Friday, November 28, 2025

आशा’चे प्रेरणादायी गाणं प्रेक्षकांच्या भेटीला संघर्ष आणि जिद्दीची गर्जना करणारे गीत प्रदर्शित

आशा’चे प्रेरणादायी गाणं प्रेक्षकांच्या भेटीलासंघर्ष आणि जिद्दीची गर्जना करणारे गीत प्रदर्शित 

चालत रहा पुढं... चालत रहा पुढं... अशी अस्मितेने भरलेली हाक देत ‘आशा’ चित्रपटाचे प्रेरणादायी गाणं नुकतेच प्रदर्शित झाले असून ते प्रेक्षकांच्या मनाला भिडताना दिसत आहे. गीतकार वलय मुळगुंद यांनी लिहिलेल्या शब्दांना संगीतकार आशिष झा यांनी प्रभावी संगीत दिले असून गायिका प्राची केळकर यांच्या दमदार आवाजाने हे गाणे अधिकच सशक्त झाले आहे. या गाण्यात संघर्षाची ठिणगी, आशेची ज्योत आणि प्रत्येक पावलागणिक उलगडणाऱ्या प्रकाशाची नवी चाहूल जाणवते. मनाला उभारी देणारे हे ॲंथम साँग केवळ ‘आशा’ सेविकेचे नसून त्या प्रत्येक स्त्रीचे आहे, जिचा अंतरंगात दडलेल्या उजेडावर विश्वास आहे. 

या गाण्याबद्दल दिग्दर्शक दिपक पाटील म्हणतात, '' ‘आशा’मधील हे गाणं म्हणजे प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे. ही केवळ आशा सेविकांची गोष्ट नाही, तर कुटुंबासाठी झगडणाऱ्या, स्वप्नांसाठी लढणाऱ्या आणि कोणत्याही संकटात न डगमगणाऱ्या प्रत्येक बाईची प्रेरक धडाडी आहे. या गाण्यातून आम्ही तिच्या ताकदीला आणि तिच्या अविरत प्रवासाला सलाम केला आहे.”

‘आशा’मध्ये महिलांची झगडणारी दुनिया आणि समाजाप्रती असलेली त्यांची अमर्याद जबाबदारी अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत रिंकू राजगुरू, सायंकित कामत, उषा नाईक, शुभांगी भुजबळ, सुहास शिरसाट, दिशा दानडे, दिलीप घारे आणि हर्षा गुप्ते यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 

दिपक पाटील दिग्दर्शित ‘आशा’चे कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, निलेश कुवर, दैवता पाटील आणि दिपक पाटील निर्माते आहेत. तर मुरलीधर छतवानी आणि रवींद्र औटी सहनिर्माते आहेत. पॅनोरमा स्टुडिओजच्या माध्यमातून सर्वत्र प्रदर्शित होणारा हा चित्रपट येत्या १९ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

एक्वस लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री बुधवार 3 डिसेंबर 2025 पासून होणार सुरू

एक्वस लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री बुधवार 3 डिसेंबर 2025 पासून होणार सुरू

प्रति इक्विटी शेअर 118 रुपये ते 124 रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित.   


इक्विटी शेअर्सच्या दर्शनी मूल्याच्या (प्रती शेअर 10 रु.) 11.80 पट फ्लोअर किंमत आणि 12.40 पट कॅप किंमत 

बोली/ऑफर बुधवार 3 डिसेंबर 2025 रोजी खुली होईल आणि शुक्रवार, 5 डिसेंबर 2025 रोजी बंद होईल (“Bid Dates”). 

प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक मंगळवार 02 डिसेंबर 2025 आहे. 

बोली किमान 120 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 120 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल (“No. of Bids”)

रेड हेअरिंग प्रोस्पेक्टस (“RHP”) लिंक: https://live.jmfl.com/od/UploadedFiles/D0456858-180C-4361-83F0-946D0B04EDA6.pdf

राष्ट्रीय, 28 नोव्हेंबर 2025: एक्वस लिमिटेड (“कंपनी”)ने इक्विटी शेअरसाठी बुधवार 3 डिसेंबर 2025 पासून प्राथमिक समभाग विक्री बोली/ऑफर खुली करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे.

