Tuesday, August 12, 2025

जगद्‌गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या गाथेची कथा अभंग तुकाराम’

 जगद्‌गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या गाथेची कथा अभंग तुकाराम’

मराठी जनमानसासाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची ‘ज्ञानेश्वरी’ आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांची ‘अभंग गाथा’ याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. माऊलींच्या ज्ञानेश्वरीने महाराष्ट्राच्या आध्यात्मिक जीवनाचा पाया रचला, आणि जगद्गुरूंच्या अभंगांनी त्याच्यावर कळस चढवला. तुकोबारायांची ही अभंग गाथा तत्कालीन समाजव्यवस्थेने लादलेल्या जलदिव्यातून तावून सुलाखून निघाली आणि आजही आपल्या जीवनाचा भक्कम पाय म्हणून उभी आहे. आजही मराठी लोकांच्या वापरात या गाथेतल्या अभंगाची चरणे, म्हणी, वाक्प्रचार या स्वरूपात आपल्याला ऐकू येतात. एकूणात रोजच्या जगण्यात आज ३५० वर्षांनंतरही संत तुकाराम आपल्या या अजरामर रचनांमधून वास्तव्य करताना आपल्याला दिसतात. जगद्गुरूंचे हे तत्वज्ञान नवीन पिढीपर्यंत नेण्यासाठी प्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर ‘अभंग तुकाराम’ हा नवा कोरा चित्रपट ७ नोव्हेंबरला घेऊन येत आहेत. पॅनोरमा स्टुडिओज ही नामांकित निर्मिती संस्था या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत.

संत तुकारामांची अभंग गाथा तत्कालीन समाजव्यवस्थेतील धर्माच्या ठेकेदारांनी इंद्रायणीत बुडवण्याचा आदेश दिला. तेव्हा संत तुकोबारायांनी हे आव्हान स्वीकारले आणि गाथा नदीत बुडवल्या. त्यांनतर या गाथा कशा तरल्या ? त्यातून काय संदेश दिला गेला ? आणि या सगळ्यात संपूर्ण समाजाने संत तुकारामांवरील भक्तीपोटी आणि प्रेमापोटी काय काय त्याग केला ? याचे थरारक आणि त्याचवेळेस भावस्पर्शी असे चित्रण ‘अभंग तुकाराम’ या चित्रपटात करण्यात आले आहे. या चित्रपटाचे मोशन टिझर पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. त्यात पाण्याच्या तरंगांबरोबर वर जाणारे अभंगांचे कागद दिसतात. त्याबरोबर आपल्याला पाठमोरे संत तुकोबाराय दिसत आहेत. ज्यांनी आकाशाकडे हात पसरून साद घातलेली दिसत आहे. त्यांच्या समोरून उगवणारा सूर्य हा आशेचे किरण पसरवीत आहे. त्याचवेळी "जेथे जातो तेथे तू माझा सांगाती" हि तुकोबारायांची अमर रचना अत्यन्त सुमधुर स्वरात समूहाकडून ऐकू येत आहे. त्या तालावर ‘अभंग तुकाराम’ हे चित्रपटाचे नाव भव्य स्वरूपात आकाशात आकाराला येऊन संत तुकारामांचे आणि त्यांच्या रचनांचे अभंगत्व अधोरेखित करताना दिसत आहे. 

अत्यंत सुंदर अशा तांत्रिक सफाईने सादर केलेले चित्रपटाचे हे शीर्षक रसिकांच्या कुतूहलाचा आणि भावपूर्ण आतुरतेचा विषय बनले आहे. या चित्रपटाची कथा आणि संवाद प्रसिद्ध लेखक योगेश सोमण यांचे असून, ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटातून आपला वारकरी संप्रदायाचा अभ्यास सिद्ध केलेले दिग्पाल लांजेकर यांनी पटकथा आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. वारकरी संगीत हा चित्रपटाचा आत्मा आहे. अभंग गाथा हा विषय असल्याने तब्बल १० अभंगांचा समावेश या चित्रपटात करण्यात आलेला आहे. ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटाचे अप्रतिम संगीत निर्माण करणारे प्रसिद्ध गायक संगीतकार अवधूत गांधी यांनी या चित्रपटाच्या संगीताची धुरा सांभाळली आहे.

