Thursday, April 23, 2026

The Board of Directors of Union Bank of India today approved the accounts of the Bank for the Quarter/Year ended March 31, 2026.

 The Board of Directors of Union Bank of India today approved the accounts of the Bank for the Quarter/Year ended March 31, 2026.

Key Highlights in FY26

Board of Directors have recommended a dividend of Rs. 5.00 per equity share (50% of face value of Rs.10 per equity share) for the year ended March 31, 2026 subject to requisite approvals.

Financial Performance: 

Net Profit of the Bank stood at Rs. 18,697 Crores during FY26. Interest income of Bank stood at Rs. 1,05,992 Crores during FY26.

Business Growth:

Total Business of the Bank increased by 5.78% YoY, wherein Gross Advances increased by 9.74% YoY & Total Deposit grew by 2.72% YoY. Bank has a total Business of Rs. 23,85,502 Crores as on March 31, 2026.

Deposit Growth: 

Global deposits have increased by 2.72% YoY. Bank now has total deposits base of Rs. 13,06,891 Crores as on March 31, 2026.

Growth in Retail, Agri and MSME (RAM) segments:

RAM Segment of the Bank increased by 12.56% YoY, with in which 16.75% growth in Retail and 18.75% growth in MSME advances is achieved on YoY basis. RAM advances as a percent of Domestic Advances stood at 57.49%.

Reduction in NPA: 

Gross NPA (%) reduced by 78 bps on YoY basis to 2.82% and Net NPA (%) reduced by 15 bps on YoY basis to 0.48% as on 31.03.2026. 

Strong Capital Ratios:

CRAR stood at 18.10% as on 31.03.2026. CET-1 ratio improved from 14.98% as on 31.03.2025 to 15.69% as on 31.03.2026.

Returns:

Bank’s Return on Assets & Return on Equity stands at 1.25% and 15.86% respectively during FY26.


Wednesday, April 22, 2026

*‘वऱ्हाड निघालं लंडनला’ चा ६०० वा प्रयोग ठरला अविस्मरणीय*

 *संदीप पाठक यांच्यावर मित्रांकडून प्रेमाचा वर्षाव*

वऱ्हाड निघालं लंडनला’ चा ६०० वा प्रयोग ठरला अविस्मरणीय

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात ‘वऱ्हाड निघालं लंडनला’ या लोकप्रिय एकपात्री नाटकाचा ६०० वा प्रयोग उत्साहपूर्ण वातावरणात आणि प्रेक्षकांच्या दणदणीत प्रतिसादात पार पडला. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर टाळ्यांच्या कडकडाटात रंगलेला हा विशेष प्रयोग एका अनोख्या सरप्राईजमुळे अधिकच भावनिक आणि संस्मरणीय ठरला.

अभिनेता संदीप पाठक यांना त्यांच्या बालवाडीपासूनच्या जिवलग मित्रांनी दिलेलं खास सरप्राईज हा या सोहळ्याचा केंद्रबिंदू ठरला. मिलिंद कुलकर्णी, निलेश चांडक, डॉ. सुशील मुगडिया, सुशील जेठलिया, अॅड. वर्षा मुंदडा, डॉ. प्रसाद देशमुख आणि संजय सावंत या संदीपच्या सर्व मित्रांनी एकत्र येत विमानाचं भव्य कटआऊट तयार केलं होतं. नाट्यगृहात प्रवेश करतानाच जणू विमानात चढत आहोत, असा अनोखा अनुभव देणारी आकर्षक सजावट करण्यात आली होती. रेड कार्पेटसह केलेल्या या खास मांडणीमुळे वातावरण अधिकच उत्साही बनले. रांगोळी, सनई-चौघडे आणि प्रेक्षकांना अत्तर लावून स्वागत अशा पारंपरिक पद्धतीने संपूर्ण वातावरण उत्सवमय झालं होतं. यावेळी केक कटिंगसोबतच शाल-श्रीफळ देऊन अभिनेता संदीप पाठक तसेच नाट्यनिर्माते संदीप सोनार आणि समीर हंपी या निर्मात्यांचा सन्मान करण्यात आला.