प्रति इक्विटी शेअर 118 रुपये ते 124 रुपये पर्यंतचा किंमतपट्टा (“Price Band”) निश्चित करण्यात आला आहे. बोली किमान 120 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 120 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल (“Minimum Bid Lot”). 

प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअर्सच्या प्राथमिक समभाग विक्रीमध्ये (“Total Offer Size”) 67०० दशलक्ष रु. (670 कोटी रु.) पर्यंतचे फ्रेश इश्यू आणि ऑफर फॉर सेल अंतर्गत प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेले एकूण 2,03,07,393 पर्यंतचे इक्विटी शेअर्स समाविष्ट आहेत. 

प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक मंगळवार, 2 डिसेंबर 2025 आहे. बोली/ऑफर बुधवार 3 डिसेंबर 2025 रोजी खुली होईल आणि शुक्रवार, 5 डिसेंबर 2025 रोजी बंद होईल. कंपनीचे रेड हेअरिंग प्रोस्पेक्टस द्वारे हे इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड (“BSE”) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE” आणि BSE बरोबर एकत्रितपणे “Stock Exchanges”) वर सूचीबद्ध करण्याचे प्रस्तावित आहे. ऑफरच्या उद्दिष्टासाठी NSE हे निर्देशित स्टॉक एक्सचेंज राहील. जे एम फायनान्शियल लिमिटेड, आयआयएफएल कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड आणि कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड हे बुक रनिंग लीड मॅनेजर्स (“BRLMs”) आहेत.

येथे वापरल्या गेलेल्या परंतु परिभाषित न केलेल्या सर्व कॅपिटलाइज्ड शब्दांचा अर्थ आरएचपी मध्ये नमूद केल्यासारखाच असेल. ही ऑफर SCRR, च्या नियम 19(2)(b) आणि SEBI ICDR नियम 31 च्या अनुषंगाने केली जात आहे. ही ऑफर बुक बिल्डिंग प्रक्रियेच्या माध्यमातून केली जात असून, SEBI ICDR सुधारित नियम 6(2) च्या नियमनात आहे. त्या अंतर्गत SEBI ICDR नियमांनुसार, ऑफरच्या किमान 75% भाग पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (“QIBs” आणि तो हिस्सा “QIB Portion”) प्रमाणबद्ध वाटपासाठी उपलब्ध असेल. तथापि आपली कंपनी, BRLMs सोबत सल्लामसलत करून, SEBI ICDR नियमांनुसार विवेकाधीन आधारावर QIB Portion पैकी 60% पर्यंत हिस्सा प्रमुख गुंतवणूकदारांसाठी (“Anchor Investor Portion”) वाटप करू शकते. त्यापैकी किमान एक तृतीयांश हिस्सा देशांतर्गत स्थानिक म्युच्युअल फंडांसाठी उपलब्ध राहील. त्यासाठी स्थानिक म्युच्युअल फंडांकडून प्रमुख गुंतवणूकदार वाटप किंमतीच्या बरोबरीने किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीसाठी वैध बोली प्राप्त व्हायला लागतील. जर प्रमुख गुंतवणूकदार भागामध्ये कमी सदस्यता किंवा वाटप न झाल्यास, उर्वरित इक्विटी शेअर्स (प्रमुख गुंतवणूकदार भाग वगळून) नेट QIB Portion मध्ये (“Net QIB Portion”) समाविष्ट केले जातील.

ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास QIB च्या एकूण हिश्शापैकी 5 % फक्त म्युच्युअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध असतील आणि QIBचा उर्वरित हिस्सा म्युच्युअल फंडांसह अन्य सर्व QIB बोलीधारकांसाठी (प्रमुख गुंतवणुकदार वगळून) उपलब्ध करून दिला जाईल. जर नेट ऑफरच्या किमान 75% चे वाटप QIBs ला करता आले नाही, तर संपूर्ण अर्ज रक्कम तत्काळ परत केली जाईल. पुढे, नेट ऑफर पैकी 15% पेक्षा जास्त नसलेला हिस्सा बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (“Non-Institutional Investors” किंवा “NIIs”) (म्हणजे “Non-Institutional Portion”) उपलब्ध असेल. बिगर संस्थात्मक भागापैकी एक तृतीयांश भाग 0.20 दशलक्ष रु. पेक्षा जास्त आणि 1.00 दशलक्ष रु. पर्यंत अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल आणि दोन तृतीयांश भाग 1.00 दशलक्ष रु.पेक्षा अधिक अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल. अर्थात त्यासाठी अशा कोणत्याही उप-श्रेणीतील सबस्क्राईब नसलेला भाग बिगर-संस्थात्मक बोली लावणाऱ्या दुसऱ्या उप-श्रेणीतील अर्जदारांना सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार वाटप केला जाऊ शकतो. ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास हे लागू होईल.

प्रत्येक बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारासाठीचे वाटप हे बिगर संस्थात्मक भागामधील इक्विटी शेअर्सच्या उपलब्धतेच्या अधीन राहून, किमान अर्ज आकारापेक्षा कमी असणार नाही आणि उर्वरित उपलब्ध इक्विटी शेअर्स असल्यास SEBI ICDR नियमनाच्या शेड्युल XIII मध्ये नमूद केलेल्या अटींनुसार प्रमाणानुसार वाटप केले जातील. सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार Retail Individual Bidders (RIBs) साठी निव्वळ ऑफरच्या (“Net Offer”) 10% पेक्षा अधिक भाग वाटपासाठी उपलब्ध राहणार नाही. ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास हे लागू होईल. तसेच, पात्र कर्मचाऱ्यांकडून कर्मचारी आरक्षण भागांतर्गत केलेल्या अर्जांवर आणि त्यांनी ऑफर प्राईस (लागू असल्यास कर्मचारी सवलत) वर किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीवर वैध बोली असतील तर त्यांना इक्विटी शेअर्सचे वाटप प्रमाणानुसार करण्यात येईल.

प्रमुख गुंतवणूकदारांखेरीज (Anchor Investors) सर्व संभाव्य गुंतवणूकदारांनी आपापल्या ASBA खात्यांचा तपशील आणि यूपीआय अर्जदारांसाठी यूपीआय आयडीसह जाहीर करून अर्जाची विहित रक्कम अॅप्लीकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक अमाऊंट (“ASBA”) प्रक्रियेद्वारे करून ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार योजनेत सहभागी करून घेण्यासाठी सर्व बोली रकमा या सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँक्स एससीएसबीतर्फे किंवा यूपीआय यंत्रणे अंतर्गत स्पॉन्सर बँकेतर्फे ब्लॉक करून ठेवण्यात येतील. प्रमुख गुंतवणूकदारांना त्यांच्यासाठीच्या हिश्शात “ASBA” प्रक्रीयेनुसार सहभागी होण्याची परवानगी नाही. 



Tuesday, November 25, 2025

मैत्री, वडिल -मुलगी नात्याची अनोखी सांगड घालणारं ‘शंकर जयकिशन’ लवकरच रंगभूमीवर!

 मैत्री, वडिल -मुलगी नात्याची अनोखी सांगड घालणारं ‘शंकर जयकिशन’ लवकरच रंगभूमीवर!

