Thursday, February 19, 2026

‘शतक’मधून डॉ. हेडगेवार यांच्या प्रेरणादायी प्रवासाला उजाळा : आरएसएस प्रमुख मोहन भागवत

 ‘शतक’मधून डॉ. हेडगेवार यांच्या प्रेरणादायी प्रवासाला उजाळा : आरएसएस प्रमुख मोहन भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त तयार होत असलेल्या ‘शतक’ या चित्रपटाबाबतची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. नवी दिल्लीतील केशव कुंज येथे नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी या चित्रपटाविषयी आपले विचार मांडले. त्यांनी या चित्रपटाला केवळ एक सिनेमॅटिक कलाकृती नव्हे, तर एका वैचारिक प्रवासाचे जिवंत चित्रण असे संबोधले.

डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या जीवनावर प्रकाश टाकत ते म्हणाले, “ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक होते आणि राष्ट्रसंघटन व सामाजिक जागृतीसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण केले. त्यांचे जीवन त्याग, शिस्त आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या अढळ भावनेचे प्रतीक होते.”

ते पुढे म्हणाले, “‘शतक’ या चित्रपटाच्या माध्यमातून डॉ. हेडगेवार यांच्या जीवनातील विविध प्रेरणादायी प्रसंग सादर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, चित्रपटातील एका गाण्यात त्यांच्या बालपणातील एक हृदयस्पर्शी प्रसंग सुंदररित्या उलगडण्यात आला आहे, ज्याने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला ताकद आणि निर्धार दिला.” तसेच त्यांनी चित्रपटाशी संबंधित संपूर्ण कलाकार, निर्माते आणि सहकाऱ्यांचे अभिनंदन व आभार मानले.

आरएसएसच्या १०० वर्षांच्या प्रवासाला समर्पित असलेला ‘शतक’ हा चित्रपट २० फेब्रुवारी रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

नाचा दणाना’वर थिरकणार महाराष्ट्र! ‘सुपर डुपर’मधील जल्लोषमय गाणे प्रदर्शित

              ‘नाचा दणाना’वर थिरकणार महाराष्ट्र!                 ‘सुपर डुपर’मधील जल्लोषमय गाणे प्रदर्शित 

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या जोरदार चर्चेत असलेल्या ‘सुपर डुपर’ या आगामी चित्रपटातील ‘नाचा दणाना’ हे गाणे प्रदर्शित होताच चांगलेच व्हायरल होत आहे. हळदीचे हे गाणे धमाल संगीत, भव्य सजावट आणि उत्साहाने भरलेल्या सादरीकरणामुळे पाहाताक्षणीच थिरकायला भाग पडणारे आहे. यात ललित प्रभाकर आणि विदुला चौगुले यांची जोडी विशेष उठून दिसत आहे तर त्यांच्या जोडीला ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत, शशांक शेंडे, हृषिकेश जोशी, नम्रता संभेराव, कुशल बद्रिके आणि प्रतीक्षा कोते या जबरदस्त कलाकारांचा जल्लोष अधिकच रंगत आणत आहे.  समीर आशा पाटील, यांचे बोल लाभलेल्या या गाण्याला अभिनव जगताप यांचे उत्स्फूर्त संगीत लाभले आहे. तर आदर्श शिंदे आणि आनंदी जोशी यांच्या आवाजाने या गाण्यात अफलातून एनर्जी आणली आहे. 

कौटुंबिक महासोहळा अशी या चित्रपटाची टॅगलाईन असल्याने ‘नाचा दणाना’मध्ये संपूर्ण कुटुंबाचा जल्लोष पाहायला मिळतोय. गाण्यात घरातील प्रत्येक सदस्य एकत्र येऊन आनंद साजरा करताना दिसतो. कुटुंबातील बॅाण्डिंग, एकमेकांवरील प्रेम आणि एकत्र येण्याचा उत्साह या गाण्यातून सुंदरपणे उलगडतो. त्यामुळेच चित्रपटाच्या नावाप्रमाणे हे गाणेही ‘सुपर डुपर’ हिट ठरण्याच्या मार्गावर आहे.

