Wednesday, July 3, 2024

अनंत भाई अंबानींचा शाही सामूहिक विवाह सोहळा ,सोहळा समाज प्रेमाचा...

 अनंत भाई अंबानींचा शाही सामूहिक विवाह सोहळा ,सोहळा समाज प्रेमाचा...

नुकत्याच झालेल्या अनंत भाई अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहपूर्व सोहळ्याची चर्चा देशभर झाली आहे.जामनगर मधील अद्भुत विवाह सोहळा, त्यानंतर परदेशात क्रूज मध्ये झालेला पूर्व विवाह सोहळा, यांनी देशाचे नाही तरजगाचे लक्ष वेधले होते.

अंबानी कुटुंब केवळ श्रीमंत म्हणून नाही तर त्यांच्या दानधर्मासाठी तसेच समाज उपयोगी कामासाठी सुद्धा चर्चित असतात.

त्यामुळेच आता चर्चा आहे ती अंबानी कुटुंबियांनी घडवून आणलेल्या एका आगळ्यावेगळ्या सामूहिक विवाह सोहळ्याची,सुरुवातीला स्वामी विवेकानंद ज्ञान मंदिर पालघर येथे आयोजित हा सामूहिक विवाह सोहळा नंतर रिलायन्स कॉर्पोरेटपार्क ठाणे येथे स्थानांतरीत करण्यात आला.

आर्थिक सुबत्तता नसलेल्या दांपत्याची जबाबदारी घेऊन, त्यांचा थाटामाटात लग्न समारंभ अंबानी कुटुंबियांकडून करण्यात  आला. अतिशय आलिशान मंडप भोजन व्यवस्था हे बघून नवविवाहित दांपत्य आणि त्यांचे कुटुंबीय भारावून गेले. या सामूहिक लग्न समारंभामुळे अनंत भाई अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्न सोहळ्याची सुरुवात झाली आहे. या सामूहिक विवाह सोहळासाठी 50 आर्थिक दुर्बल दांपत्यांना पालघर वरतून या विशेष सोहळ्यासाठीस्थानांतरित करून, शंभर किलोमीटर दूर ठाणे येथे अविस्मरणीय सोहळा पार पडला. साधारणतः 800 लोकांमध्ये पार पडला या सोहळ्यात त्यांचे कुटुंबीय, समाजातील प्रतिष्ठित लोक, समाजसेवक इत्यादी उपस्थित होते.


अंबानी कुटुंब नेहमीच “मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे” या एका विचारावरती काम करत असते आणि हीच त्यांच्या कुटुंबाची परंपरा आहे.या सामूहिक विवाह सोहळ्यात श्रीमती नीता अंबानी आणि श्री मुकेश अंबानी सुद्धा उपस्थित होते. यामुळे या विवाह सोहळ्यात अजूनच चार चांद लागल्याचे सांगितलं जाते. या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये प्रत्येक दाम्पत्यांला सोन्याची आभूषण आहे त्यात मंगळसूत्र अंगठी आणि नथ ही भेट म्हणून देण्यात आली. अंबानी कुटुंबियांचं या सामूहिक विवाह सोहळ्याच्या नियोजनानंतर सर्व स्तरातून प्रचंड कौतुक होत आहे .

एआयच्या माध्यमातून खुलणार अनोखी प्रेमकहाणी

 एआयच्या माध्यमातून खुलणार अनोखी प्रेमकहाणी

 

सोनी मराठी वाहिनीवरील 'तू भेटशी नव्याने’ मालिकेची उत्सुकता

 

मालिका  'तू भेटशी नव्याने’ येत्या  जुलैपासून सोनी मराठी वाहिनीवर सोम ते शुक्र रात्री .००वाआपल्या भेटीला येणार आहे.


 

सोनी मराठी वाहिनीने आजवर अनेक चांगल्या मालिका प्रेक्षकांसाठी आणल्या आहेतप्रेक्षकांनीही या मालिकांवर  भरभरून  प्रेम केलं आहेमात्र मालिका विश्वात एक वेगळं पाऊल टाकत पहिली एआय मालिका प्रेक्षकांसाठी आणली आहे. ‘तू भेटशी नव्याने या मालिकेच्या घोषणेपासूनच ही एआय मालिका नेमकी कशी असेलयाची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहेमालिका विश्वात एआयवर आधारित असलेली ही जगभरातली पहिलीच मालिका आहेही मालिका येत्या  जुलैपासून सोनी मराठी वाहिनीवर रोज रात्री .००वाआपल्या भेटीला येणार आहे.