या अनपेक्षित सन्मानाने भारावलेल्या संदीप पाठक यांनी भावना व्यक्त करत सांगितलं, ‘आयुष्यात मी खरंच काही कमावलं असेल, तर ती माणसं आहेत. मित्र-मैत्रिणी, कुटुंब आणि सहकाऱ्यांच्या साथीनं हा प्रवास शक्य झाला. आजच्या धावत्या जगात असं मनापासूनचं सरप्राईज मिळणं म्हणजे आयुष्यभर जपण्यासारखी आठवण आहे’ प्रकाशझोतात दिसणाऱ्या प्रत्येक यशामागे अनेक अनामिक हातांचा वाटा असतो, याची जाणीव करून देणारा हा सोहळा ‘वऱ्हाड निघालं लंडनला’च्या यशात आणखी एक सुवर्णक्षण ठरला.

ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. लक्ष्मण देशपांडे यांनी गाजवलेलं ‘वऱ्हाड’ हे एकपात्री नाटक गेली अनेक वर्षं मराठी रंगभूमीवर रसिकांचं मन जिंकत आहे. अभिनेता संदीप पाठक यांनी या नाटकाला नव्या पिढीपर्यंत पोहोचवत महाराष्ट्रभर यशस्वी प्रयोग सादर केले आहेत. अस्सल मराठवाडी बोली, बावन्न व्यक्तिरेखांचा बहारदार आविष्कार, भिन्न आवाजांची रंगत आणि प्रचंड ऊर्जेनं साकारलेलं हे नाटक आजही तितकंच टवटवीत आणि प्रेक्षकप्रिय ठरत आहे.

संत तुकाविप्र’ साहित्याचा आध्यात्मिक ठेवा सज्ज; अभंग चित्रफीत आणि माहितीपटाचे लोकार्पण*

 ‘संत तुकाविप्र’ साहित्याचा आध्यात्मिक ठेवा सज्ज; अभंग चित्रफीत आणि माहितीपटाचे लोकार्पण.

महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. या भूमीत विविध संतांनी आपल्या कार्यातून समाजाला दिशा दिली आणि आजचा महाराष्ट्र घडवण्यात मोलाचा वाटा उचलला. संतांच्या प्रेरणेतून अनेक विधायक चळवळी उभ्या राहिल्या. भारतीय संत परंपरा ही समाजव्यवस्थेचा भक्कम कणा असून, संतांचे खरे कार्य त्यांच्या जीवनकथांपेक्षा त्यांच्या साहित्यामधून अधिक प्रभावीपणे उलगडते.

प्रत्येक संताने भक्तिमार्गातून आपले योगदान दिले असले तरी आजही अनेक संतांचे कार्य आणि विचार समाजापर्यंत पुरेशा प्रमाणात पोहोचलेले नाहीत. ‘संत तुकाविप्र’महाराज हे अशाच थोर संतांपैकी एक. संत एकनाथ महाराजांच्या शिष्यपरंपरेतील हे महान सत्पुरुष होते. त्यांच्या अभंगांमधून भक्तिमार्ग हा आत्मसाक्षात्काराचा सर्वोत्तम मार्ग असल्याची जाणीव होते. वारकरी संप्रदायाशी निष्ठा ठेवून त्यांनी अध्यात्म, भक्ति आणि समाजप्रबोधनाचा संदेश दिला.

महाराष्ट्राचे संतसाहित्य हे अमूल्य सांस्कृतिक संचित आहे. मात्र ‘संत तुकाविप्र’ महाराजांचे साहित्य आजही व्यापक स्तरावर पोहोचलेले नाही. ही उणीव भरून काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सहकार्यातून ‘संत तुकाविप्र’ साहित्य प्रचार आणि प्रसार या प्रकल्पातंर्गत त्यांच्या अभंगांची चित्रफीत आणि त्यांच्या जीवनावर आधारित माहितीपटाचा प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झाला. ‘संत तुकाविप्र’ यांच्या जीवनकार्यावर आधारित मोबाईल अ‍ॅपचेही यावेळी उद्घाटन करण्यात आले. त्यांच्या समृद्ध साहित्य संपदेचा ठेवा लवकरच पुस्तकरूपाने वाचकांच्या भेटीला येणार आहे ‘संत तुकाविप्र’ संस्थान अंजनवती यांचे सहकार्य यासाठी लाभले आहे.