प्रत्येक कलाकाराची ऊर्जा, नृत्य आणि रंगतदार वेशभूषा यामुळे हे गाणे अधिकच आकर्षक बनले आहे. विशेष म्हणजे, या गाण्यातील हुक स्टेप इतकी भन्नाट आहे की, ती लवकरच ट्रेंडिंग होणार, याची चाहत्यांना खात्री आहे. लग्नसमारंभात ‘नाचा दणाना’वर नाचल्याशिवाय कार्यक्रम पूर्णच होणार नाही, असे चित्र सध्या हे गाणे पाहून दिसतेय.

चित्रपटाचे दिग्दर्शक समीर आशा पाटील म्हणतात, ‘’ ‘नाचा दणाना’ हे गाणे चित्रपटातील एक खास क्षण साजरा करते. नात्यांमधला आनंद, उत्साह आणि एकत्र येण्याची भावना या गाण्यातून अधोरेखित होते. कथा ज्या उंचीवर पोहोचते, त्या क्षणाला साजेशी ऊर्जा आम्ही या गाण्यातून व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रेक्षकांना हे गाणे नक्की आवडेल, याची मला खात्री आहे.”

झी स्टुडिओजची प्रस्तुत, नाईंटी नाईन प्रॉडक्शन्स तथा सिद्धिविनायक प्रॉडक्शन्सची निर्मित आणि समीर आशा पाटील दिग्दर्शित 'सुपर डुपर‘चा हा कौटुंबिक महासोहळा येत्या ३ एप्रिल रोजी रंगणार आहे. या चित्रपटाचे विजय शिंदे आणि नरेश बोर्डे निर्माते आहेत. तर उमेश कुमार बन्सल, बवेश जानवलेकर प्रस्तुतकर्ता आहेत.

प्रतिमा आणि वास्तव यामध्ये दरी निर्माण झाली आहे- नितीन गडकरी* *संघ समजून घेण्यासाठी ‘शतक’ पाहाण्याचे आवाहन*

प्रतिमा आणि वास्तव यामध्ये दरी निर्माण झाली आहे-               नितीन गडकरी. संघ समजून घेण्यासाठी.           ‘शतक’ पाहाण्याचे आवाहन*

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी ‘शतक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के १०० वर्ष’ या चित्रपटाबद्दल म्हणाले, हा चित्रपट म्हणजे भारताच्या राष्ट्रनिर्मितीच्या कमी परिचित अध्यायाची सिनेमॅटिक झलक आहे. संघाच्या कार्याबाबत चर्चा होत असली तरी प्रतिमा आणि वास्तव यामध्ये अनेकदा अंतर राहिले असल्याचे त्यांनी नमूद केले.

लोकांना संघ अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा चित्रपट पाहाण्याचे आवाहन करत गडकरी म्हणाले, ‘’एक स्वयंसेवक म्हणून मला अनेकदा असे वाटते की, प्रतिमा आणि वास्तव किंवा समज आणि प्रत्यक्ष सत्य यामध्ये अंतर राहिले आहे. दुर्दैवाने हे संघाबाबत घडले आहे. मी आपण सर्वांना आवाहन करतो की, जवळ या, संघाची विचारधारा जाणून घ्या आणि त्याग, समर्पण व देशभक्तीची भावना समजून घ्या.’’

ते पुढे म्हणाले, ‘’मी रस्ते, पूल, एक्सप्रेसवे आणि बोगदे यांवर काम केले. मी अभियंता नव्हतो, ना मला आधीचा अनुभव होता. लोक विचारतात हे कसे शक्य झाले? मी सांगतो, मी संघाचा स्वयंसेवक आणि विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता आहे. या संस्थांकडून मिळालेल्या मूल्यांनीच मला मार्गदर्शन केले आणि त्यामुळेच मी हे कार्य करू शकलो.’’

