Wednesday, August 13, 2025

सोनू निगमच्या सुरेल आवाजात अनुभवायला मिळणार ‘तूच आहे’ बेटर-हाफची लव्हस्टोरी’ मधील हृदयस्पर्शी गाणं प्रदर्शित

 सोनू निगमच्या सुरेल आवाजात अनुभवायला मिळणार ‘तूच आहे’ 

बेटर-हाफची लव्हस्टोरी’ मधील हृदयस्पर्शी गाणं प्रदर्शित 

सुशीलकुमार अग्रवाल आणि अल्ट्रा प्रस्तुत ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ या बहुप्रतिक्षित मराठी चित्रपटातील ‘तूच आहे’ हे भावस्पर्शी गाणे नुकतेच प्रदर्शित झाले असून, प्रेक्षकांकडून या गाण्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांच्या मधुर आणि हृदयाला भिडणाऱ्या आवाजात सादर झालेल्या या गाण्याने अल्पावधीतच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या गीतात प्रेम, विरह आणि भावनांचा अनोखा संगम अनुभवायला मिळतो. गाण्याचे भावपूर्ण बोल गीतकार संजय अमर यांनी लिहिले असून, ते थेट मनाच्या खोलवर जाऊन भिडतात. तर या गाण्याला साजन पटेल आणि अमेय नरे यांचे संगीत लाभले आहे. हे गाणे सुबोध भावेवर चित्रित करण्यात आले असून, त्यांच्या हृदयस्पर्शी अभिनयाने गाण्याची ताकद अधिकच वाढली आहे.

दिग्दर्शक संजय अमर म्हणतात, '' ‘तूच आहे’ हे प्रत्येकाच्या आयुष्यात कधीतरी जाणवलेली वेदना, ओढ आणि एकटेपणाचा भावनिक प्रवास उलगडणारे गाणे आहे. सुबोध भावे यांचा अभिनय आणि सोनू निगम यांचा आवाज ही या गाण्याची खरी बाजू आहे.”

निर्माते रजत अग्रवाल म्हणतात, “या गाण्यात चित्रपटातील एक महत्त्वाचा भावनिक क्षण सादर केला आहे. त्यातही सोनू निगम यांच्यासारख्या दिग्गज गायकाचा सहभाग आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.”

‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ चे लेखन, छायांकन आणि दिग्दर्शन संजय अमर यांनी केले आहे. रजत मीडिया एंटरटेनमेंट निर्मित या चित्रपटात सुबोध भावे, रिंकू राजगुरू, प्रार्थना बेहरे आणि अनिकेत विश्वासराव यांच्या दमदार भूमिका पाहायला मिळतील. विनोद आणि प्रेमाचा अद्वितीय मेळ असलेल्या या सिनेमाचा टिझर आधीच चर्चेत आला होता आणि आता ‘तूच आहे’ गाण्यानेही प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. हा चित्रपट २२ ऑगस्ट २०२५ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

बाप - मुलाच्या धमाल नात्याची झलक 'आवशीचो घो'मध्ये! 'दशावतार'मधील पहिलं गाणं प्रदर्शित

                                   बाप - मुलाच्या धमाल नात्याची झलक 'आवशीचो घो'मध्ये!                                                                          'दशावतार'मधील पहिलं गाणं प्रदर्शित 

सध्या सर्वत्र चर्चेत असलेला आणि प्रेक्षकांच्या प्रचंड उत्सुकतेचा विषय ठरलेला ‘दशावतार’ हा मराठी चित्रपट लवकरच म्हणजेच १२ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. झी स्टुडिओज प्रस्तुत, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊस निर्मित या भव्य चित्रपटात अनेक दिग्गज कलाकारांची मांदियाळी आहे. दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर आणि अभिनय बेर्डे यांचा अप्रतिम अभिनय या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. पोस्टर आणि टीझरने प्रेक्षकांमध्ये आधीच प्रचंड उत्सुकता निर्माण केली असतानाच, आता या चित्रपटातील पहिलं गाणं ‘आवशीचो घो’ नुकतंच प्रदर्शित झालं असून या आगळ्यावेगळ्या गाण्याने कोकणच्या मातीचा गंध सोबत आणला आहे. अनेकांना शिवी वाटणारा हा शब्द खरंतर लाडाने वापरला जाणारा शब्द आहे. मालवणी भाषेत आईला प्रेमाने आवशी आणि नवऱ्याला घो  असं म्हणतात. म्हणूनच आईच्या नवऱ्याला म्हणजेच वडीलांना प्रेमाने ‘आवशीचो घो’ म्हणायची पद्धत आहे. दशावतार चित्रपटातलं हे गाणं सुद्धा बाप आणि मुलाच्या अनोख्या नात्याबद्दल आहे.

