमंत्री ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रेरणेने आणि खासदार मा. श्री. श्रीकांतजी एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शेलारमामा फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. सुशांत अरुण शेलार यांच्या संकल्पनेतून हा चैत्र नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. मा.श्री. एकनाथ शिंदे (उपमुख्यमंत्री - महाराष्ट्र राज्य), मा.श्री. देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री -महाराष्ट्र राज्य), श्रीमती. सुनेत्रा पवार (उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य), मा.डॉ.निलम गो-हे (उपसभापती- विधान परिषद), मा.डॉ. श्रीकांत शिंदे (खासदार) यांच्या विशेष  उपस्थितीसह अभिनेता सौरभ गोखले,  मेघन जाधव,  विघ्नेश जोशी,  अक्षय मुडावदकर, डॉ. निखिल राजशिर्के, अभिनेत्री  तेजस्विनी पंडित, रेश्मा शिंदे आदी मनोरंजन आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर या उत्सवाला हजर राहणार आहेत. 


गेल्या काही वर्षापासून सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात सक्रीय असलेल्या शेलारमामा फाऊंडेशन या संस्थेतर्फे मुंबईच्या लोअर परळ येथे चैत्र नवरात्रोत्सवाचे आयोजन करणात येते. हिंदू धर्म, आपल्या परंपरा आणि संस्कृती याचे जतन आणि संवर्धन यासह हा समृद्ध वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावा हा या चैत्र नवरात्रोत्सवा मागचा हेतू असल्याचे अभिनेता सुशांत  शेलार यांनी सांगितले.

कोकण वैभव जवळ, तालचेकरवाडी शाळेसमोर, लोअर परळ उड्डाणपुलाखाली १९ मार्च २०२६ ते २७ मार्च दरम्यान रंगणाऱ्या या उत्सवात अभिषेक, शृंगार पूजा, मंडल पूजा, पाठ वाचन, नवचंडी होमहवन,भजन, ललिता सहस्त्रनाम, कुंकू मार्चन, देवीचा गोंधळ, जागरण  महिला पुरीहिताचें पठण, श्रीरामनवमी उत्सव, विसर्जन आदी आराधनेने चैत्र नवरात्री उत्सवाचा जागर केला जाणार आहे.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची घटक संस्था प्रायोगिक रंगमंच संघातर्फे प्रथमच रंगमंच एक अभिव्यक्ती अनेक..

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची घटक संस्था प्रायोगिक रंगमंच संघातर्फे प्रथमच रंगमंच एक अभिव्यक्ती अनेक...*

दिनांक : २१ मार्च २०२६ सायंकाळी : ६. ३० वाजता स्थळ :साळगावकर प्रायोगिक रंगमंच, यशवंतराव नाट्य संकुल, माटुंगा रोड, मुंबई - ४०००१६.

आयोजित राज्यस्तरीय एकांकिका लेखन स्पर्धा २०२५ - २०२६ आयोजित करण्यात आला...

( विशेष सन्मान )

संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या ९१ एकांकिका मधून विजेत्या ठरलेल्या एकांकिका आणि त्यांच्या लेखकांचा सन्मान... 

प्रमुख पाहुणे : प्रेमानंद गज्वी 

प्रमुख अतिथी : गिरीश पतके 

संस्थेच्या पारितोषिक विजेत्या संघांचे कथा अभिवाचन 

उत्तेजनार्थ पारितोषिके सहा 

प्रत्येकी १०००/रुपये. +प्रमाणपत्र 

०४) नॉट स्क्रिप्टेड - देवेंद्र प्रभुदेसाई एकांकिका लेखन स्पर्धेतील उत्तेजनार्थ ₹ 1000/= चे पारितोषिक विनयरूप टूर्स अँड ट्रॅव्हल, नवी मुंबई (रुपाली विनायक सावर्डेकर )तर्फे देण्याचे घोषित करण्यात आले. 

०५)गोल्ड फिशचा खून करणारे ते - संकेत तांडेल  

०६) एका भेटीची गोष्ट - राकेश सुबाराव इंगवले 

०७) चंद्र माधवी - अनिल मुनघाटे 

०८) युगे युगे - ज्ञानेश्वर पाटील 

०९) दंश - महेंद्र डोंगरे

लक्षणीय पारितोषिके सहा

 प्रत्येकी ५००/रुपये. +प्रमाणपत्र ही पाचशे रुपयांची सहा पारितोषिके अशोक परब यांच्या सौजन्याने देण्यात आली. 