शतकपूर्ती वर्ष साजरे करण्याबाबत ते म्हणाले, ‘’आपण सर्वांनी एकत्र येऊन हे शताब्दी वर्ष साजरे करावे, संघाला समजून घ्यावे आणि त्याची विचारधारा आपल्या जीवनात स्वीकारावी. हा चित्रपट जरूर पाहावा आणि संघ समजून घेण्याचा प्रयत्न करावा, अशी माझी नम्र विनंती आहे.”

संघाबद्दल बोलताना गडकरी म्हणाले, ‘’ या १०० वर्षांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने लाखो तरुणांना देशभक्ती आणि राष्ट्रनिर्मितीची प्रेरणा दिली आहे. मला अभिमान आहे की, मीसुद्धा त्या स्वयंसेवकांपैकी एक लहानसा कार्यकर्ता आहे ज्याला ही प्रेरणा मिळाली.”

ते पुढे म्हणाले, ‘’त्यांच्या समर्पणामुळे आज आपण ही ऐतिहासिक १०० वर्षे साजरी करत आहोत. मात्र कार्य अजून अपूर्ण आहे. भारताला जगातील अग्रगण्य राष्ट्र बनवणे, हे आमचे ध्येय आहे. सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रत्येक क्षेत्रात देशाला सर्वोच्च स्थानावर नेण्यासाठी आम्ही कार्य करणार आहोत.’’

दलित, वंचित आणि गरजू घटकांबद्दल बोलताना नितीन गडकरी म्हणाले, ‘’ गरीबी, भूक आणि बेरोजगारीशी झुंजणाऱ्या समाजघटकांचे जीवन बदलण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आपण भारतीय आहोत आणि हिंदुत्व ही आपली भारतीय ओळख आहे. भारतीय ओळख म्हणजे हिंदुत्व. ही आपल्या पूर्वजांकडून मिळालेली सनातन सांस्कृतिक परंपरा आहे. हिंदुत्व जातीय किंवा सांप्रदायिक नाही आणि ते कोणत्याही एका धर्माशी जोडलेले नाही. ते एक जीवनपद्धती आहे. सर्व धर्मांचे लोक भारतीय असू शकतात, कारण भारतीय ओळख आपल्या इतिहास, संस्कृती आणि परंपरेत रुजलेली आहे. हीच प्रेरणा संघाने आम्हाला दिली आहे.’’

‘शतक: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के १०० वर्ष’ हा चित्रपट संघाच्या विचारप्रवाहाचा प्रवास, सामाजिक उपक्रम आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या राष्ट्रसेवेचा मागोवा घेणारा आहे. नुकताच प्रदर्शित झालेला ट्रेलर सध्या चर्चेचा विषय ठरला असून चित्रपट २० फेब्रुवारी २०२६ रोजी देशभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

Apollo Hospitals Navi Mumbai Launches Precision Oncology Clinic to Deliver Personalised, Genomics-Led Cancer Care

Apollo Hospitals Navi Mumbai Launches Precision Oncology Clinic to Deliver Personalised, Genomics-Led Cancer Care

Navi Mumbai | 18th January 2025: Apollo Hospitals Navi Mumbai today announced the launch of its Precision Oncology Clinic, a first-of-its-kind programme designed to deliver deeply personalised cancer treatment based on a patient’s genomic profile, biomarker subtype, age, comorbidities, lifestyle factors, and individual treatment goals.

In an era where the same cancers can behave in markedly different ways in different patients, the traditional ‘one-size-fits-all’ approach is no longer sufficient. Precision Oncology enables clinicians to identify the most effective drug, anticipate treatment-related toxicity, and customise therapy to maximise efficacy while minimising side effects.

Speaking on the launch, Dr. Jyoti Bajpai Lead Consultant, Medical and Precision Oncology, Apollo Hospitals Navi Mumbai, said, “Genomics tells us not just what cancer a patient has, for example, breast cancer, but also the type and subtype based on the genetics. Breast cancer can be Luminal A, Luminal B, Triple-negative, or HER2 type, with each type varying in aggressiveness and responding differently to therapies.

