Monday, February 2, 2026

*खवैय्ये आवडत्या चिकनक्रिस्परचा आस्वाद घेऊ शकतात, केवळ 99 रुपयांत*

*खवैय्ये आवडत्या चिकनक्रिस्परचा आस्वाद घेऊ शकतात, केवळ 99 रुपयांत*

KFC इंडियाचे चिकन क्रिस्पर मील आता फक्त 99 रुपयांत

चिकनप्रेमी फ्राईज आणि पेप्सीसह त्यांच्या आवडत्या चिकनक्रिस्परचा आस्वाद घेऊ शकतात, केवळ 99 रुपयांत~

India, 2025: या वर्षाची अखेर आणखीनच कुरकुरीत, खुसखुशीत आणि चविष्ट झाली आहे!

KFC आपल्या खवैय्यांचे आवडते चिकन क्रिस्परच्या रूपातले जेवण केवळ 99 रु. इतक्या अशक्यप्राय किंमतीत घेऊन आले आहे. 

चिकनप्रेमी खवैय्ये एका मऊ तिळाच्या बनमध्ये रसाळ पेरी पेरी चिकन स्ट्रिप्स, क्रीमी, टँगी सॉस आणि लेट्यूस ठेऊन बनवलेले आपले आवडते चिकन क्रिस्पर आणि जोडीला कुरकुरीत, सोनेरी फ्राईज आणि थंडगार पेप्सीचा मनमुराद आस्वाद घेऊ शकतात.

केवळ 99 रु. किंमतीचे चिकन क्रिस्पर मील आता महाराष्ट्र (मुंबई वगळून), चंदीगड ट्रायसिटी आणि हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील निवडक शहरांमध्ये डाईन-इन आणि टेकअवे या दोन्ही पर्यायात उपलब्ध आहे.

KFC मध्ये डाईन-इन करतानाच तुम्ही KFC अॅपवर प्री-ऑर्डर करून झटपट तुमचे आवडते चिकन क्रिस्पर मील मागवू शकता आणि केवळ 99 रुपयांत आपल्या आवडत्या चिकन क्रिस्पर मीलवर ताव मारू शकता.

डॅशिंग जोडीच्या प्रेमाचा संघर्ष सांगणारे ‘रुबाब’चे शीर्षक गीत प्रदर्शित

डॅशिंग जोडीच्या प्रेमाचा संघर्ष सांगणारे ‘रुबाब’चे शीर्षक गीत प्रदर्शित 

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेत असलेल्या ‘रुबाब’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाचे शीर्षक गीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या डॅशिंग जोडीच्या प्रेमकथेची झलक याआधीच प्रेक्षकांनी आधीच्या गाण्यांमधून अनुभवली. आता या शीर्षकगीतातून त्यांच्या नात्यातील नवा टप्पा उलगडतो. प्रेमात आलेले अंतर, बदललेली परिस्थिती आणि तरीही न डगमगणारी भावना या गाण्यात पाहायला मिळते. 

परिस्थितीमुळे एकमेकांपासून दूर गेले असले, तरी त्यांचे प्रेम मात्र तितकेच ठाम आणि आत्मविश्वासाने भरलेले आहे. आपले प्रेम पुन्हा मिळवण्यासाठी, कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही मार्गाने आपले प्रेम मिळवायचे, हा निर्धार या शीर्षकगीतातून ठळकपणे समोर येतो. रोमान्ससोबतच ॲटिट्यूड, ठामपणा आणि रुबाब यांचा मिलाफ या गाण्यात पाहायला मिळतो. 

‘रुबाब हा प्रेम जगण्याचा’ ही ओळ गाण्याचा आत्मा ठरते. ठामपणे, अभिमानाने आणि स्वतःच्या अटींवर जगणे म्हणजे प्रेम ही भावना या एका ओळीतून प्रभावीपणे मांडण्यात आली आहे. या ओळीमुळे संपूर्ण गाण्याला एक वेगळी ओळख मिळते. या शीर्षकगीतात डॅशिंग जोडीचे प्रेम क्षणांपुरते मर्यादित न राहाता, त्यामागील ठामपणा, आत्मविश्वास सादर करणारे आहे. 

या गाण्याला मुकुंद सुर्यवंशी यांचा प्रभावी आवाज लाभला असून, चिनार - महेश यांनी संगीत दिले आहे. गाण्याचे आशयपूर्ण बोल मंगेश कांगणे यांनी लिहिले आहेत. शब्द, संगीत आणि गायन यांचा अचूक मेळ साधत हे शीर्षक गीत चित्रपटाच्या एकूण भावविश्वाला अधिक गहिरे बनवते.  

चित्रपटाचे दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे म्हणतात,  '' 'रुबाब' हा चित्रपट एक विचार आहे. हे शीर्षकगीत चित्रपटाचा सार सांगतो. प्रेम कसे असावे, ते कसे जगावे आणि त्यात असलेला आत्मसन्मान किती महत्त्वाचा आहे, हे या गाण्यातून आम्ही सांगायचा प्रयत्न केला आहे. या शीर्षकगीतातून नायक आणि नायिकेमधील अंतर, संघर्ष आणि तरीही न संपणारी भावना दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रेक्षकांना हे गीत नक्कीच भावेल.” 

झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित ‘रुबाब’ या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन शेखर बापू रणखांबे यांनी केले असून संजय झणकर आणि गौरी झणकर हे चित्रपटाचे निर्माते आहेत. उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर यांनी चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. या चित्रपटात संभाजी ससाणे आणि शितल पाटील प्रमुख भूमिकेत झळकणार असून, ही नवी जोडी प्रेक्षकांसाठी नक्कीच उत्सुकतेचा विषय ठरणार आहे. ६ फेब्रुवारीपासून ‘रुबाब’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.डॅशिंग जोडीच्या प्रेमाचा संघर्ष सांगणारे ‘रुबाब’चे शीर्षक गीत प्रदर्शित 

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेत असलेल्या ‘रुबाब’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाचे शीर्षक गीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या डॅशिंग जोडीच्या प्रेमकथेची झलक याआधीच प्रेक्षकांनी आधीच्या गाण्यांमधून अनुभवली. आता या शीर्षकगीतातून त्यांच्या नात्यातील नवा टप्पा उलगडतो. प्रेमात आलेले अंतर, बदललेली परिस्थिती आणि तरीही न डगमगणारी भावना या गाण्यात पाहायला मिळते. 

परिस्थितीमुळे एकमेकांपासून दूर गेले असले, तरी त्यांचे प्रेम मात्र तितकेच ठाम आणि आत्मविश्वासाने भरलेले आहे. आपले प्रेम पुन्हा मिळवण्यासाठी, कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही मार्गाने आपले प्रेम मिळवायचे, हा निर्धार या शीर्षकगीतातून ठळकपणे समोर येतो. रोमान्ससोबतच ॲटिट्यूड, ठामपणा आणि रुबाब यांचा मिलाफ या गाण्यात पाहायला मिळतो. 

‘रुबाब हा प्रेम जगण्याचा’ ही ओळ गाण्याचा आत्मा ठरते. ठामपणे, अभिमानाने आणि स्वतःच्या अटींवर जगणे म्हणजे प्रेम ही भावना या एका ओळीतून प्रभावीपणे मांडण्यात आली आहे. या ओळीमुळे संपूर्ण गाण्याला एक वेगळी ओळख मिळते. या शीर्षकगीतात डॅशिंग जोडीचे प्रेम क्षणांपुरते मर्यादित न राहाता, त्यामागील ठामपणा, आत्मविश्वास सादर करणारे आहे. 

या गाण्याला मुकुंद सुर्यवंशी यांचा प्रभावी आवाज लाभला असून, चिनार - महेश यांनी संगीत दिले आहे. गाण्याचे आशयपूर्ण बोल मंगेश कांगणे यांनी लिहिले आहेत. शब्द, संगीत आणि गायन यांचा अचूक मेळ साधत हे शीर्षक गीत चित्रपटाच्या एकूण भावविश्वाला अधिक गहिरे बनवते.  

चित्रपटाचे दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे म्हणतात, '' 'रुबाब' हा चित्रपट एक विचार आहे. हे शीर्षकगीत चित्रपटाचा सार सांगतो. प्रेम कसे असावे, ते कसे जगावे आणि त्यात असलेला आत्मसन्मान किती महत्त्वाचा आहे, हे या गाण्यातून आम्ही सांगायचा प्रयत्न केला आहे. या शीर्षकगीतातून नायक आणि नायिकेमधील अंतर, संघर्ष आणि तरीही न संपणारी भावना दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रेक्षकांना हे गीत नक्कीच भावेल.” 

झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित ‘रुबाब’ या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन शेखर बापू रणखांबे यांनी केले असून संजय झणकर आणि गौरी झणकर हे चित्रपटाचे निर्माते आहेत. उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर यांनी चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. या चित्रपटात संभाजी ससाणे आणि शितल पाटील प्रमुख भूमिकेत झळकणार असून, ही नवी जोडी प्रेक्षकांसाठी नक्कीच उत्सुकतेचा विषय ठरणार आहे. ६ फेब्रुवारीपासून ‘रुबाब’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आई–मुलींच्या नात्याचा हळुवार प्रवास सांगणारं सोनू निगम यांचे ‘हास जराशी’ गाणं प्रदर्शित

आई–मुलींच्या नात्याचा हळुवार प्रवास सांगणारं सोनू निगम यांचे ‘हास जराशी’ गाणं प्रदर्शित 

'तिघी'मधील भावस्पर्शी गाणं प्रेक्षकांच्या भेटीला 


आई आणि मुलींचं नातं हे केवळ जन्माने जोडलेलं नसतं, तर ते आयुष्यभर साठत गेलेल्या आठवणींनी, संस्कारांनी, न बोललेल्या भावनांनी आणि एकमेकांसाठी असलेल्या मूक समजुतींनी घडलेलं असतं. कधी त्या नात्यात हसरे, हलके क्षण असतात, तर कधी अपेक्षा, वेदना आणि अंतरही… तरीही मनाच्या खोल कुठेतरी हे नातं कायम घट्ट गुंफलेलं असतं. अशाच भावनांचा, नात्यांच्या नाजूक छटांचा हळुवार वेध घेणारा आगामी मराठी चित्रपट म्हणजे ‘तिघी’. या चित्रपटातील ‘हास जराशी’ हे भावनिक गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून, अल्पावधीतच ते मनाला स्पर्श करून जात आहे. आई आणि मुलींच्या नात्यातील हळवे, आनंदी, कधी वेदनांनी ओथंबलेले, तर कधी आशेने उजळलेले क्षण या गाण्यात सुंदरपणे उलगडताना दिसतात. दुःख आणि सुख, अंतर आणि आपुलकी या सगळ्यांचा एक भावनिक प्रवास हे गाणं मांडतं.

जितेंद्र जोशी यांच्या संवेदनशील आणि अर्थपूर्ण शब्दांना अद्वैत नेमळेकर यांचं हृदयाला भिडणारं संगीत लाभलं असून, सोनू निगम यांच्या जादुई आवाजामुळे हे गाणं अधिकच भावस्पर्शी झालं आहे. भारती आचरेकर, सोनाली कुलकर्णी आणि नेहा पेंडसे बायस या तिघींवर चित्रित झालेलं हे गाणं त्यांच्या नात्यातील भावनिक बंध, हसरे क्षण आणि न बोललेली वेदना प्रभावीपणे समोर आणतं.

चित्रपटाच्या दिग्दर्शिका जीजिविषा काळे सांगतात, '' ‘हास जराशी’ हे गाणं आई आणि मुलींच्या नात्यातील अतिशय नाजूक भावविश्व उलगडतं. या गाण्यात मोठे प्रसंग नाहीत, परंतु आयुष्य घडवणारे छोटे क्षण आहेत. एकमेकांसाठीचं न बोललेलं प्रेम, मनात दडवलेली वेदना, आणि तरीही कठीण काळात एकमेकांसाठी उभं राहाण्याची ताकद. या तिघींचं नातं कधी मैत्रीचं वाटतं, कधी संघर्षाचं, तर कधी फक्त एक शांत आधार बनून राहातं. ‘हास जराशी’ हे गाणं म्हणजे या नात्याचा एक हळवा श्वास आहे, जो प्रेक्षकांच्या मनाला नकळत स्पर्श करून जातो.”

सुप्री मीडिया प्रस्तुत आणि कोक्लिको पिक्चर्स निर्मित ‘तिघी’ या चित्रपटात भारती आचरेकर, सोनाली कुलकर्णी आणि नेहा पेंडसे बायस यांच्या प्रमुख भूमिका असून, चित्रपटाची कथा व दिग्दर्शन जीजिविषा काळे यांनी केलं आहे. निर्मितीची धुरा निखिल महाजन, सुहृद गोडबोले, स्वप्निल भंगाळे आणि नेहा पेंडसे बायस यांनी सांभाळली आहे. आई–मुलींच्या नात्याकडे प्रगल्भ, संवेदनशील आणि वेगळ्या नजरेतून पाहाणारा ‘तिघी’ हा चित्रपट येत्या ६ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, त्याआधीच ‘हास जराशी’ हे गाणं प्रेक्षकांच्या मनात खास जागा निर्माण करत आहे.

Saturday, January 31, 2026

India leads a ‘Global Vision for Patient Safety’ at Day 1 of Apollo Hospitals International Health Dialogue 2026

 India leads a ‘Global Vision for Patient Safety’ at Day 1 of Apollo Hospitals International Health Dialogue 2026

Hyderabad, 31 January 2026: International Health Dialogue (IHD) 2026 opened today in Hyderabad, bringing together clinicians, patient safety leaders, accreditation experts, and health system policymakers from India and abroad. With the theme Global Voices. One Vision. Day 1 centred patient safety where it truly belongs, as a leadership and governance priority, shaped by equity and enabled by responsible digital transformation. The discussions reflected a clear direction across geographies: India’s lived experience of delivering care at scale, while steadily strengthening standards and accountability, is increasingly informing how the world thinks about patient safety and trust. 

