Monday, August 31, 2026

*अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती, मुंबई आयोजित खुला राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा महोत्सव "नाट्य परिषद करंडक"*

 *अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती, मुंबई आयोजित खुला राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा महोत्सव "नाट्य परिषद करंडक"*


मुंबई - रंगभूमीची मध्यवर्ती संघटना असलेली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती मुंबई आयोजित, अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनानिमित्त सुरू झालेला 'नाट्यकलेचा जागर' भव्य राज्यस्तरीय खुल्या एकांकिका स्पर्धा महोत्सवात सलग तिसऱ्या वर्षी देखील 'नाट्य परिषद करंडक' रूपात आयोजित करण्यात आला आहे असे परिषदेचे अध्यक्ष श्री. प्रशांत दामले यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील कलावंत, नाट्यकर्मींसाठी हा स्पर्धात्मक महोत्सव राज्यस्तरावर आयोजित केला असून या स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील सर्व कलावंतांनी भाग घ्यावा असे आवाहन उपाध्यक्ष (उपक्रम) श्री. भाऊसाहेब भोईर यांनी केले आहे.

मागील वर्षी हा स्पर्धात्मक महोत्सव महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर यशस्वीरित्या सादर झाला. मागील वर्षी २५८ एकांकिका या महोत्सवात सादर झाल्या, अंतिम फेरीत निवड झालेल्या कलावंतांसाठी नाट्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले, नाट्यक्षेत्रातील दिग्गज दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्री यांनी गावोगावी जाऊन हे शिबिर घेतले. यामुळे अंतिम फेरीतील एकांकिका दर्जेदार झाल्या आणि यातून मागील वर्षी नाट्य परिषद करंडक स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त एकांकिका “चिरंजीव परफेक्ट बिघडलाय” या एकांकिकेचे व्यावसायिक नाटकात रूपांतर करून व्यावसायिक रंगभूमीवर हे नाटक सादर करण्यात आले आणि नाटकाचे आजअखेर १०० नाट्यप्रयोग झाले असून त्यातील २५ प्रयोग महाराष्ट्रभारतील नाट्य परिषदेच्या शाखांमध्ये सादर करण्यात आले, अशी माहिती अध्यक्ष श्री. प्रशांत दामले यांनी दिली.

दरवर्षी 'नाट्य परिषद करंडक' ह्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे नाट्य परिषदेच्या नियामक मंडळ व कार्यकारी समितीने ठरविले आहे. तसेच १०० व्या नाट्यसंमेलनानिमित्त सुरू करण्यात आलेला 'नाट्यकलेचा जागर' यातील एकपात्री स्पर्धा, नाट्यअभिवाचन स्पर्धा, नाट्यसंगीत पद गायन प्रवेश स्पर्धा यांचा देखील स्पर्धा महोत्सव घेण्याचा परिषदेचा मानस आहे.

नाट्य परिषद करंडक ही स्पर्धा प्राथमिक, विभागीय व अंतिम फेरी अश्या तीन फेऱ्यांमध्ये होणार आहे. प्राथमिक फेरी सप्टेंबर अखेर विविध केंद्रांवर होऊन यातील निवडक कलाकृतींची विभागीय फेरी तर अंतिम फेरी मुंबई येथे दिनांक २८ ऑक्टोबर २०२६ रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल, मनमाला टँक रोड, माटुंगा - माहीम, मुंबई येथे होणार आहे. 

अंतिम फेरीत निवड झालेल्या कलावंतांसाठी नाट्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. हे शिबिर नाट्यक्षेत्रातील दिग्गज दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्री घेणार असून अंतिम फेरीतील सादरीकरणाचा दर्जा यामुळे सर्वोत्तम असणार आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी एकांकिका स्पर्धा घेण्याचा नाट्य परिषदेचा मानस आहे. ज्या जिल्ह्यातून किमान १० प्रवेशिका येतील त्याठिकाणी स्पर्धेचे केंद्र देण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील सर्व गुणवंत कलाकारांना नाट्यसंमेलनात आपली कला सादर करण्याची संधी या उपक्रमातून मिळणार आहे. तसेच सर्वोत्कृष्ट एकांकिकेका व्यावसायिक रंगभूमीवर व्हावी यासाठी नाट्य परिषद प्रयत्नशील राहणार आहे.