तांबव्याचा विष्णूबाळा रुपेरी पडद्यावर अवतरणार

 तांबव्याचा विष्णूबाळा रुपेरी पडद्यावर अवतरणार

मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये अभिनेता सयाजी शिंदे यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. प्रत्येक भूमिका अगदी लीलया साकारणारे सयाजी शिंदे यांनी त्यांच्या प्रत्येक कलाकृतीत स्वतःची वेगळी छाप उमटवली आहे. आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत नुकतीच त्यांनी ‘तांबव्याचा विष्णूबाळा’ या महत्त्वपूर्ण चित्रपटाची घोषणा केली आहे.  

सातारा जिल्ह्यातील डोंगराच्या कुशीत वसलेल्या तांबवे गावातील विष्णू बाळा पाटील यांच्या संघर्षाची कथा या चित्रपटातून उलगडणार आहे. सत्यघटनेवर आधारलेल्या, रक्तरंजित संघर्षाचा नायक असलेल्या विष्णूबाळाची मध्यवर्ती भूमिका सयाजी शिंदे साकारणार असून मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीतील कलावंतांची मांदियाळी या भव्य चित्रपटातून आपल्या भेटीला येणार आहे. ‘विश्वविनायक सिनेमॅटिक सफारी फिल्म एलएलपी प्रोडक्शन’ बॅनरअंतर्गत येणाऱ्या ‘तांबव्याचा विष्णूबाळा’ या चित्रपटाचे लेखन अरविंद जगताप यांचे असून दिग्दर्शन अनुप जगदाळे करणार आहेत. या चित्रपटाचे निर्माते मनोहर जगताप आहेत. हा चित्रपट मराठीसोबत हिंदी, तेलुगू आणि तामिळ भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सातारच्या ग्रामीण भागात घडलेल्या या सूडनाट्याचा थरार जनसामान्यांना अचंबित करणारा असणार आहे, असा विश्वास सयाजी शिंदे यांनी व्यक्त केला. ‘रावरंभा’ या ऐतिहासिक चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शक अनुप जगदाळे आपल्या या नव्या कलाकृतीबद्दल बोलताना सांगतात कि, ‘काहीतरी नवीन आणि वेगळा अनुभव देणारा चित्रपट करावा असं मनात होतं. सयाजी शिंदे यांच्या साथीने ही सत्यकथा भव्यदिव्य स्वरूपात मांडण्याची कल्पना सुचली. एक वेगळ्या धाटणीचा कथाविषय आणि दमदार कलाकार यांना एकत्र पहाण्याची पर्वणी प्रेक्षकांना या चित्रपटामुळे लाभणार आहे.  गावच्या भाऊबंदकीतून आणि श्रेयवादातून सख्ख्या चुलत भावांमध्ये विकोपाला गेलेला वाद आणि त्यातून कुटुंबावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी विष्णूबाळाने केलेला रक्तरंजित संघर्ष ‘तांबव्याचा विष्णूबाळा’ या चित्रपटातून पहायला मिळणार आहे.   

२००१ साली ‘तांबव्याचा विष्णूबाळा’ हा मराठी चित्रपट आला होता. यात सयाजी शिंदे यांच्यासोबत अनेक मात्तबर कलाकारांनी भूमिका केल्या होत्या. आता पुन्हा एकदा नव्या कलाकारांच्या संचात हा चित्रपट भव्य स्वरूपात प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे.




