Thursday, March 12, 2026

सखे गं साजणी’ चित्रपटाचे शीर्षक गीत पुण्यात फ्लॅश मॉबमधून प्रदर्शित; मैत्री आणि प्रवासाचा रंगतदार उत्सव

 *‘सखे गं साजणी’ चित्रपटाचे शीर्षक गीत पुण्यात फ्लॅश मॉबमधून प्रदर्शित; मैत्री आणि प्रवासाचा रंगतदार उत्सव* 

मराठी चित्रपट ‘सखे गं साजणी’ ३ एप्रिल २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, चित्रपटाचे शीर्षक गीत नुकतेच प्रदर्शित झाले आहे. विशेष म्हणजे या गाण्याचे अनोख्या पद्धतीने पुण्यातील एलप्रो मॉलमध्ये फ्लॅश मॉबच्या माध्यमातून प्रत्यक्ष प्रदर्शित करण्यात आले. या वेळी उपस्थित असलेल्या चाहत्यांनीही उत्साहाने या सादरीकरणात सहभागी होत वातावरण अधिक रंगतदार केले.

या गाण्यात प्रार्थना बेहरे, पूजा सावंत आणि अभिजीत खांडकेकर यांची धमाल मैत्री आणि त्यांच्या प्रवासातील मजेशीर क्षणांची झलक पाहायला मिळते. सुंदर दृश्ये, नृत्य आणि उत्साही वातावरणामुळे हे गाणे चित्रपटातील मैत्रीचा आनंद अधिक खुलवते.




हे गाणे लोकप्रिय गायक अभिजीत सावंत यांनी गायले असून, संगीत विजय भाटे यांनी दिले आहे. या गाण्याचे शब्द लखन चौधरी यांनी लिहिले असून, रॅपचे शब्द आणि सादरीकरण रोहन तुपे यांनी केले आहे. गाण्याचे संगीत संयोजन आणि निर्मितीही रोहन तुपे यांनी केली आहे.






गाण्यातील शहनाई आणि क्लॅरिनेटचे सूर दुर्गेश भोसले यांनी साकारले असून, कोरस आणि पार्श्वगायन श्वेता ठाकूर, वैभवी पंचागणे आणि मानसी जगताप यांनी केले आहे. अतिरिक्त गायन ऋषभ साठे यांचे आहे. शहनाई आणि कोरसचे ध्वनिमुद्रण आलोप स्टुडिओ येथे कौशल व्हीजी यांनी केले असून, मुख्य गायनाचे ध्वनिमुद्रण एएमव्ही स्टुडिओ येथे हर्ष भोईर यांनी केले आहे. ध्वनिमुद्रण सहाय्यक म्हणून यश जोशी यांनी काम पाहिले आहे.





उत्साही संगीत, प्रवासाची मस्ती आणि कलाकारांची ऊर्जा यामुळे हे गाणे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असून, ‘सखे गं साजणी’ या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढवत आहे.

Iraq Oil Tanker Attack: Indian Embassy Saves 15 Indian Crew Members

 *Iraq Oil Tanker Attack: Indian Embassy Saves 15 Indian Crew Members*

Mumbai. The Indian Embassy in Iraq successfully rescued 15 Indian crew members after an attack on an oil tanker near the Basra coast on 11 March. The embassy is in constant contact with its citizens and the local administration, and the rescued Indians have been moved to a safe location.

The situation in West Asia remains fragile due to the ongoing conflict involving Iran, Israel, and the United States. Amid these tensions, the crude oil tanker “Seaface Vishnu”, flying the flag of the Marshall Islands and reportedly owned by a U.S. company, was attacked near Basra in Iraq. According to media reports, the attack was carried out by an Iranian suicide boat. Unfortunately, one Indian crew member lost his life in the incident.

Due to the heightened tensions in the region, officials at the Indian Embassy in Baghdad were already on alert and closely monitoring developments in the area. As soon as the incident was reported, the embassy immediately arranged for the remaining 15 Indian crew members to be moved to a safe location.