*स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी रोख पारितोषिके*

एकांकिका स्पर्धा सर्वोत्कृष्ट प्रथम रु. १,००,०००/-, 

उत्कृष्ट द्वितीय रु. ७५,०००/-, 

उत्तम तृतीय रु. ५०,०००/, 

दोन उत्तेजनार्थ पारितोषिके रु. १५,०००/-

लेखन/दिग्दर्शन वैयक्तिक रोख पारितोषिके रु. ११,०००/-, रु. ७,०००/-, रु. ५०००/-

स्त्री अभिनय/पुरूष अभिनय वैयक्तिक 

रोख पारितोषिके रु. ७,०००/-, रु. ५,०००/-, रु. ३०००/-

नेपथ्य/प्रकाश योजना/पार्श्वसंगीत/रंगभूषा 

व वेशभूषासाठी वैयक्तिक रोख पारितोषिके रु. ५,०००/-, रु. ३,०००/-, रु. २०००/- देण्यात येणार आहेत. 

या स्पर्धेतील सर्व सहभागी कलावंत, तंत्रज्ञ यांना सहभागपत्र देण्यात येणार आहे. एकांकिकेसाठी प्रवेश फी रु. १०००/- ठेवण्यात आली आहे. या स्पर्धेची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीनेच होणार असून खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून एकांकिका स्पर्धेची माहिती, नियमावली www.natyaparishad.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. स्पर्धेचे प्रवेश अर्ज भरण्याची शेवटची तारीख आणि वेळ दिनांक १८ सप्टेंबर २०२६ आहे. 

स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी ८५९१७०६८८७ या क्रमांकावर संपर्क साधावा. या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी, कलावंतांनी, महाविद्यालय, हौशी संस्था, विद्यापीठाच्या व इतर महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आव्हान नाट्य परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

आपला,

*प्रशांत दामले*

*अध्यक्ष*

निहिलेंटने एआय आधारित भावना ओळखणारे आणि भावनिक आरोग्यासाठी उपयुक्त nSEPIA अॅप लाँच केले

 

इमोस्केप™ तंत्रज्ञानावर आधारित nSEPIA अॅप वापरकर्त्यांना त्यांच्या भावना लगेच समजून घेण्यास मदत करते आणि भावनिक संतुलन राखण्यासाठी प्रत्येक व्यक्तिनुसार योग्य उपाय सुचवते.

मुंबई, 28 ऑगस्ट 2026: जागतिक स्तरावर तंत्रज्ञान आणि कन्सल्टिंग सेवा देणारी कंपनी निहिलेंट लिमिटेडने आज nSEPIA अॅप लॉन्च केल्याची घोषणा केली. हे एआय तंत्रज्ञानावर आधारित अॅप असून, ते लोकांना त्यांच्या भावना ओळखण्यास आणि भावनिक आरोग्य सुधारण्यास मदत करते. हे अॅप रोजच्या जीवनात वापरण्यासाठी तयार करण्यात आले आहे. nSEPIA वापरकर्त्यांना त्या क्षणी त्यांच्या मनाची आणि भावनांची स्थिती समजून घेण्यास मदत करते. त्यानंतर भावना अधिक चांगल्या आणि संतुलित ठेवण्यासाठी व्यक्तीच्या गरजेनुसार योग्य उपाय सुचवते. हे अॅप जगभरात अँड्रॉइड आणि आयओएस (iOS) वर डाउनलोड करता येणार आहे.

nSEPIA चा वापर करणे खूप सोपे आहे. आपल्या भावना समजून घ्या, त्यानुसार योग्य पाऊल उचला आणि त्यानंतर झालेला बदल जाणून घ्या. या अॅपमध्ये वापरकर्त्याला वैयक्तिकृत वेलनेस कंटेंटमधून आपल्या गरजेचा पर्याय स्वतः निवडण्याची गरज नाही. त्याऐवजी, nSEPIA प्रथम त्या वेळची व्यक्तीची भावनिक स्थिती समजून घेते आणि त्यानुसार योग्य उपाय सुचवते.