‘संत तुकाविप्र’ साहित्य प्रचार आणि प्रसार प्रकल्पाद्वारे त्यांच्या अभंगांना आधुनिक माध्यमांची जोड देत प्रभावी सादरीकरण करण्यात आले आहे. चित्रफीत आणि माहितीपटाच्या माध्यमातून त्यांच्या विचारांचा व्यापक प्रसार घडवण्याचा हा महत्त्वपूर्ण प्रयत्न आहे.

‘संत तुकाविप्र महाराजांचे अभंग मराठीतील दिग्गज गायक आनंद भाटे आणि ऋषिकेश रानडे यांच्या सुरांनी सजले असून, संगीतकार कमलेश भडकमकर यांनी त्यांना उत्कृष्ट संगीतसाज दिला आहे. या अभंगांची सादरीकरणे अत्यंत भावपूर्ण आणि प्रभावी ठरली आहेत.

या वेळी उपस्थित मान्यवरांनीही ‘संत तुकाविप्र’ महाराजांचे साहित्य समाजापर्यंत अधिक प्रमाणात पोहोचवण्याची गरज व्यक्त केली. संत साहित्याचे अभ्यासक, कीर्तनकार आणि प्रवचनकार यांनी पुढाकार घेऊन या विचारांचा प्रसार करावा, असे मत मांडण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह. भ. प. प्रकाश महाराज बोधले होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून संत एकनाथ संस्थान, पैठण येथील ह. भ. प. विनीत महाराज गोसावी उपस्थित होते. कीर्तनाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात प्रबोधन करणारे प्रकाश महाराज बोधले यांना वारकरी संप्रदायात विशेष मानाचे स्थान आहे. तसेच विनीत महाराज गोसावी हे संत एकनाथांच्या परंपरेतील चौदावे वंशज असून, ‘संत तुकाविप्र’ महाराजांच्या कार्याशी त्यांचा आध्यात्मिक संबंध अधोरेखित होतो.


एकूणच, ‘संत तुकाविप्र’ महाराजांच्या साहित्याचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि संत परंपरेचा विचार अधिक व्यापक करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे.

Thursday, April 16, 2026

Saffrons Miss India & Mrs India 2026

Saffrons Miss India & Mrs India 2026

11 States of Maharashtra 

Mumbai, Navi Mumbai, Thane, Kolhapur, Solapur, Pune, Nashik, Kalyan, Mira-Bhayander, Chhatrapati Sambhaji Nagar.



 

 "You could be the next Miss & Mrs India*

Saffrons World is organising Beauty & Talent Contest "Saffrons Miss India & Saffrons Mrs India 2026 in NaviMumbai. Reach out to fulfill your dreams. This is "The Platform' to showcase your dream. 

The USP of the show 

No Skin Show, 

No Bikini Show  

No Swim Suit Show. 

The Participants Criteria 

For Miss 16 yrs to 30 yrs. 

For Mrs 18 yrs to 40 yrs.

For Mrs (Elite) 41 yrs to 60+. 

Widow, Single Mother, Divorcee, Annulled are allowed to participate in this show.

For more details please contact us 

Vijay Kalose on 816 997 7833 / 9594573869.

Friday, April 10, 2026

कल्याणात अनोखी कलाकृती: ४४८ कलमांतून उभी राहिली बाबासाहेबांची विचारधारा

कल्याणात अनोखी कलाकृती: ४४८ कलमांतून उभी राहिली बाबासाहेबांची विचारधारा

कल्याण, महाराष्ट्र —विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त एक आगळीवेगळी आणि अर्थपूर्ण कलाकृती साकारण्यात आली आहे. कला, कलम आणि संविधान चे संगम.

प्रसिद्ध प्रेरक वक्ते प्रो. डॉ. दिनेश गुप्ता आनंदश्री यांनी भारतीय संविधानातील कलमांच्या माध्यमातून बाबासाहेबांचे प्रेरणादायी चित्र उभे केले आहे.

या अनोख्या कलाकृतीमध्ये भारतीय संविधानातील सुमारे ४४८ कलमांपैकी महत्त्वाच्या कलमांच्या शीर्षकांचा वापर करून बाबासाहेबांची प्रतिमा साकारण्यात आली आहे.