भरत जाधव - महेश मांजरेकर पहिल्यांदाच एकत्र झळकणार 

मराठी रंगभूमीवर एक विनोदी, हृदयस्पर्शी आणि नातेसंबंधांचा वेध घेणारं नाटक ‘शंकर-जयकिशन’ लवकरच नाट्यरसिकांच्या भेटीला येत आहे. वडिल- मुलीचे गुंतागुंतीचे नाते, वर्षानुवर्षे दडलेली कटुता आणि अचानक जीवनात घडलेल्या अनपेक्षित व्यक्तीच्या आगमनाने बदलणारे समीकरण अशी या नाटकाची कथा आहे. कथानकात वडिल मुलीच्या नात्यात कोणी तिसरा येतो. त्याच्या येण्यामागंच नेमकं कारण काय ? की त्याच्या आयुष्यात काही गूढ रहस्य दडलंय? याचं उत्तर नाट्यरसिकांना नाटक पाहूनच मिळणार आहे. 

 हे मजेदार, हटके आणि भावनिक नाटक विशेष ठरणार आहे, कारण पहिल्यांदाच भरत जाधव आणि महेश मांजरेकर हे दोन प्रभावी कलाकार रंगभूमीवर एकत्र दिसणार आहेत. त्यातही महेश मांजरेकर तब्बल २९ वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन करत आहेत. त्यामुळे महेश मांजरेकर यांच्यासाठीही आणि प्रेक्षकांसाठीही हा एक खास क्षण असणार आहे. 

दिग्दर्शक सुरज पारसनीस म्हणतात, ‘’हे नाटक फक्त हसवणारं नाही तर नात्यांमधल्या अदृश्य धाग्यांना भिडणारं आहे. मैत्री आणि पित्याच्या नात्याची वेगळी बाजू यातून प्रेक्षकांसमोर येईल.”

निर्माते, अभिनेते भारत जाधव म्हणतात, ‘’महेशजी आणि मी अनेक वर्षे एकाच इंडस्ट्रीमध्ये काम करत आहोत, त्यामुळे आमची चांगली मैत्री आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या अनेक चित्रपटांमध्येही मी भूमिका केल्या आहेत. एकमेकांना कामामध्ये काय अपेक्षित असतं, हे आम्ही उत्तम जाणतो. त्यामुळेच त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव हा नेहमीच अनोखा असतो आणि आता तर आम्ही एकत्र रंगमंचावर झळकणार आहोत. त्यामुळे आम्हाला एकत्र पाहाण्यासाठी प्रेक्षक जितके आतुर आहेत. तितकीच उत्सुकता आम्हालाही लागून राहिली आहे. मला खात्री आहे, आमची केमिस्ट्री रंगभूमीवर वेगळी जादू निर्माण करेल.”

तर महेश मांजरेकर आपल्या या प्रवासाबद्दल म्हणतात, ‘’ २९ वर्षांनंतर रंगभूमीवर परत येणं ही माझ्यासाठी भावनिक गोष्ट आहे. नाटक हे माझ्यासाठी नेहमीच अग्रस्थानी आहे. मात्र चित्रपटांमुळे मला नाटकाला वेळ देता आला नाही. परंतु आता जितका जमेल तेवढा वेळ मी रंगभूमीसाठी देणार आहे. ‘शंकर जयकिशन’चं कथानक वाचताना मला जाणवलं, हे नाटक रंगभूमीवर आलंच पाहिजे. भरतसोबत मी अनेकदा काम केलं आहे, मी त्यांच्या अभिनयाचा आदर करतो. तो प्रामाणिक, संवेदनशील आणि ऊर्जा असलेला कलाकार आहे. आता रंगभूमीवर आम्ही एकत्र येतोय. एकमेकांच्या अनुभवांची देवाणघेवाण रंगमंचावर एक वेगळाच रंग उमटवेल, याची मला खात्री आहे.”

भरत जाधव एण्टरटेन्मेंट निर्मित सुरज पारसनीस दिग्दर्शित या नाटकाचे लेखन विराजस कुलकर्णी याने केले आहे. क्षितिज पटवर्धन यांचे गीत लाभलेल्या या नाटकात शिवानी रांगोळे, भरत जाधव आणि महेश मांजरेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. विनोद, भावना आणि नात्यांचे सुंदर मिश्रण असलेल्या ‘शंकर-जयकिशन’ या नाटकाचा शुभारंभ १९ डिसेंबर रोजी विलेपार्ले येथील दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथे होणार आहे.



चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’* *नाटकाला रसिक प्रेक्षकांची दाद*

 चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’* *नाटकाला रसिक प्रेक्षकांची दाद

वन्समोअरची दाद अन कलाकार गोंधळले

रविवार २३ नोव्हेंबर रात्री ८.३०वा. गडकरी रंगायतन,  ठाणे येथील चिरंजीव परफेक्ट बिघडलाय नाटकाच्या प्रयोगाला रसिक प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. नाटकातील एका प्रसंगामध्ये कलाकार श्रेयस जोशी आणि वैभव रंधवे यांच्या जुगलबंदीला प्रेक्षकांनी वन्समोअर अशी दाद दिली. दोघेही व्यावसायिक रंगभूमीवर नवीन असल्यामुळे त्यांना अश्या प्रकारची दाद मिळाल्यावर ते गोंधळून गेले त्यांना काय करावे ते क्षणभर कळले नाही,  त्यांनी नाटक तसेच पुढे सुरू ठेवले.

रसिक प्रेक्षक नाटक संपल्यावर आत मेकरूम मध्ये त्यांना भेटायला आले. ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ नाटकाच्या प्रयोगावर ते सगळेच खूप खूष होते आणि त्यांनी त्या दोघांना विनंती केली की, ‘या पुढील प्रयोगांमध्ये जर तुम्हाला तुमच्या गाण्यांना प्रेक्षकांनी वन्समोअर दिला तर तो तुम्ही नक्की घ्या’.

तुम्ही तिघेही अतिशय छान कामं करत आहात.  आम्हा प्रेक्षकांना तुमची ही फ्रेश लूक मधली कॉमेडी बघून खूप मज्जा आली. आम्ही हे नाटक खूप एन्जॉय केलं. त्यांनी नाटकातील कलाकारांना पुढील प्रयोगांना आणि त्यांच्या यशस्वी वाटचालीला शुभेच्छा ही दिल्या आणि नाटकातील कलाकारांबरोबर फोटो ही काढले.


Apollo rolls out its third facility in Maharashtra with a 400-bed quaternary care facility in Pune

 Apollo rolls out its third facility in Maharashtra with a 400-bed quaternary care facility in Pune

Apollo Hospitals, Asia’s pioneering integrated healthcare services provider, today inaugurated its newest facility in Swargate, Pune. The hospital will initially open with 250 beds as part of a phased launch, with plans to expand capacity further to meet growing healthcare needs across the region. 

“At Apollo, our mission is to transform healthcare not just in India, but for the world. Inspired by the ‘Heal in India – Heal by India’ vision, we are creating a global destination where clinical excellence meets compassion and affordability. We want health and happiness in every home of Pune and India,” said Dr Prathap C Reddy, Chairman, Apollo Hospitals Group.

Apollo Hospitals’ expansion in Pune reflects a strategic response to the city’s evolving healthcare demands, integrating advanced technology with a deep commitment to serving diverse communities and stakeholders. 

“At Apollo Hospitals Pune, we carry forward a legacy of over four decades built on clinical excellence, compassionate care, and relentless innovation. This new facility is a testament to our enduring commitment to advancing healthcare accessibility and quality honouring the trust placed in us by generations of patients,” said Dr. Preetha Reddy, Executive Vice Chairperson, Apollo Hospitals. 


Dr. Suneeta Reddy, Managing Director, Apollo Hospitals Enterprise Ltd. added, "Our Pune hospital is a strategic addition to Apollo’s growing national footprint, a significant entry into one of India’s most rapidly growing healthcare markets. We are excited to expand access to high-end quaternary care, collaborate with Pune’s formidable clinical talent and bring our integrated health eco-system to the city and the region, to build a strong future-ready network of care for Maharashtra.“

"Our Pune facility has been built on a foundation of safety science, evidence-based practice, and a culture that has patients at the centre of every decision. As we grow, our commitment remains unchanged in delivering patient care through consistent quality and transparent outcomes that is as compassionate and clinically rigorous." Dr. Madhu Sasidhar, Group CEO & President, Apollo Hospitals.