अमेरिका-स्थित बँकाई व्हेंचर्स आणि हरिबोल एकत्र येऊन पारदर्शक, तंत्रज्ञान-आधारित नैतिक अन्न परिसंस्था निर्माण करणार

                          अमेरिका-स्थित बँकाई व्हेंचर्स आणि हरिबोल एकत्र येऊन पारदर्शक,                      तंत्रज्ञान-आधारित नैतिक अन्न परिसंस्था निर्माण करणार

अमेरिका-स्थित बँकाई व्हेंचर्स, जे फिनटेक, ब्लॉकचेन आणि एआय-आधारित नावीन्यपूर्णतेत जागतिक अग्रणी आहे, यांनी इस्कॉनपासून प्रेरित भारतातील अग्रगण्य क्रूरता-मुक्त अन्न ब्रँड हरिबोल बरोबर धोरणात्मक भागीदारी जाहीर केली आहे. या सहकार्याचा उद्देश डेअरी आणि नॉन-डेअरी या दोन्ही क्षेत्रांमध्ये पारदर्शक, तंत्रज्ञान-चालित परिसंस्था निर्माण करणे आहे—ज्यात पारंपरिक वैदिक मूल्ये आणि आधुनिक डिजिटल पायाभूत सुविधा यांचे संमिश्रण करून नैतिक अन्न प्रणालींचे डिझाइन, विस्तार आणि विश्वास यांना नवी व्याख्या दिली जाईल. ही भागीदारी आध्यात्मिक तत्त्वज्ञान आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा संगम आहे, ज्याचे केंद्र नैतिक स्त्रोत, ग्रामीण सक्षमीकरण, पशु कल्याण आणि संपूर्ण पुरवठा साखळीतील पारदर्शकता आहे.अहिंसेत रुजलेले, तंत्रज्ञानाने सशक्त: हरिबोल ग्रामीण शेतकरी समुदायांबरोबर जवळून काम करते, जे अहिंसा (अहिंसा) या तत्त्वाने प्रेरित नैतिक आणि टिकाऊ पद्धतींसाठी वचनबद्ध आहेत. डेअरी क्षेत्रात, ही बांधिलकी गायी आणि बैलांच्या आयुष्यभर संरक्षणात रूपांतरित होते, ज्याला एआय आणि आयओटी-सक्षम आरोग्य निरीक्षण प्रणालींचा आधार आहे ज्या शेतकऱ्यांना मोफत पुरवल्या जातात.

नॉन-डेअरी क्षेत्रात, हरिबोल पारंपरिक आणि पर्यावरण-जागरूक पद्धतींना प्रोत्साहन देते, जसे की धान्यांची जल-चक्की गिरणी आणि तेलांचे कोल्ड-प्रेसिंग. या पद्धती शुद्धता, पर्यावरणीय संतुलन आणि ट्रेसिबिलिटी टिकवतात—प्रत्येक उत्पादन गुणवत्ता आणि नैतिकतेत अबाधित राहील याची खात्री करतात. सामाजिक कल्याणासाठी तंत्रज्ञान: बँकाई व्हेंचर्सची भूमिका: या सहकार्याचा भाग म्हणून, बँकाई व्हेंचर्स एआय, ब्लॉकचेन आणि डिजिटल पायाभूत सुविधा यातील आपले कौशल्य प्रदान करेल जेणेकरून हरिबोलची नैतिक आणि पारदर्शक पुरवठा साखळी अधिक मजबूत करता येईल. या उपक्रमाचा उद्देश नावीन्यपूर्णतेतून सामाजिक परिणाम साधणे आहे शेतकऱ्यांना सशक्त बनवणे, प्राण्यांचे रक्षण करणे आणि ग्राहकांना त्यांचे अन्न उगमापासून वापरापर्यंत शोधण्याची क्षमता देणे.

सुश्री अम्मी ब्रह्मभट्ट, सह-संस्थापक, बँकाई व्हेंचर्स, म्हणाल्या:“आम्हाला विश्वास आहे की जेव्हा नावीन्यपूर्णता करुणेसह जुळते, तेव्हाच ती आपले सर्वोच्च उद्दिष्ट गाठते. हरिबोल ही आध्यात्मिकदृष्ट्या जागरूक अन्न प्रणालीचे उदाहरण आहे जी तंत्रज्ञानाचा वापर सहानुभूती आणि काळजीसाठी करते. आम्हाला या चळवळीत योगदान देण्याचा अभिमान आहे, जिथे प्रत्येक उत्पादन ते डेअरी असो वा वनस्पती-आधारित पारदर्शकता, जागरूकता आणि नैतिक जबाबदारी दर्शवते.”