१०)ऑट लिबर्टास ऑट माॅर्स- अभिजित वाईकर 

११) पाच बाय सातचे कुरुक्षेत्र - नम्रता शिरढोणे 

१२)कळसूत्र - रवी इनामदार 

१३) शून्य गोलार्धावर आदिम अनंताचा सैतानी अस्त- अभिजित वाईकर 

१४) समांतर - कय्युम काझी 

१५) बिंब प्रतिबिंब - अर्जुन गावडे

या स्पर्धेसाठी माननीय परीक्षक म्हणून सर्वश्री डॉ. अनिल बांदिवडेकर, आभास आनंद, विलास पगार यांनी काम पाहिले. 

प्रायोगिक रंगमंच संघाच्या वतीने अंतिम फेरीत आलेल्या सर्व पारितोषिक प्राप्त एकांकिकांचा संग्रह प्रकाशित करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. 

संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन दत्ता सावंत यांनी केले. 

दिलीप दळवी 

अध्यक्ष 

प्रायोगिक रंगमंच संघ

प्रसिद्धी -. आवाज माझा. महाराष्ट्राचा चॅनल 

गणेश तळेकर

Saturday, March 21, 2026

*'चैत्र चाहूल २०२६' : ‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा भावपूर्ण सोहळा रवींद्र नाट्यमंदिरात संपन्न!*

*'चैत्र चाहूल २०२६' : ‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा भावपूर्ण सोहळा रवींद्र नाट्यमंदिरात संपन्न!*


*मुंबई :* गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा हा सोहळा यावर्षी गुरुवार, १९ मार्च २०२६ रोजी रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात अभिनेता वैभव मांगले यांच्या प्रभावी कथावाचनाने झाली. त्यांनी प्रख्यात लेखक विद्याधर पुंडलिक यांच्या ‘माळ’ या गाजलेल्या कथेचे वाचन सादर केले. मानवी नातेसंबंध, एकटेपणा आणि भावनिक पोकळी यांचे सूक्ष्म दर्शन घडवणाऱ्या या कथेचे त्यांनी केलेले सादरीकरण इतके जिवंत होते की, सभागृहातील रसिक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. ‘माळ’ ही केवळ ओसाड जागेची प्रतिमा नसून, मनातील रिकामेपणाचे प्रतीक आहे, हे त्यांनी आपल्या वाचनातून प्रभावीपणे उलगडले. मास्तर आणि काशीताई यांसारख्या व्यक्तिरेखा जणू रंगमंचावर सजीव झाल्याचा भास रसिकांना झाला. उपस्थितांनी या वाचनाला उत्स्फूर्त दाद दिल


यानंतर ‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचे वितरण करण्यात आले. पुण्यातील ‘सुदर्शन रंगमंच’च्या शुभांगी दामले यांना ‘ध्यास सन्मान’ प्रदान करण्यात आला, तर प्रख्यात लेखक व भाष्यकार सुरेश गोसावी यांना ‘रंगकर्मी सन्मान’ देऊन गौरविण्यात आले. सन्मान स्वीकारताना शुभांगी दामले यांनी सांगितले की, नाट्यदर्पण रजनीकार सुधीर दामले यांच्या प्रेरणेतून सामाजिक कार्याची दिशा मिळाली आणि इतरांना संधी उपलब्ध करून देण्याच्या ध्यासातून आपली वाटचाल घडली. तर सुरेश गोसावी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले, “आजपर्यंत लिहिले खूप, पण बोलण्याचा प्रसंग पहिल्यांदाच आला. बाजुस पडलेल्या दगडाला मोठे पण द्यायचा आज उत्सव आहे. नमस्कार”

या प्रसंगी निलेश जाधव यांनी पद्मश्री डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे यांना स्वतः तयार केलेल्या विठोबाच्या तैल चित्राची आकर्षक फोटोफ्रेम भेट दिली. तसेच त्यांना सापडलेल्या सोन्याच्या दागिन्यांतून मिळालेली रक्कम सामाजिक कार्यासाठी देण्याचा उदात्त निर्णय घेत, पेण येथील दिव्यांग मुलांसाठी कार्यरत ‘सुहित जीवन ट्रस्ट’च्या संचालिका सुरेख पाटील यांच्याकडे ती रक्कम सुपूर्द करण्यात आली. यावेळी ‘ॲड फिझ’ निर्मित ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ या कॉफीटेबल पुस्तकाची झलकही सादर करण्यात आली.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पद्मश्री डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे यांनी ‘रंग विठ्ठल’ हा खास ‘चैत्र चाहूल’साठी सादर केलेला अभंग रसिकांसमोर सादर केला. त्यांच्या सुरेल गायनाला तबल्यावर यती भागवत, संवादिनीवर ज्ञानेश्वर सोनवणे, तालवाद्यावर सूर्यकांत सुर्वे, पखवाजवर हनुमंत रावडे, बासरीवर अमर ओक तसेच स्वरसाथीसाठी निमिष कैकाडी, स्वरांगी मराठे आणि स्वराली जोशी यांनी समर्थ साथ दिली.