दिलीप प्रभावळकर आणि सिद्धार्थ मेनन यांच्यावर चित्रित करण्यात आलेलं हे गाणं, वडील आणि मुलामधील नात्याचं एक अजब रसायन दाखवणारं आहे. हे गाणं वर वर पाहता मिश्किल किंवा गंमतीशीर वाटत असलं तरी ते गाणं बाप - मुलाच्या नात्याचं सारच मांडतं. विशेष म्हणजे यात कधी कधी मुलगा वडिलांची जबाबदारी घेणारा ‘वडील’ बनतो आणि वडील त्याचे ‘मूल‘ होतात. बाप मुलाच्या नात्याचं हळूवारपण उलगडणारं हे गाणं गुरु ठाकूरच्या समृद्ध लेखणीतून उतरलं असून, संगीत दिग्दर्शक ए व्ही प्रफुल्लचंद्र यांनी संगीतबद्ध केलं आहे. तर ओंकारस्वरुप याने ते गायलं आहे. या गीताबद्दल गीतकार गुरु ठाकूर म्हणतात की, ‘’बाप आणि मुलगा यांच्यातील मैत्रीचं नातं मिश्किल आणि खट्याळ अंदाजात सादर करणारं गाणं आजवर कधीच झालं नव्हतं. ‘आवशीचो घो’ या गाण्यामुळे ते लिहिण्याची संधी मला मिळाली. मालवणी बोलीतील शब्दांचा गोडवा, ए. व्ही. यांच्या संगीताची जादू आणि पडद्यावर दिलीपजी आणि सिद्धार्थ यांचा अफलातून परफॉर्मन्स यांनी या गाण्याला वेगळं परिमाण दिलं आहे.’’

चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक सुबोध खानोलकर म्हणतात, '' आवशीचो घो’ हे गाणं वडील-मुलामधील नात्याची वीण अत्यंत लोभसपणे अधोरेखित करतं. हे गाणं प्रत्येकाला आपल्या वडिलांच्या जवळ नेणारं, आणि हसताहसताही प्रत्येकाच्या मनाला भिडणारं असं हे गाणं आहे. वडील मुलाच्या नात्यातील प्रेम, ताण, समज-गैरसमज आणि काळानुसार बदलणारी जबाबदारी हे सगळं या एका गाण्यातून सहजतेने दाखवणं हे मोठं आव्हान होतं. परंतु गुरु ठाकूर, ए व्ही प्रफुल्लचंद्र आणि गायक ओंकार स्वरूप या सगळ्या टीमने ते उत्तमरित्या पार पाडलं. पडद्यावरही ते नातं सिद्धार्थ मेनन आणि दिलीप प्रभावळकर यांच्या केमिस्ट्रीतून कमाल उतरलंय!'' 

झी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणाले, '' 'दशावतार'मध्ये प्रेक्षकांना भावनिक आणि कलात्मक अशा विविध थरांवरचा अनुभव मिळणार आहे. ‘आवशीचो घो’ हे गाणं या प्रवासातील एक भावपूर्ण वळण आहे. संगीत, शब्द आणि अभिनयाचं कमाल सादरीकरण यामुळे हे गाणं सर्व वयोगटांसाठी रिलेटेबल ठरणारं आहे.'' 

निर्माते सुजय हांडे म्हणतात, ''जेव्हा आम्ही हे गाणं प्लॅन केलं, तेव्हा आमचा उद्देश फक्त धमाल गाणं देणं हा नव्हता तर नात्यांची गुंतागुंत आणि सहजता दाखवणं होता. दिलीपजी आणि सिद्धार्थ यांच्यासारख्या अनुभवी कलाकारांनी याला वेगळ्या उंचीवर नेलं आहे.”

'दशावतार'चा टीझर पाहूनच प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. आता ‘आवशीचो घो’ गाण्याने या चित्रपटातील भावनिक बाजूही उलगडायला सुरुवात झाली आहे. धमाल आणि हृदयस्पर्शी भावनांचं हे सुंदर मिश्रण प्रेक्षकांना नक्की भावेल, अशी आशा आहे.