“The Precision Oncology Clinic allows us to reach this more precise diagnosis and treat the patient with a more personalised treatment strategy. We can select the most effective drug for that cancer type, at the right dose for the right patient, and even predict complications before they occur. This is no longer the future of oncology; this is oncology today.”

Adding to this, Mr. Arunesh Punetha, Regional CEO – Western Region, Apollo Hospitals, shared, “Precision Oncology allows us to move beyond a one-size-fits-all approach, ensuring every patient receives care tailored to their disease, biology, age, gender, profession, preferences, and life circumstances.”

The Precision Oncology Clinic at Apollo Hospitals Navi Mumbai offers genomics-driven cancer care with advanced molecular science, clinical expertise, and a patient-focused approach. Patients receive comprehensive genomic profiling, including next-generation sequencing, to detect actionable mutations and pathway changes.

Therapeutic strategies use targeted agents and precision medicines to maximise effectiveness and minimise side effects. All cases are reviewed by a multidisciplinary tumour board, including oncologists, pathologists, genetic counsellors, radiologists, and support specialists, ensuring evidence-based, consensus-driven decisions.

The launch of the Precision Oncology Clinic underscores Apollo Hospitals’ commitment to excellence, research, and technology-enabled healthcare. By integrating genomic science with multidisciplinary expertise, it aims to redefine cancer treatment standards and deliver more predictable, safer, outcome-focused therapy for patients.

Saturday, February 14, 2026

नात्यांच्या सूक्ष्म छटांना सूर देणारं ‘तिघी’मधील ‘शारदा सरिता’ गाणं प्रदर्शित

 नात्यांच्या सूक्ष्म छटांना सूर देणारं ‘तिघी’मधील ‘शारदा सरिता’ गाणं प्रदर्शित

भारती आचरेकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गाणे प्रेक्षकांच्या भेटीस 


‘तिघी’ या चित्रपटाने आधीच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. नात्यांची गुंतागुंत आणि भावनिक प्रवास यांचा सखोल वेध घेणाऱ्या या चित्रपटातील ‘हास जराशी’ हे पहिले गाणे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले. त्यानंतर आता चित्रपटातील आणखी एक संवेदनशील आणि भावस्पर्शी गाणे ‘शारदा सरिता’ प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधत हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, आई–मुलीच्या नात्याचा हळुवार आणि भावनिक प्रवास मांडणारे हे गाणे प्रत्येक आईसाठी आणि प्रत्येक मुलीसाठी खास ठरणारे आहे.

प्रतिभावान अभिनेता-कवी जितेंद्र जोशी यांनी लिहिलेल्या या गाण्याचे शब्द अत्यंत काव्यमय असून निलेश मोहरीर यांनी दिलेल्या सुरेल आणि मृदू संगीतामुळे गाण्याला शांत, प्रवाही असा भाव लाभला आहे. तसेच प्रियंका बर्वे यांच्या आवाजाने या गाण्याला अधिक भावनिक उंची मिळाली आहे. शब्द, सूर आणि गायन यांचा सुंदर मेळ साधणारे ‘शारदा सरिता’ हे गाणे मनाला स्पर्शून जाते. आईच्या नजरेतून मुलीकडे आणि मुलीच्या मनातून आईकडे पाहाण्याचा कोमल भाव या गीतातून अनुभवायला मिळतो.

गीतकार जितेंद्र जोशी म्हणतात, ‘’ ‘शारदा सरिता’ लिहिताना शब्दांची जुळवाजुळव करण्यापेक्षा भावनांची जुळवाजुळव अधिक महत्त्वाची वाटली. हे गाणं मोठ्या, ठळक भावना मांडत नाही, तर हळूच मनात शिरणाऱ्या, आत खोलवर रुजणाऱ्या भावना सांगतं. आयुष्यातील नाती, त्यांची ताकद आणि स्वीकार यांचा एक प्रवाही अनुभव शब्दांतून मांडण्याचा प्रयत्न केला. शब्द नदीसारखे वाहते असावेत, ही भावना मनात होती आणि त्यातूनच ‘शारदा सरिता’ आकाराला आलं.’’