याचा अनुभव डिव्हाइसच्या कॅमेऱ्याद्वारे छोट्या आणि सोप्या प्रक्रियेपासून सुरू होतो. यामध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा अस्वस्थता होत नाही. इमोशन एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने nSEPIA चेहरा आणि डोळ्यांच्या आसपासच्या सूक्ष्म हालचाली तसेच डोके आणि शरीराच्या वरच्या भागाच्या हालचालींचे विश्लेषण करते. याच्या आधारे अॅप वापरकर्त्याची भावनिक स्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करते. वापरकर्त्याची गोपनीयता जपण्यासाठी ही संपूर्ण प्रक्रिया डिव्हाइसवरच केली जाते. यानंतर nSEPIA व्यक्तीच्या भावनिक स्थितीनुसार संगीत, श्वसनाचे व्यायाम, योग आणि ध्यान यापैकी योग्य पर्याय वैयक्तिक स्वरूपात सुचवते.

सुचवलेली कृती केल्यानंतर वापरकर्ता आपल्या भावनिक स्थितीची पुन्हा तपासणी करू शकतो आणि त्यात झालेला बदल पाहू शकतो. त्यामुळे भावना समजून घेणे, त्यानुसार योग्य पाऊल उचलणे आणि त्यानंतर झालेल्या बदलाचा विचार करणे, अशी सातत्यपूर्ण प्रक्रिया तयार होते. यामुळे लोकांना केवळ आपल्या भावना व्यक्त करण्याऐवजी त्या अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास आणि त्यावर जागरूकपणे काम करण्यास मदत होते.

याच विचारातून nSEPIA चे “इमोशन्स. इन बॅलन्स.” म्हणजेच “भावना संतुलनात” हे संदेशवाक्य देण्यात आले आहे.

nSEPIA च्या लॉन्चबद्दल बोलताना एल.सी. सिंह, संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष, निहिलेंट लिमिटेड म्हणाले, “गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही आपल्या भावना आपल्या विचारांवर, निर्णयांवर, इतरांशी असलेल्या संबंधांवर आणि जीवन जगण्याच्या पद्धतीवर कसा परिणाम करतात, हे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. nSEPIA हीच समज रोजच्या जीवनात आणते. हे अॅप व्यक्तीला त्याच वेळी आपल्या भावना ओळखण्याची संधी देते. केवळ भावना अनुभवत राहण्याऐवजी, भावनिक संतुलनाकडे जाण्यासाठी योग्य पाऊल उचलण्यास मदत करते. या प्रकारे तंत्रज्ञान माणसाच्या विचारांमध्ये किंवा भावनांमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करत नाही, तर व्यक्तीला स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करते. तंत्रज्ञान माणसासाठी अधिक उपयुक्त आणि मानवी बनवणे हा निहिलेंटच्या मोठ्या उद्दिष्टांपैकी एक महत्त्वाचा भाग आहे.”