यावेळी  बोलताना सोनी मराठी वाहिनीचे  बिझनेस हेड अजय भाळवणकार म्हणाले कीसोनी मराठी वाहिनीने प्रेक्षकांसाठी नेहमीच  नाविन्यपूर्ण  प्रयोग केले आहेतअसाच एआयचा एक वेगळा प्रयोग ‘तू भेटशी नव्याने मालिकेच्या निमित्ताने करत असून  केवळ तंत्रज्ञान वापरायचं म्हणून हा प्रयोग  केलेला नाही तर क्रिएटिव्ह टीमची मेहनत यामध्ये दिसणार आहे.  तंत्रज्ञानाप्रमाणे मालिकेची कथा ही तितकीच दमदार असायला हवी हे आम्ही कटाक्षाने पाळलं आहेवेगळी कथा आणि उत्तम तंत्रज्ञान याचा मिलाफ असलेली ही मालिका  प्रेक्षकांचं  नक्की मनोरंजन करेल असा विश्वास सोनी मराठी वाहिनीच्या फिक्शन हेड सोहा कुळकर्णी यांनी व्यक्त  केलापहिल्यांदा एआयवर आधारित मालिकेत काम करण्याची मिळालेली संधी माझ्यासाठी  निश्चितच आनंददायी असल्याचे  सुबोध भावे यांनी सांगितलेसुबोध भावे यांच्यासोबाबत काम करण्याचा आनंद आणि दडपण दोन्ही असल्याचे शिवानी सोनार हिने सांगितले.


 

पहिलं प्रेम कधीही विसरता येत नाहीत्या प्रेमाच्या आठवणी मनाच्या एका कोपऱ्यात कायम असतातयाच आठवणींचा हळवा बंध घेऊन माही आणि गौरी या दोघांची प्रेमकथा बहरणार आहेप्रत्येकाला पुन्हा प्रेमात पाडणारी ही नवीकोरी गोष्ट दोन काळांतल्या वेगळ्या शैलींत दिसणार आहे.मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्माते अजय मयेकर आहेतसहनिर्माते  संदीप जाधव आहेत.



या मालिकेच्या माध्यमातून अभिनेता सुबोध भावे छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहेत्याच्या जोडीला अभिनेत्री शिवानी सोनार प्रमुख भूमिका साकारणार आहेसुबोध भावे हा अष्टपैलू अभिनेत्यांपैकी एकचित्रपट  मालिका यांमध्ये त्याने साकारलेल्या भूमिकांचं नेहमीच कौतुक झाल्याचं पाहायला मिळालं आहेएखादी व्यक्तिरेखा अविस्मरणीय कशी करायचीहे या अभिनेत्याने वेळोवेळी दाखवून दिलं आहेत्याची प्रत्येक मालिका खास आहेअभिनेत्री शिवानी सोनार ही मालिकेतला चर्चेतला चेहरा आहे.


वेगवेगळ्या मालिकांमधून घराघरांत पोहोचलेला हा चेहरा आता 'तू भेटशी नव्याने या मालिकेत खास अंदाजात दिसणार आहे ‘तू भेटशी नव्याने ह्या मालिकेच्या माध्यमातून एका नव्या प्रयोगासाठी ही जोडी सज्ज झाली आहे.

 

'तू भेटशी नव्याने या मालिकेत सुबोध भावे हा दुहेरी भूमिकेत दिसणार आहेमात्रया दोन्ही व्यक्तीरेखांच्या वयामध्ये जवळपास २०-२५ वर्षांचे अंतर असणार आहेया मालिकेतला सुबोध भावे आणि शिवानी सोनार यांचं वेगळं दिसणं सध्या चर्चेत आहेयात अभिमन्यू या कॉलेज प्रोफेसरच्या भूमिकेत सुबोध आणि  तरुण माहीच्या भूमिकेतही तोच दिसणार आहेशिवानी सोनार गौरी या भूमिकेत दिसणार आहे

   'तू भेटशी नव्यानेमालिकेच्या निमित्ताने दोन वेगळ्या काळांतल्या भूमिका आणि नव्वदीच्या काळातील आठवणी पहिल्यांदाच अनुभवायला  मिळणार आहेत.एआयचा वापर करून ह्या मालिकेतल्या व्यक्तिरेखा साकारल्या जाणार आहेत.  या नव्या प्रयोगाचा एक भाग म्हणून आणि मालिकेच्या जाहिरातीकरता एक भन्नाट कल्पनाही लढवली होती मे १९९१ रोजी सुबोधने त्याची पत्नी मंजिरी हिला प्रपोज केले होतेअभिनेत्याच्या आयुष्यातल्या या गोड क्षणानिमित्त त्याने  मे २०२४ रोजी एक व्हिडिओ शेअर केलात्याने त्या क्षणी नेमकं काय घडलं होतंहे अत्यंत आगळ्यावेगळ्या शैलीत सांगितलंया व्हिडिओमध्ये ३३ वर्षांपूर्वीचा सुबोध दिसलामात्र त्यासाठी कोणताही जुना फोटो किंवा व्हिडिओ वापरला नव्हतातर एआयचा वापर करून सुबोधने ही किमया साधलीतर मालिका सुरू होण्यापूर्वी शिवानीने सुबोध भावे याला त्याच्या मालिकात्रपटांची आठवण करून देणारी एक खास फ्रेम भेट म्हणून दिली.