Opening the conference, Dr. Sangita Reddy, Joint Managing Director, Apollo Hospitals Group, recalled the founding purpose of IHD as a platform built for sharing learning that should not remain confined to individual systems. “So much innovation is happening within our hospitals, within our systems. We are learning every day. But why is this knowledge staying within our own ecosystem? Why are we not sharing it more openly?” she said, adding that the intent has always been to “take what we have learned and make it useful for others.” Reflecting the expanding global relevance of the platform, she noted that IHD 2026 received over 5,000 registrations, 300+ paper submissions, and 120+ award entries from 75+ institutions worldwide.

Setting the tone for outcomes that work in real life, Dr Jayesh Ranjan, Special Chief Secretary for the Industries & Commerce (I&C) and Information Technology (IT) Departments, Government of Telangana, highlighted why equity must sit at the centre of patient safety design. “When we talk about sharing learning and improving systems, we have to start with the truth that patients are not homogeneous. Different patients live in different worlds, and safety means different things in each,” he said. “An equity lens forces a design lens. If we want patient safety to hold up in the real world, we must design for those who are most vulnerable, and we must plan for continuity, access, and how people actually behave,” he added. On digital inclusion, he observed, “The digital divide is not only infrastructure. Often, the mindset divide is bigger.”

Across the day, speakers converged on one practical point: patient safety outcomes increasingly depend on how well the ecosystem works as a coordinated whole, across regulators, accreditors, providers, and technology partners. In the opening plenary, Dr. Madhu Sasidhar, President and Chief Executive Officer, Hospitals Division, Apollo Hospitals Enterprise Limited, emphasised shared ownership and organisational accountability. “Patient safety cannot be solved by one stakeholder alone. It requires regulators, governments, accreditors, providers, and technology firms to work as one. Patient safety is not a departmental responsibility. It is in fact an organisational leadership responsibility.”

From a global quality and safety lens, Dr. Carsten Engel, CEO, International Society for Quality in Health Care (ISQua), reflected on the gap between sustained attention and on-ground improvement. “Patient safety has been on the agenda for decades, but we still have to say we are not there yet,” he said. He cautioned against adding activity without impact, noting, “We risk creating safety clutter, procedures and activities done in the name of safety that do not improve safety.” He urged leaders to adopt a systems view of behaviour and context: “Don’t ask why people didn’t do what they should have done. Ask why it made sense for them to do what they did.”

On standards and execution, Dr. Atul Mohan Kochhar, CEO, National Accreditation Board for Hospitals & Healthcare Providers (NABH), underlined urgency with an implementation-first approach. “Patient safety is not only a technical issue. It is a moral, social, and economic imperative. Policies alone do not improve safety. Implementation efficiency does,” he said. Reinforcing ambition in measurable terms, he added, “We must be ambitious when it comes to patient safety. Zero harm is the only number that can be accepted for patient safety risk.”

Building on this emphasis on implementation, accountability, and measurable safety outcomes, Apollo Hospitals also signed a Memorandum of Understanding with Roche Diagnostics India as part of Day 1 proceedings to explore the integration of advanced artificial intelligence into clinical decision-making. The collaboration will focus on translating AI-enabled insights into practical, clinician-friendly support across care pathways, strengthening consistency in clinical judgement, earlier risk identification, and safer, more standardised care delivery at scale.

Apollo’s emphasis on culture-led transformation was articulated by Dr. Rohini Sridhar, Chief of Medical Services, Apollo Hospitals, who stressed that systems improve only when clinical teams move together with the organisation. “Unless clinicians walk with you, zero harm cannot be achieved. If one unit experiences harm, every unit must learn immediately. Technology accelerates learning, but culture determines action.”

Later in the day, IHD 2026 hosted a dedicated spotlight session for the newly launched digital health startup community, with a curated set of startups pitching to investors. The session focused on solutions grounded in real clinical and operational gaps, including safer workflows, decision support, early risk identification, improved documentation, and scalable patient engagement. The segment reinforced IHD’s emphasis on translating innovation into validated, implementable tools that strengthen safety, outcomes, and trust.

IHD 2026 continues on January 31 in Hyderabad with further sessions and showcases focused on patient safety, digital transformation, healthcare operations, and clinical learning.

For further information contact :- Rajesh Dabhade 9594061617, Adfactors PR

अंकुश चौधरीच्या वाढदिवसानिमित्त ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

                             थोडी प्रतीक्षा…                                     मोठीधमाल! ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’           आता १३ फेब्रुवारीला

अंकुश चौधरीच्या वाढदिवसानिमित्त ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

३० जानेवारी रोजी प्रदर्शित होणारा ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट आता पुन्हा एकदा तेवढ्याच जोशाने आणि तेवढीच धमाल घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट आता १३ फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार असून, दिग्दर्शक अंकुश चौधरी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रदर्शनाची नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे थोड्या प्रतीक्षेनंतर, लवकरच कुरळे बंधूंची धमाल आणि गोंधळ प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे.

'पुन्हा एकदा साडे माडे तीन’ हा चित्रपट रतन, मदन, चंदन आणि बबन या वेगवेगळ्या स्वभावांच्या चार जणांच्या आयुष्यात घडणाऱ्या गोंधळाची, गैरसमजांची आणि अनपेक्षित वळणांची धमाल सांगणार आहे. सतत बिघडत जाणारी परिस्थिती, छोट्या गोष्टींमधून मोठा गोंधळ आणि त्यातून निर्माण होणारा विनोद हा या कथेचा  केंद्रबिंदू आहे. या सगळ्या गोंधळात रिंकू राजगुरूची एन्ट्री त्यांच्या आयुष्यात एक वेगळंच वळण घेऊन येणार आहे. ती या चौघांच्या आयुष्यात का आली आणि तिच्या येण्याने सगळ्यांची गडबड का उडाली, याची उत्तरं चित्रपट पाहूनच मिळणार आहेत. या सगळ्यात बबनचा खोडकरपणा, मदनचा विनोदी अंदाज, चंदनची निरागसता आणि रतनचा ताठर स्वभाव प्रेक्षकांना पुन्हा एकदा प्रेमात पाडणार आहे. 

चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत अमेय विनोद खोपकर पिक्चर्सचे अमेय खोपकर म्हणतात, ''माननीय अजितदादा पवार यांच्या अकाली जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली होती. हा आघात अत्यंत वेदनादायी असून, या दुःखात आम्हीही सहभागी आहोत. अशा काळात कोणत्याही प्रकारचा आनंदोत्सव साजरा करणे आम्हाला योग्य वाटले नाही. त्यामुळे संवेदनशीलतेची जाणीव ठेवत आम्ही ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. तसेच इतर चित्रपटांच्या प्रदर्शनावर कोणताही परिणाम होऊ नये, याचीही काळजी घेत आम्ही हा चित्रपट १३ फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित करत आहोत. संवेदनशीलतेला प्राधान्य देत घेतलेला हा निर्णय प्रेक्षकांकडूनही समजून घेतला जाईल, असा विश्वास आहे.''

या चित्रपटात अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, आणि रिंकू राजगुरू यांच्या प्रमुख भूमिका असून संजय नार्वेकर यात पाहुणे कलाकार म्हणून झळकणार आहेत. सुशीलकुमार अग्रवाल आणि अल्ट्रा मीडिया ॲण्ड एंटरटेनमेंट प्रस्तुत, उषा काकडे प्रॉडक्शन्स, ईओडी. मीडिया उदाहरणार्थ निर्मित आणि अमेय विनोद खोपकर पिक्चर्स यांच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अंकुश चौधरी यांनी केले आहे. तसेच उषा काकडे, पुष्कर यावलकर, सुधीर कोलते, स्वाती खोपकर आणि निनाद नंदकुमार बत्तीन हे निर्माते आहेत. मोहसिन खान, यशराज टिळेकर, सौरभ ललवाणी आणि धनविक एंटरटेनमेंट सहनिर्माते असून स्मिथ पीटर तेलगोटे सहायक निर्माता आहेत. चित्रपटाचे छायाचित्रण प्रसिद्ध छायाचित्रकार संजय जाधव यांनी केले आहे.

स्क्रिप्ट असतानाही स्क्रिप्टशियाव घडला रुबाब! अनोख्या मेकिंग स्टोरीने ‘रुबाब’ चर्चेत

स्क्रिप्ट असतानाही स्क्रिप्टशियाव घडला रुबाब! अनोख्या मेकिंग स्टोरीने ‘रुबाब’ चर्चेत

झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित ‘रुबाब’ या आगामी मराठी चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. ‘तुझ्यासारखी नको, तूच पाहिजे’ ही चित्रपटाची टॅगलाईन सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, चित्रपटातील रुबाबदार जोडीही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. तसेच चित्रपटाच्या ट्रेलरलाही प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. मात्र सध्या हा चित्रपट एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. या चित्रपटाच्या मेकिंगमधील एक अनोखी बाब समोर आली आहे. 

ट्रेलरमध्ये चित्रपटाच्या कथेची झलक पाहायला मिळते, तसेच कलाकारांचा जबरदस्त अभिनयही दिसतो. कलाकारांच्या दमदार अभिनयामागे एक वेगळीच गोष्ट आहे. या चित्रपटासाठी कलाकारांना स्क्रिप्टच देण्यात आले नाही. कलाकारांनी २३ दिवस वेगवेगळ्या लोकेशन्सवर जाऊन रिहर्सल करून, वर्कशॉप करून या चित्रपटाचे शूटिंग केले मात्र, स्क्रिप्ट असूनही त्यांना स्क्रिप्ट मिळाले नाही. याचे कारण असे की, दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे यांनी प्रत्येक प्रसंग, संवाद आणि भावनिक पट त्यांच्या मार्गदर्शनातून सविस्तरपणे स्पष्ट केला, ज्यामुळे कलाकारांनी प्रत्यक्ष अनुभवातून सीन साकारले. या वेगळ्या कार्यपद्धतीमुळे सेटवर सतत संवाद, चर्चा आणि सर्जनशील देवाणघेवाण सुरू होती. परिणामी, स्क्रिप्टपेक्षा समज, अनुभव आणि रिहर्सलवर आधारित अभिनयाची एक नवी प्रक्रिया ‘रुबाब’च्या निर्मितीत पाहायला मिळाली. 

झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित ‘रुबाब’ या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन शेखर बापू रणखांबे यांनी केले असून संजय झणकर आणि गौरी झणकर निर्माते आहेत तर उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर प्रस्तुतकर्ता आहेत. या चित्रपटात संभाजी ससाणे व शितल पाटील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. येत्या ६ फेब्रुवारीपासून हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Friday, January 30, 2026

रोहिणी हट्टंगडी – मुक्ता बर्वे पुन्हा एकत्र!

 रोहिणी हट्टंगडी – मुक्ता बर्वे पुन्हा एकत्र!

‘माया’मध्ये अनुभवायला मिळणार स्वतंत्र स्त्रीमनाचा प्रगल्भ आविष्कार

मराठी रंगभूमीवर माय–लेकीचं नातं अत्यंत संवेदनशीलतेनं मांडणाऱ्या गाजलेल्या ‘चारचौघी’ या नाटकातून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या रोहिणी हट्टंगडी आणि मुक्ता बर्वे या दोन दिग्गज अभिनेत्री पुन्हा एकदा एकत्र येत आहेत. यावेळी त्या रंगभूमीवर नव्हे, तर मोठ्या पडद्यावर ‘माया’ या आगामी मराठी चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहेत.

‘चारचौघी’सारख्या स्त्रीप्रधान नाटकानंतर आता ‘माया’ या चित्रपटातही या दोघी स्वतंत्र विचारांच्या, स्वाभिमानी आणि आत्मभान असलेल्या स्त्री व्यक्तिरेखा साकारणार आहेत. अनुभव आणि अभिनयातील परिपक्वतेचा संगम असलेली ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावणारी ठरत आहे.

रोहिणी हट्टंगडी यांचा अभिनय म्हणजे सूक्ष्मतेतून मोठे भाव उलगडणारी प्रक्रिया, तर मुक्ता बर्वे ही आधुनिक स्त्रीचं सशक्त प्रतिनिधित्व करणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. त्यामुळे 'माया' मध्ये त्यांचा केवळ अभिनय नाही तर, स्त्रीमनाच्या विविध छटांची प्रगल्भ मांडणी पाहायला मिळणार आहे. 

रोहिणी हट्टंगडी म्हणतात, ''मुक्तासोबत पुन्हा काम करणं हा एक अत्यंत समाधान देणारा अनुभव आहे. ती एक संवेदनशील, विचारशील आणि स्वतःच्या अभिनयाबाबत प्रचंड प्रामाणिक अभिनेत्री आहे. तिच्यासोबत काम करताना समोरची व्यक्तिरेखा अधिक सखोल होते. अभिनय म्हणजे केवळ संवाद बोलणं नसून, तो जगण्याचा अनुभव असतो आणि मुक्ताकडे तो अनुभव मनापासून स्वीकारण्याची क्षमता आहे. तिच्यासोबतचा प्रत्येक सीन मला अभिनेत्री म्हणून अधिक समृद्ध करून जातो.'' 

मुक्ता बर्वे आपल्या अनुभवाबद्दल बोलते, ''रोहिणी ताईंसोबत पुन्हा काम करणं, ही माझ्यासाठी शिकण्याचीच एक प्रक्रिया आहे. त्यांच्या अनुभवातून येणारी शांतता, प्रसंग समजून घेण्याची दृष्टी आणि अभिनयातील प्रगल्भता सतत प्रेरणा देते. सेटवर त्यांच्यासोबत असताना अभिनय सहज घडतो. त्यांनी आयुष्य आणि अभिनय दोन्ही खूप खोलवर अनुभवलं आहे आणि ते त्यांच्या प्रत्येक भूमिकेत दिसून येतं. अशा कलाकारासोबत काम करणं हे खरं तर भाग्य आहे.”