या उपक्रमाबद्दल बोलताना डॉ. विहंग वाहीया, कन्सल्टंट सायकियाट्रिस्ट आणि प्रोफेसर एमेरिटस ऑफ सायकियाट्री म्हणाले, “भावना या मानवी वर्तनाचा आणि चांगल्या मानसिक आरोग्याचा महत्त्वाचा भाग आहेत. मात्र, आतापर्यंत भावनांचा परिणाम समजून घेणे हे मोठ्या प्रमाणावर व्यक्ती स्वतःच्या भावना किती ओळखू, समजून घेऊ आणि व्यक्त करू शकते, यावर अवलंबून होते. त्यामुळे भावना अधिक अचूक आणि निष्पक्ष पद्धतीने समजून घेण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. निहिलेंट या क्षेत्रात काम करत असल्याने, nSEPIA च्या माध्यमातून ही संकल्पना पुढे नेली जात आहे, हे पाहून आनंद होत आहे. nSEPIA मध्ये व्यक्तीची भावनिक स्थिती समजून घेणे ही पहिली पायरी आहे. त्यानंतर त्या व्यक्तीला अधिक चांगल्या भावनिक संतुलनाकडे जाण्यासाठी योग्य मदत आणि मार्गदर्शन दिले जाते.” 

nSEPIA मध्ये आधुनिक तंत्रज्ञानासोबत भावना संतुलित ठेवण्यासाठी आणि भावनिक आरोग्य सुधारण्यासाठी प्रस्थापित ज्ञान आणि प्रभावी पद्धतींचाही वापर करण्यात आला आहे. यामध्ये संगीतासाठी भारतीय शास्त्रीय राग, पाश्चात्त्य सिम्फोनिक संगीत आणि खास तयार केलेले संगीत असे विविध पर्याय आहेत. ध्यान, श्वसनाचे व्यायाम आणि योगाशी संबंधित अनुभव भारतीय परंपरांवर आधारित आहेत. यामध्ये बी.के.एस. अय्यंगार यांच्या परंपरेने प्रेरित व्यायामांचाही समावेश आहे. या सर्व कृती संबंधित तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आणि मार्गदर्शनानुसार तयार करण्यात आल्या आहेत. याशिवाय, गाइडेड रिफ्लेक्शनच्या (मार्गदर्शित आत्मपरीक्षण) माध्यमातून वापरकर्त्यांना आपल्या मनातील भावना शांतपणे समजून घेण्याची आणि त्यावर विचार करण्याची आणखी एक संधी मिळते.

nSEPIA ला शक्ती देणारे तंत्रज्ञान म्हणजे इमोस्केप™ हे निहिलेंटचे मेडिकल-ग्रेड इमोशन एआय प्लॅटफॉर्म आहे. इमोस्केपमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), कॉम्प्युटर व्हिजन आणि मशीन लर्निंगचा वापर केला जातो. हे निहिलेंटच्या पेटंटद्वारे सुरक्षित असलेल्या तांत्रिक रचनेवर आधारित आहे. या तंत्रज्ञानाची पायाभरणी नाट्यशास्त्रात सांगितलेल्या नवरस सिद्धांतावर आधारित आहे. या प्लॅटफॉर्मच्या क्षमतेची वैज्ञानिक आणि शैक्षणिक संशोधनाच्या माध्यमातूनही चाचणी घेण्यात आली आहे. मानवी भावनांचे अधिक निष्पक्ष पद्धतीने मूल्यांकन करणे हा याचा उद्देश आहे. इमोस्केप हे व्यावसायिक आणि संस्थात्मक वापरासाठी तयार करण्यात आले आहे, तर nSEPIA हे भावना समजून घेणारे तंत्रज्ञान सामान्य लोकांसाठी रोजच्या वापरात उपलब्ध करून देते. 

nSEPIA च्या जागतिक लॉन्चद्वारे निहिलेंटचा उद्देश भावना समजून घेणे आणि त्याबाबत जागरूक होण्याची प्रक्रिया रोजच्या जीवनात सोपी आणि सर्वांसाठी सहज उपलब्ध करून देणे हा आहे. यामागील मुख्य उद्देश लोकांना भावना निर्माण होताच त्या ओळखता याव्यात, त्या समजून योग्य पद्धतीने हाताळता याव्यात आणि आपल्या भावनिक जीवनात अधिक चांगले संतुलन राखता यावे, यासाठी मदत करणे हा आहे.