हे चित्र केवळ कलात्मक सौंदर्य दाखवत नाही, तर संविधान, समता, बंधुता, न्याय, समानता आणि नागरिकांच्या अधिकारांविषयी एक प्रभावी संदेश देत आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून डॉ. गुप्ता यांनी युवकांना आणि समाजातील सर्व घटकांना संविधानाचे महत्त्व समजून घेण्यासाठी आणि ते आपल्या जीवनात उतरवण्यासाठी प्रेरित केले आहे.


या अनोख्या कलाकृतीचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, उपस्थितांनी या अभिनव प्रयत्नाचे जोरदार स्वागत केले.

विशेष म्हणजे, डॉ. गुप्ता यांचे नाव यापूर्वी सात वेळा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदले गेले आहे.

‘अबब विठोबा बोलू लागला’ बालनाट्यातून देणार खास संदेश*

 *नवीन प्रयोग, नवी भाषा - प्रभाकर मोरे यांची खास तयारी*

गेली अनेक वर्षे ‘हास्यजत्रा’त कोकणी व्यक्तिरेखेमधून प्रेक्षकांना खळखळून हसवणारे अभिनेते  प्रभाकर मोरे आता एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहेत. ‘अबब विठोबा बोलू लागला’ या गाजलेल्या बालनाट्यात ते प्रथमच काम करणार असून पुजाऱ्याच्या भूमिकेत झळकणार आहेत. यासाठी प्रमाण भाषेत संवाद साधण्याचं मोठं आव्हान त्यांनी यशस्वीपणे पेललं आहे. विविध विषयांवरील बालनाट्यांनी नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आता त्याच परंपरेला उजाळा देत, एकेकाळी गाजलेलं आणि प्रेक्षकांना खळखळून हसवणारं ‘अबब विठोबा बोलू लागला’ हे लोकप्रिय बालनाट्य पुन्हा एकदा रंगभूमीवर धम्माल करायला सज्ज झालं आहे. मालिका आणि चित्रपट क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे दिग्दर्शक प्रशांत गिरकर ‘अबब विठोबा बोलू लागला’ या नाटकाचं दिग्दर्शन करत असून, त्यांच्या दिग्दर्शनातून या नाटकाला आधुनिक सादरीकरणाची जोड मिळाली आहे. जुन्या आठवणींना नवी झळाळी देत, विनोद आणि संदेश यांचा सुंदर मेळ घालणाऱ्या  या बालनाट्याचे  पुढील  प्रयोग १६ एप्रिल गुरु दु  ४:३० काशीनाथ घाणेकर, ठाणे १७ एप्रिल शुक्र स ११:३० प्रबोधनकार ठाकरे, बोरिवली १७ एप्रिल शुक्र संध्या ७:३०  शिवाजी मंदिर, दादर  येथे होणार आहेत. मुंबई, पुणे, नाशिक येथे १० यशस्वी प्रयोग झाल्यावर मुलांच्या परीक्षे नंतर आता सुट्टीत महाराष्ट्रभर याचे प्रयोग होणार आहेत. १ ते ३ मे कोकण दौरा आहे. 

नुकत्याच पार पडलेल्या पत्रकार परिषदेत प्रभाकर मोरे यांनी सांगितलं, “प्रमाण भाषेत बोलणं माझ्यासाठी खूप मोठं चॅलेंज होतं. इतकी वर्षं कोकणी व्यक्तिरेखा साकारल्यानंतर हा बदल सोपा नव्हता. त्यामुळे या नाटकासाठी मला अधिक वेळ देऊन मेहनत घ्यावी लागली. पण त्या प्रक्रियेत खूप काही नवीन शिकायला मिळालं.” संस्कृती आणि परंपरेची सुंदर सांगड घालणारं हे बालनाट्य केवळ लहान मुलांसाठीच नव्हे, तर मोठ्यांनाही अंतर्मुख करणारं ठरणार आहे. आजच्या मोबाईलच्या आहारी गेलेल्या पिढीला वास्तवाशी पुन्हा जोडण्याचा प्रयत्न या नाटकातून प्रभावीपणे करण्यात आला आहे. मनोरंजनासोबतच विचार करायला भाग पाडणार  ‘अबब विठोबा बोलू लागला’ हे बालनाट्य लहान मोठ्या प्रत्येकाने आवर्जून बघावं, असं आवाहन  प्रभाकर मोरे यांनी यावेळी केलं.

