Friday, June 13, 2025

'ऊत' चित्रपटातून नवी जोडी रुपेरी पडद्यावर

 'ऊत' चित्रपटातून नवी जोडी रुपेरी पडद्यावर

अभिनेते  मकरंद देशपांडे यांच्या हस्ते  चित्रपटाचा पोस्टर अनावरण सोहळा संपन्न

तारुण्याच्या पंखांत आकाशाला गवसणी घालण्याचं बळ असतं. व्यवस्थेविरुद्ध बंड करणारी तरुणाईच असते. व्यवस्थेविरुद्ध केलेल्या संघर्षाची कहाणी सांगणारा वेरा फिल्म्स निर्मित आणि राम मलिक लिखित-दिग्दर्शित 'ऊत' हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात एक संघर्ष कथा पहायला मिळणार असून  या सोबतच 'ऊत' मध्ये एक प्रेमकथाही आहे. या प्रेमकथेचा नायक अभिनेता राज मिसाळ असून, अभिनेत्री आर्या सावे ही नायिका आहे. या चित्रपटाच्या  निमित्ताने ही नवी जोडी  मराठी रुपेरी पडद्यावर दाखल झाली आहे. या चित्रपटाचा शानदार पोस्टर अनावरण सोहळा नुकताच अभिनेते प्रसिद्ध मकरंद देशपांडे यांच्या हस्ते  संपन्न झाला. यावेळी मंचावर चित्रपटातील सर्व कलाकार व तंत्रज्ञ उपस्थित होते.  

यावेळी चित्रपटाला  शुभेच्छा देताना अभिनेता मकरंद देशोपांडे  म्हणाले की,  ‘चित्रपट करणं हे कसब आहे. अनेकांची मेहनत यात असते. आज चित्रपटाला प्रेक्षक  नसताना  चित्रपट बनवण्याचं धाडस करणं कॊतुकास्पद आहे.  या चित्रपटासाठी  मला  विचारणा झाली होती पण काही कारणास्तव या चित्रपटात काम करण्याचा माझा योग  जुळून आला नव्हता. पण आज या  चित्रपटाचे पोस्टर अनावरण माझ्या हस्ते  झाले आणि  या चित्रपटासोबत जोडला जाण्याचा योग जुळून आला, याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.  

याप्रसंगी बोलताना अभिनेता राज मिसाळ म्हणाले की, माझा बॅकस्टेज पासून सुरु झालेला प्रवास आज चित्रपटाच्या प्रदर्शनापर्यंत येऊन पोहचला आहे. या प्रवासात साथ दिलेल्या सर्वांचे मी आभार मानतो. या पोस्टर अनावरण सोहळ्याच्या वेळी चित्रपटातील झिंगनांग चिंगनांग लै भारी गं... या प्रेमगीताची खास झलक कलाकारांनी सादरीकरणातून उपस्थितांना दाखविली. वैभव जोशी यांनी  लिहिलेलं हे गाणं  जयदीप वैद्य यांनी  गायले आहे, तर संगीत आशुतोष कुलकर्णी यांचे आहे.

कान्स फेस्टिव्हलमध्ये ‘ऊत’ या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मलेशिया फिल्म फेस्टिव्हल, ईस्टर्न युरोप फिल्म फेस्टिव्हल, ईस्ट विलेज न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हल, सिनसिने फिल्म फेस्टिव्हल, श्रीलंका इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, मँचेस्टर फिल्म फेस्टिव्हल, अहमदाबाद इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल या सारख्या अनेक देशी-विदेशी चित्रपट महोत्सवात ‘ऊत’ या मराठी चित्रपटाने आपली यशस्वी मोहोर उमटविली आहे.

लेखकांच्या विविध मागण्यांसाठी मानाचि लेखक संघटनेचे निवेदन

 लेखकांच्या विविध मागण्यांसाठी मानाचि लेखक संघटनेचे निवेदन

९ जून २०२५ रोजी मालिका नाटक चित्रपट लेखक संघटनेचे पदाधिकारी, पुरुषोत्तम बेर्डे, राजीव जोशी, आशिष पाथरे, डॉ अलका नाईक आणि विवेक आपटे लेखकांच्या समस्यांसाठी, माननीय सांस्कृतिक मंत्री ॲड. श्री. आशिष शेलार यांना भेटले. संघटनेचे अध्यक्ष विवेक आपटे यांनी लेखकांच्या समस्या मंत्रीमहोदयांना सांगितल्यावर, लेखकांवर अनेक प्रकारे अन्याय होतो, हे त्यांनी मान्य केले. चर्चा करून आपण समस्या सोडवू या, असेही म्हटले.