*Actor Rajat Bedi Enters the Marathi Film Industry*

 *Actor Rajat Bedi Enters the Marathi Film Industry*

*Rajat Bedi to Present Upcoming Marathi Film ‘Bandhu’; Set for Release on November 20*

The growing association of Hindi film personalities with Marathi cinema has been a topic of discussion in recent times. Joining this list is actor Rajat Bedi, who has had a long-standing journey across Hindi and South Indian cinema. Bedi is now set to make his mark in the Marathi film industry as the presenter of the upcoming Marathi film ‘Bandhu’. With this association, the Bedi family’s rich cinematic legacy finds a new connection with Marathi cinema.

The Bedi family, which has a distinguished legacy in the Hindi film industry, will now have its presence felt in Marathi cinema. Rajat Bedi, son of acclaimed filmmaker-producer Narendra Bedi and grandson of renowned Urdu litterateur, screenwriter and filmmaker Rajinder Singh Bedi, is all set to begin a new chapter with Marathi cinema.

Rajinder Singh Bedi enriched Hindi cinema through his writing for acclaimed films such as Madhumati, Abhimaan, Devdas, Ek Chadar Maili Si, Anupama and Satyakam . Rajinder Singh Bedi was also honoured with the ‘Padmashri’ for his significant contribution to Indian cinema. His son, Narendra Bedi, also carved a niche for himself as a successful filmmaker, delivering popular films such as Bandhan, Jawani Diwani, Khotey Sikkay, Benaam, Rafoo Chakkar and Sanam Teri Kasam. Among his notable works were Benaam and Adalat, both of which emerged as blockbusters starring Amitabh Bachchan. Carrying forward the artistic legacy of two stalwarts of Indian cinema, Rajat Bedi is now entering the Marathi film industry, making his association with ‘Bandhu’ a noteworthy new chapter for the family.

Interestingly, this association is more than just the entry of an individual into Marathi cinema. It marks a new chapter in the Bedi family’s long-standing cinematic journey, connecting the next generation of the family with the Marathi film industry.

Presented by Rajat Bedi, JSD Studio, in collaboration with TRIFLIX Entertainment, ‘Bandhu’ is slated to release in theatres on November 20. The film is written and directed by Nitin Sindhuvijay Supekar and produced by Pranav Desai, Juhi Desai and Kuldeep Sunil Ojha.

Rajat Bedi began his career as a model and won the Gladrags Manhunt competition in 1994. He made his acting debut with 2001: Do Hazaar Ek and gained widespread recognition for his role in Koi... Mil Gaya. He went on to feature in several Hindi films including Jodi No. 1, The Hero: Love Story of a Spy, Raqt, Aksar and Partner. Alongside Hindi cinema, Bedi has also worked in Tamil, Telugu, Kannada and Punjabi films. Through Shah Rukh Khan’s son Aryan Khan’s directorial series ‘Bads of Bollywood’ Rajat Bedi has made a powerful comeback to the acting world, with his new innings receiving considerable attention and appreciation. 

In addition to acting, Rajat Bedi has also made significant contributions to film production. His association with ‘Bandhu’ as its presenter therefore represents more than a professional collaboration; it brings his extensive experience across Indian cinema to the Marathi film industry.

Speaking about his Marathi debut, Rajat Bedi said, “For the Bedi family, Indian cinema is not just an industry; it is an inseparable part of our lives. The legacy I have inherited from my father and grandfather is a matter of immense pride for me. Now, with a Marathi film, a new chapter in this journey is beginning. Marathi cinema is known for its strong content and quality storytelling, so being a part of this film is truly special for me. I hope the audience welcomes this new role of mine and the film with the same warmth and love.”

With the Bedi family’s illustrious cinematic legacy and Rajat Bedi’s extensive experience across Indian cinema, his association with ‘Bandhu’ has already generated considerable interest. The Marathi film audience will now be looking forward to witnessing this new chapter unfold on the big screen.