‘अरण्य’मध्ये उलगडणार जंगल, भावना आणि संघर्षाची कहाणी लक्षवेधक मोशन पोस्टर प्रदर्शित

 ‘अरण्य’मध्ये उलगडणार जंगल, भावना आणि संघर्षाची कहाणी 

लक्षवेधक मोशन पोस्टर प्रदर्शित 

एस एस स्टुडिओ निर्मित ‘अरण्य’ या चित्रपटाचे दमदार मोशन पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. निर्माते शरद पाटील आणि अंजली पाटील यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शक अमोल दिगांबर करंबे आहेत. हार्दिक जोशी, वीणा जगताप, हिृतीका पाटील, विजय निकम, सुरेश विश्वकर्मा आणि चेतन चावडा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचा भव्य प्रवास १९ सप्टेंबर २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मोशन पोस्टरमध्ये जंगलाची दाट हिरवाई, धुक्याने व्यापलेले दृश्य आणि त्यात लपलेला गूढपणा अंगावर काटा आणणारा आहे. यातील हार्दिक जोशी चा लूक विशेष लक्ष वेधून घेतो. डोळ्यांमध्ये प्रखर राग आणि निर्धार, चेहरा कपड्याने झाकलेला आणि पार्श्वभूमीला जंगलातील गूढ वातावरण. त्याच्या नजरेतून एक भयंकर संघर्ष आणि दडलेली कहाणी जाणवते.

दिग्दर्शक अमोल दिगांबर करंबे म्हणतात, ‘अरण्य’ ही फक्त जंगलाची कथा नाही, तर ही मानवी अस्तित्व, निसर्गाशी असलेलं आपलं नातं आणि संघर्षाच्या काठावर उभ्या राहिलेल्या माणसाची कहाणी आहे. या अरण्यात फक्त झाडं, पाने किंवा वेली नाहीत, तर येथे श्वास घेणाऱ्या प्रत्येक गोष्टीच्या मागे एक इतिहास आहे. कधी शांत, कधी रक्तरंजित. मला हवं होतं की प्रेक्षकांनी या जंगलाचा गंध, त्यातील ओलसरपणा, आणि त्याच्या प्रत्येक सावलीतील रहस्य अनुभवावं. ‘अरण्य’ प्रेक्षकांना आतून जगायला लावेल.’’

निर्माते शरद पाटील म्हणतात, ‘’आजच्या सिनेमात तंत्रज्ञान, थरार आणि भावना यांचा सुंदर संगम दुर्मीळ झाला आहे. ‘अरण्य’करताना आम्ही ठरवलं होतं की, हा चित्रपट प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर उभा राहावा. तो अनुभवावा. ‘अरण्य’ म्हणजे निसर्गाशी असलेल्या आपल्याच नात्याचं आरशातलं प्रतिबिंब आहे. प्रत्येक फ्रेम, प्रत्येक संवाद आणि प्रत्येक भावनेतून आम्ही एक सत्य सांगत आहोत, जे दडलेलं आहे परंतु दुर्लक्षित नाही. आम्हाला खात्री आहे की, ‘अरण्य’ प्रेक्षकांच्या मनात खोलवर ठसा उमटवेल.’’

लव्हस्टोरी, घोस्ट कॉमेडीचा धमाका 'बेटर-हाफची लव्हस्टोरी'चा भन्नाट ट्रेलर प्रदर्शित

 लव्हस्टोरी, घोस्ट कॉमेडीचा धमाका

'बेटर-हाफची लव्हस्टोरी'चा भन्नाट ट्रेलर प्रदर्शित 

प्रेम, भूत आणि हास्याचा भन्नाट मेळ घालणारा आगामी मराठी चित्रपट ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. या घोस्ट कॉमेडीचा दमदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या उत्सुकतेला अधिकच उधाण आले आहे. सुबोध भावे आणि रिंकू राजगुरू ही हटके जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने मोठ्या पडद्यावर धमाल उडवायला सज्ज झाली आहे. या आधी ‘पालतू फालतू’ या मजेशीर गाण्यामुळे आणि ‘ना कळले कधी तुला’ या भावनिक गीतामुळे चित्रपटाविषयी कुतूहल निर्माण झालं होतंच, परंतु आता आलेल्या ट्रेलरमुळे प्रेक्षकांना या प्रेमकथेच्या गोंधळातल्या धमाल प्रवासाची झलक पाहायला मिळाली आहे. 