शालिनी सिनेमाज आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन निर्मित ‘माया’ या चित्रपटाचे निर्माते डॉ. सुनील दातार, अलका मधुकर दातार आणि नितीन प्रकाश वैद्य आहेत. आदित्य इंगळे दिग्दर्शित या चित्रपटात मुक्ता बर्वे, रोहिणी हट्टंगडी यांच्यासह गिरीश ओक, सिद्धार्थ चांदेकर आणि विजय केंकरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. येत्या २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणारा ‘माया’ हा चित्रपट त्याच्या पोस्टरमुळे आधीच चर्चेत असून, नात्यांच्या गुंत्यातून उमटणारी, स्त्रीमनाच्या स्वातंत्र्याची आणि आत्मशोधाची ही कथा प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच भिडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

*६ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय ‘आफ्टर ओ.एल.सी’ – दमदार ॲक्शन आणि थराराची पर्वणी!*

 *६ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय ‘आफ्टर                                           ओ.एल.सी’                               दमदार ॲक्शन आणि थराराची पर्वणी!*

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेचा विषय ठरलेला बहुप्रतिक्षित ॲक्शन चित्रपट ‘आफ्टर ओ.एल.सी’ अखेर आपल्या रिलीज डेटसह सज्ज झाला आहे. अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेला हा दमदार, ॲक्शन-पॅक्ड सिनेमा ६ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच त्यातील तगडी ॲक्शन, रहस्य आणि थरारक दृश्यांनी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. प्रत्येक फ्रेममध्ये वेगळी ऊर्जा आणि कथा उलगडण्याची उत्सुकता निर्माण करणारा ‘आफ्टर ओ.एल.सी’ हा सिनेमा प्रेक्षकांना एक वेगळाच अनुभव देणार आहे.

या चित्रपटात कवीश शेट्टी, मेघा शेट्टी, शिवानी सुर्वे, विराट मडके, अश्विनी चवरे यांच्यासह अनेक मराठी कलाकारांची भक्कम टीम पाहायला मिळणार आहे. प्रत्येक कलाकाराने आपल्या भूमिकेला न्याय देत चित्रपट अधिक प्रभावी केला आहे. थरार, रहस्य आणि जोरदार ॲक्शन यांचा उत्तम मेळ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.कन्नड सिनेसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक सडागारा राघवेंद्र यांनी ‘आफ्टर ओ.एल.सी’चे दिग्दर्शन केले असून, ‘दिपक राणे फिल्म्स’ आणि ‘इंडियन फिल्म फॅक्टरी’ यांच्या संयुक्त विद्यमाने या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. हा सिनेमा मराठी भाषेत प्रदर्शित होणार असल्यामुळे मराठी प्रेक्षकांमध्ये त्याबद्दल विशेष उत्सुकता आहे.

दमदार कथा, जबरदस्त ॲक्शन आणि रहस्यमय प्रवास घेऊन येणारा *‘आफ्टर ओ.एल.सी’ ६ फेब्रुवारीपासून* आपल्या जवळच्या चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे.

थराराची ही सफर अनुभवण्यासाठी सज्ज राहा!

Tuesday, January 27, 2026

’पुन्हा एकदा साडे माडे तीन’चं धमाकेदार प्रमोशनल साँग चर्चेचा केंद्रबिंदू!

 तीन भावांचा निरागस जल्लोष…

 ’पुन्हा एकदा साडे माडे तीन’चं धमाकेदार प्रमोशनल साँग चर्चेचा केंद्रबिंदू!

कुरळे बंधू केमिस्ट्री म्हणजे नुसती गोष्ट नाही, तर धमाल, टोमणे, खट्याळपणा आणि मनमोकळा आनंद यांचा अखंड उत्सव! हाच उत्सव आता ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ या बहुप्रतीक्षित मराठी चित्रपटाच्या नव्या प्रमोशनल साँगमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. टीझर आणि ट्रेलरला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर हे दमदार, निरागस शब्दांचं आणि जबरदस्त एनर्जीने ओतप्रोत भरलेलं हे प्रमोशनल साँग सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

अवधूत गुप्ते यांच्या खणखणीत आणि उत्स्फूर्त आवाजामुळे गाण्यात वेगळीच चैतन्याची लहर निर्माण झाली आहे. गौरव चाटी आणि आदित्य बेडेकर यांच्या संगीताने गाण्याला धमाल टच दिला असून विक्रांत हिरनाईक यांच्या साध्या, निरागस आणि मनाला भिडणाऱ्या शब्दांतून तीन भावांमधील घट्ट नातं, इनोसंट बॉण्डिंग आणि मस्तीदार केमिस्ट्री सुंदरपणे उलगडते. हे गाणं ऐकताना पाय थिरकतातच, आणि चेहऱ्यावर हसूही नकळत उमटतं, म्हणूनच हा ट्रॅक खऱ्या अर्थाने ‘फील गुड’ ठरतोय.

या प्रमोशनल साँग निर्मिती प्रक्रिया देखील तितकीच इंटरेस्टिंग आहे. चित्रपटाच्या कथेत गाण्यासाठी स्वतंत्र सीन नसल्यामुळे प्रमोशनल साँग करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, पहिलं गाणं अजय–अतुल यांचं असल्याने ते प्रेक्षकांच्या मनात खोलवर रुळलं होतं. त्यामुळे त्या गाण्याच्या भावविश्वाशी सुसंगत असं, तरीही वेगळ्या ढंगाचं आणि तितकंच आपलेपण जपणारं गाणं देण्याचा विचार करण्यात आला.

याबाबत दिग्दर्शक अंकुश चौधरी म्हणतो, “चित्रपटात गाणं बसवता येईल, असा सीन नव्हता, म्हणून प्रमोशनल गाण्याचा विचार केला. पहिलं गाणं प्रेक्षकांच्या मनात आपली खास जागा निर्माण करून गेलं होतं. त्यामुळे त्याच भावनेला पुढे नेणारं, तरीही वेगळ्या मांडणीचं काहीतरी करायचं होतं. अजय–अतुल यांच्याशी चर्चा झाली, मात्र त्यांच्या इतर कमिटमेंटमुळे ते शक्य झालं नाही. एका सेशनदरम्यान चित्रपटातील एक बॅकग्राऊंड ट्यून आठवली आणि त्याच बेसवर जबरदस्त गाणं तयार करण्याची कल्पना सुचली. यावेळी रोमँटिक झोनऐवजी निरागस, इनोसंट आणि पूर्णपणे तीन भावांभोवती फिरणारं गाणं करायचं ठरवलं.”

टीझर, ट्रेलरनंतर आता प्रमोशनल साँगने ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ची उत्सुकता शिखरावर नेली आहे. तीन भावांचा हा धमाकेदार, निरागस आणि मनमोकळा जल्लोष मोठ्या पडद्यावर अनुभवण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ येत्या ३० जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

या चित्रपटात भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव आणि रिंकू राजगुरू यांच्या प्रमुख भूमिका असून संजय नार्वेकर यात पाहुणे कलाकार म्हणून झळकणार आहेत. सुशीलकुमार अग्रवाल आणि अल्ट्रा मीडिया ॲण्ड एंटरटेनमेंट प्रस्तुत, उषा काकडे प्रॉडक्शन्स, ईओडी. मीडिया उदाहरणार्थ निर्मित आणि अमेय विनोद खोपकर पिक्चर्स यांच्या सहकार्याने साकारलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन अंकुश चौधरी यांनी केलं आहे. उषा काकडे, पुष्कर यावलकर, सुधीर कोलते, स्वाती खोपकर आणि निनाद नंदकुमार बत्तीन हे निर्माते असून मोहसिन खान, यशराज टिळेकर, सौरभ ललवाणी आणि धनविक एंटरटेनमेंट सहनिर्माते आहेत. यापूर्वीही एव्हीके पिक्चर्सने अनेक मनोरंजनात्मक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आणले आहेत. यापुढेही ते असेच जबरदस्त चित्रपट घेऊन येतील.

*WELCOME TO THE JUNGLE Arrives in Theatres on 26th June 2026!*

 *India’s biggest and most awaited comedy franchise locks the release date! WELCOME TO THE JUNGLE Arrives in Theatres on 26th June 2026!*


A franchise which gets people rolling in laughter just with the reference of its iconic tune and audiences have been waiting with much antiWELCOME TO THE JUNGLE Arrives in Theatres on 26th June 2026!*cipation for the next edition, a comedy spectacle that promises unfiltered laughs, larger than life madness and non-stop entertainment *Welcome to the Jungle*, has officially locked its theatrical release for *26th June 2026.*

Packed with unique humour, outrageous situations and rib-tickling hilarious moments with a blend of high-octane action and blockbuster music, *Welcome to the Jungle* delivers high-energy comedy on an epic scale. Blending chaos, charm, blasts and unapologetic fun, the film is designed to be a complete laugh riot, offering audiences a joyride filled with surprises, punchlines and unforgettable moments.

Directed by Ahmed Khan ‘Welcome to the Jungle’ boasts of a massive ensemble cast of over 30 actors, each a benchmark of talent and known for their excellent comic timing, a combination that is rare sight on the big screen. Akshay Kumar, Suniel Shetty, Jackie Shroff, Raveena Tandon, Disha Patani, Jacqueline Fernandez, Arshad Warsi, Paresh Rawal, Rajpal Yadav, Johnny lever, Aftab Shivdasani, Lara Dutta, Shreyas Talpade, Tusshar Kapoor, Daler Mehndi, Farida Jalal, Krishna Abhishek, Kiku Sharda, Kiran Kumar, Mukesh Tiwari, Yashpal Sharma, Vindu Dara Singh, Nawab Shah, Urvashi Rautela, Puneet Issar, Arjun Firoz Khan, Late Pankaj Dheer, Sudesh Berry, Hemant Pandey, Zakir Hussain, Sayaji Shinde and many more all come together to deliver an epic entertainer.

AA Nadiadwala and Star Studio18 present in association with Cape of Good Films and Seeta Films ‘Welcome To the Jungle’ is a Base Industries Group and Seeta Films Production and directed by Ahmed Khan is all set to hit theatres worldwide on 26th June 2026.

प्रेमाच्या रेशमी धाग्यात गुंफली अभि–कृतिकाची केमिस्ट्री! ‘लग्नाचा शॉट’मधील ‘रेशमी बंध’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

 प्रेमाच्या रेशमी धाग्यात गुंफली अभि–कृतिकाची केमिस्ट्री! ‘लग्नाचा शॉट’मधील ‘रेशमी बंध’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला 

मराठी चित्रपटसृष्टीत लव्हस्टोरीचा नवा रंग भरण्यासाठी आगामी चित्रपट ‘लग्नाचा शॉट’ सज्ज झाला असून चित्रपटातील अभिजीत आमकर व प्रियदर्शिनी इंदलकर या नव्या जोडीची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. आता या चित्रपटातील ‘रेशमी बंध’ हे रोमँटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यात या फ्रेश जोडीची केमिस्ट्री पाहायला मिळते. प्रदर्शित होताच या गाण्याने आपल्या हळव्या सुरांमुळे आणि मनाला भिडणाऱ्या दृश्यांमुळे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे

‘रेशमी बंध’ या गाण्यात अभि आणि कृतिका यांच्या प्रेमकथेची सुरुवात उलगडताना पाहायला मिळते. निसर्गरम्य वातावरणात उमलणारं त्यांचं नातं, नजरेतून व्यक्त होणारी ओढ आणि एकमेकांच्या सहवासात वाढणारी जवळीक या गाण्यात अत्यंत सौम्य आणि भावस्पर्शी पद्धतीने मांडण्यात आली आहे. निसर्गसौंदर्यात या गाण्याचे चित्रीकरण करण्यात आल्यामुळे हे गाणं अधिकच लक्षवेधी ठरत आहे. या गाण्याचं संगीत आणि गीतलेखन प्रविण कोळी आणि योगिता कोळी यांनी केलं असून, केवल वाळंज आणि स्नेहा महाडिक यांच्या मधुर स्वरांनी गाण्यात अधिकच रंगत आणली आहे. 

दिग्दर्शक अक्षय गोरे म्हणतात, “ ‘रेशमी बंध’ हे गाणं अभि आणि कृतिकाच्या नात्याची पहिली ओळख आहे. ज्यात त्यांच्या खुलणाऱ्या प्रेमाची झलक पाहायला मिळते. अभि-कृतिकाची केमिस्ट्री, आजूबाजूचे निसर्गसौंदर्य व गाण्याचे सुमधूर संगीत यामुळे प्रेक्षकांना हे गाणे नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे.”

महापर्व फिल्म्स निर्मित आणि जिजा फिल्म कंपनी यांच्या सहयोगाने साकारलेल्या ‘लग्नाचा शॉट’ या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन अक्षय गोरे यांनी केले आहे. गीत-संगीताची धुरा प्रवीण कोळी आणि योगिता कोळी यांनी सांभाळली असून अक्षय महादेव गोरे, विजय महादेव गोरे, अभिषेक उत्कर्ष कोळी आणि सुरेश मगनलाल प्रजापती हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. ६ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात प्रियदर्शिनी इंदलकर, अभिजीत आमकार, प्रभाकर मोरे, अभिजीत चव्हाण, राजन ताम्हाणे, लीना पंडित, संजय कुलकर्णी, विजय पवार, मनोहर जाधव, संजीवनी पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

*नात्यांच्या गुंत्यातील मनोव्यापार उलगडणाऱ्या ‘माया’चा टीझर प्रदर्शित!*

 *नात्यांच्या गुंत्यातील मनोव्यापार उलगडणाऱ्या ‘माया’चा टीझर प्रदर्शित!*

नात्यांच्या गुंतागुंतीकडे हळुवारपणे पाहाणाऱ्या आणि माणसाच्या अंतर्मनातील हालचाली टिपणाऱ्या कथा दिग्दर्शक आदित्य इंगळे यांच्या चित्रपटांची खास ओळख आहे. ‘अलिबाबा आणि चाळीशीतले चोर’ आणि ‘बिन लग्नाची गोष्ट’सारख्या चित्रपटांतून नात्यांवर संवेदनशील भाष्य करणाऱ्या आदित्य इंगळे यांचा ‘माया’ हा नवा चित्रपट आता त्याच भावविश्वाचा पुढचा टप्पा ठरत असल्याचं नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरमधून दिसून येतं. या टीझरमुळे या चित्रपटाची उत्सुकता अधिकच वाढली आहे. 