Nihilent Limited announcing the global launch of nSEPIA

Nihilent Limited announcing the global launch of nSEPIA


Nihilent Limited announcing the global launch of nSEPIA, an AI-powered emotion detection and emotional wellness application designed for everyday use. nSEPIA enables individuals to understand their present emotional state and then offers a personalised next step to help them move towards greater emotional balance. The app will be available for download internationally on Android and iOS.

TAJ FORAYS INTO LUXURY BRANDED VILLAS

TAJ FORAYS INTO LUXURY BRANDED VILLAS WITH TAJ MOUNT KUSUR RESORT & VILLAS, LONAVALA DEVELOPED BY AMAVI

MUMBAI, 28 AUGUST 2026: Indian Hotels Company (IHCL), India’s largest hospitality company, today announced the launch of Taj Mount Kusur Resort and Villas in Lonavala, Maharashtra. Developed in partnership with Amavi, India’s only hospitality-backed real estate brand, the project marks Taj’s entry into the luxury branded villa segment.

Mr. Puneet Chhatwal, Managing Director & Chief Executive Officer, IHCL, said, “For over a century, Taj has defined luxury hospitality through its grand palaces, landmark city hotels, safaris and residences. Recognised as the World's Strongest Luxury Hotel Brand and India's Strongest Brand, Taj continues to strengthen its position at the forefront of the luxury hospitality sector. The launch of Taj Mount Kusur Resort & Villas marks our entry into the branded villa segment, broadening our portfolio to address evolving consumer preferences while bringing the trust, service excellence and legacy of the brand to a new category of luxury real estate.”

Spread across a 34-acre estate in the Western Ghats, Taj Mount Kusur Resort and Villas is an integrated luxury development comprising 32 branded villas and a 100-key Taj resort. The project offers panoramic views of the surrounding lake and valley. Inspired by contemporary barn-style architecture, featuring expansive glass façades, spacious verandahs, the villas naturally flow into the surrounding landscape. The development includes a two-acre Wabi-Sabi Central Park inspired by the Japanese philosophy of embracing simplicity and harmony with nature. Residents can enjoy the Miyawaki forest, nature trails, zen gardens, stargazing decks, golf putting greens, a fitness lawn and multi-purpose sports courts. The integrated project also includes Club Amavi offering wellness and recreation facilities, banquet and dining venues.

The branded villas will be offered for sale integrated into the resort inventory through a lease-back programme. Residents will have access to Taj’s renowned hospitality services, including concierge assistance, housekeeping, maintenance and the leisure and wellness amenities of the resort.

Mr. Apurv Kumar, Managing Director, Clarks Group of Hotels and Founder, Amavi, said, “Second homes are bought to create more time — time with family, time in nature and time for oneself. Yet too often, they become another responsibility. At Amavi, our purpose is to change that. Taj Mount Kusur Resort and Villas brings together the privacy and permanence of a home with the care and service of Taj hospitality. Rooted in the Western Ghats, it also reflects our belief that meaningful development must respect the land and create value for the communities around it. We want Mount Kusur to be not merely a property people own, but a place they return to, belong to and come to.”

Mr. Sachin Agrawal and Mr. Bajrang Bararia, Founders, Amavi, said, “With Taj Mount Kusur Resort and Villas, Amavi has sought to create a residential offering that combines design, nature and hospitality. Luxury consumers today are increasingly seeking experiences that combine the privacy of a second home with the services and assurance of a hospitality brand. The project's low-density planning, integrated amenities and professionally managed services are intended to provide homeowners with the privacy of villa ownership and the convenience of a luxury resort. Amavi is pleased to partner with IHCL in bringing this vision to life under the Taj brand.”

Located between Mumbai and Pune, Lonavala is one of Maharashtra’s most established leisure destinations. Known for its scenic valleys, lakes and waterfalls, the hill station continues to attract leisure travellers, wellness seekers and second-home buyers.