Wednesday, March 18, 2026

‘चिरायू’ च्या मंचावर ‘बीज गुढी’ची अनोखी संकल्पना

 *मराठी कलाविश्वाचा सन्मान सोहळा… दिमाखात रंगला ‘चिरायू २०२६’*

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी आपण सगळेच सज्ज झाले आहोत. येत्या गुढीपाडव्याचं औचित्य साधत ‘शेलार मामा फाउंडेशन’ आयोजित ‘चिरायू २०२६’ हा कलाकारांच्या सन्मानाचा आणि नात्यांच्या उत्सवाचा सोहळा मोठ्या दिमाखात आणि उत्साहात संपन्न झाला. अवघं मराठी कलाविश्व यानिमित्ताने एकवटलं होतं. नवनवे संकल्प आणि कार्य-प्रकल्पांसोबत मनोरंजनाची गुढी उभारत मराठी नववर्षाचं स्वागत ‘चिरायू’तर्फे दणक्यात साजरं केलं जातं. शेलार मामा फाऊंडेशनच्या वतीने आयोजित ‘चिरायू’चे वैशिष्ट्य म्हणजे अभिनव संकल्पनांच्या माध्यमातून ‘चिरायू’ सतत वेगळा आणि सकारात्मक संदेश देत असते. तसेच नवोन्मेषाच्या आनंदासोबतच पडद्यामागे राबणाऱ्या कलाकर्मींची दखल ‘चिरायू’च्या मंचावर घेतली जाते.

यंदा चिरायू च्या मंचावर ‘बीज गुढी’ची अनोखी संकल्पना साकारण्यात आली. गोधड्यांमध्ये बियांचा वापर करत ही गुढी तयार करण्यात आली. उभारलेली ही ‘बीज गुढी’ केवळ परंपरेचे प्रतीक न राहता निसर्गाशी नाते जपण्याची प्रेरणा देणारी ठरली. या बियांमधून भविष्यात झाडे उगवून हरित पर्यावरण घडवण्याचा संकल्पही यावेळी व्यक्त करण्यात आला. परंपरा आणि पर्यावरण यांची सांगड घालत हा उपक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला. उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणात हा सोहळा दिमाखात रंगला.२००६ पासून ‘शेलार मामा फाउंडेशन’च्या माध्यमातून हा सन्मान सोहळा सातत्याने आयोजित केला जात आहे.

मराठी कलाक्षेत्र हे प्रयोगशीलतेसोबतच समाजाभिमुखतेसाठीही ओळखले जाते. सामाजिक बांधिलकीची जाणीव जपत ‘चिरायू’ उपक्रम राबवला जातो. यंदा क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या कार्याबद्दल अभिनेता सुयश टिळक याला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पुरस्कृत ‘पर्यावरण स्नेही’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पडद्यामागील कलाकारांमध्ये वेशभूषेसाठी राहुली नागरे, चित्रपट पोस्टर डिझायनिंग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सचिन गुरव, तर चित्रपट प्रसिद्धी-जनसंपर्क क्षेत्रातील कार्याबद्दल गणेश गारगोटे यांचा सन्मान करण्यात आला. त्यासोबत मेकअप आर्टिस्ट संतोष गिलबिले, आणि डबिंग आर्टिस्ट अभिनेता मंगेश सातपुते यांनाही याप्रसंगी गौरविण्यात आले. अमृता राव, सुजय डहाके, भार्गव जगताप, श्रीनिवास पोकळे, त्रिशा ठोसर, कबीर खंदारे या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त विजेत्या मान्यवरांचा विशेष सन्मानही यावेळी करण्यात आला.

या सोहळ्यात ‘शेलार मामा फाउंडेशन’चे मा. श्री. सुशांत शेलार यांनी माननीय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांचे विशेष आभार मानले. तसेच खासदार श्रीकांत शिंदे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम , सर्व मान्यवर, कलाकार आणि तंत्रज्ञांचे आभार मानत संस्थेचा उद्देश स्पष्ट केला. “समाजासाठी आणि कलेसाठी मनापासून काम करणाऱ्या व्यक्तींना योग्य व्यासपीठ देऊन त्यांचा गौरव करणे आणि त्यांच्या कार्याची दखल घेणे, हा आमचा खरा हेतू आहे,” असे सांगत त्यांनी उपस्थित सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. “मातीत राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या कष्टांमुळेच आपल्या जीवनात खरी समृद्धी येते. त्यांच्या आयुष्यात आनंद फुलू दे आणि सुगीचे दिवस येऊ दे,’ अशी भावनाही सुशांत शेलार यांनी यावेळी व्यक्त केली.