टीझरमधून एक महत्त्वाचा विचार पुढे येतो. माणूस खरंतर एकटेपणाला घाबरत नाही, तर पोरकेपणाच्या भावनेला घाबरतो. ‘माया’चा टीझर हा भाव अतिशय हळुवारपणे उलगडतो. नात्यांमध्ये अडकलेलं मन, त्यातून तयार होणारे मनोव्यापार आणि आयुष्य प्रवाही होण्यासाठी आवश्यक असलेली भावनिक मुक्तता यावर हा चित्रपट भाष्य करत असल्याचं जाणवतं.

चित्रपटात सिद्धार्थ चांदेकरने साकारलेली हाऊस फादरची भूमिका नात्यांकडे पाहाण्याचा वेगळा, समजूतदार दृष्टिकोन देते. मुक्ता बर्वे, विजय केंकरे आणि रोहिणी हट्टंगडी यांच्या व्यक्तिरेखा आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर उभ्या असलेल्या माणसांच्या भावविश्वाचं प्रभावी प्रतिनिधित्व करतात. तर गिरीश ओक यांची व्यक्तिरेखा विशेष लक्ष वेधून घेते. आजाराने ग्रस्त असलेला, अंतर्मुख आणि काहीसा विचित्र स्वभाव असलेला हा माणूस मनात खोलवर साठवून ठेवलेल्या आघातांमुळे इतरांपासून दुरावलेला दिसतो. त्यांचा अस्वस्थपणा आणि मनातील अढी कथेला गंभीर आणि विचारप्रवर्तक वळण देताना दिसते.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक आदित्य इंगळे म्हणतात, ‘’बर्‍याच वेळा आपण मनाला गाठी मारून ठेवतो. आयुष्यात पूर्वी घडून गेलेल्या काही घटना आपल्यावर खोलवर आघात करतात आणि त्यालाच आपण संपूर्ण आयुष्य समजतो. त्या अनुभवांवर प्रतिक्रिया देण्यात किंवा मनात अढी धरून ठेवण्यात आपण खूप काळ घालवतो. काळाच्या ओघात ही अढी सुटली, तरच आयुष्य प्रवाही होऊ शकतं. ही अढी नात्यांमधून, जिव्हाळ्यातून सुटते आणि त्यानंतर आयुष्य पुन्हा एकदा पुढे सरकायला लागतं. ‘माया’ हा चित्रपट याच भावनिक प्रवासावर भाष्य करतो.”

शालिनी सिनेमाज आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाचे निर्माते डॉ. सुनील दातार, अलका मधुकर दातार आणि नितीन प्रकाश वैद्य आहेत. आदित्य इंगळे दिग्दर्शित ‘माया’ हा चित्रपट २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. टीझरमुळेच चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढताना दिसत असून, नात्यांच्या गुंत्यातून उमटणारी ही हळवी तरीही खोलवर जाणारी कथा प्रेक्षकांच्या मनात नक्कीच घर करून जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

*शाहिद कपूर और दिशा पाटनी ने ‘आशिकों की कॉलोनी’ में बढ़ाया तापमान, ओ’रोमियो का एनर्जेटिक ट्रैक मचा रहा है धूम!*

 *शाहिद कपूर और दिशा पाटनी ने ‘आशिकों की कॉलोनी’ में बढ़ाया तापमान, ओ’रोमियो का एनर्जेटिक ट्रैक मचा रहा है धूम!*

Song link - https://bit.ly/AashiqonKiColony

साजिद नाडियाडवाला की बहुप्रतीक्षित फिल्म ओ’रोमियो अपने ट्रेलर को लेकर पहले ही जबरदस्त चर्चा में है और अब फिल्म का दूसरा गाना ‘आशिकों की कॉलोनी’ रिलीज़ होकर इस एक्साइटमेंट को और भी ऊँचाई पर ले जाता नजर आ रहा है। यह गाना एक हाई-एनर्जी डांस नंबर है, जो सुनते ही दर्शकों को थिरकने पर मजबूर कर देता है। 90 के दशक की विजुअल फील और आज के मॉडर्न बीट्स का खूबसूरत मेल इस गाने को खास बनाता है।

‘आशिकों की कॉलोनी’ में नॉस्टैल्जिया और समकालीन संगीत का ऐसा संतुलन देखने को मिलता है, जो इसे बाकी गानों से अलग पहचान देता है। गाने की धुन जहां पुराने बॉलीवुड डांस नंबर्स की याद दिलाती है, वहीं इसकी बीट्स और अरेंजमेंट पूरी तरह से आज के युवाओं के टेस्ट के हिसाब से तैयार किए गए हैं। इसका कैची हुक लाइन गाने को बार-बार सुनने लायक बनाती है।

इस गाने की सबसे बड़ी खासियत है इसकी दमदार क्रिएटिव टीम। संगीतकार विशाल भारद्वाज, गीतकार गुलज़ार और गायक मधुबंती बागची व जावेद अली की यह जुगलबंदी एक बार फिर जादू बिखेरती नजर आती है। गुलज़ार के शब्दों में सादगी और शरारत दोनों झलकती है, वहीं विशाल भारद्वाज का म्यूजिक क्लासिक टच के साथ फ्रेश फील देता है। गाने को टी-सीरीज़ ने प्रस्तुत किया है।

ऑन-स्क्रीन बात करें तो शाहिद कपूर और दिशा पाटनी की यह पहली जोड़ी दर्शकों के लिए एक नया और रोमांचक अनुभव लेकर आई है। दोनों की केमिस्ट्री फ्रेश, एनर्जेटिक और बेहद नैचुरल लगती है। रंगीन और उत्सव जैसे माहौल में फिल्माया गया यह गाना विजुअली भी काफी आकर्षक है। शाहिद कपूर अपने रग्ड और स्टाइलिश लुक में नजर आते हैं और एक खास माइकल जैक्सन इंस्पायर्ड मूव से गाने में सरप्राइज एलिमेंट जोड़ते हैं। वहीं दिशा पाटनी अपने कॉन्फिडेंट अंदाज़, ग्रेस और फ्लूइड डांस मूव्स से स्क्रीन पर चार चांद लगा देती हैं।

भारतीय दिल से जुड़ा यह गाना, थ्रोबैक फ्लेवर और मॉडर्न टच के साथ, क्लासिक बॉलीवुड डांस नंबर्स की याद दिलाता है। मस्ती, जोश और एनर्जी से भरपूर ‘आशिकों की कॉलोनी’ फिल्म ओ’रोमियो की म्यूज़िकल जर्नी में एक और रंगीन पड़ाव जोड़ता है।

जैसे-जैसे फिल्म की रिलीज़ नज़दीक आ रही है, ओ’रोमियो को लेकर दर्शकों का उत्साह लगातार बढ़ता जा रहा है।

*बेजॉय नांबियार की ‘तू या मैं’ में रोमांस, थ्रिल और ज़िंदगी की जंग! ट्रेलर ने बढ़ाया सस्पेंस!*

 *बेजॉय नांबियार की ‘तू या मैं’ में रोमांस, थ्रिल और ज़िंदगी की जंग! ट्रेलर ने बढ़ाया सस्पेंस!*

*बेजॉय नांबियार की ‘तू या मैं ’ का ट्रेलर रिलीज़, रोमांस और                            थ्रिल का खतरनाक मेल!*.                                        

Link : https://bit.ly/TuYaaMainOfficialTrailer

क्या खौफनाक मगरमच्छ के सामने टिक पाएंगे शनाया कपूर और आदर्श गौरव?

फिल्ममेकर बेजॉय नांबियार एक बार फिर दर्शकों को रोमांच और सस्पेंस से भरी दुनिया में ले जाने के लिए तैयार हैं। उनकी आने वाली फिल्म ‘तू या मैं’ का ट्रेलर रिलीज़ हो चुका है और यह साफ संकेत देता है कि यह फिल्म सिर्फ एक लव स्टोरी नहीं, बल्कि ज़िंदगी और मौत के बीच की खौफनाक जंग है। शनाया कपूर और आदर्श गौरव स्टारर इस सर्वाइवल थ्रिलर ने ट्रेलर के साथ ही दर्शकों की धड़कनें तेज़ कर दी हैं।

ट्रेलर की शुरुआत एक दिलचस्प और मज़ेदार अंदाज़ में होती है, जिसमें क्लासिक फिल्म ‘खून भरी मांग’ को हल्के-फुल्के नॉड के साथ पेश किया गया है। शनाया कपूर यहां मिस वैनिटी के किरदार में नज़र आती हैं एक ग्लैमरस और कॉन्फिडेंट कंटेंट क्रिएटर, वहीं आदर्श गौरव बने हैं ‘A’, नालासोपारा से आया एक बेबाक और साहसी डिजिटल क्रिएटर। दोनों की मुलाकात, उनकी केमिस्ट्री और कंटेंट के लिए की जाने वाली एडवेंचर भरी ट्रिप शुरुआत में बेहद मज़ेदार और रिलेटेबल लगती है। लेकिन कहानी तब पलट जाती है, जब यह फन और फ्लर्ट वाला सफर अचानक एक डरावने सपने में बदल जाता है। 

ट्रेलर में दिखाया गया खून से सना पूल, घबराए हुए चेहरे और सामने मौजूद एक खूंखार मगरमच्छ सब मिलकर दर्शकों को सीट से हिलने नहीं देते। अब यहां कैमरा ऑन है, लेकिन कंटेंट के लिए नहीं, बल्कि जिंदा बचने के लिए। हर सांस, हर फैसला और हर मूव मौत और ज़िंदगी के बीच फर्क तय करता है।

‘तू या मैं’ सिर्फ सर्वाइवल थ्रिलर नहीं, बल्कि आज की creator-driven कल्चर पर भी एक दिलचस्प नजर डालती है, जहां लाइक्स और व्यूज़ की दुनिया कब असली खतरे में बदल जाए, किसी को अंदाज़ा नहीं होता। रोमांस, डर, एड्रेनालिन और इमोशंस को नए जमाने की स्टोरीटेलिंग के साथ जोड़ते हुए बेजॉय नांबियार एक ऐसा सिनेमैटिक एक्सपीरियंस देने का वादा करते हैं, जो आम वेलेंटाइन फिल्मों से बिल्कुल अलग है।

फिल्म का निर्माण आनंद एल राय और हिमांशु शर्मा ने Colour Yellow बैनर के तहत किया है, वहीं विनोद भानुशाली और कमलेश भानुशाली (Bhanushali Studios Limited) भी इस प्रोजेक्ट से जुड़े हैं। दमदार कास्ट, इंटेंस कहानी और अनोखा कॉन्सेप्ट फिल्म को खास बनाता है।

अगर आप इस वेलेंटाइन सिर्फ रोमांस नहीं, बल्कि रोमांच और डर का तड़का भी चाहते हैं, तो ‘तू या मैं’ आपके लिए परफेक्ट #DateFright बनने वाली है।

फिल्म 13 फरवरी 2026 को सिनेमाघरों में रिलीज़ होगी जहां इस बार प्यार सिर्फ महसूस नहीं होगा, बल्कि सच में काटेगा।

Motorola ने Motorola Signature लाँचसह भारतातील प्रमुख श्रेणीमध्ये विशेष भर केली,

 Motorola ने Motorola Signature लाँचसह भारतातील प्रमुख श्रेणीमध्ये विशेष भर केली

Motorola ने Motorola Signature लाँचसह भारतातील प्रमुख श्रेणीमध्ये विशेष भर केली, या नवीन स्‍मार्टफोनमध्‍ये डीएक्‍सओएमएआरके^ द्वारे प्रमाणित जगातील सर्वोत्तम कॅमेरा, भारतातील पहिल्‍या 24X7 प्रीव्हिलेज सर्विसेससह सिग्‍नेचर क्‍लब, आकर्षक फिनिशेस् आणि प्रमुख कार्यक्षमता व एआय आहे, किंमत फक्‍त Rs. 54,999* पासून सुरू होते 

Motorola Signature डीएक्‍सओएमएआरके* कडून गोल्‍ड लेबल कॅमेरा मान्यतेसह इमेजिंगमध्‍ये नवीन जागतिक मापदंड स्‍थापित करतो. या स्‍मार्टफोनमध्‍ये जगातील पहिला व सर्वात प्रगत सोनी एलवायटीआयए बी2बी मेन कॅमेरा आहे, ज्‍यामध्‍ये डॉल्‍बी व्हिजन व्हिडिओ व 8के व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे, ज्‍यामधून अपवादात्‍मक सुस्‍पष्‍टता, गतीशील रेंज आणि पॅन्‍टोन प्रमाणित अचूक रंगसंगतीसह प्रोफेशनल-ग्रेड फोटोग्राफी व सिनेमॅटिक व्हिडिओ निर्मितीची खात्री मिळते. 

Motorola Signature अत्‍यंत सडपातळ प्रोफाइलसह सुधारित लक्‍झरी कारागिरीचा अनुभव देतो. या स्‍मार्टफोनमध्‍ये फॅब्रिक-प्रेरित प्रीमियम फिनिशसह अचूकरित्‍या डिझाइन करण्‍यात आलेली एअरक्राफ्ट-ग्रेड अॅल्‍युमिनिअम फ्रेम आहे, जेथे वैशिष्‍ट्यपूर्ण प्रीमियम डिझाइन शैलीमध्‍ये आकर्षकता, आरामदायीपणा आणि टिकाऊपणाचे संयोजन आहे. 