कर्टेन रेझर एंटरटेनमेंट’ आणि ‘लिटिल थिएटर’ अर्थात‘बालरंगभूमी’या संस्थेकडून नीळकंठ नांदुरकर लिखित हे विनोदी नाटक नव्या संचासह प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या नाटकाचा इतिहासही तितकाच समृद्ध आहे. यापूर्वी लक्ष्मीकांत बेर्डे, विजय केंकरे, विनोद हडप यांसारख्या दिग्गज कलाकारांनी या नाटकात काम करत त्याला अफाट लोकप्रियता मिळवून दिली होती. त्यांच्या अभिनयामुळे हे नाटक त्या काळात प्रचंड गाजलं होतं. आता सुधाताईंच्या पश्चात निर्माती नमिता वागळे-गिरकर या नाटकाला नव्या रूपात सादर करत आहेत.


या नव्या आवृत्तीत प्रसिद्ध अभिनेते प्रभाकर मोरे ‘धम्माल पुजारी’च्या भूमिकेत असून  त्यांच्यासोबत सागर पवार, नीता दोंदे, निखिल केंजळे, प्रकाश अय्याळ, अजित सावरे, प्रेम औटि, आशिक चव्हाण, विरराज राजपूत, उन्नती शिंदे, बालकलाकार अबीर जोशी, गोजिरी जगदाळे, कियारा पाटील, श्रीजा पोटे, आयुष टेंबे, ध्रुव खानविलकर, सिद्धेश बरीदे, ओवी भुजबळ, मृगा जोशी नाटाकाची रंगत वाढवणार आहेत.

या नाटकाविषयी बोलताना  दिग्दर्शक प्रशांत गिरकर  सांगतात,  आजच्या डिजिटल युगात मोबाईलच्या जाळ्यात अडकलेल्या पिढीला वास्तवाशी पुन्हा जोडण्याचा एक सुंदर प्रयत्न म्हणजे ‘अबब विठोबा बोलू लागला’ हे नाटक. हे नाटक केवळ मनोरंजनापुरतं मर्यादित नसून, संस्कार आणि संस्कृती यांचा सुरेख मिलाफ प्रेक्षकांसमोर मांडतं आजच्या धावपळीच्या जीवनात हरवत चाललेल्या मूल्यांची जाणीव करून देत, कुटुंबाला एकत्र आणण्याचं काम हे नाटक करतं. विशेष म्हणजे, हे फक्त बालनाट्य नाहीतर मोठ्यांसाठीही तितकंच महत्त्वाचं आहे. पालकांनी बालकांसोबत बालक होवून पहावे असे नाटक आहे. पालक आणि मुलांमधील नातं अधिक घट्ट करण्यासाठी, संवाद वाढवण्यासाठी आणि एकमेकांना समजून घेण्यासाठी हे नाटक एक प्रभावी माध्यम  ठरेल, असा विश्वास ते व्यक्त करतात.  


नाटकाचे नेपथ्य महेश साळगावकर तर संगीताची जबाबदारी आनंद ओक यांनी सांभाळली आहे. रंगभूषा स्वप्नील चिमणे,  प्रकाशयोजना केदार भोंडवे यांची आहे.  वेशभूषा काजल अटेलियर यांची आहे. निर्मिती व्यवस्था नरेंद्र  आंगणे यांनी सांभाळली आहे

आउट ऑफ सिल्याबस: पुस्तकांच्या पलीकडे' चित्रपटाचा पोस्टर व म्युझिक लाँच सोहळा संपन्न; मराठी दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत रंगला सोहळा

अजिंक्य राऊत आणि अद्वयी ही नवी जोडी 'आउट ऑफ सिल्याबस: पुस्तकांच्या पलीकडे'मधून प्रेक्षकांच्या भेटीस; पोस्टर आणि म्युझिक लाँच सोहळ्यानंतर लूकची चर्चा* 