या भागीदारीच्या आध्यात्मिक पायाभरणीला प्रतिध्वनी देत, इस्कॉनच्या गव्हर्निंग बॉडी कमिशनचे सदस्य आणि गोवर्धन इकोव्हिलेजचे संचालक गौरांग दास यांनी इस्कॉनचे संस्थापक-आचार्य, हिज डिवाइन ग्रेस ए.सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या शिकवणीवर विचार केला:“श्रील प्रभुपाद म्हणाले होते, ‘दूध म्हणजे धार्मिक तत्त्वच आहे. ते गायीद्वारे दिलेले चमत्कारी अन्न आहे, आणि गाय ही मानव समाजातील सर्वात महत्त्वाची प्राणी आहे कारण ती दूध देते.’ पण त्यांनी हेही चेतावणी दिली होती, ‘आजकाल दूध शुद्ध नाही. ते त्यात इतक्या गोष्टी मिसळत आहेत पावडर, पाणी, अगदी युरियासुद्धा फक्त प्रमाण वाढवण्यासाठी. हे खूप चुकीचे आहे. असे दूध परिणामकारक ठरणार नाही.’ जर 1960 च्या दशकात त्यांची ही चिंता होती, तर आज आपण विचार करायला हवे आपल्या दुधाची स्थिती काय आहे?”

मान्यताप्राप्त नैतिक ब्रँड:वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमद्वारे मान्यता प्राप्त, हरिबोल डीएनए-प्रमाणित ए2 गायीचे दूध आणि तूप, कोल्ड-प्रेस्ड तेल, रेडी-टू-ईट जेवण आणि टिकाऊ पद्धतीने पिकवलेले किराणा माल यासह विविध प्रकारचे नैतिक आणि ट्रेसिबल उत्पादने देते जी सर्व क्रूरता-मुक्त शेत प्रणालींमधून मिळवली जातात.

श्री यचनीत पुष्कर्णा, मुख्य कार्यकारी अधिकारी व संचालक, हरिबोल, म्हणाले:“बँकाई व्हेंचर्ससोबतची ही भागीदारी प्रामाणिकपणा आणि परिणाम याबद्दल आमची सामायिक वचनबद्धता दर्शवते. आमच्या शेतकरी भागीदारांना अत्याधुनिक एआय साधने मोफत देऊन आणि आमच्या पुरवठा साखळीत पारदर्शकता वाढवून, आम्ही ग्राहकांना प्रत्येक उत्पादनाच्या प्रवासाचे माती व बियाण्यापासून ते गाय आणि स्वयंपाकघरापर्यंत खरे दर्शन घडवतो.”

अन्न प्रणालींमधील नव्या नैतिक प्रतिमेकडे मिळून, बँकाई व्हेंचर्स आणि हरिबोल भारताच्या अन्न उद्योगात एक नवा मानक स्थापित करत आहेत जिथे डेटा पारदर्शक आहे, दया मोजता येते, आणि प्रत्येक उत्पादन केवळ शरीरालाच नव्हे तर पृथ्वी आणि आत्म्यालाही पोषण देते.

Tuesday, August 5, 2025

Meet the Changemakers championing the growth of India’s Small Businesses

 

Meet the Changemakers championing the growth of  India’s Small Businesses

With more than 63 million enterprises and contributing more than 30% to the GDP, the MSME sector forms the backbone of India’s economy. The sector's impact spans across manufacturing, services, and exports. It employs more than 284 million people and accounts for over 45% of India’s total exports. Beyond the support from the government, a rising tide of leaders is breaking the barriers and enabling MSMEs to grow. These visionaries are empowering India’s small businesses to reach their full potential.

Here is a list of leaders who are catalysing the growth of MSMEs:

     Aniket Doegarm, Co-Founder & CEO, Haqdarshak

Aniket Doegarm is the Founder and CEO of Haqdarshak, a social enterprise working to support individuals and micro-businesses to avail the benefits of government welfare schemes. Through Haqdarshak, Aniket has helped bridge the information asymmetry around welfare programs, which often prevents MSMEs from accessing benefits meant for them. 