दिग्दर्शिका जीजिविषा काळे म्हणतात, ‘’ ‘तिघी’ हा चित्रपट नात्यांच्या न बोलल्या जाणाऱ्या भावना आणि सूक्ष्म घालमेल टिपणारे आहे. ‘शारदा सरिता’ हे गाणं केवळ कथानकाचा भाग नाही, तर तो एक भावनिक प्रवास आहे. आयुष्यात येणाऱ्या शांत, तरीही खोलवर परिणाम करणाऱ्या क्षणांना हे गाणं स्वर देतं. विशेषतः आई आणि मुलीमधील नात्याची हळवी, मजबूत वीण या गीतातून अधिक अधोरेखित होते. या गाण्यामुळे प्रेक्षक पात्रांच्या मनोविश्वाशी अधिक घट्टपणे जोडले जातील, असा विश्वास आहे.”

‘तिघी’मध्ये भारती आचरेकर, सोनाली कुलकर्णी आणि नेहा पेंडसे बायस यांच्या प्रमुख भूमिका असून सुप्री मीडिया प्रस्तुत आणि कोक्लिको पिक्चर्स निर्मित ‘तिघी’ हा चित्रपट येत्या ६ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जीजिविषा काळे दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती निखिल महाजन, सुहृद गोडबोले, स्वप्निल भंगाळे, नेहा पेंडसे बायस यांनी केली आहे.

Maharashtra Hosts IDSA Mahavikas 2026; a Government, Industry & Consumer Dialogue in Mumbai

Maharashtra Hosts IDSA Mahavikas 2026; a Government, Industry & Consumer Dialogue in Mumbai

 

Mumbai, 13 February 2026 - Maharashtra today witnessed the convergence of senior government dignitaries, consumer commission members, industry leaders and women direct sellers and Self Help Groups representing MAVIM at Mahavikas 2026, organised by the Indian Direct Selling Association (IDSA) in collaboration with the Department of Food, Civil Supplies and Consumer Protection, Government of Maharashtra, at the Y.B. Chavan Centre.

The conference focused on strengthening consumer awareness, reinforcing ethical business practices and promoting women’s entrepreneurship in the direct selling sector.

India’s direct selling industry continues to demonstrate steady growth. As per IDSA’s Annual Survey FY 2023–24, the sector recorded total sales of ₹22,142 crore in FY 2023–24, marking a 4.04 percent rise over the previous year, and currently supports over 88 lakh direct sellers across the country, including close to 39 lakh women. Maharashtra has emerged as the largest contributor to this growth, with ₹2,879 crore in sales and a 13 percent share of the national market. Over 10 lakh active direct sellers in the state earn their livelihoods through the sector, positioning Maharashtra at the forefront of industry expansion and accountability.

The conference featured focused deliberations on regulatory frameworks, grievance redressal mechanisms and responsible business conduct. A key session titled “Smart Consumers, Strong Markets” highlighted practical guidance on evaluating direct selling platforms and consumer protection measures. Amongst the panelists, Hon. Smt. Vandana Mishra, President, District Consumer Disputes Redressal Commission; Advocate Shri Uday Warunjikar, Member, Consumer Lawyers Association, Mumbai shared their views. Another session , “Empowering Women through Entrepreneurship,” showcased journeys of women direct sellers and MAVIM Self-help groups building sustainable livelihoods across communities, recognising these women for their achievements, through awards.

Shri Anil Diggikar, Additional Chief Secretary, Department of Food, Civil Supplies and Consumer Protection, Maharashtra, noted, “Regulations deliver real impact only when they are effectively implemented on the ground. Consumers must be aware of their rights, and companies must be accountable for their conduct. When this balance is achieved, the marketplace becomes safer, more transparent, and more credible for all stakeholders.