मुंबईतील ITC Grand Central परेल या पंचतारांकित हॉटेलमध्ये दिनांक ९ एप्रिल २०२६ रोजी 'आउट ऑफ सिल्याबस: पुस्तकांच्या पलीकडे' (Out Of Syllabus) चित्रपटाचा पोस्टर आणि म्युझिक लाँच सोहळा अगदी दिमाखात पार पडला. मराठी सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या सोहळ्याची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. या प्रेरणादायी चित्रपटाची निर्मिती डॉ. सुगत जी. वाघमारे यांनी ‘अदू-तिशू प्रॉडक्शन्स अँड म्युझिक’च्या बॅनरखाली केली असून दिग्दर्शन नवीन देशबोनिया यांनी केले आहे.

दिग्गजांची उपस्थिती

​या दिमाखदार सोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. यात प्रामुख्याने अभिनेते महेश मांजरेकर, वैशाली सामंत, गौरव मोरे, रोहित माने, शिवाली परब, वनिता खरात, रसिका वेंगुर्लेकर, पॅडी कांबळे, कुणाल मेश्राम, अभय जोधपूरकर, सौरभ अभ्यंकर, गोपाळ गावंडे, मोहित कुलकर्णी, संजय पवार, अजिंक्य राऊत, मिलिंद शिंदे, कमलेश सावंत, अद्वयी, अभिजित रामचंद्र, सानिका तोरस्कर आणि शेषपाल गणवीर या कलाकार मंडळींचा समावेश होता.

चित्रपटाचे वेगळेपण आणि नवी कोरी जोडी

​'आउट ऑफ सिल्याबस: पुस्तकांच्या पलीकडे' या चित्रपटाच्या पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढविली आहे. अभिनेता अजिंक्य राऊत आणि नवोदित अभिनेत्री अद्वयी ही एक फ्रेश जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. पोस्टरमध्ये दिसणारा 'पुस्तकी अभ्यास करणारा नायक' आणि 'त्याच्याकडे पाहत बसलेली नायिका' यामुळे कथेविषयी विशेष कुतूहल निर्माण झाले आहे. केवळ पुस्तकी परीक्षेत उत्तीर्ण होण्यापेक्षा आयुष्याची परीक्षा यशस्वीपणे पार पाडण्याची एक थरारक आणि प्रेरणादायी कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे.

निर्मिती आणि तांत्रिक बाजू

​या चित्रपटाची तांत्रिक बाजू अतिशय भक्कम असून चित्रपटाचे लेखन अनिकेत कोरडे यांनी केले आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन नवीन देशबोनिया यांनी केले आहे. निर्माते डॉ. सुगत जी. वाघमारे यांनी ‘अदू-तिशू प्रॉडक्शन्स अँड म्युझिक’च्या बॅनरखाली चित्रपटाची निर्मिती केली आहे. तांत्रिक नाविन्य जपत सचिन मनोहराराव ढोकणे यांनी चित्रपटाचे 'AI क्रिएटिव्ह डायरेक्टर' म्हणून काम पाहिले आहे. तर संगीत दिग्दर्शक मोहित कुलकर्णी यांनी संगीताची धुरा सांभाळली असून, वैशाली सामंत, अभय जोधपूरकर आणि गोपाळ गावंडे यांनी गाण्यांना सुमधुर स्वर दिले आहेत. तर मनीष केदार व्यास, सुधीर वड्डेली यांनी छायांकनाची जबाबदारी पेलवली आहे. आणि संकलन अनिल विठ्ठल थोरात यांचे आहे. 


मुख्य भूमिकेत अजिंक्य राऊत, अद्वयी आणि शेषपाल गणवीर असून त्यांना सानिका तोरस्कर, अभिजित रामचंद्र, मिलिंद शिंदे आणि कमलेश सावंत यांची महत्त्वपूर्ण साथ लाभली आहे. 'अदू-तिशू प्रॉडक्शन अँड म्युझिक' प्रस्तुत हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार

The Board of Directors of Union Bank of India today approved the accounts of the Bank for the Quarter/Year ended March 31, 2026.

  The Board of Directors of Union Bank of India today approved the accounts of the Bank for the Quarter/Year ended March 31, 2026. Key Highl...