Thursday, August 27, 2026

*IndiaFirst Life’s AI-Driven Transformation with Salesforce Agentforce*

 *IndiaFirst Life’s AI-Driven Transformation with Salesforce Agentforce*

Building on its unified Salesforce foundation, IndiaFirst Life is bringing AI agents into critical workflows to improve speed, consistency, and customer experience at scale

 *Mumbai, August 27, 2026*: Salesforce, the #1 Agentic CRM, today announced that IndiaFirst Life Insurance Company Limited (IndiaFirst Life) – a Bank of Baroda subsidiary – has selected Agentforce to advance its enterprise-wide AI transformation. IndiaFirst Life will embed trusted AI agents into critical processes to improve sales, streamline operations and enhance customer experience. The initiative builds on its unified Salesforce platform, which supports the insurance journey from lead generation to claims settlement. This marks the next phase of IndiaFirst Life’s collaboration with Salesforce and reinforces its ambition to build a more intelligent, and customer-centric life insurance experience.

Founded in 2009, IndiaFirst Life serves customers across more than 90% of India's pin codes and continues to expand its distribution reach. To support these priorities, IndiaFirst Life is deploying Agentforce across three priority areas of its business: *new business underwriting, customer service, and claims processing.*

● *New Business Underwriting*: AI agents will review KYCs, financial and medical documents against underwriting guidelines, to flag discrepancies, assess risk, and recommend decisions. This will help accelerate policy issuance while improving consistency, compliance and auditability.

● *Customer Service*: AI agents will classify incoming cases, assess sentiment, and generate compliant responses, helping reduce turnaround times and enabling teams to focus on more complex customer interactions.

● *Claims*: For Micro Insurance and Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana (PMJJBY) products, AI agents will verify documents, identify missing information, and route exceptions for review, helping accelerate claims handling, and improving responsiveness for customers.

 The Agentforce deployment builds on a Salesforce-powered technology ecosystem already embedded across IndiaFirst Life's operations. Agentforce Financial Services serves as the life insurer's core engagement layer, providing sales teams, distributors, and service representatives with a unified customer view. Business Process Management capabilities standardise workflows across new business, underwriting, servicing, and claims. MuleSoft connects UNIFY, IndiaFirst Life's proprietary sales Super App, with Salesforce in real time. Combined with analytics and operational dashboards, this ecosystem enables seamless information flow, operational visibility, and data-driven decision-making.

 *Rushabh Gandhi, Managing Director & CEO, IndiaFirst Life Insurance*, said, “IndiaFirst Life’s digital transformation journey with Salesforce has strengthened sales processes and elevated customer experiences across the value chain. With Agentforce, we are building on this foundation by bringing AI agents into key business processes, enabling faster execution. This will allow our teams to focus on more meaningful customer interactions and areas where human judgment matters most. IndiaFirst Life is deepening its #CustomerFirst commitment by pairing technology with trust and driving innovation responsibly across the organisation.”

 *Arundhati Bhattacharya, President and CEO, Salesforce – South Asia*, said, “IndiaFirst Life is demonstrating how organisations can build an agentic enterprise on a strong digital foundation. By extending Agentforce across an already connected Salesforce environment, the company can extend trusted AI across critical workflows while keeping people at the centre of decisions that require judgment and empathy. We are proud to deepen our collaboration with IndiaFirst Life as it reimagines insurance delivery through enterprise-grade AI."

 

This expanded collaboration will help IndiaFirst Life enhance operational agility, strengthen customer outcomes and support continued innovation as it scales AI across the insurance lifecycle.

*Salesforce, the #1 CRM, powered by AI technology and capabilities.