Recognizing Pune as a vibrant hub of IT innovation and comprehensive city-building, Apollo Hospitals is proud to be part of this dynamic ecosystem. “Our new facility in the city of Pune reflects Apollo’s commitment to not only medical excellence but also to supporting the growth and wellbeing of a city that is shaping India’s future as a center of technology and innovation,” said Dr. Manisha Karmarkar, CEO, Apollo Hospitals Pune. 

Apollo Hospitals Pune represents a deliberate expansion of high-acuity, technology-enabled care in Western India. The campus brings together advanced surgical robotics, precision oncology, comprehensive critical care, and specialist programs in cardiac sciences, transplants, orthopaedics, and mother-and-child health, all built on a unified digital backbone. The design is meant to shift the region’s care capacity upward: modular OTs standardize quality, integrated ICUs and neonatal units close critical-care gaps, and IoT-driven monitoring with telehealth connectivity strengthens continuity across the patient journey. With a multidisciplinary clinical team and evidence-led protocols, the hospital positions Apollo to deliver consistent outcomes at scale, deepen its quaternary footprint, and serve as a regional reference center for complex care.



Friday, November 21, 2025

सलमान खानचा संदेश: ‘एमपॉवर मुंबई सायक्लोथॉन २०२५’

                 सलमान खानचा संदेश:                                       mएमपॉवर मुंबई सायक्लोथॉन २०२५

 Ride for Your Mind, Ride for Your City, Ride for Change.

‘राइड टू एमपॉवर मुंबई सायक्लोथॉन २०२५’ हा उपक्रम यावर्षी मोठ्या प्रमाणात आयोजित केला जात असून, मुंबईकरांना फिटनेस, मानसिक आरोग्य आणि पर्यावरण या तिन्ही विषयांबद्दल जागरूक करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या निमित्ताने सलमान खान यांनी खास संदेश देत मुंबईकरांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

सलमान खान म्हणाले 

Mumbai, gear up! Join us for the Ride to Mpower Mumbai Cyclothon on 30th November at MMRDA Ground, BKC Bandra. Ride for purpose and better mental health and fitness, and be part of the movement for a greener, healthier city. Join a Ride to Mpower Mumbai Cyclothon - for every reel turns a change.

हा उपक्रम *लोहा फाउंडेशन तर्फे,* *फिट इंडिया मूव्हमेंट* आणि *क्रीडा प्राधिकरण भारत* (एस.ए.आय.) यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे. यामागील मुख्य हेतू - मानसिक आरोग्याविषयी जागरूकता वाढवणे आणि “शारीरिक तंदुरुस्तीइतकेच मानसिक आरोग्य महत्त्वाचे” हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवणे. मानसिक आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेले एमपॉवर (आदित्य बिरला एज्युकेशन ट्रस्ट) या उपक्रमासोबत कार्यरत आहे.

रेस डायरेक्टर आणि मुख्य सल्लागार कृष्ण प्रकाश (आय.पी.एस., ए.डी.जी. – फोर्स वन) म्हणाले, “सायकलिंग म्हणजे केवळ स्पर्धा नव्हे; ती शिस्त, सहनशक्ती आणि एकतेची भावना आहे. या सायक्लोथॉनमुळे मानसिक आरोग्याचा महत्त्वपूर्ण संदेश लोकांपर्यंत पोहोचतो.”

सायक्लोथॉनमध्ये विविध अंतरांचे चार पर्याय ठेवण्यात आले आहेत -

१० किमी, २५ किमी, ५० किमी आणि १०० किमी. सर्व वयोगटातील लोकांसाठी हे उपक्रम खुले आहेत. सहभागींना सायक्लिंग जर्सी, मेडल, गुडीज, वैयक्तिक फोटो, ई-टायमिंग प्रमाणपत्र, तसेच वैद्यकीय आणि हायड्रेशन सुविधा कार्यक्रमाच्या संपूर्ण मार्गावर मिळणार आहेत.