हार्डवेअरपलीकडे प्रीमियम मालकीहक्‍क अनुभव देणारा सिग्‍नेचर विशेष सिग्‍नेचर क्‍लब प्रीव्हिलेजेस् देणारा भारतातील पहिला स्‍मार्टफोन आहे, ज्‍यामध्‍ये 24X7 लाइव्‍ह एजंट सपोर्ट आहे, ज्‍यामधून सर्वोत्तम जीवनशैली अनुभव, प्रीमियम अॅक्‍सेस सर्विसेस् आणि राहणीमान उत्‍साहवर्धक करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेले सर्वोत्तम फायदे मिळतात. 

क्‍वॉलकॉमच्‍या प्रमुख व आधुनिक स्‍नॅपड्रॅगन® 8 जेन 5 मोबाइल प्‍लॅटफॉर्मद्वारे समर्थित सिग्‍नेचर तडजोड न करणारी प्रमुख कार्यक्षमता देतो. या स्‍मार्टफोनमधील प्रगत कॉपर मेश लिक्विड मेटल कूलिंग सिस्‍टम अधिक गेमिंग, मल्‍टीटास्किंग आणि एआय-संचालित वर्कलोडदरम्‍यान शाश्वत सर्वोच्‍च कार्यक्षमतेची खात्री देते.   

मोटोरोलाने आपल्‍या नवीन परिसंस्‍था उत्‍पादनाची देखील घोषणा केली, ते म्‍हणजे पोलारद्वारे समर्थित मोटो वॉच, जे प्रगत वेलनेस ट्रॅकिंग देते जसे झोपेबाबत माहिती, रिकव्‍हरी, एसपीओ2 आणि हार्ट रेट ट्रॅकिंग, तसेच क्‍लासिक घड्याळाचे लुक व फिल कायम ठेवते.

मोटो वॉचमध्‍ये कॉर्निंग® गोरिला® ग्‍लास ३ चे संरक्षण असलेली विभागातील एकमेव अॅल्‍युमिनिअम डिझाइन आहे, ज्‍याला पूरक आयपी68 + 1एटीएम जलरोधक, 1.4 इंच वर्तुळाकार ओएलईडी डिस्‍पले, ड्युअल-बँड जीपीएस आहे आणि मोटो वॉच सतत डिस्‍प्‍ले सुरू राहिला तरी जवळपास 7 दिवसांर्यंत बॅटरी कार्यरत राहण्‍याची खात्री देते. 

Motorola Signature 12 जीबी रॅम + 256 जीबी, 16 जीबी रॅम + 512 जीबी आणि 16 जीबी रॅम + 1 टीबी स्‍टोरेज व्‍हेरिएण्‍ट्स या 3 स्‍टोरेज व्‍हेरिएण्‍ट्ससह पॅन्‍टोन™ मार्टिनी ऑलिव्‍ह व पॅन्‍टोन™ कार्बन (डार्क ब्‍ल्‍यू) या रंगांमध्‍ये फ्लिपकार्ट, Motorola.in आणि आघाडीच्‍या रिटेल स्‍टोअर्समध्‍ये उपलब्‍ध असेल. या स्‍मार्टफोनीची प्रभावी लाँच किंमत INR 54,999* फक्‍त आहे.  

पोलारद्वारे समर्थित मोटो वॉच 6 व्‍हेरिएण्‍टमध्‍ये उपलब्‍ध असेल, जेथे प्रभावी लाँच किंमत सिलिकॉन व्‍हेरिएण्‍टसाठी फक्‍त Rs.5,999 आणि मेटल व लेदर व्‍हेरिएण्‍ट्ससाठी फक्‍त Rs.6,999 आहे.     

मुंबई, २३ जानेवारी २०२६: मोटोरोला या मोबाइल तंत्रज्ञानामधील जागतिक अग्रणी आणि भारतातील आघाडीच्‍या एआय स्‍मार्टफोन ब्रँडने आज भारतात Motorola Signature च्‍या लाँचची घोषणा केली, जेथे अत्‍याधुनिकता व लक्‍झरी वैयक्तिककरणासह अल्‍ट्रा-प्रीमियम प्रमुख स्‍मार्टफोनमध्‍ये नवीन मापदंड स्‍थापित केला आहे. तडजोड न करणा-या उत्‍कृष्‍टतेचा शोध घेणा-या ग्राहकांसाठी डिझाइन करण्‍यात आलेला सिग्‍नेचर प्रमुख अनुभवांना नव्‍या उंचीवर घेऊन जातो. या स्‍मार्टफोनमध्‍ये जागतिक दर्जाची कॅमेरा नाविन्‍यता, सुधारित लक्‍झरी कारागिरी, नेक्‍स्‍ट-जनरेशन कार्यक्षमता आणि सर्वोत्तम जीवनशैली प्रीव्हिलेजेस् आहेत. या प्रीमियम परिसंस्‍थेला अधिक प्रबळ करत मोटोरोला पोलारद्वारे समर्थित मोटो वॉच देखील लाँच केला आहे, जो कालातीत वॉच डिझाइनमध्‍ये विभागातील अग्रणी वेलनेस ट्रॅकिंग देतो.  

Motorola Signature मध्‍ये जगातील एकमेव ट्रिपल सोनी एलवायटीआयए™ प्रो-ग्रेड कॅमेरा सिस्‍टम आहे, जी डीएक्‍सओएमएआरके गोल्‍ड लेबल सर्टिफिकेशनसह प्रमाणित आहे, ज्‍यामधून वास्‍तविक स्थितींमध्‍ये अपवादात्‍मक फोटो व व्हिडिओ कार्यक्षमतेची खात्री मिळते. डीएक्‍सओएमएआरकेच्‍या कॅमेरा परफॉर्मन्‍स इंडेक्‍सवर 164 च्‍या कॅमेरा स्‍कोअरसह मोटोरोला सिग्‍नेचर भारतातील INR 100,000 श्रेणी अंतर्गत पहिल्‍या क्रमांकाचा कॅमेरा फोन बनला आहे. या सिस्‍टममधील खासियत म्‍हणजे 50 मेगापिक्‍सल सोनी एलवायटीआयए™ बी2बी मेन कॅमेरा. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा 50 मेगापिक्‍सल सेन्‍सर प्रगत सिनेमॅटिक इमेजिंग देतो, ज्‍यामध्‍ये जवळपास 60 एफपीएसमधील 8के व 4के मधील डॉल्‍बी व्हिजन® व्हिडिओ रेकॉर्डिंग, क्‍वॉड पिक्‍सल तंत्रज्ञान, प्रगत नॉईज रिडक्‍शन आणि 3.50 ऑप्टिकल इमेज स्‍टेबिलायझेशन आहे, ज्‍यामधून कोणत्‍याही प्रकाश स्थितीमध्‍ये अत्‍यंत स्थिरपणे फोटो कॅप्‍चर होण्‍याची खात्री मिळते. याला पूरक 50 मेगापिक्‍सल सोनी एलवायटीआयए™ 600 पेरिस्‍कोप कॅमेरासह 3x ऑप्टिकल झूम, ओआयएस आणि जवळपास 100x सुपर झूम प्रो, 50 मेगापिक्‍सल अल्‍ट्रा-वाइड + मॅक्रो व्हिजन कॅमेरासह 1220 फिल्‍ड ऑफ व्‍ह्यू व क्‍लोज-फोकस मॅक्रो क्षमता आणि 60 एफपीएसमध्‍ये 4के व्हिडिओ क्षमता असलेला 50 मेगापिक्‍सल सोनी एलवायटीआयए™ 500 फ्रण्‍ट कॅमेरा आहे. संपूर्ण कॅमेरा सिस्‍टम पॅन्‍टोन™ व्‍हॅलिडेटेड कलर आणि स्किनटोन™ कॅलिब्रेशन व मल्‍टीस्‍पेक्‍ट्रल 3-इन-1 लाइट सेन्‍सरसह अधिक सुधारण्‍यात आली आहे, ज्‍यामधून अचूक एक्‍स्‍पोजर, व्‍हाइट संतुलन आणि वास्‍तविक रंगसंगती निर्मितीची खात्री मिळते.   

इमेजिंग अनुभवामध्‍ये अधिक भर करणारे वैशिष्‍ट्य म्‍हणजे मोटो एआय व गुगल एआय वैशिष्‍ट्यांची प्रगत श्रेणी, जे प्रोफेशनल दर्जाची फोटोग्राफी सहज करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहेत. एआय सिग्‍नेचर स्‍टाइल सीननुसार कलर, कॉन्‍ट्रॅस्‍ट व टोनशी जुळून जाते, तर एआय अॅक्‍शन शॉट सुधारित शटर गती व सुस्‍पष्‍टतेसह अधिक हालचाल असलेल्‍या क्षणांना थांबवते. एआय ग्रुप शॉट विविध फ्रेम्‍सना एकत्र करत प्रत्‍येक चेहरा सुस्‍पष्‍टपणे दिसण्‍याची खात्री देते आणि एआय ऑटो स्‍माइल कॅप्‍चर आपोआपपणे परिपूर्ण क्षणाला कॅप्‍चर करते. एआय फोटो एन्‍हान्‍समेंट इंजिन, एआय अॅडप्टिव्‍ह स्‍टेबिलायझेशन आणि एआय कलर ऑप्टिमायझेशन रिअल टाइममध्‍ये काम करत तपशील, गतीशील श्रेणी व नैसर्गिक स्किन टोन्‍सना अधिक आकर्षक करतात. गुगल फोटोज एआय टूल्‍स जसे एआय मॅजिक एडिटर, एआय मॅजिक इरेजर, एआय फोटो अनब्‍लर, फोटो टू व्हिडिओ आणि सिनेमॅटिक फोटोज फोटो कॅप्‍चर केल्‍यानंतर उत्तम एडिटिंग, संघटित व कथानकाच्‍या स्‍वरूपात सादर करण्‍याची सुविधा देतात.

कारागिरी व संवदेशनशील भावनेवर फोकस करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेल्‍या मोटोरोला सिग्‍नेचरमध्ये लक्‍झरीअसपणे सुधारित, अत्‍यंत सडपातळ डिझाइन आहे, जी ब्रश एअरक्राफ्ट-ग्रेड अॅल्‍युमिनिअम व संपन्‍न फॅब्रिक-प्रेरित फिनिशेसमधून तयार करण्‍यात आली आहे. फक्‍त 6.99 मिमी जाडी आणि 18 किलो वजन असलेला हा डिवाईस हातामध्‍ये सहजपणे सामावून जातो, तसेच दिवसभर वापरासाठी कोमल, कॉन्‍चर कडांसह परिपूर्ण संतुलित फ्रेम आहे. या डिझाइनला सिग्‍नेचर सीएमएफ एक्झिक्‍युशनसह वाढवण्‍यात आले आहे, जेथे विचारपूर्वक डिझाइन करण्‍यात आलेले टेक्‍स्‍चर्स व फिनिशेस् लुक व फिल वाढवतात, ज्‍यासह डिवाईसच्‍या विशिष्‍ट आधुनिक व अल्‍ट्रा-प्रीमियम आकर्षकतेमध्‍ये अधिक वाढ झाली आहे. पॅन्‍टोन™ निर्मित रंगांमध्‍ये उपलब्‍ध असलेल्‍या प्रत्‍येक व्‍हेरिएण्‍टमध्‍ये अद्वितीय प्रीमियम फिनिश पॅन्‍टोन™ मार्टिनी ऑलिव्‍ह आहे, ज्‍यामध्‍ये ट्विल-प्रेरित टेक्‍स्‍चर आहे, ज्‍यामधून सुधारित क्षमतेची खात्री मिळते, तसेच पॅन्‍टोन™ कार्बन लिनेन-प्रेरित टेक्‍स्चर फिनिश देते, ज्‍यामधून आधुनिकता, कालातीत आकर्षकता आणि लक्‍झरी दिसून येते. 

हार्डवेअरपलीकडे अनुभवाला घेऊन जात Motorola Signature हा विशेष सिग्‍नेचर क्‍लब प्रीव्हिलेजेस् देणारा भारतातील पहिला स्‍मार्टफोन आहे. या डिवाईसमध्‍ये सर्विससह 24/7 ऑन-डिमांड प्रीव्हिलेजचा समावेश करण्‍यात आला आहे. प्रत्‍येक मोटोरोला सिग्‍नेचर वापरकर्त्‍याला पूरक एक वर्षाचे सिग्‍नेचर क्‍लब अॅप स‍बस्क्रिप्‍शन मिळते, ज्‍यासह प्रवास, गोल्फिंग, वाइन व डायनिंग, कला व संस्‍कृती, खरेदी व व्‍यवसाय सेवांमध्‍ये सर्वोत्तम सपोर्ट मिळतो, तसेच दैनंदिन जीवनशैली साह्य जसे वेलनेस सत्रे, पाळीव प्राण्‍यांची काळजी, लॉण्‍ड्री आणि इव्‍हेण्‍ट समन्‍वयन मिळते. वापरकर्त्‍यांना अद्वितीय अनुभव देण्‍यासाठी सिग्‍नेचर क्‍लब विशेष वेलकम ऑफर देखील देते, जेथे पहिली सर्विस जवळपास INR 6,000^^ पर्यंत मोफत आहे. आधुनिक, महत्त्वाकांक्षी जीवनशैलीशी जुळून जाण्‍याकरिता डिझाइन करण्‍यात आलेले सिग्‍नेचर क्‍लब अद्वितीय सोयीसुविधा, वैयक्तिकृत पाठिंबा आणि प्रीमियम अनुभवांसह स्‍मार्टफोन मालकीहक्‍काला अधिक उत्‍साहित करते. 