                                            Hardika Shah, Founder & CEO, Kinara Capital

Access to formal credit is one of the biggest issues that curtail MSME growth. According to the World Bank, Indian MSMEs face an immense credit gap of USD 400 billion. To bridge this critical financing gap, Hardika Shah founded Kinara Capital. Kinara Capital is a fast-growing NBFC-Fintech focused on last-mile financial inclusion of MSMEs. Leveraging technology, Kinara has removed traditional barriers and made formal credit accessible to MSMEs. 

Ravish Naresh, Jaideep Poonia, Dhanesh Kumar, Ashish Sonone, Founders  Khatabook

IIT Bombay alumni Ravish Naresh, Jaideep Poonia, Dhanesh Kumar, and Ashish Sonone founded Khatabook to support small and micro-businesses in digitizing their bookkeeping. The Khatabook app enables users to record credit and debit transactions, send automated payment reminders via SMS or WhatsApp, and manage customer ledgers.

Dinesh Agarwal and Brijesh Agrawal, Founders, IndiaMART

At a time when India had just 15,000 internet users, Dinesh Agarwal and Brijesh Agrawal launched IndiaMART as a simple B2B directory and website development service for businesses. What began as a tech experiment in a largely offline economy has now grown into India’s largest online B2B marketplace. It enables businesses to showcase diverse portfolios of quality products and connect with the right buyers. 

Hrishikesh Datar, Founder & CEO, Vakilsearch

Navigating India’s complex legal and regulatory framework is one of the biggest hurdles faced by many MSMEs. For many entrepreneurs, managing compliance requirements like business registration, GST filing, or intellectual property protection can be confusing and time-consuming.

Connplex Cinemas Limited IPO Opens on August 07, 2025

                          Connplex Cinemas Limited IPO Opens on August 07, 2025

Connplex Cinemas Limited (Connplex, The Company) is an entertainment company revolutionizing the cinema industry with a focus on luxury proposes to open its Initial Public Offering on August 07, 2025, aiming to raise 90.27 Crore (At Upper Price Band) by fresh issue of 51,00,000 equity shares, to be listed on the NSE Emerge platform.


The issue size is 51,00,000 equity shares at a face value of 10 each with a price band of 168 - 177 Per Share.

Equity Share Allocation

  • QIB Anchor Portion – Upto 14,52,000 Equity Shares
  • Qualified Institutional Buyer – Upto 9,68,800 Equity Shares
  • Non-Institutional Investors – Not Less Than 7,27,200 Equity Shares
  • Individual Investors – Not Less Than 16,96,000 Equity Shares
  • Market Maker – Upto 2,56,000 Equity Shares 

The net proceeds from the IPO will be utilized for capital expenditure requirement for purchase of corporate office, purchase of LED Screens and Projectors, Working Capital Requirement and general corporate expenses. The anchor portion will open on August 06, 2025 and issue will close on August 11, 2025.

The Book Running Lead Manager to the Issue is Beeline Capital Advisors Private Limited, The Registrar to the Issue is MUFG Intime India Private Limited 

Mr. Anish Tulshibhai Patel, Managing Director and and Mr. Rahul Kamleshbhai Dhyani, Joint Managing Director of Connplex Cinemas Limited expressed, "Going public is an important milestone for Connplex Cinemas as we move into our next phase of development. From the outset, our focus has been on redefining how cinema is experienced—making it more comfortable, more engaging and more accessible. With the support of this IPO, we plan to invest in infrastructure that allows us to maintain high-quality standards while expanding our footprint across both urban and emerging markets. This includes setting up our corporate headquarters and upgrading key technologies like LED screens and projectors. Our goal remains simple: to deliver a reliable and enjoyable cinema experience to more people across India.”

About Connplex Cinemas Limited:

Connplex Cinemas Limited is an entertainment company revolutionizing the cinema industry with a focus on luxury, innovation, and accessibility. Operating under the brand name “CONNPLEX” and other registered brands, the company specializes in developing cinema set-up, entering franchise agreements, film exhibition and distribution, and generating revenue from screening of movies, sales of food and beverages, and advertisements. By strategically expanding into underserved markets in Tier 2, 3, and 4 cities, as well as metro locations including Tier 1 across India, Connplex Cinemas blends convenience, affordability, and premium experiences to bring high-quality entertainment to audiences across India.