त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची मी मीटिंग लावतो, अ


से सांगून संघटनेने दिलेल्या निवेदनावर तसा शेराही मारला, असे अध्यक्ष श्री विवेक आपटे यांनी नमूद केले. मानाचि लेखक संघटना मराठी भाषेतील मालिका नाटक व चित्रपटांच्या हौशी व व्यावसायिक लेखकांची संघटना असून, २०१६ पासून रजिस्टर कंपनी म्हणून सर्व माध्यमात लेखन करणाऱ्या कवी, गीतकार, व लेखकांच्या उत्कर्ष व सन्मानासाठी कार्यशील आहे. परस्पर संवादातून लेखकांच्या समस्यांचे निराकरण करून, त्यांना यथोचित मान व धनही मिळावे यासाठी मानाचि संघटना सदैव जागृत व कार्यरत आहे. यासंदर्भात आम्ही खालील मुद्दे आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो !

१. मुद्दा - सध्या नाटकाची संहि, रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाकडे पाठविले जाते. मंडळ त्या संहितेतील आक्षेपार्ह भागावर शेरा मारून, त्याचे जाहीर प्रयोग करण्याची परवानगी देते. पण त्यात नाटकाचे शीर्षक लेखकाच्या नावाने रजिस्टर होत नाही. त्यावर लेखकाचा मालकी / स्वामित्व हक्क न राहिल्याने ते शीर्षक लेखकाच्या परवानगीशिवाय, मालिका किंवा चित्रपटांसाठीही वापरले जाते. त्याचप्रमाणे चित्रपटाचे शीर्षक, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाकडे व चित्रपटाबरोबर मालिकेचे ही शीर्षक, इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स असोसिएशन (IMPPA) कडे निर्माता रजिस्टर करतो. साहजिकच शीर्षका वरचा मालकी / स्वामित्व हक्क निर्मात्याकडे जातो. नंतर निर्माता ते शीर्षक लाखो रुपयांना विकू शकतो / विकतो आणि ते ज्याला सुचले आहे त्या लेखकाला त्याचा एक रुपयाही मिळत नाही.

मागणी - लेखकाला सुचलेले नाटकाचे, चित्रपटाचे, किंवा मालिकेचे शीर्षक वरीलपैकी कुठल्याही एका / अधिक संस्थांकडे, लेखकाला स्वतःला, स्वतःच्या नावाने रजिस्टर करता यायला हवे.

२. मुद्दा - सध्या कवितेतल्या / गीतातल्या / भावगीताच्या किंवा संवादाच्या ओळींची सर्रास मालिका शीर्षके बनवली जातात. त्याचे त्याच्या कवी / गीतकार / भावगीत कार / संवाद लेखक यांना श्रेय व मानधन दिले जात नाही.

मागणी - यापुढे वर नमूद केल्याप्रमाणे मालिकेचे शीर्षक वापरले असल्यास, त्याच्या मूळ लेखकाचा आदरपूर्वक उल्लेख श्रेयनामावलीत केला जावा. त्याचप्रमाणे त्या लेखकास त्याचे मानधनही (वन टाइम पेमेंट) मिळावे.

३. मुद्दा - मानाचि लेखक संघटनेच्या कार्यालयासाठी तसेच संघटना लेखकांसाठी करत असलेली वर्कशॉप्स किंवा संघटनेचे सांजमेळ्यासारखे उपक्रम करण्यासाठी लागणारी जागा !

मागणी - संघटनेला त्यांचे कार्यालय तसेच अन्य उपक्रम राबवण्यासाठी पु. ल. देशपांडे अकॅडमी / रवींद्र नाट्य मंदिर /मध्यवर्ती सरकारी आस्थापनात अंदाजे १०० लोकांना पुरेल एवढी जागा विनामूल्य किंवा अत्यल्प भाड्यात मिळावी.