” Ms. Aprajita Sarcar, Vice Chairperson, Indian Direct Selling Association, said, “True growth is not defined by scale alone, but by trust. A fair and transparent ecosystem is especially empowering for women—it instils confidence, encourages entrepreneurship, and enables them to build sustainable sources of income with the right support system in place.”

Amongst the industry leaders, Ms Soma Maitra, COO, Modicare; Dr. Abraham Lee, CEO / MD, Atomy India ; Dr Ratnesh Lal, Chairperson, IDSA and Mr Vivek Katoch, Treasurer, IDSA also shared their insightful views at the event. Mahavikas 2026 concluded with a joint commitment to strengthen consumer awareness, ethical practices, and women’s entrepreneurship. It reinforced that the future of direct selling in Maharashtra will be built on trust and transparency.

अजय देवगण ‘शतक’साठी निवेदकाच्या भूमिकेत !ट्रेलर प्रदर्शित

अजय देवगण ‘शतक’साठी निवेदकाच्या भूमिकेत !ट्रेलर प्रदर्शित


शतक - संघ के १०० वर्ष’ या चित्रपटाचा बहुप्रतीक्षित ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून या ट्रेलरला बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगण यांच्या प्रभावी आवाजाची साथ लाभली आहे. त्यांच्या भारदस्त आवाजामुळे चित्रपटाची पहिलीच झलक अतिशय प्रभावी ठरत आहे. यावरून चित्रपटाची भव्यता, भावना आणि गंभीरता यांचा अंदाज येतो.

त्याग, चिकाटी आणि राष्ट्रप्रथम या मूल्यांवर आधारलेला हा ट्रेलर गुरुजी मा. स. गोळवलकर यांच्या संघाच्या चिरंतन विचारांवर आधारित शतकीय प्रवासाचा मागोवा घेतो. विविध दस्तऐवजीकरणावर आधारलेला हा चित्रपट इतिहासातील काही न सांगितलेल्या अध्यायांकडे एका दृष्टिकोनातून पाहाण्याचा प्रयत्न करतो. भगव्या रंगाच्या प्रभावी प्रतीकातून ही संकल्पना अधिक ठळकपणे मांडण्यात आली आहे.

चित्रपटाचा भाग असल्याबद्दल अजय देवगण म्हणाले, ‘’राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शंभर वर्षांच्या प्रवासाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. एक शतक हे केवळ कालगणनेतील टप्पा नसून, ते पिढ्यान् पिढ्यांच्या बांधिलकी, त्याग आणि राष्ट्रनिर्मितीतील योगदानाचे प्रतीक आहे. या शंभर वर्षांत संघाने सेवा, एकात्मता आणि सांस्कृतिक ओळख यांविषयीच्या चर्चांना आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ‘शतक’ या दीर्घ प्रवासावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो. माझ्यासाठी या कथेला आवाज देणे हा खरोखरच सन्मान आहे. ही केवळ एका संस्थेची गोष्ट नाही, तर एका विचाराची कथा आहे, जी काळाच्या ओघात अनेक आव्हानांना सामोरे जात ठामपणे उभी राहिली. जिद्द, श्रद्धा आणि सामूहिक ध्येय यांविषयी बोलणाऱ्या या कथेला माझा आवाज देणे ही अत्यंत अर्थपूर्ण अनुभूती आहे.’’

पॅनोरमा यांच्या सहयोगाने निर्मित या चित्रपटाची निर्मिती वीर कपूर यांनी केली असून, दिग्दर्शन आशिष मल्ल यांचे आहे. सह-निर्माते आशिष तिवारी आहेत. ‘शतक’ २० फेब्रुवारी २०२६ रोजी देशभर प्रदर्शित होणार आहे.





‘शतक’मधून डॉ. हेडगेवार यांच्या प्रेरणादायी प्रवासाला उजाळा : आरएसएस प्रमुख मोहन भागवत

  ‘शतक’मधून डॉ. हेडगेवार यांच्या प्रेरणादायी प्रवासाला उजाळा : आरएसएस प्रमुख मोहन भागवत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त तय...