Motorola Signature ला शक्‍ती देते स्‍नॅपड्रॅगन® 8 जेन 5 मोबाइल प्‍लॅटफॉर्म, जो बिल्‍ट-इन को-पायलट व परप्‍लेक्सिटीसह प्रमुख श्रेणीची, एआय-केंद्रित कार्यक्षमता देतो. ऑक्‍टा-कोअर सीपीयूसह जवळपास 3.8 गिगाहर्ट्झ सर्वोच्‍च क्‍लॉक गती आणि 3 दशलक्षपेक्षा जास्‍त अंतूतू स्‍कोअर असलेली चिपसेट गेमिंग, मल्‍टीटास्किंग, कन्‍टेन्‍ट निर्मिती व दैनंदिन वापरादरम्‍यान अत्‍यंत सुलभ कार्यक्षमतेची खात्री देते. प्रीमियम सीपीयू व जीपीयू आर्किटेक्‍चर जवळपास 36 टक्‍के जलद सीपीयू कार्यक्षमता आणि 11 टक्‍के सुधारित जीपीयू कार्यक्षमता देते, ज्‍यामधून सहजपणे व्हिज्‍युअल्‍स दिसण्‍याची, जलदपणे अॅप लाँच होण्‍याची आणि सर्वोत्तम गेमिंगची खात्री मिळते. क्‍वॉलकॉम® एआय इंजिन रिअल-टाइम, ऑन-डिवाईस जेन एआय अनुभवांसाठी जवळपास 46 टक्‍के सुधारित एनपीयू कार्यक्षमता देते. शाश्वत सर्वोच्‍च कार्यक्षमतेला प्रगत थर्मल सिस्‍टमसह विशाल 6,002 मिमी2 वेपर चेम्‍बर आणि प्रगत आर्क्टिकमेश कूलिंग सिस्‍टमचे पाठबळ आहे, जी अधिक वेळ वर्कलोडदरम्‍यान तापमान जवळपास 4.4 अंश सेल्सिअसपर्यंत थंड ठेवते. जवळपास 16 जीबी एलपीडीडीआर5एक्‍स, रॅम बूस्‍ट आणि जवळपास 1 टीबी यूएफएस 4.1 स्‍टोरेजसह मोटोरोला सिग्‍नेचर विनासायास मल्‍टीटास्किंग, जलद डेटा उपलब्‍धता आणि 8के कन्‍टेन्‍टसाठी व्‍यापक स्‍पेस, तसेच गतीशील, लो-लेण्‍टसी कनेक्‍शन्‍ससाठी विभागातील अग्रणी 5जी कनेक्‍टीव्‍हीटी, वाय-फाय 7 व प्रगत नेटवर्क ऑप्टिमायझेशन देतो.  

Motorola Signature मध्‍ये 6.8-इंच सुपर एचडी (1.5के) एक्‍स्‍ट्रीम एएमओएलईडी डिस्‍प्‍लेसह इन्‍फानाइट कॉन्‍ट्रॅस्‍ट, डॉल्‍बी व्हिजन® आणि एचडीआर10+ आहे, ज्‍यामधून आकर्षक व्हिज्‍युअल्‍स, आकर्षक रंगसंगती आणि सिनेमॅटिक सखोलता मिळते. 6200 नीट्स सर्वोच्‍च ब्राइटनेस, 100 टक्‍के डीसीआय-पी3 वाइट कलर गम्‍यूट, 10-बीट कलर डेप्‍थ आणि 165 हर्ट्झ रिफ्रेश रेटसह स्क्रिन सुस्‍पष्‍टता, सहज परस्‍परसंवाद आणि सुलभ गेमिंगची खात्री देते. पॅन्‍टोन™ व्‍हॅलिडेटेड डिस्‍प्‍ले व स्किनटोन™ अचूकता, डॉल्‍बी-समर्थित डायनॅमिक व्हिडिओ एन्‍हान्‍समेंट, ऑल्‍वेज ऑन डिस्‍प्‍ले, स्‍मार्ट वॉटर टच, प्रगत आय-केअर प्रोटेक्‍शन्‍स आणि कॉर्निंग® गोरिला® ग्‍लास व्हिक्‍टस® 2 सह सुधारित डिस्‍प्‍ले आकर्षक व्हिज्‍युअल्‍ससह टिकाऊपणा आणि दैनंदिन उपयुक्‍ततेची खात्री देतो. 

Motorola Signature मोटो एआय 2.0 सह येतो, जेथे समर्पित एआय कीच्‍या माध्‍यमातून त्‍वरित उपलब्‍धतेसह उच्‍च दर्जाचे इंटेलिजन्‍स मिळते. या डिवाईसमध्‍ये नेक्‍स्‍ट मूव्‍ह संदर्भीय सूचना आहेत, ज्‍या स्क्रिनवर सुरू असलेल्‍या गोष्‍टींना समजून घेते आणि रिअल टाइममध्‍ये योग्‍य कृती करते. तसेच एआय इमेज स्‍टुडिओ, स्‍केच टू इमेज, स्‍टाइल सिंक, टेक्‍स्‍ट टू स्टिकर आणि अवतार निर्मिती असे सर्जनशील टूल्‍स देखील आहेत. कॅच मी अप 2.0, पे अटेंशन लाइव्‍ह ट्रान्स्क्रिप्‍शन्‍स, एआय पेलिस्‍ट स्‍टुडिओ, ग्‍लोबल सर्च, ऑटो स्क्रिनशॉट ब्‍लर आणि धीस ऑन दॅटच्‍या माध्‍यमातून सहजपणे विविध डिवाईसवर टास्‍क करण्‍याच्‍या सुविधेसह उत्‍पादकता वाढवण्‍यात आली आहे. वैशिष्‍ट्ये जसे रिमेम्‍बर धीस आणि रिकॉल स्‍मार्ट मेमरी वॉल्‍टप्रमाणे काम करतात, तर परप्‍लेक्सिटी इंटीग्रेशन त्‍वरित शोध, नियोजन आणि संदर्भीय शिफारशी देते. मोटो एआय, को-पायलट, परप्‍लेक्सिटी व गुगल जेमिनी यामधून निवड करण्‍याच्‍या सुविधेसह वापरकर्ते अत्‍यंत वैविध्‍यपूर्ण, सर्वोत्तम सहाय्यतेचा अनुभव घेऊ शकतात.

या लाँचबाबत मत व्‍यक्‍त करत मोटोरोला इंडियाचे व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. टी. एम. नरसिंहन म्‍हणाले, ''मोटोरोला सिग्‍नेचरसह आम्‍ही भारतातील अल्‍ट्रा-प्रीमियम स्‍मार्टफोन्‍ससाठी नवीन मापदंड निर्माण करत आहोत, जो सर्वोत्तम वैशिष्‍ट्यांच्‍या पुढे जातो. या लाँचमधून जागतिक दर्जाची नाविन्‍यता, सुधारित डिझाइन आणि दैनंदिन राहणीमान अधिक उत्‍साहवर्धक करणा-या अर्थपूर्ण अनुभवांना एकत्रित करण्‍याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. डीएक्‍सओएमएआरकेद्वारे सुवर्ण मानकांसह प्रमाणित करण्‍यात आलेले उल्‍लेखनीय कॅमेरा तंत्रज्ञान, प्रमुख कार्यक्षमता, पहिल्‍यांदाच भारतातील स्‍मार्टफोन उद्योगामध्‍ये समाविष्‍ट करण्‍यात आलेले विशेष सिग्‍नेचर क्‍लब प्रीव्हिलेजेस् आणि वेलनेस-केंद्रित परिसंस्थेला एकत्र आणत, तसेच पोलारद्वारे समर्थित मोटो वॉच लाँच करत आम्‍ही सर्वांगीण प्रीमियम ऑफरिंग सादर करत आहोत, जी दैनंदिन जीवनशैलीमध्‍ये विशिष्‍टता, कार्यक्षमता व उद्देशाचा शोध घेत असलेल्‍या ग्राहकांसाठी डिझाइन करण्‍यात आली आहे.''

Motorola Signature मध्‍ये सिनेमॅटिक साऊंडसह बोस व डॉल्‍बी अॅटमॉस®चा साऊंड आहे. ड्युअल स्टिरिओ स्‍पीकर्स विशाल, सखोल व सुस्‍पष्‍ट ऑडिओ देतात, जो व्हिज्‍युअल्‍सशी जुळून जातो, तर कन्‍टेन्‍ट-अॅडप्टिव्‍ह ट्यूनिंग आणि हाय-रिझॉल्‍यूशन ऑडिओ सर्टिफिकेशन संगीत, चित्रपट, पॉडकास्‍ट्स व गेम्‍सदरम्‍यान संतुलित, सर्वोत्तम व स्‍टुडिओ-दर्जाच्‍या साऊंडची खात्री देतात. 

Motorola Signature मध्‍ये अत्‍यंत सडपातळ डिझाइनसह सर्वोच्‍च प्रमाणित टिकाऊपणा वैशिष्‍ट्ये आहेत, जेथे या डिवाईसने प्रखर एमआयएल-एसटीडी-810एच मिलिटरी-ग्रेड चाचण्‍या पार केल्‍या आहेत. या डिवाईसमध्‍ये अद्वितीय जलरोधक व धूळरोधकसह आयपी68 व आयपी69 सर्टिफिकेशन आहे, ज्‍यामधून 30 मिनिटांसाठी जवळपास 1.5 मीटर खोल ताज्‍या पाण्‍यामध्‍ये देखील फोन उत्तमरित्‍या कार्यरत राहण्‍याची, तसेच धूळ, वाळू आणि उच्‍च दबावाच्‍या पाण्‍यापासून संरक्षणाची खात्री मिळते. हा डिवाईस नकळतपणे 1.5 मीटर उंचीवरून पडल्‍यामुळे होणा-या नुकसानापासून, तसेच शॉक्‍स, व्‍हायब्रेशन्‍स, 30 अंश सेल्सिअस ते 60 अंश सेल्सिअसपर्यंतच्‍या प्रखर तापमान, उच्‍च आर्द्रता व वाळू, धूळ, द्रवपदार्थ, सोलार रॅडिएशन आणि उंचावरील दाबांपासून सुरक्षित राहण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे.या डिवाईसमधील कॉर्निंग® गोरिला® ग्‍लास व्हिक्‍टस® 2 डिस्‍प्‍ले अधिक संरक्षण देते, जेथे सिग्‍नेचरमध्‍ये प्रीमियम डिझाइनसह तडजोड न करणारा टिकाऊपणा आहे.   

Motorola Signature मध्‍ये दिवसभर फोन कार्यरत राहण्‍यासाठी क्षमतापूर्ण सिलिकॉन-कार्बन बॅटरी आहे, जी जवळपास 41 तासांपर्यंत वापराची खात्री देते, तसेच अधिक वेळ व्हिडिओ, गेमिंग, सोशल मीडिया व संगीताचा आनंद देते. 90 वॅट टर्बोपॉवर™ वायर्ड व 50 वॅट वायरलेस चार्जिंग स्‍मार्टफोन जलदपणे व सुरक्षितपणे चार्ज होण्‍याची खात्री देते, तसेच रिव्‍हर्स चार्जिंगसह चालता-फि‍रता इतर डिवाईसेस चार्ज करता येते. प्रगत बॅटरी तंत्रज्ञान व स्‍मार्ट पॉवर मॅनेजमेंट फोनच्‍या अत्‍यंत सडपातळ डिझाइनबाबत तडजोड न करता विश्वसनीय, कार्यक्षम परफॉर्मन्‍स देतात. 

Motorola Signature अँडॉइड 16 वर आधारित हेलिओ यूआयवर संचालित आहे, जेथे 7 खात्रीदायी ओएस अपग्रेड्स आणि 7 वर्षांचे सिक्‍युरिटी मेन्‍टेनन्‍स रीलीजेज (एसएमआर) मिळतात, ज्‍यासह सुरक्षित व भविष्‍याकरिता सुसज्‍ज अनुभव मिळतो. या डिवाईसमध्‍ये व्‍यवसाय श्रेणीच्‍या संरक्षणासाठी मोटो सेक्‍युअर 5.0 सह थिंकशील्‍ड, इतरांसाठी अॅप उपलब्‍धता व वापराचे व्‍यवस्‍थापन करण्‍यासाठी फॅमिली स्‍पेसेस आणि वापरकर्त्‍यांना डिजिटल व्‍यत्‍यय न येण्‍याची खात्री देण्‍यासाठी मोटो अनप्‍लग आहे. सॉफ्टवेअरला पूरक इको-फ्रेण्‍डली पॅकेजिंग व मोटो एलाइटकेअर आहे, ज्‍यामधून प्रीमियम सपोर्ट मिळतो, तसेच दुरूस्‍तीदरम्‍यान मोफत स्‍टॅण्‍डबाय डिवाईसेस, मोफत पिकअप व ड्रॉप, समर्पित सिग्‍नेचर बडी आणि 24x7 व्‍हॉट्सअॅप असिस्टण्‍ट आहे, ज्‍यासह विनासायास व उत्‍साहवर्धक मालकीहक्‍क अनुभवाची खात्री मिळते.

सिग्‍नेचर अनुभव आणि एकूण मोटोरोला परिसंस्‍थेला उत्‍साहवर्धक करत मोटोरोलाने पोलारद्वारे समर्थित मोटो वॉच देखील लाँच केला आहे, ज्‍यासह तंत्रज्ञान, वेलनेस व जीवनशैलीचे संयोजन असलेली एकीकृत प्रीमियम परिसंस्‍था वितरित करण्‍याचा आपला दृष्टिकोन अधिक प्रबळ केला आहे.  