कार्यक्रमात पुढील आकर्षक झोन्स देखील असतील -

मानसिक आरोग्य जागरूकता विभाग, झुंबा सेशन्स, लाइव्ह संगीत, हेल्दी नाश्ता, तसेच विशेष ‘चॅरिटी बीआयबी’ पर्याय, ज्यातून मानसिक आरोग्य सेवांना थेट मदत होईल.

 *कार्यक्रमाचा तपशील*:

*स्थळ* : एम.एम.आर.डी.ए. ग्राउंड, बी.के.सी., मुंबई

*दिनांक* : ३० नोव्हेंबर २०२५

*वेळ* : पहाटे ४.०० वाजल्यापासून

Thursday, November 20, 2025

१९ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'आशा'

 १९ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'आशा' 

''बाई अडलीये… म्हणूनच ती नडलीये'' अशा प्रभावी टॅगलाईनसह येणाऱ्या ‘आशा’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, चित्रपट प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. येत्या १९ डिसेंबरला ‘आशा’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

प्रदर्शनाआधीच या चित्रपटाने आपली ताकद सिद्ध केली आहे. ६१व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात तब्बल चार पुरस्कार मिळवत ‘आशा’ने समीक्षकांची दाद मिळवली आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.

‘आशा’मध्ये महिलांची झगडणारी दुनिया, त्यांचा आत्मविश्वास आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी अतिशय भावस्पर्शी पद्धतीने मांडली आहे. या कथानकाच्या केंद्रस्थानी आहे आशा सेविका आणि ही भूमिका साकारत आहे रिंकू राजगुरू. या व्यक्तिरिक्त या चित्रपटात सायंकित कामत, उषा नाईक, शुभांगी भुजबळ, सुहास शिरसाट, दिशा दानडे, दिलीप घारे आणि हर्षा गुप्ते यांसारखे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये झळकणार आहेत.

रिंकूने साकारलेली 'आशा' ही फक्त आरोग्य यंत्रणेतील एक कर्मचारी नसून प्रत्येक महिला, प्रत्येक कुटुंबासाठी मार्गदर्शक, आधार आणि निर्भय आवाज आहे. तिच्या डोळ्यांतून दिसणारा संघर्ष, तिच्या पावलांतून जाणवणारी जबाबदारी आणि संकटांचा सामना करताना न हरता उभी राहणारी ताकद आहे. या सर्वांमुळे ही भूमिका चित्रपटाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.

दिग्दर्शक दिपक पाटील म्हणतात, '' ‘आशा’ हा चित्रपट फक्त आशा आरोग्य सेविकांचा नाहीये तर घर सांभाळून, घरासाठी घराबाहेर पडणाऱ्या प्रत्येक बाईचा आहे. तिच्या स्वप्नांचा, तिच्या जिद्दीचा आहे. सतत नवनवीन विषयांना उचलून धरणाऱ्या मराठी प्रेक्षकांना ही वेगळ्या वाटेवरची वेगळी आणि अनोखी गोष्ट निश्चितच आवडेल, अशी खात्री आहे.’’

दिपक पाटील दिग्दर्शित ‘आशा’चे कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, निलेश कुवर, दैवता पाटील आणि दिपक पाटील निर्माते आहेत. तर मुरलीधर चटवानी आणि रवींद्र अवटी सहनिर्माते आहेत. पॅनोरमा स्टुडिओजच्या माध्यमातून सर्वत्र प्रदर्शित होणारा हा चित्रपट नाविन्यपूर्ण कथा घेऊन येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना कधीही न पाहिलेल्या दुनियेचं दर्शन घडवणारं आहे.

India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026

  India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026 IIJS Bharat – Signature 2026 to expected to ge...