सुशीलकुमार अग्रवाल आणि अल्ट्रा प्रस्तुत, रजत मीडिया एंटरटेनमेंट निर्मित या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये एक वेगळी आणि हटके प्रेमकथा उलगडताना दिसते. सुबोध भावे याची ‘बेटर-हाफ’ म्हणजे पत्नी गेल्यानंतर तिचा आत्मा त्याच्याच शरीरात वास करत असल्याचं गोंधळलेलं चित्र ट्रेलरमध्ये पाहायला मिळतं. त्यातून सुटका मिळवण्यासाठी सुरू होतो विनोदी संघर्ष, ज्यात प्रार्थना बेहरे आणि अनिकेत विश्वासराव यांची त्याला साथ मिळते. आता यातून सुबोध भावाची सुटका होते का, याचे उत्तर मात्र प्रेक्षकांना चित्रपट पाहूनच मिळणार आहे. 

दिग्दर्शक संजय अमर या चित्रपटाविषयी सांगतात, “ही घोस्ट कॉमेडी असली तरी ती एका आगळ्यावेगळ्या प्रेमकथेची सांगड घालते. कलाकारांच्या ताकदीमुळे ही संकल्पना पडद्यावर प्रभावीपणे साकारता आली. सुबोध आणि रिंकूची फ्रेश जोडी, प्रार्थना आणि अनिकेतसारखे अनुभवी कलाकार यांचं योगदान अमूल्य आहे.”

चित्रपटाचे निर्माता रजत अग्रवाल म्हणतात, “आजच्या पिढीला नेहमी काहीतरी हटके आणि नाविन्यपूर्ण बघायचं असतं. ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. यामध्ये विनोद, सस्पेन्स, भावना आणि स्टारकास्ट यांचं परिपूर्ण मिश्रण आहे.”

या चित्रपटाचे लेखन, छायांकन आणि दिग्दर्शन संजय अमर यांचेच असून, साजन पटेल आणि अमेय नरे यांनी संगीताची जबाबदारी सांभाळली आहे. सुबोध भावे, रिंकू राजगुरू, प्रार्थना बेहरे आणि अनिकेत विश्वासराव यांच्यासारख्या दमदार कलाकारांच्या अभिनयाने साकारलेला हा सिनेमा येत्या २२ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

प्रिया बापट पहिल्यांदाच झळकणार पोलिसाच्या भूमिकेत 'अंधेरा' या हॉरर जॉनरमध्ये साकारणार दमदार भूमिका!

 प्रिया बापट पहिल्यांदाच झळकणार पोलिसाच्या भूमिकेत  

'अंधेरा' या हॉरर जॉनरमध्ये साकारणार दमदार भूमिका!

मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणारी, अभिनयाच्या विविध छटांमध्ये रसिकांची मनं जिंकणारी प्रिया बापट आता एका नव्या आणि थरारक अविष्कारात दिसणार आहे. अमेझॉन प्राईमवर लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘अंधेरा’ या हॉरर सिरीजमध्ये ती एका महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. नुकताच या सिरीजचा ट्रेलर सोशल मीडियावर झळकला असून, त्याने प्रेक्षकांमध्ये एकाच वेळी भीती आणि उत्सुकता निर्माण केली आहे. या सिरीजमधून प्रियाने हॉरर जॉनरमध्ये पदार्पण केले असून यात ती पहिल्यांदाच पोलिसाची भूमिका साकारत आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांसाठी ही एक आनंदाची बाब आहे. 

या अनुभवाबद्दल प्रिया बापट म्हणते, ''मी पहिल्यांदाच हॉरर जॉनरमध्ये काम करतेय आणि हा अनुभव खरोखरच वेगळा ठरला. खूप नाईट शिफ्ट्समध्ये शूटिंग केलं, परंतु स्क्रिप्ट इतकी इंटरेस्टिंग होती की,  काम करताना काहीच जाणवले नाही. जेव्हा हे स्क्रिप्ट मला मिळालं, तेव्हा वाचून एकच विचार मनात आला, तो म्हणजे सध्या वाचलेल्या स्क्रिप्ट्सपैकी हे सर्वात उत्तम होतं. ही कथा फार वेगवेगळ्या पद्धतीने उलगडते आणि म्हणूनच ती अभिनयाच्या दृष्टीने खूपच आव्हानात्मक ठरली. यात अ‍ॅक्शन सिक्वेन्सेस आहेत, भीतीदायक हॉरर सीन आहेत. त्यामुळे कलाकार म्हणून ही भूमिका करताना एक वेगळीच मजा आली. आतापर्यंत मी राजकारणी, वकील यांसारख्या विविध भूमिका साकारल्या आहेत. मात्र, या सिरीजमध्ये मी एका पूर्णतः वेगळ्या प्रोफेशनमधून प्रेक्षकांसमोर येणार आहे. मराठीत मला जसं प्रेम मिळालं, तसंच प्रेम मला हिंदी प्रोजेक्ट्ससाठीही मिळालं, याचा खूप आनंद आहे. आता हॉरर जॉनरमधून मी प्रेक्षकांचं मन कसं जिंकू शकेन, याचीच उत्सुकता लागली आहे. ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा प्रतिसाद बघायला मी प्रचंड उत्सुक आहे. आशा आहे, प्रेक्षक या भूमिकेलाही तितकंच प्रेम देतील.''