Connplex Cinemas constructs and designs cinemas featuring luxurious recliner seating, advanced sound systems, and high-definition projection technology to provide an elevated movie-going experience. Through collaborations with filmmakers and studios, it distributes films across its cinemas and digital platforms moreover they also provide the event spaces for private screening, corporate events and community gatherings to engage audiences which maximizes revenue streams along with audience reach.

Connplex Cinemas distinguishes itself with customer-centric designs and a commitment to innovation, offering boutique-style cinemas with high-grade seatings, advanced technologies and sound systems that foster community connections while providing intimate and upscale environments. The company’s strategic locations and advanced technologies give it a competitive edge in attracting and retaining a diverse audience that includes families, young adults, and cinema enthusiasts. Company’s programming, which includes mainstream blockbusters, art films, group bookings and themed events, ensures broad appeal while catering to varied audience preferences.

For the period ended 31st March 2025, The company reported Revenue of 9,560.96 Lakhs and EBITDA of 2,627.56 Lakhs & PAT 1,900.99 Lakhs.

Disclaimer:

Certain statements in this document that are not historical facts are forward looking statements. Such forward-looking statements are subject to certain risks and uncertainties like government actions, local, political or economic developments, technological risks, and many other factors that could cause actual results to differ materially from those contemplated by the relevant forward-looking statements. The Company will not be in any way responsible for any action taken based on such statements and undertakes no obligation to publicly update these forward-looking statements to reflect subsequent events or circumstances.

गौतमी पाटील आणि सिद्धार्थ जाधवचा जलवा , आतली बातमी फुटली चित्रपटातील सखूबाई गाणं प्रदर्शित

गौतमी पाटील आणि सिद्धार्थ जाधवचा जलवा, आतली बातमी फुटली चित्रपटातील सखूबाई गाणं प्रदर्शित

काही दिवसांपासून सोशल  मीडियावर सखूबाई  कोण?  याची सर्वत्र चर्चा रंगली होती. अखेर ही  ‘आतली बातमी  फुटली’ असून  ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून महाराष्ट्राची लाडकी नृत्यांगना गौतमी पाटील आहे. नुकतेच तिचे आणि  पॉवरपॅक्ड अभिनेता सिद्धार्थ जाधव यांचे ‘आतली बातमी फुटली' या चित्रपटातील सखूबाई हे पहिले धमाकेदार गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. वीजी फिल्म्स या बॅनरअंतर्गत दिग्दर्शक विशाल पी. गांधी आणि जैनेश इजरदार 'आतली बातमी फुटली' हा नवाकोरा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी घेऊन आले आहेत. येत्या १९ सप्टेंबरला हा चित्रपट राज्यभरात प्रदर्शित होणार आहे.  

प्रत्येकाला ठेका धरायला लावणारा धमाकेदार आयटम नंबर ऐकायला जितकं जल्लोषमय आहे, तितकंच तो पहायलाही कमाल आहे. ‘सबसे कातिल’ गौतमी पाटील आणि ‘एनर्जेटिक’ अभिनेता सिद्धार्थ जाधव यांनी या गाण्यात चांगलीच धमाल आणली आहे. या धमाकेदार गाण्याला संगीत एग्नेल रोमन यांनी दिले आहे.चैतन्य कुलकर्णी  यांनी  लिहिलेले हे गाणं सोनाली सोनावणे हिने गायलं आहे.

‘हे आयटम सॉंग करताना आम्हाला खूप मजा आली. प्रेक्षकांनाही हे आयटम सॉंग ठेका धरायला लावेल,  असा विश्वास या दोघांनी व्यक्त केला. चित्रपटातील गौतमी पाटीलचा हॉट आणि सिद्धार्थ जाधवचा कूल अंदाज प्रेक्षकांसाठी भन्नाट तडका असणार हे नक्की.