पोलारद्वारे समर्थित मोटो वॉच क्‍लासिक घड्याळाप्रमाणे दिसण्‍यासाठी व अनुभव देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे, जो आरोग्‍याबाबत प्रगत, विज्ञान-आधारित माहिती देतो. या वॉचमध्‍ये कॉर्निंग® गोरिला® ग्‍लास 3 चे संरक्षण असलेली विभागातील एकमेव अॅल्‍युमिनिमयम डिझाइन आहे आणि हा वॉच स्‍टेनलेस स्‍टील, वेगन लेदर आणि सिलिकॉन स्‍ट्रॅप्‍ससह उपलब्‍ध आहे, ज्‍यामुळे दैनंदिन परिधान करण्‍यासाठी आणि औपचारिक प्रसंगांसाठी विविधता मिळते. पोलारच्‍या जागतिक स्‍तरावरील विश्वसनीय वेलनेस प्‍लॅटफॉर्मद्वारे समर्थित हा वॉच आरोग्‍य व फिटनेसवर अचूक ट्रॅकिंग ठेवण्‍यासाठी स्‍मार्ट वर्कआऊट ट्रॅकिंग, नाइटली एएनएस रिचार्ज इनसाइट्स, प्रगत स्‍लीप ट्रॅकिंग, ऑल्‍वेज ऑन एसपीओ2 व हार्ट रेट मॉनिटरिंग आणि ड्युअल-बँड जीपीएस अशा सर्वोत्तम वैशिष्‍ट्यांसह येतो.

जवळपास 13 दिवस कार्यरत राहणारी बॅटरी, 7 दिवसांपर्यंत ऑल्‍वेज-ऑन डिस्‍प्‍ले आणि फक्‍त 5 मिमिनटांच्‍या चार्जिंगमध्‍ये संपूर्ण दिवस कार्यरत राहण्‍याची क्षमता यांसह मोटो वॉच विनाव्‍यत्‍यय कार्यक्षमतेची खात्री देतो. या वॉचमध्‍ये 1.4 इंच वर्तुळाकार ओएलईडी डिस्‍प्‍ले, 24 हून अधिक ऑल्‍वेज-ऑन डिस्‍प्‍ले डिझाइन्‍स आणि आयपी68 + 1एटीएम वॉटर रेसिस्‍टण्‍स आहे, ज्‍यामुळे हा वॉच सक्रिय व दैनंदिन जीवनशैलींसाठी अनुकूल आहे. 

उपलब्‍धता: 

मोटोरोला सिग्‍नेचर 12GB RAM + 256GB, 16GM RAM + 512GB व 16GB RAM + 1TB स्‍टोरेज व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये उपलब्‍ध असेल, तसेच दोन आकर्षक पॅन्‍टोन™ निर्मित रंग - पॅन्‍टोन मार्टिनी ऑलिव्‍ह व पॅन्‍टोन कार्बनमध्‍ये येईल. सर्व व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये एअरक्राफ्ट-ग्रेड अॅल्‍युमिनिअम फ्रेमवर डिझाइन करण्‍यात आलेले सुधारित, टेक्‍स्‍टाइल-प्रेरित प्रीमियम फिनिश आहे, ज्‍यामधून ग्रिप व आकर्षकतेची खात्री मिळते. 

या स्‍मार्टफोनच्‍या विक्रीला संपूर्ण भारतात 30th January 2026 रोजी फ्लिपकार्ट, Motorola.in, आणि आघाडीच्‍या रिटेल स्‍टोअर्समध्‍ये सुरूवात होईल. या स्‍मार्टफोनची प्रभावी लाँच किंमत INR 54,999* पासून सुरू होते.  

लाँच किंमत:        

12GB + 256GB                 : Rs. 59,999 

16GB + 512GB : Rs. 64,999 

16GB + 1TB      :                     Rs. 69,999 

किफायतशीर ऑफर: 

ग्राहक खाली देण्‍यात आलेल्‍या 2 पैकी 1 ऑफरचा आनंद घेऊ शकतो 

1. बँक ऑफर – एचडीएफसी व अॅक्सिस बँकच्‍या माध्‍यमातून Rs. 5000 त्‍वरित बँक सूट 

2. जवळपास Rs 5,000 एक्‍स्‍चेंज बोनस (निवडक मॉडेल्‍ससाठी, एक्‍स्‍चेंज बोनस जवळपास Rs 7,500 आहे) 

प्रभावी किमतीसह ऑफर: 

12GB + 256GB : Rs. 54,999*

16GB + 512GB : Rs. 59,999*

16GB + 1TB            : Rs. 64,999*

ऑपरेटर ऑफर: 

जिओ प्रीपेड प्‍लॅन Rs. 1199 सह रिचार्जवर Rs. 15,000 किमतीचे 6 महिन्‍यांसाठी 10 प्रीमियम ओटीटी अॅप्‍स मोफत उपलब्‍ध.

अधिक माहितीसाठी - https://www.jio.com/offers/brand-partners/jio-motorola-signature-offer-2026/  

अतिरिक्‍त ऑफर्स:  

1. 6 महिन्‍यांसाठी मोफत परप्‍लेक्सिटी प्रो सबस्क्रिप्‍शन मिळवा. 

2. कोणत्‍याही बीस्‍पोक प्रीव्हिलेज अनुभवावर मोटोरोला सिग्‍नेचर क्‍लब अॅपच्‍या माध्‍यमातून जवळपास Rs 6000 किमतीच्‍या वेलकम बेनीफिट्सचा आनंद घ्‍या. 

बंडल ऑफर्स:

मोटोरोला सिग्‍नेचरसह मोटो-वॉचच्‍या खरेदीवर फ्लॅट Rs. 5,000 सूट. 

ऑफर फक्‍त 10 फेब्रुवारीपर्यंत वैध आहे.

motorola signature च्‍या खरेदीवर या ऑफरचा आनंद घेऊ इच्छिणारे ग्राहक व्‍हॉट्सअॅपवरील मोटोरोला सपोर्ट (80679 16686) वर 'Hi' पाठवू शकतात आणि स्‍वत:चा तपशील प्रविष्‍ट करत उल्‍लेख करण्‍यात आलेले डिस्‍काऊंट कूपन निर्माण करू शकतात. 

To know more about the product visit:  

Flipkart - https://www.flipkart.com/motorola-signature-pantone-martini-olive-256-gb/p/itm945fffeb4a94c?pid=MOBHGVJYTCM8BZQF

https://www.flipkart.com/motorola-signature-coming-soon-store

Motorola website - https://www.motorola.in/smartphones-motorola-signature/p?skuId=616 

Disclaimers:

^All battery life claims are approximate and based on the median user tested across a mixed use profile (which includes both usage and standby time) under optimal network conditions. Actual battery performance will vary and depends on many factors including signal strength, network and device settings, temperature, battery condition, and usage patterns.

*Price including all offers

# As Per TechArc India’s Leading AI Smartphone Brand Report 2025

^https://www.dxomark.com/motorola-signature-camera-test/

^^ *Welcome Offer valid till 31 March. Offer applicable on the first Signature Club service only, with benefits of up to INR 6,000. If the service cost exceeds INR 6,000, the additional amount shall be borne by the user. If the service cost is below INR 6,000, the complimentary benefit will be considered fully utilised and cannot be carried forward or reused. Dining and shopping services are excluded from this offer. Offer subject to availability and other terms and conditions.

Detailed Specifications: Motorola Signature

Wednesday, January 21, 2026

Pepperfry third year ‘Home Report Card 2025’ launch

 Pepperfry third year ‘Home Report Card 2025’ launch

India’s Only Trends and Trivia Guide for Home & Décor

Mumbai, 20 January 2026 : Pepperfry, India’s leading omnichannel furniture and home goods marketplace, has marked the third year of its much loved Home Report Card launch with the release of the 2025 edition; a report that captures how Indian households shopped for their homes in 2025. Based on real purchase behaviour across 700+ cities, the report highlights a clear shift - homes are no longer upgraded in one go, but improved steadily, room by room through the year. Home categories recorded nearly 2X higher transaction intensity than furniture, with storage, kitchen utilities, organisers, and lighting leading the demand. In cities such as Bengaluru, Pune, and Jaipur, Home Goods accounted for more than half of all home-related purchases.

Living rooms emerged as the most socially expressive space in Indian homes. Living room furniture delivered significantly higher engagement across categories, reflecting a shift towards planned upgrades driven by lifestyle aspirations rather than immediate need. Purchase cycles significantly going down with customers changing sofas once in 4 years. In Bedroom, Queen-size beds and mattresses continued to dominate demand nationwide.

Ashish Shah, Co-Founder and Chief Executive Officer, Pepperfry said,“Excited to release this third edition of Pepperfry’s Home Report Card 2025. As always, the report isn’t about forecasting trends, it reflects behaviour across millions of households based on the purchases done on Pepperfry; showing how homes are becoming more personal, practical, and thoughtfully built over time, the report is filled with tons of trivia around regional likes and preferences as usual. With advent of many D2C Brands launching this year on Pepperfry, we see customers getting more discerning and buying products that are unique and design-led. This year Pepperfry will continue to pursue its strong ambition of becoming the defacto ‘Fashion for Home’ destination for consumers and brands alike.”

Shubbam Sharma, Chief Growth Officer, Pepperfry added,“What Indians buy for their homes today is deeply influenced by where they live, how they work, and how their lifestyles are changing. The Pepperfry Home Report Card 2025 brings these insights to life, combining data, trends, and trivia to paint a comprehensive picture of home buying across India. The report also inspires us to make the most relevant supply available based on new trends for our customers this year.”

Kulbhushan Atkar, Head of Marketing and Furniture Category, Pepperfry said,“What Pepperfry’s Home Report Card 2025 clearly highlights is a shift from episodic home buying to continuous home-building. Consumers are no longer waiting for festivals or a new home to act, they’re upgrading in smaller, more assured decisions through the year. For brands and marketers, this changes the approach. Success will hinge on remaining relevant across life stages, seasons, and moments—by offering the right solutions when homes are ready for change, not when the calendar dictates it.”

Lighting emerged as the year’s biggest design shift, with hanging lights and wall lamps outperforming soft décor across metros. Tier-2 India contributed over 40% of Home demand, with cities such as Goa, Nagpur, Kochi, and Bhopal investing strongly in ambience and functionality.

Work-from-home proved to be functional, with office chairs emerging as the fastest-moving furniture category of the year, driven equally by metros and Tier-2 cities. Across metro markets, Mandirs emerged as one of the leading home categories, highlighting how devotional spaces continue to be integrated into modern urban homes. The Home Report Card 2025 underscores how Indian homes are no longer chasing perfection but investing in living better - one thoughtful decision at a time.

Hannah Joseph Hospital Limited IPO Opens on January 22, 2026

 Hannah Joseph Hospital Limited IPO Opens on January 22, 2026

Total Issue Size – Up To 60,00,000 Equity Shares of ₹ 10 each

IPO Size - ₹ 42.00 Crore (At Upper Price Band)

Price Band - ₹ 67 - ₹ 70 Per Share

Lot Size – 2,000 Equity Shares

Left to Right

Dr. Sunil Kumar Manocha CapitalSquare Advisors Private Limited

Dr. Mosesjoseph Arunkumar Hannah Joseph Hospital Limited

Mr. Daniel Dayanand Fenn Hannah Joseph Hospital Limited

Mr. Pandiarajan Thangaraj - Internal Auditor.                                                      Hannah Joseph Hospital Limited

Mumbai, January 20, 2026 – Hannah Joseph Hospital Limited (Hannah Joseph, The Company) a multi-specialty tertiary care hospital in Madurai with focus on Neurosciences and Trauma, proposes to open its Initial Public Offering on January 22, 2026, aiming to raise ₹ ₹ 42.00 Crore (At Upper Price Band) by fresh issue of 60,00,000 equity shares, to be listed on the BSE SME platform.

The issue size is 60,00,000 equity shares at a face value of ₹ 10 each with a price band of ₹ 67 - ₹ 70 Per Share.

Equity Share Allocation

Qualified Institutional Buyer – Not more than 28,46,000 Equity Shares 

Non-Institutional Investors – Not less than 8,58,000 Equity Shares 

Individual Investors – Not less than 19,96,000 Equity Shares

Market Maker – 3,00,000 Equity Shares

The net proceeds from the IPO will be utilized for Funding of capital expenditure for establishing Radiation Oncology Centre and General Corporate Purposes. The anchor portion will open on Wednesday, January 21, 2026 and the issue will open on Thursday, January 22, 2026 and will close on Tuesday, 

The Book Running Lead Manager to the Issue Capital Square Advisors Private Limited, The Registrar to the Issue is Bigshare Services Private Limited.

Dr. Mosesjoseph Arunkumar, Chairman and Managing Director of Hannah Joseph Hospital Limited expressed, “Since its inception, remained committed to delivering advanced, ethical, and patient-centric healthcare services. Our evolution from a single-specialty focus to a multi-specialty tertiary care hospital reflects our continuous investments in clinical excellence, technology, and skilled medical professionals. Being a regional referral center for complex neurological, neurosurgical, cardiac, and trauma care, we have consistently strengthened our infrastructure and clinical capabilities to meet the growing healthcare needs of South Tamil Nadu.

The proposed IPO is expected to support the Company’s planned capacity and service expansion initiatives, enabling it to strengthen its clinical offerings and deliver more integrated, end-to-end care. These initiatives are aimed at enhancing patient convenience and treatment outcomes while broadening the Company’s ability to serve complex medical needs under a single platform. The expansion is also expected to drive incremental inpatient and outpatient volumes and support sustainable growth in revenues over the medium to long term.”

Mr. Sunil Kumar Manocha, Founder & Director of Capital Square Advisors Private Limited said, “Hannah Joseph Hospital operates a tertiary care facility in its core market with a focused presence across neurosciences, cardiology, trauma, and critical care. Supported by accredited operations and participation in government insurance schemes, the hospital is positioned to deploy incremental capital towards capacity enhancement and service integration initiatives. 