 

नातं जपण्यासाठी सोबत हवी असते फक्त निरंतर प्रेमाचीकारणजगायला श्वासाची नाही तरप्रेमाची गरज असते!”‘तू भेटशी नव्याने या शीर्षकाप्रमाणेच  नव्या रूपात  नव्या वळणार होणारी ही भेट नेमकी  कशी असेलया प्रेमकथेचे रंग कसे बहरणारहे  सर्व अनुभवण्यासाठी येत्या  जुलैपासून सोनी मराठी वाहिनीवर रोज रात्री .०० वाप्रसारित होणारीतू भेटशी नव्यानेही मालिका नक्की पाहा.

Saffrons Mrs India (Monsoon Queen) & Saffrons Miss India (Monsoon Princess) 2024.

 Greetings from Saffrons World!!!

After the Grand Success of Saffrons Miss India, Mrs India & Mr India International 2024, Saffrons World takes the pleasure to announce Monsoon Dhamaka.

Saffrons Mrs India (Monsoon Queen) & Saffrons Miss India (Monsoon Princess) 2024.

NO SWIMSUIT ROUND, NO BIKINI ROUND NO SKIN SHOW 

WORLD OF FASHION UNDER ONE UMBRELLA FOR MISS & MRS.

Contestant’s Benefits

*Free Gift of Real Diamond Jewellery worth Rs.10,000/- *All the contestants will get a free portfolio worth Rs.25,000/- *Grooming & 

Personality Development *Three Winners from each category will get Daimond on their teeth. *Dental Care (Scaling and Polishing)

 *Skin & Hair Care *Fitness Care *Introduction *Stage Fear *Voice Modulation *Diction *Table Manners *Camera Facing 

*Ramp walk (Choreography) *Certificates to all contestants and Winners *Gift Vouchers *Gift Hampers *Introduction with News Media 

*Introduction with Producers and Directors *Crown and Sash *Celebrities to interact *Guidance for  Movies, TV Serials, Music Albums 

*Future Modeling endorsement for Fashion Shows, Short Films, Web Series, Music Albums, Saree shoots Jewellery shoots and Product Ads.

Again.....

You don't have to be a Model to become a Model.

On the 21st of July 2024 in Mumbai.

For Registration and detail 

Contact no: 9594573869,  8928137608

अनंत भाई अंबानींचा शाही सामूहिक विवाह सोहळा: सोहळा समाज प्रेमाचा...

 अनंत भाई अंबानींचा शाही सामूहिक विवाह सोहळा: सोहळा समाज प्रेमाचा...

नुकत्याच झालेल्या अनंत भाई अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहपूर्व सोहळ्याची चर्चा देशभर झाली आहे. जामनगर मधील अद्भुत विवाह सोहळा, त्यानंतर परदेशात क्रूज मध्ये झालेला पूर्व विवाह सोहळा, यांनी देशाचे नाही तर जगाचे लक्ष वेधले होते. 

अंबानी कुटुंब केवळ श्रीमंत म्हणून नाही तर त्यांच्या दानधर्मासाठी तसेच समाज उपयोगी कामासाठी सुद्धा चर्चित असतात. 

त्यामुळेच आता चर्चा आहे ती अंबानी कुटुंबियांनी घडवून आणलेल्या एका आगळ्यावेगळ्या सामूहिक विवाह सोहळ्याची, सुरुवातीला स्वामी विवेकानंद ज्ञान मंदिर पालघर येथे आयोजित हा सामूहिक विवाह सोहळा नंतर रिलायन्स कॉर्पोरेट पार्क ठाणे येथे स्थानांतरीत करण्यात आला.

आर्थिक सुबत्तता नसलेल्या दांपत्याची जबाबदारी घेऊन, त्यांचा थाटामाटात लग्न समारंभ अंबानी कुटुंबियांकडून करण्यात आला. अतिशय आलिशान मंडप भोजन व्यवस्था हे बघून नवविवाहित दांपत्य आणि त्यांचे कुटुंबीय भारावून गेले.