४. मुद्दा - सध्या मराठी चित्रपटाला सेन्सॉर सर्टिफिकेट देण्यापूर्वी, त्या चित्रपटाचे दिग्दर्शक, छाया लेखक, संगीतकार, संकलक व प्रमुख कलाकारांप्रमाणे लेखक तसेच गीतकार कडूनही त्यांचे पूर्ण मानधन मिळाल्याचे व सेन्सॉर सर्टिफिकेट देण्याला त्यांची हरकत नसल्याचे प्रमाणपत्र घेण्याचा नियम आहे. परंतु त्याचे काटेकोर अंमलबजावणी होत नाही.

मागणी - यापुढे लेखक तसेच गीतकाराने ही, त्याचे पूर्ण मानधन मिळाल्याचे ना हरकत प्रमाणपत्र (NOC) सादर करणे अनिवार्य केले जावे. त्याशिवाय या चित्रपटाला सेन्सॉर सर्टिफिकेट दिले जाऊ नये.

५. मुद्दा - चित्रपट, मालिका व वेब मालिकांचा व्यवसाय फार मोठ्या प्रमाणात मुंबई व महाराष्ट्रात आहे. पण सध्या नव्या संकल्पना किंवा संहितेच्या कॉपीराईट व इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईटचे रजिस्ट्रेशन फक्त दिल्लीला होते, जे गैरसोयीचे आहे.

मागणी - कॉपीराईट व इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट चे रजिस्ट्रेशन दिल्ली बरोबरच मुंबईतही करता येण्याची सोय हवी.

६. मुद्दा - वृद्ध किंवा विकलांग झालेल्या आता काम करू न शकणाऱ्या लेखकांसाठी ग्रुप इन्शुरन्स व पेन्शन प्लॅन !

मागणी - या योजनेसाठी वर नमूद केल्याप्रमाणे लेखकांची पात्रता पडताळून, शासनाला तसे सूचित करण्याची जबाबदारी व अधिकार मानाचि संघटनेला सोपवले जावे. कारण आम्हाला या योजनेत शासनासह निर्माते, कलाकार व प्रेक्षकांचाही सहभाग अपेक्षित आहे.

आपण आमच्या मागण्यांची योग्य ती दखल घेऊन आवश्यक ती कारवाई / मार्गदर्शन कराल, हा विश्वास आहे.

'Kon Hona Maharashtriacha Ladka Kirtankar

                              Kon Hona Maharashtriacha Ladka Kirtankar'

Govardhan Ghee collaborates with Sony Marathi Channel's 'Kon Hona Maharashtriacha Ladka Kirtankar' to celebrate Maharashtra's cultural heritage

Govardhan Ghee, a subsidiary of Parag Milk Foods, announces its association with the show 'Kon Hona Maharashtracha Ladka Kirtankar' on Sony Marathi Channel, a name synonymous with purity and excellence. This unique reality show is the only unique platform dedicated to Kirtan. It is a devotional artistic endeavor celebrated in Maharashtra. Kirtan is a beautiful blend of storytelling, poetry and music. Over the centuries, it has been contributing immensely beyond the artistic expression of Kirtanveer. It is the soul of India's spiritual journey, which brings together all communities through the power of devotion and tradition. Through this collaboration, Govardhan Ghee has extended its commitment to the dairy industry by supporting an initiative that celebrates the cultural and spiritual heritage of Maharashtra. The programme aims to celebrate and preserve this heritage by mainstreaming Kirtan on television, while inspiring a new generation of Kirtan singers.

Akshali Shah, Executive Director, Parag Milk Foods, said, "At Parag Milk Foods, our core values ​​have always been rooted in authenticity and heritage. Just as Govardhan Ghee has been an integral part of Indian households for generations, similarly, Kirtan has maintained an unbroken chain of devotion and storytelling. We consider it an honour to extend our support to Sony Marathi's 'Kon Hona Maharashtriacha Ladka Kirtankar', a show that will continue to inspire and touch the hearts of today's audiences through Jai."                                                                                                                                                                                     Tushar Shah, Business Head and Chief Marketing Officer (CMO) of Hindi Cinema, English, Bengali, Marathi, Mehiti Ranjan Channels at Sony Picture Networks India (SPNI), highlighted the cultural impact of the show, saying, "Sony Marathi has always presented stories that touch the true soul of Maharashtra. Kon Hona Maharashtriacha Ladka Kirtankar is not just a reality show - it is a heartfelt tribute to the art form that has shaped the cultural identity of the state. We hope to give a new lease of life to this beautiful tradition by providing a national platform to talented Kirtankars. We are delighted that Govardhan Ghee is collaborating with us on this journey, as their values ​​of purity and tradition blend beautifully with the core of our show, making this initiative even more meaningful." Through this collaboration, Govardhan Ghee has further strengthened its role as a custodian of purity, not only contributing to the dairy industry but also to preserving the cultural core of India. By supporting the 'Who Will Be Maharashtra's Favorite Kirtankar' event, the brand has championed a legacy that goes beyond commerce, celebrating the artistic and cultural traditions of Maharashtra for generations to come.