दिग्दर्शक संजय जाधव, सचित पाटील, अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर, दिग्दर्शक समित कक्कड,श्रुती मराठे, गौरव घाटणेकर, स्मिता गोंदकर, पुष्कर जोग, योगेश शिरसाट, जान्हवी किल्लेदार, राधा सागर, निर्मात्या अमृता राव, रणजित जोग, अक्षया गुरव, अक्षता नाईक, संजना पाटील, मंगेश सातपुते, संगीतकार अजित परब, त्रिशा ठोसर, भार्गव जगताप, गीतकार मंदार चोळकर आदि कलाकार यावेळी उपस्थित होते. 


कला, संस्कृती, समाजसेवा यांचा गौरव करणारा आणि मान्यवरांची उपस्थिती, कलाकारांचा उत्साह, रसिकांचा भरभरून प्रतिसाद यामुळे ‘चिरायू २०२६’ सोहळा अविस्मरणीय ठरला.

गश्मीर महाजनीचा दमदार ‘गोंधळ’ !

 गश्मीर महाजनीचा दमदार ‘गोंधळ’ !

गावोगावी फिरून आई जगदंबेचा जागर करणारे गोंधळी म्हणजे आपल्या लोकसंस्कृतीचा महत्त्वाचा घटक. त्यांची भक्ती, त्याची ऊर्जा आपल्यातही चैतन्य निर्माण करते. येत्या १७ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या आगामी ‘सालबर्डी’ या मराठी चित्रपटात अभिनेता गश्मीर महाजनी दमदार गोंधळी साकारताना दिसणार आहे. ‘काळरातीचा जोर वाढला घोर, होई शिरजोर गं जगदंबे’ ।

अंधार मातला थोर, असा घनघोर, लागला घोर गं जगदंबे ।

या गोंधळ नृत्यात गश्मीरने पारंपरिक वेशभूषा, प्रभावी देहबोलीसह कमालीचा नृत्याविष्कार सादर केला आहे. नुकतेच हे गीत प्रकाशित झाले असून त्याला जोरदार प्रतिसाद मिळतोय. जगदंबेचा हा गोंधळ कथानकात थरार आणि उत्सुकता वाढवणारा ठरणार आहे. संबळाच्या ठेक्यावर रहस्यमय वातावरणात गश्मीरची एन्ट्री वेगळीच रंगत वाढविणारी आहे. गीतकार मुकुंद भालेराव यांच्या लेखणीतून सजलेल्या या गोंधळाला संगीतकार पद्मनाभ गायकवाड यांचा संगीतसाज आहे. अजय गोगावले यांचा दमदार स्वर गाण्याला लाभला आहे. हा गोंधळ आशिष पाटील यांनी आपल्या सदाबहार अदाकारीने नृत्यदिग्दर्शित केला आहे.   

गावातील गूढ शांततेच्या आड दडलेलं जीवघेणं रहस्य उलगडण्यासाठी हा गोंधळी येतोय का? अशा प्रश्नांची उत्सुकता यामुळे निर्माण झाली आहे. याबद्दल बोलताना गश्मीर महाजनी म्हणतो, ‘गोंधळ ही केवळ परंपरा नाही, तर देवीभक्तीची एक ऊर्जादायी अभिव्यक्ती आहे’. ‘सालबर्डी’मधील माझा गोंधळी हा कथानकाला वेगळी दिशा देणारा महत्त्वाचा दुवा आहे. गोंधळ गीतामध्ये असलेली ऊर्जा, नाद आणि पारंपरिक वातावरण यामुळे शूटिंग करतानाच अंगावर रोमांच उभे राहत होते. प्रेक्षकांनाही हा अनुभव नक्कीच जाणवेल.”

महाराष्ट्रातील दुर्गम भागात वसलेल्या ‘सालबर्डी’ गावात घडणाऱ्या रहस्यमय घटनांचा थरारक शोध घेणारा ‘सालबर्डी’ हा चित्रपट नेब्यूला फिल्म्सच्या बॅनरखाली साकारण्यात आला आहे. या चित्रपटाची निर्मिती अनिल देवडे पाटील, डॉ. गजानन जाधव आणि राम जाधव यांनी केली असून, चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा रमेश साहेबराव चौधरी यांनी सांभाळली आहे. ‘सालबर्डी’ चित्रपटात पूजा सावंत, शशांक शेंडे, ओंकार भोजने, भारत गणेशपुरे, अंशुमन विचारे, रोहित कोकाटे, कमलाकर सातपुते, चित्तरंजन गिरी, अनिल नगरकर, माधव अभ्यंकर, प्रवीण डाळिंबकर, अभय गिते, राजेंद्र सातार्डेकर, कोमल चौधरी आदि कलाकारांच्या भूमिका आहेत.

JITO Premier League 2026 Franchise Auction Sets New Benchmark for Community Cricket in India

  JITO Premier League 2026 Franchise Auction Sets New Benchmark for Community Cricket in India Mumbai:* The JITO Premier League (JPL) 2026 h...