‘अंधेरा’चं ट्रेलर पाहून प्रेक्षकांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. कथानक काय आहे? हे रहस्य नेमकं कुठं घेऊन जाणार आहे? मात्र या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहेत, परंतु तोपर्यंत ‘अंधेरा’ची ही थरारक झलक आणि प्रिया बापटचं हॉरर शैलीतील पदार्पण यामुळे ही सिरीज चर्चेचा विषय ठरली आहे.


US-based Bankai Ventures and HariBol Unite to Create a Transparent, Tech-Driven Ethical Food Ecosystem

          US-based Bankai Ventures and HariBol Unite to Create a                           Transparent, Tech-Driven Ethical Food Ecosystem

In Alignment with ISKCON’s Spiritual and Vedic Values

US-based Bankai Ventures, a global leader in fintech, blockchain, and AI-driven innovation, has announced a strategic partnership with HariBol, India’s foremost cruelty-free food brand inspired by ISKCON. The collaboration aims to build a transparent, technology-powered ecosystem across both dairy and non-dairy segments—blending traditional Vedic values with modern digital infrastructure to redefine how ethical food systems are designed, scaled, and trusted. This partnership represents a fusion of spiritual ethos and cutting-edge technology—centered on ethical sourcing, rural empowerment, animal welfare, and complete supply chain traceability.

Rooted in Ahimsa, Empowered by Technology

HariBol operates in close collaboration with rural farming communities committed to ethical, sustainable practices inspired by the principle of Ahimsa (non-violence). In the dairy sector, this commitment translates into the lifelong protection of cows and bulls, supported by AI- and IoT-enabled health monitoring systems—offered at no cost to farmers.

In the non-dairy segment, HariBol champions traditional, eco-conscious practices such as water-milling of grains and cold-pressing of oils. These methods uphold purity, ecological balance, and traceability—ensuring every product remains uncompromised in quality and ethics.

Technology for Good: Bankai Ventures’ Role

As part of the collaboration, Bankai Ventures will provide its expertise in AI, blockchain, and digital infrastructure to fortify HariBol’s ethical and transparent supply chain. The initiative aims to bring social impact through innovation—empowering farmers, protecting animals, and enabling consumers to trace their food from origin to consumption.

Ms. Ami Brahmbhatt, Co-Founder of Bankai Ventures, remarked: “We believe that innovation reaches its highest purpose when it aligns with empathy. HariBol exemplifies a spiritually conscious food system that uses technology for compassion and care. We’re proud to contribute to a movement where every product—whether dairy or plant-based—embodies transparency, consciousness, and moral responsibility.”

Echoing the spiritual foundation of this partnership, Gauranga Das, member of the governing body commission of ISKCON, reflected on the teachings of His Divine Grace A.C. Bhaktivedanta Swami Prabhupada, Founder-Acharya of ISKCON:

“Srila Prabhupada once said, ‘Milk is nothing but religious principle. It is the miracle food given by the cow, and the cow is the most important animal in human society because she gives milk.’ But he also warned, ‘Nowadays milk is not pure. They are adding so many things - powder, water, even urea - to increase the volume. This is very bad. That milk will not have the effect.’ If this was his concern in the 1960s, one must ask - what is the state of our milk today?”

A Recognized Ethical Brand

Endorsed by the World Economic Forum, HariBol offers a wide range of ethically sourced and traceable products including DNA-verified A2 cow milk and ghee, cold-pressed oils, ready-to-eat meals, and sustainably grown groceries—all sourced from cruelty-free farm systems. Mr. Yachneet Pushkarna, CEO & Director of HariBol, added: “This partnership with Bankai Ventures represents our shared commitment to integrity and impact. By giving our farming partners access to cutting-edge AI tools free of charge and extending transparency across our value chain, we offer consumers an authentic view into every product’s journey—from soil and seed to cow and kitchen.”