या सामूहिक लग्न समारंभामुळे अनंत भाई अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्न सोहळ्याची सुरुवात झाली आहे.

या सामूहिक विवाह सोहळासाठी 50 आर्थिक दुर्बल दांपत्यांना पालघर वरतून या विशेष सोहळ्यासाठीस्थानांतरित करून, शंभर किलोमीटर दूर ठाणे येथे अविस्मरणीय सोहळा पार पडला. साधारणतः 800 लोकांमध्ये पार पडला या सोहळ्यात त्यांचे कुटुंबीय, समाजातील प्रतिष्ठित लोक, समाजसेवक इत्यादी उपस्थित होते.

अंबानी कुटुंब नेहमीच “मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे” या एका विचारावरती काम करत असते आणि हीच त्यांच्या कुटुंबाची परंपरा आहे.या सामूहिक विवाह सोहळ्यात श्रीमती नीता अंबानी आणि श्री मुकेश अंबानी सुद्धा उपस्थित होते.

यामुळे या विवाह सोहळ्यात अजूनच चार चांद लागल्याचे सांगितलं जाते. या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये प्रत्येक दाम्पत्यांला सोन्याची आभूषण आहे त्यात मंगळसूत्र अंगठी आणि नथ ही भेट म्हणून देण्यात आली.

अंबानी कुटुंबियांचं या सामूहिक विवाह सोहळ्याच्या नियोजनानंतर सर्व स्तरातून प्रचंड कौतुक होत आहे .

Tuesday, July 2, 2024

गौतमीच्या मैत्रीने खुलणार क्षितिजचे जीवन; 'अंतरपाट' मालिकेत नवं वळण

 गौतमीच्या मैत्रीने खुलणार क्षितिजचे जीवन; 'अंतरपाट' मालिकेत नवं वळण

कलर्स मराठीवरील 'अंतरपाट' या लोकप्रिय मालिकेत गौतमी आणि क्षितिजचा लग्नसोहळा नुकताच थाटामाटात पारंपरिक पद्धतीने पार पडला आहे. त्यांचा विवाह विशेष सोहळा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. या विशेष सोहळ्यानंतर त्यांनी आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. लग्नाच्या पहिल्या रात्रीच क्षितिज गौतमीला त्याचं जान्हवीवर प्रेम असल्याचं सत्य सांगणार आहे, तर दुसरीकडे आता त्यांच्या नात्यातील नवा अध्याय सुरू होणार आहे. दोघांमध्ये मैत्रीचं नातं फुलणार आहे.

क्षितिजचं गौतमीसोबत लग्न झालेलं असलं तरी त्याच्या मनात अजूनही पूर्वीची प्रेयसी जान्हवीची जागा कायम आहे. जान्हवीचे स्थान कोणीही घेऊ शकत नाही, हे त्याच्या मनात पक्के आहे. तरीसुद्धा, गौतमीने या नात्यात मैत्रीचे बीज पेरण्याचा निर्णय घेतला आहे. एकंदरीतच क्षितिजने सत्य सांगितल्यानंतरही गौतमीने धीर सोडलेला नाही.

गौतमी आणि क्षितिजच्या मैत्रीचं नातं त्यांच्या आयुष्यात एक नवा रंग भरणार आहे. गौतमीने क्षितिजला दिलेला हा मैत्रीचा हात त्यांच्या नात्याला एक नवी दिशा देणार आहे. गौतमी आणि क्षितिज लग्नबंधनात अडकल्याने त्यांच्यात पती-पत्नीचं नातं निर्माण झालंय. पण त्यासोबत ते इतर नात्यांतही अडकले आहेत. ही सगळी नाती जपणं गौतमी आपलं कर्तव्य मानते. तिने अत्यंत सकारात्मक पद्धतीने या लग्नाचा स्वीकार केलेला मालिकेत पाहायला मिळेल.

गौतमी आणि क्षितिजच्या नात्यातील हे नवं वळण प्रेक्षकांना नक्कीच भावेल. त्यांच्या या नव्या, सुंदर नात्याची झलक पाहा आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर. पाहा 'अंतरपाट' दररोज संध्याकाळी 7:30 वाजता फक्त आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर आणि कधीही #JioCinema वर.

अनंत भाई अंबानींचा शाही सामूहिक विवाह सोहळा ,सोहळा समाज प्रेमाचा...

  अनंत भाई अंबानींचा शाही सामूहिक विवाह सोहळा ,सोहळा समाज प्रेमाचा... नुकत्याच झालेल्या अनंत भाई अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहपूर्व...