Trust is Rare in The Traitors—Except Between Maheep and Anshula Kapoor

Trust is Rare in The Traitors-Except Between Maheep and Anshula Kapoor   

In the opening episode of The Traitors India, where trust is constantly questioned, Maheep Kapoor and Anshula Kapoor offered a quiet moment of certainty.

During an early interaction when the contestants were asked to name the one person they trusted the most, both Maheep and Anshula chose each other without hesitation. It was a simple but telling exchange that reflected their bond—not just as family, but as individuals who anchor each other in unfamiliar spaces.


The gesture wasn’t strategic or dramatic—it was instinctive. In a game designed around manipulation and betrayal, the duo’s unwavering faith in each other stood out. They weren’t trying to form a loud alliance or control the room; they were simply choosing trust, where it mattered most.

As the series begins to unfold, Maheep and Anshula’s grounded presence brings a refreshing sense of honesty to a game built on secrets

Wednesday, June 11, 2025

Vishnu Manchu’s Kannappa Sets Trailer Launch Date for June 13

 Vishnu Manchu’s Kannappa Sets Trailer Launch Date for June 13

The much-anticipated mythological actioner Kannappa, headlined by Vishnu Manchu, is all set to drop its official trailer on June 13.

Mounted on a large scale, the film has generated considerable buzz for its ambitious storytelling and stunning visual canvas. Directed by Mukesh Kumar Singh, the film also includes Akshay Kumar, Kajal Aggarwal, Prabhas, Mohanlal, Arpit Ranka and other leading south actors. Kannappa draws inspiration from the revered devotee of Lord Shiva, bringing to screen a tale that blends devotion, destiny, and action.

While details about the trailer are still under wraps, fans can expect a glimpse into the film’s scale and world-building—something that has been in the making for years. The project also features an ensemble cast, with several surprise appearances expected.

With the trailer launch just around the corner, Kannappa is already shaping up to be one of the most talked-about releases of the year.



Tuesday, June 10, 2025

अवधूत गुप्तेंच्या ‘ आई’ अल्बममधील ‘तू नसशील तर’ भावस्पर्शी गाणे प्रदर्शित

 अवधूत गुप्तेंच्या ‘ आई’ अल्बममधील ‘तू नसशील तर’ भावस्पर्शी गाणे प्रदर्शित 

आईच्या मायेचा स्पर्श मनाला भावतो आणि त्याच नात्याची गुंफण करणारे ‘तू नसशील तर’ हे नवे गाणे आता प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. अवधूत गुप्ते यांच्या ‘आई’ या भावभावनांनी भरलेल्या अल्बममधील हे तिसरे गाणे असून, त्यामधून आई आणि मुलाच्या नात्याची हळवी, खोल आणि मनाला भिडणारी भावना मांडण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे गाणे पूर्णपणे ब्लॅक अँड व्हाईटमध्ये चित्रित करण्यात आले आहे, ज्यामुळे त्यातील भावना अधिक प्रभावीपणे व्यक्त होत आहेत. अवधूत गुप्ते यांनी हे गाणे स्वतः संगीतबद्ध केले असून त्याचे गायनही त्यांनीच केले आहे. एकविरा म्युझिक प्रस्तुत या भावस्पर्शी गीताचे शब्द लिहिले आहेत समीर सामंत यांनी व संगीत संयोजनाची जबाबदारी अनुराग गोडबोले यांनी सांभाळली आहे. 

'तू नसशील तर’ हे गाणे आईच्या अनुपस्थितीत निर्माण होणाऱ्या भावनिक पोकळीची हळवी जाणीव करून देणारे आहे. गाण्याचे बोल हृदयाला स्पर्श करणारे असून, अवधूत गुप्तेंचा आवाज या गाण्याला आणखी भावनात्मक उंचीवर घेऊन जातो. या गाण्याच्या निमित्ताने आईविषयीची कृतज्ञता, प्रेम आणि व्याकुळता अशा अनेक भावना व्यक्त होत आहेत.