या चित्रपटाची निर्मिती विशाल पी. गांधी आणि ग्रीष्मा अडवाणी यांची आहे. सहनिर्माता अम्मन अडवाणी तर सहयोगी दिग्दर्शक जीवक मुनतोडे आहेत. 'आतली बातमी फुटली’ चित्रपटाचे छायांकन अमित सुरेश कोडोथ तर संकलन रवी चौहान यांचे आहे. कथा जैनेश इजरदार यांनी तर पटकथा जीवक मुनतोडे, अम्मन अडवाणी,जैनेश इजरदार, विशाल पी. गांधी यांची आहे. संवाद लेखन जीवक मुनतोडे, व अद्वैत करंबेळकर यांनी केले आहेत. वेशभूषा ग्रीष्मा अडवाणी यांची, नृत्यदिग्दर्शन राहुल ठोंबरे, तिजो जॉर्ज यांचे आहे. प्रॉडक्शन डिझायनर रवी नाईक आहेत. कास्टिंग दिग्दर्शन जोकीम थोरास यांनी केले आहे, तर कार्यकारी निर्माते अब्दुल खान आहेत. 'आतली बातमी फुटली’ चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी फिल्मास्त्र स्टुडिओजने सांभाळली आहे.

महाराष्ट्राचे दोन लाडके डान्स स्टार पहिल्यांदाच एकत्र..

 सखूबाई गाणं आता पहा फक्त @naadsstream वर 

गाणं पहा इथे - link In Bio 

#सखूबाई  #SongOutNow

@vishalpgandhi @grieshmaadvani @ammanadvani 

@veejeefilms 

@NaadSstream @jatinmsethi 

@official_gautami941_ @sonalisonawane29 @agnelroman @chaitanya_kulkarni_writes

@keyuraut

@mohan.agashe @rohinihattangady @siddharth23oct @pritamkagneofficial @vijaynikam4761 #BharatGaneshpure @anandakarekar @amol_kagne_official @rahulchecks82

#Sakhubai #Aatli_Baatmi_Futlii #19Sep2025  

#Aatlibaatmifutlii #Veejeefilms #NaadSstream #Music  #songoftheyear 

[Sakhubai | Aatli Baatmi Futlii | Siddharth Jadhav | Gautami Patil | Sonali Sonawane | Naad Sstream | Marathi | New Song]

महापूर' नाटकाचा भव्य प्रीमियर

 महापूर' नाटकाचा भव्य प्रीमियर

हल्ली नवे विषय, नव्या संहिता रंगभूमीवर सादर होत आहेत. तर दुसरीकडे काही जुन्या, दिग्गज नाटककारांच्या त्या काळात लिहिलेली, सादर झालेली नाटकं पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस आलेली पाहायला मिळत आहेत. ही नाटकं पुन्हा रंगभूमीवर येण्यामागचं मुख्य कारण असतं ते, त्या नाटकाची भक्कम संहिता. आधुनिक मराठी रंगभूमीवरचा एक निर्णायक टप्पा ठरलेले नाटक 'महापूर'. या नाटकाला ज्येष्ठ लेखक सतीश आळेकर यांच्या लेखणीने एका वेगळ्याच उंचीवर नेले. हे नाटक आता त्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात पुन्हा एकदा रसिकांसमोर आलं आहे. 

अभिनेता आरोह वेलणकर याने या नाटकासाठी पुढाकार घेतला आहे. या नाटकाची निर्मिती वाइड विंग्ज मीडिया करत असून, दिग्दर्शन ऋषी मनोहर करत आहे. पुण्यात झालेल्या यशस्वी प्रयोगांनंतर 'महापूर' नाटकाचा भव्य असा प्रीमियर मुंबईत १५ ऑगस्टला  रवींद्र नाट्यमंदिर येथे होणार आहे. यासंदर्भात माहिती देण्यासाठी नुकत्याच एका पत्रकार परिषदेचे आयोजन  करण्यात आले होते.  