These initiatives are expected to expand clinical offerings, improve patient throughput and case mix, and support growth in inpatient and outpatient revenues.”

About Hannah Joseph Hospital Limited:

Hannah Joseph Hospital Limited (Hannah Joseph, The Company) is a Madurai-based, Multi-Specialty Neurosciences and Trauma Center Operating 133-bed tertiary hospital with allied specialities of Cardiac Sciences, Orthopedics, Oral and Maxillofacial Surgery.

Incorporated in 2011 and transitioned into a public limited company in 2022, the hospital has developed an integrated care model supported by advanced clinical infrastructure, critical care capabilities, and academic training programs.

Led by experienced medical professionals, the Company serves as a regional referral center for complex Neurological, Neurosurgical and Trauma related surgeries while maintaining a balanced mix of inpatient and outpatient services.

For the period ended 31st March 2025, the company reported Revenue of ₹ 7,753.13 Lakhs, EBITDA Margin of 26.47% & PAT Margin 9.30%. 

For the period ended 30thSeptember 2025, the company reported Revenue of ₹ 4,254.52 Lakhs, EBITDA Margin of 27.38% & PAT Margin 12.03%. 

Disclaimer: 

Certain statements in this document that are not historical facts are forward looking statements. Such forward-looking statements are subject to certain risks and uncertainties like government actions, local, political or economic developments, technological risks, and many other factors that could cause actual results to differ materially from those contemplated by the relevant forward-looking statements. The Company will not be in any way responsible for any action taken based on such statements and undertakes no obligation to publicly update these forward-looking statements to reflect subsequent events or circumstances.

Thursday, January 8, 2026

India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026

 India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026


IIJS Bharat – Signature 2026 to expected to generate ₹75,000 crore in orders over the next three months

Industry on Track for USD 100 Billion Exports by 2047, Aligned with PM’s Vision of Viksit Bharat: GJEPC Chairman

IIJS Bharat – Signature 2026 features 1,600+ exhibitors and 3,300+ stalls across 1.25 lakh sq. m. at two premier Mumbai venues

25,000+ trade buyers, including 1,400 international buyers from 40 countries

and 12 international buyer delegations.

National , 8 January 2026: India today reaffirmed its position at the centre of the global gems and jewellery trade as the Gem & Jewellery Export Promotion Council (GJEPC) inaugurated the 18th edition of IIJS Bharat – Signature 2026 at the Jio World Convention Centre (JWCC), Mumbai—formally opening the global jewellery business calendar for the year.

Widely regarded as the first and most influential B2B jewellery trade fair of the year, IIJS Bharat – Signature 2026 brings together the entire global value chain at a time when market sentiment, sourcing strategies, and business direction for the year ahead begin to take shape.

The inaugural ceremony was graced by Chief Guest Sandrine Conseiller, CEO, De Beers Brands and Chair, Natural Diamond Council, and Guests of Honour Harsha Bangari, Managing Director, EXIM Bank and Saumen Bhaumik, Managing Director, CaratLane.

The inauguration took place in the presence of Kirit Bhansali, Chairman, GJEPC; Shaunak Parikh, Vice Chairman & Convener, National Exhibitions, GJEPC; and Sabyasachi Ray, Executive Director, GJEPC, along with members of the Committee of Administration, exhibitors, buyers, and leading stakeholders from across the global gem and jewellery industry.

IIJS Bharat – Signature 2026 is being held at two premier venues in Mumbai—Jio World Convention Centre (8–11 January 2026) and Bombay Exhibition Centre, NESCO, Goregaon (9–12 January 2026)—alongside IGJME Bharat – Signature 2026, the machinery and technology showcase.

Spanning over 1.25 lakh square metres, the exhibition brings together 1,600+ exhibitors across 3,300+ stalls, welcoming over 25,000 trade buyers from 800+ Indian cities, including 1,400 international buyers from 40 countries and 12 international buyer delegations. The show offers a comprehensive sourcing platform across gold, diamond, silver and studded jewellery, loose natural diamonds, coloured gemstones, couture and fine jewellery, lab-grown diamonds, and machinery and allied segments.

The Chief Guest, Ms. Sandrine Conseiller, CEO, De Beers, inaugurated the show and highlighted,” there is no better place to talk about the future of jewellery than India. From being the birthplace of the world’s diamond story to emerging as one of the fastest-growing markets today, India continues to be a pillar of stability and opportunity for the global gems and jewellery industry. Platforms like IIJS Signature play a critical role in strengthening trust, partnerships and confidence across the ecosystem, while reinforcing India’s position at the heart of the global jewellery trade.”

Shri Kirit Bhansali, Chairman, GJEPC, said, “As the year's first major international showcase, IIJS Bharat – Signature embodies the Indian gem and jewellery industry's confidence, resilience, and global readiness. India stands at the nexus of trust, transparency, and opportunity—with IIJS bringing this story to life.”

“In 2026, India steps boldly onto the world stage, assuming the Kimberley Process Chairmanship for the third time—a resounding vote of confidence in our leadership, credibility, and dedication to ethical trade. Poised to achieve the USD 100 billion export milestone by 2047, India's gem and jewellery sector has outgrown dependence on traditional markets. It will drive growth through Free Trade Agreements, robust government support, strategic diversification, manufacturing and technology innovation, and retail expansion. These pillars—anchored in transparency and consumer trust—strengthen our global competitiveness and ensure sustainable, long-term growth”, Chairman added

Highlighting the role of finance and infrastructure in strengthening the sector, Harsha Bangari, Managing Director, EXIM Bank, said, “Gems and jewellery is a traditional yet dynamic sector with a significant contribution to India’s exports and employment. Strengthening infrastructure, improving awareness about financial products, addressing technology and skill gaps, and easing trade bottlenecks are critical for clusters to realise their full export potential.”

Saumen Bhaumik, Managing Director, CaratLane said, “As our industry grows, every stakeholder has benefited, but continued investment in skills and craftsmanship will be key to sustaining this momentum. With the industry expected to grow significantly in the coming years, the availability of skilled hands will become critical. Making artisans a priority is not charity, it is business prudence. If we want to be global leaders, dignity, pride and security for craftsmanship must sit at the centre of our growth story.”

Shaunak Parikh, Vice Chairman, GJEPC said, “IIJS Bharat – Signature 2026 represents India’s commanding position in the global gem and jewellery industry, spanning manufacturing excellence, design innovation, and a rapidly growing domestic market. As the first major international jewellery trade fair of the year, it is where the global industry turns to India for direction and opportunity. The scale of participation, growing international presence, and strong entry of new enterprises reflect the confidence of the trade—making IIJS Bharat – Signature the definitive platform where the global jewellery business year truly begins.”

Inspired by the Art Forms of India under the overarching “Brilliant Bharat” theme, the dedicated Crafts Pavilion at IIJS Bharat – Signature 2026 celebrates the country’s rich jewellery heritage through curated displays and live demonstrations by National Award-winning artisans. The pavilion showcases GI-tagged traditions such as Thewa (gold on glass), Banarasi Meenakari, Cuttack’s centuries-old silver filigree, and distinctive silver crafts from the Hupari cluster, offering visitors a focused glimpse into India’s living craft legacy.

The exhibition also features Select CLUB, a curated luxury segment at JWCC showcasing high-end couture and fine jewellery by 107 select companies, alongside Innov8 Talks & Symposium Knowledge Forums addressing critical themes such as the future of natural diamonds, Free Trade Agreements, lab-grown diamond technology, ease of doing business, and the role of AI in jewellery by 2030.

Aligned with GJEPC’s One Earth sustainability initiative, IIJS Bharat – Signature 2026 continues its commitment to responsible exhibitions, including the elimination of over 600,000 single-use plastic water bottles at the Bombay Exhibition Centre and wider adoption of eco-conscious practices.

With global buyers, industry leaders, and policymakers converging in Mumbai, IIJS Bharat – Signature 2026 is poised to set the tone for the gem and jewellery industry in the year ahead—combining heritage, innovation, sustainability, and global business opportunity on one unified platform.

About The Gem and Jewellery Export Promotion Council (GJEPC)

The Gem & Jewellery Export Promotion Council (GJEPC), set up by the Ministry of Commerce, Government of India (GoI) in 1966, is one of several Export Promotion Councils (EPCs) launched by the Indian Government, to boost the country’s export thrust, when India’s post-Independence economy began making forays in the international markets. Since 1998, the GJEPC has been granted autonomous status. The GJEPC is the apex body of the gems & jewellery industry and today represents 10700+ members in the sector.  With headquarters in Mumbai, GJEPC has Regional Offices in New Delhi, Kolkata, Chennai, Surat and Jaipur, all of which are major centres for the industry. It thus has a wide reach and is able to have a closer interaction with members to serve them in a direct and more meaningful manner. Over the past decades, GJEPC has emerged as one of the most active EPCs and has continuously strived to both expand its reach and depth in its promotional activities as well as widen and increase services to its members.

Facebook: www.facebook.com/GJEPC

Instagram: www.instagram.com/gjepcindia

Youtube: www.youtube.com/gjepcindia

Twitter: www.twitter.com/GJEPCIndia 

Tuesday, January 6, 2026

अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ चित्रपटाचा भव्य ट्रेलर अनावरण सोहळा संपन्न!

 ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ चित्रपटाचा भव्य ट्रेलर अनावरण सोहळा संपन्न!


महिला पत्रकारांच्या हस्ते केले ट्रेलरचे अनावरण!

झीस्टुडिओज आणि सनफ्लॉवर स्टुडिओज निर्मित बहुप्रतिक्षित ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा  रंगली आहे. चित्रपटाच्या टीझर व शीर्षक गीताने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली होती. आता प्रेक्षकांच्या याच उत्सुकतेत भर घालत या चित्रपटाचा भव्य ट्रेलर अनावरण सोहळा नुकताच एका अनोख्या पद्धतीने पार पडला. हा चित्रपट स्त्री सशक्तीकरणावर भाष्य करणारा असल्याने या सोहळ्याला उपस्थित सर्व महिला पत्रकार, चित्रपटाच्या तंत्रज्ञ टीममधील महिला यांच्याद्वारे चित्रपटाच्या ट्रेलरचे अनावरण करण्यात आले. हा क्षण या सोहळ्याचे खास आकर्षण ठरले. तसेच यादिवशी अभिनेत्री प्रार्थना बेहेरेचा वाढदिवस असल्याने संपूर्ण टीमने केक कापून तिचा वाढदिवसही साजरा केला. 

सासू सुनेचं नातं हे अनेक कुटुंबात तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना या प्रकारचं असतं.. तर काहींसाठी ‘ असून अडचण, नसून खोळंबा’ अशा स्वरूपाचं असतं.  थोडक्यात, घरोघरी मातीच्या चुली अशी परिस्थिती असते. पण, याहीपलिकडे जाऊन त्यांच्यात एक असाही भावनिक बंध असतो जो या नात्याची वीण कधीच सैल होऊ देत नाही. अशाच काहीशा भावना मांडणारा आणि या नात्याचे नवे पैलू उलगडणारा चित्रपट म्हणजे अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई ? या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच मोठ्या दिमाखात पार पडला. 

ट्रेलरमध्ये सासू -सूनेच्या नात्याचे केवळ आदर्श रूप नाही, तर त्यातील चांगले-वाईट पैलू, संघर्ष आणि भावनिक क्षणही प्रामाणिकपणे मांडण्यात आले असून, हसवत हसवत विचार करायला लावणारी ही कथा आहे. ही केवळ एक सासू-सूनेची गोष्ट नसून स्त्रियांची गोष्ट आहे. स्त्रियांनी एकमेकींना समजून, एकमेकींची साथ दिल्यावर त्या अधिक सक्षम व मजबूत होतील असा प्रभावी विचार या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. 

दिग्दर्शक केदार शिंदे म्हणतात, “ ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ हा एक मनोरंजक व कौटुंबिक चित्रपट आहे. चौकोनी कुटुंबाची ही कथा आहे, त्यामुळे हा चित्रपट घरातील प्रत्येकासाठी आहे. यात विनोद आहे, भावना आहेत आणि प्रत्येक घरात दिसणाऱ्या सासू-सुनेच्या नात्याची ओळखीची परिस्थिती आहे. प्रेक्षकांना या नात्यातील गंमतीदार प्रसंग, भावनिक वळणे आणि दोन्ही व्यक्तिरेखांची ताकद अनुभवता येईल.”

या प्रसंगी बोलतांना झी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणाले की, “ 

केदार शिंदे यांनी या चित्रपटाची गोष्ट जेव्हा पहिल्यांदा ऐकवली तेव्हाच आम्ही ठरवलं की हा चित्रपट आपण करुयात. ही गोष्ट केवळ सासू- सून या नात्यांची नाही तर संपूर्ण कुटुंबाची आणि सोबतीनेच स्त्रीयांबद्दलचा एक नवा दृष्टीकोन देणारी आहे. जी सर्वांनाच आवडेल. 

झी स्टुडिओज व सनफ्लॉवर स्टुडियोज निर्मित ‘अगं अगं सूनबाई !काय म्हणताय सासूबाई?’ चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले असून सना शिंदे, उमेश कुमार बन्सल यांची निर्मिती आहे. चित्रपटाची कथा आणि संवाद वैशाली नाईक व ओमकार मंगेश दत्त यांची असून पटकथा वैशाली नाईक यांची आहे. तसेच चित्रपटाचे छायाचित्रण व संकलन मयूर हरदास यांनी केले आहे. येत्या १६ जानेवारी पासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

*खवैय्ये आवडत्या चिकनक्रिस्परचा आस्वाद घेऊ शकतात, केवळ 99 रुपयांत*

*खवैय्ये आवडत्या चिकनक्रिस्परचा आस्वाद घेऊ शकतात, केवळ 99 रुपयांत* KFC इंडियाचे चिकन क्रिस्पर मील आता फक्त 99 रुपयांत चिकनप्रेमी फ्राईज आणि ...