या गाण्याबद्दल अवधूत गुप्ते म्हणतात, “ ‘आई’ हा अल्बम माझ्या अत्यंत जवळचा आहेच मात्र ‘तू नसशील तर’ हे गाणे अधिकच जवळचे आहे. कारण, अलीकडेच मी माझ्या आईला गमावले असून त्या सर्व भावना या गाण्यातून मी व्यक्त केल्या आहेत. हे गाणे समुद्रकिनाऱ्यावर चित्रित करण्यात आले आहे याचं कारण म्हणजे मी जेव्हा समुद्रकिनारी जातो, आकाशाकडे बघतो तेव्हा मला असे वाटते की आई आहे आणि ती मला बघतेय. आई गेल्यानंतर माझ्या आयुष्यातील रंग उडाले होते. मला कशातच रस नव्हता. त्यामुळे ही अशी भावना असल्याने हे गाणे ब्लॅक अँड व्हाईट शूट करण्यात आले आहे.”

गश्मीर महाजनीचा नवा अध्याय सुरू, वाढदिवसानिमित्त पहिल्या दिग्दर्शकीय चित्रपटाची घोषणा

 गश्मीर महाजनीचा नवा अध्याय सुरू, 

वाढदिवसानिमित्त पहिल्या दिग्दर्शकीय चित्रपटाची घोषणा 

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता गश्मीर महाजनी आता एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गश्मीरने चित्रपट, हिंदी मालिका, नृत्यामुळे प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे एक स्थान निर्माण केले आहे. आता गश्मीर लेखक-दिग्दर्शक आणि निर्मात्याच्या भूमिकेत पदार्पण करत आहे. विशेष म्हणजे, त्याच्या वाढदिवसानिमित्ताने त्याने त्याच्या या पहिल्या चित्रपटाच्या मुहूर्ताची सोशल मीडियावर घोषणा केली. जीआरम्स इव्हेंट्स अँड प्रॉडक्शन या निर्मिती संस्थेअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती होत आहे. 


या चित्रपटाचे निर्माते गौरी महाजनी, माधवी महाजनी आणि गश्मीर महाजनी असून लेखन व दिग्दर्शन गश्मीर स्वतः करत आहे. अभिनय क्षेत्रात अनेक वर्षांचा अनुभव असलेला गश्मीर आता कॅमेऱ्यामागे जाऊन एक नव्या प्रवासाला सुरुवात करत आहे. या चित्रपटाचे छायाचित्रण सुप्रसिद्ध डीओपी सत्यजीत शोभा श्रीराम यांच्या कॅमेऱ्यातून साकारले जात आहे. गश्मीरच्या या नव्या इनिंगबद्दल मराठी सिनेसृष्टीतूनही शुभेच्छांचा वर्षाव होत असून या चित्रपटाचं नाव आणि कलाकार  जाणून घेण्याबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.


आपल्या या नवीन प्रवासाविषयी गश्मीर महाजनी म्हणतो, “दिग्दर्शन हे माझं एक दीर्घकाळापासूनचं स्वप्न आहे. अभिनय करताना अनेक गोष्टी शिकल्या, अनुभवल्या आणि आत खोलवर काही सांगायचं राहून गेलं होतं. आता त्या भावना, ती विचारांची प्रक्रिया मी कॅमेऱ्याच्या मागून मांडणार आहे. चित्रपट ही एक सामूहिक कला आहे, मात्र काही कथा अशा असतात, ज्या फक्त आपल्या दृष्टिकोनातूनच सांगितल्या जाऊ शकतात. माझा हा चित्रपट म्हणजे माझ्या मनात कित्येक वर्षांपासून रुजत गेलेली कल्पना आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने ही गोष्ट सुरू करत असल्यामुळे हे एक भावनिक आणि प्रेरणादायी क्षण आहेत. ही जबाबदारी मोठी आहे, परंतु प्रेक्षकांचा विश्वास आणि प्रेम हेच माझं बळ आहे.”

Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025

  Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025 Price Band fixed at ₹105 per equity share of face value ₹1...