यावेळी बोलताना अभिनेता आरोह वेलणकर म्हणाला की, ‘१५ वर्षांपूर्वी पुरुषोत्तम  करंडकच्या  दरम्यान  ज्येष्ठ समीक्षक माधव वझे  यांनी  हे नाटक  तू करायला हवं असं मला सांगितलं. तेव्हापासून हे नाटक करण्याचा माझा मानस  होता. मध्यंतरी सतीश आळेकरांची एक शॉर्ट फिल्म करत असताना हे नाटक मी करू  का ? अशी विचारणा त्यांना केली.  योगायोगाने या नाटकाचं  सुवर्ण महोत्सवी वर्ष असून हे नाटक तू अवश्य सादर कर यासाठी सतीश आळेकरांनी मला परवनगी दिली आणि आज हे नाटक आज तुमच्यासमोर सादर करताना अतिशय आनंद होत आहे’.

१९७५ साली रंगमंचावर अवतरलेल्या 'महापूर' नाटकातील मोहन गोखले  यांनी साकारलेली भूमिका मी करत असून, माझ्यासाठी ही माईलस्टोन भूमिका आहे. सुरुवातीला  प्रायोगिक म्हणून उचलेलं हे पाऊल आता व्यावसायिक दृष्टिकोनातून आम्हाला सादर करायचं आहे. पहिल्या काही प्रयोगाला मिळालेल्या प्रतिसादानंतर मुंबईत भव्य असा नाटकाचा प्रीमियर करीत हे नाटक अधिकाधिक नाट्यरसिकांपर्यंत पोहचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.

गाजलेली कलाकृती पुन्हा सादर करण्याचा आनंद व्यक्त करताना दिग्दर्शक  ऋषी मनोहर यांनी  सांगितले की,  ‘सतीश आळेकरांची  ही संहिता इतक्या वर्षांनीही तितक्याच ताकदीनं प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. याच समृद्धतेचा अनुभव नाट्यरसिकांना पुन्हा देता येतोय  हे मला खूप महत्त्वाचं वाटतं. प्रत्येक प्रयोगानंतर कलाकार निवडीबद्दल झालेलं कौतुक ही नाटकाच्या यशाची पावती आहे.

सध्या रिकॉलचा  काळ आहे. एकेकाळी गाजलेल्या नाटकांचे  पुन्हा सादरीकरण करीत ते भावी पिढ्यांसाठी उपलब्ध करून देण्याची संकल्पना मोलाची आहे. कलाकार म्हणून तितकंच समाधान देणारी ही भूमिका असल्याचे प्रतिपादन अभिनेत्री रेशम श्रीवर्धनकर, यांनी केले.

‘महापूर’ ही नाट्यकहाणी प्रेमभंग, शिक्षणातील बेताची गती, आळस आणि गुंतागुंतीच्या कौटुंबिक परिस्थितीमुळे मानसिक तोल ढळलेल्या एका तरुणाच्या मानसिक अवस्थेचे संवेदनशील चित्रण करते. यात नायकाची व्यक्तिगत घुसमट प्रेक्षकांसमोर उलगडली जाते. आरोह वेलणकर, दिलीप जोगळेकर प्रसाद वनारसे, रेशम श्रीवर्धनकर, धीरेश जोशी, रेणुका दफ्तरदार या कलाकारांच्या यात भूमिका आहेत. 


नाटकाचे निर्मितीप्रमुख कुशल खोत तर निर्मिती व्यवस्थापक सौरभ महाजन आहेत. पार्श्वसंगीत सारंग कुलकर्णी यांचे आहे. प्रकाशयोजना तेजस देवधर तर वेशभूषा देविका काळे  यांची आहे  नेपथ्यरचना ऋषी मनोहर, मल्हार विचारे यांची आहे. दिग्दर्शन साहाय्य आणि रंगमंच व्यवस्था वज्रांग आफळे, गणेश सोडमिसे, मल्हार विचारे, प्रणव शहा यांनी सांभाळली आहे.

*खवैय्ये आवडत्या चिकनक्रिस्परचा आस्वाद घेऊ शकतात, केवळ 99 रुपयांत*

*खवैय्ये आवडत्या चिकनक्रिस्परचा आस्वाद घेऊ शकतात, केवळ 99 रुपयांत* KFC इंडियाचे चिकन क्रिस्पर मील आता फक्त 99 रुपयांत चिकनप्रेमी फ्राईज आणि ...