Wednesday, August 26, 2026

*निलेश नाईक यांचा ‘द्विधा’मधून दिग्दर्शकीय प्रवास*

 *एडिटर ते डिरेक्टर* 

*निलेश नाईक यांचा ‘द्विधा’मधून दिग्दर्शकीय प्रवास*

संकलक चित्रपटाच्या प्रत्येक दृश्याला एकमेकांशी जोडत कथेला आकार देतो आणि हीच दृश्यांची साखळी जोडता-जोडता संपूर्ण चित्रपट दिग्दर्शित करण्याचं स्वप्न दिग्दर्शक निलेश नाईक यांनी पाहिलं. अनुभव, मेहनत आणि सर्जनशीलतेच्या जोरावर त्यांनी हे स्वप्न आता प्रत्यक्षात साकारलं आहे. एडिटिंगच्या बारकाव्यांपासून दिग्दर्शनाच्या व्यापक कॅनव्हासपर्यंतचा त्यांचा प्रवास ‘द्विधा’च्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे.

निर्णयांच्या उंबरठ्यावर उभं राहिल्यावर निर्माण होणारी मानसिक घालमेल आणि स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करण्याची धडपड अशा भावनिक पैलूंना स्पर्श करणारी ‘द्विधा’ची कथा प्रेक्षकांना एका वेगळ्या अनुभवाची अनुभूती देणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला ‘उत्तम ट्रेलर’ म्हणत अनेकांनी कौतुकाची थाप दिली आहे. चित्रपटात सतीश पुळेकर, मानसी कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका असून त्यांच्यासोबत रेणुका दफ्तरदार, निमिष कुलकर्णी, आस्ताद काळे, तन्वी कुलकर्णी, पुष्कर सराड, मनोज कोल्हटकर, भूषण कडू, प्रफुल्ल सावंत, हेमांगी वेळणकर आणि ओवी तानवडे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ४ सप्टेंबरला ‘द्विधा’ महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

तब्बल १८ वर्षांहून अधिक काळ मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रात कार्यरत असलेल्या निलेश नाईक यांनी २००१ मध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. वरिष्ठ ऑफलाइन एडिटर आणि प्रोमो डायरेक्टर म्हणून काम केल्यानंतर त्यांनी स्वतःची स्पिनिंग व्हील प्रॉडक्शन्स ही निर्मिती संस्था सुरू केली. हिंदी तसेच प्रादेशिक चित्रपटसृष्टीतील अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांवर त्यांनी काम केले असून, ‘ब्लॅक’, ‘दस’, ‘माय नेम इज खान’, ‘सावरिया’ आणि ‘रा.वन’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांच्या प्रमोशनल कामाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. चित्रपट प्रमोशनसोबतच कॉर्पोरेट फिल्म्स आणि विविध आघाडीच्या ब्रँड्सच्या जाहिरात मोहिमांमध्येही त्यांनी योगदान दिले आहे.

निलेश नाईक यांच्या सर्जनशील कामाची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेण्यात आली आहे. त्यांच्या उल्लेखनीय प्रमोशनल कामासाठी त्यांना ‘प्रोमॅक्स एशिया २००४’ आणि ‘प्रोमॅक्स वर्ल्डवाइड २००५’ असे दोन प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत.त्यांच्या सर्जनशील प्रवासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे ‘वो पल दोज लव्हली मोमेंट्स’ हा लघुपट. या लघुपटाने भारतासह आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध पुरस्कार पटकावले आहेत.


एडिटिंगमधून कथेला आकार देण्यापासून ते दिग्दर्शक म्हणून संपूर्ण कथा पडद्यावर उभी करण्यापर्यंतचा निलेश नाईक यांचा प्रवास ‘द्विधा’मधून नव्या वळणावर पोहोचला आहे. दीर्घ अनुभवातून आलेली दृष्टी, सिनेमाच्या भाषेची जाण आणि मानवी भावविश्वाकडे पाहण्याची संवेदनशील नजर यामुळे ‘द्विधा’ चित्रपट त्यांच्या दिग्दर्शकीय कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

*अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती, मुंबई आयोजित खुला राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा महोत्सव "नाट्य परिषद करंडक"*

 *अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती, मुंबई आयोजित खुला राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा महोत्सव "नाट्य परिषद करंडक"* मुंबई - रं...