Towards a New Ethical Paradigm in Food Systems : Together, Bankai Ventures and HariBol are setting a precedent in India’s food industry—where data is transparent, kindness is measurable, and each product nourishes not just the body but also the planet and soul.


Tuesday, August 12, 2025

जगद्‌गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या गाथेची कथा अभंग तुकाराम’

 जगद्‌गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या गाथेची कथा अभंग तुकाराम’

मराठी जनमानसासाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची ‘ज्ञानेश्वरी’ आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांची ‘अभंग गाथा’ याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. माऊलींच्या ज्ञानेश्वरीने महाराष्ट्राच्या आध्यात्मिक जीवनाचा पाया रचला, आणि जगद्गुरूंच्या अभंगांनी त्याच्यावर कळस चढवला. तुकोबारायांची ही अभंग गाथा तत्कालीन समाजव्यवस्थेने लादलेल्या जलदिव्यातून तावून सुलाखून निघाली आणि आजही आपल्या जीवनाचा भक्कम पाय म्हणून उभी आहे. आजही मराठी लोकांच्या वापरात या गाथेतल्या अभंगाची चरणे, म्हणी, वाक्प्रचार या स्वरूपात आपल्याला ऐकू येतात. एकूणात रोजच्या जगण्यात आज ३५० वर्षांनंतरही संत तुकाराम आपल्या या अजरामर रचनांमधून वास्तव्य करताना आपल्याला दिसतात. जगद्गुरूंचे हे तत्वज्ञान नवीन पिढीपर्यंत नेण्यासाठी प्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर ‘अभंग तुकाराम’ हा नवा कोरा चित्रपट ७ नोव्हेंबरला घेऊन येत आहेत. पॅनोरमा स्टुडिओज ही नामांकित निर्मिती संस्था या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत.

संत तुकारामांची अभंग गाथा तत्कालीन समाजव्यवस्थेतील धर्माच्या ठेकेदारांनी इंद्रायणीत बुडवण्याचा आदेश दिला. तेव्हा संत तुकोबारायांनी हे आव्हान स्वीकारले आणि गाथा नदीत बुडवल्या. त्यांनतर या गाथा कशा तरल्या ? त्यातून काय संदेश दिला गेला ? आणि या सगळ्यात संपूर्ण समाजाने संत तुकारामांवरील भक्तीपोटी आणि प्रेमापोटी काय काय त्याग केला ? याचे थरारक आणि त्याचवेळेस भावस्पर्शी असे चित्रण ‘अभंग तुकाराम’ या चित्रपटात करण्यात आले आहे. या चित्रपटाचे मोशन टिझर पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. त्यात पाण्याच्या तरंगांबरोबर वर जाणारे अभंगांचे कागद दिसतात. त्याबरोबर आपल्याला पाठमोरे संत तुकोबाराय दिसत आहेत. ज्यांनी आकाशाकडे हात पसरून साद घातलेली दिसत आहे. त्यांच्या समोरून उगवणारा सूर्य हा आशेचे किरण पसरवीत आहे. त्याचवेळी "जेथे जातो तेथे तू माझा सांगाती" हि तुकोबारायांची अमर रचना अत्यन्त सुमधुर स्वरात समूहाकडून ऐकू येत आहे. त्या तालावर ‘अभंग तुकाराम’ हे चित्रपटाचे नाव भव्य स्वरूपात आकाशात आकाराला येऊन संत तुकारामांचे आणि त्यांच्या रचनांचे अभंगत्व अधोरेखित करताना दिसत आहे. 

अत्यंत सुंदर अशा तांत्रिक सफाईने सादर केलेले चित्रपटाचे हे शीर्षक रसिकांच्या कुतूहलाचा आणि भावपूर्ण आतुरतेचा विषय बनले आहे. या चित्रपटाची कथा आणि संवाद प्रसिद्ध लेखक योगेश सोमण यांचे असून, ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटातून आपला वारकरी संप्रदायाचा अभ्यास सिद्ध केलेले दिग्पाल लांजेकर यांनी पटकथा आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. वारकरी संगीत हा चित्रपटाचा आत्मा आहे. अभंग गाथा हा विषय असल्याने तब्बल १० अभंगांचा समावेश या चित्रपटात करण्यात आलेला आहे. ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटाचे अप्रतिम संगीत निर्माण करणारे प्रसिद्ध गायक संगीतकार अवधूत गांधी यांनी या चित्रपटाच्या संगीताची धुरा सांभाळली आहे.

Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025

  Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025 Price Band fixed at ₹105 per equity share of face value ₹1...