In a post on the social media platform X, the Indian Embassy said, “On March 11, 2026, a US-owned crude oil tanker Safesea Vishnu, sailing under the Marshall Islands flag, was attacked near Basra, Iraq, in which one Indian crew member unfortunately lost his life. The remaining 15 Indian crew have since been evacuated to a safe place. Embassy of India Baghdad is in regular contact with Iraqi authorities and rescued Indian sailors and is offering all possible assistance. Embassy extends its deepest condolences to the family members of the deceased crew member.”

Meanwhile, India’s Directorate General of Shipping (DGS) has, as a precautionary measure, declared the Persian Gulf, the Strait of Hormuz, and the Gulf of Oman as high-risk areas. As part of security protocols, all Indian-flagged vessels have been instructed to maintain round-the-clock surveillance, increase position reporting, and test their Ship Security Alert Systems.

In a separate statement, Ministry of External Affairs spokesperson Randhir Jaiswal said, “Nearly 10 million Indians live across GCC countries. The welfare of our diaspora is our highest priority. The Prime Minister has spoken with leaders of several countries in the region, including the UAE, Qatar, Saudi Arabia, Oman, Bahrain, Jordan, Kuwait, and Israel. The External Affairs Minister is also in regular contact with his counterparts in these countries as well as Iran.”

सांस्कृतिक कार्यमंत्री माननीय अॅड. आशिष शेलार यांच्या हस्ते ‘खंजिरीचे बोल’ चित्रपटाचा मुहूर्त संपन्न; चित्रपटाचे शूटिंग कोल्हापूर येथे होणार

 *सांस्कृतिक कार्यमंत्री माननीय अॅड. आशिष शेलार यांच्या हस्ते ‘खंजिरीचे बोल’ चित्रपटाचा मुहूर्त संपन्न; चित्रपटाचे शूटिंग कोल्हापूर येथे होणार* 

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग तसेच महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ (Film City) यांच्या अंतर्गत साकारण्यात येत असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनावर आधारित पहिल्या फीचर फिल्म ‘खंजिरीचे बोल’ या मराठी चित्रपटाचा मुहूर्त क्लॅप आज मुंबई येथे उत्साहात संपन्न झाला. या चित्रपटाचा मुहूर्त सांस्कृतिक कार्यमंत्री माननीय अॅड. आशिष शेलार यांच्या हस्ते पार पडताच चित्रपटाच्या शूटिंगलाही अधिकृत सुरुवात झाली. या चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच कोल्हापूर येथे सुरू होणार आहे.




एकेकाळी समाज प्रबोधन, ग्रामविकास, राष्ट्रभक्ती आणि भक्तीचा संदेश देण्यासाठी कीर्तन हे प्रभावी माध्यम मानले जात होते. संतांच्या कीर्तनातून समाजाला सकारात्मक दिशा मिळत असे. मात्र आधुनिक काळात ही परंपरा हळूहळू मागे पडताना दिसत आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारधारा, कार्यपद्धती आणि समाजासाठी केलेले कार्य व्यापक स्तरावर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा आणि समाजप्रबोधनाची परंपरा महाराष्ट्रासह देशभरातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या चित्रपटाच्या माध्यमातून केला जाणार आहे.

या चित्रपटात लोकप्रिय मराठी अभिनेता प्रसाद ओक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची भूमिका साकारताना दिसणार आहेत.

या चित्रपटाचे दिग्दर्शन अनंत महादेवन करत असून लेखन श्रीकांत बोजेवार यांनी केले आहे. चित्रपटाचे छायाचित्रण हिमांशु दुबे यांचे असून संगीत कौशल इनामदार यांनी दिले आहे. तर चित्रपटाचे कला दिग्दर्शक संतोष फुटाणे आहेत.



महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग तसेच महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ (फिल्म सिटी) निर्मित, इन असोसिएशन विथ कल्चर कॅनव्हास एंटरटेनमेंट प्रोडक्शन च्या सहयोगाने हा चित्रपट निर्मित करण्यात येत आहे. या चित्रपटाची सह-निर्मिती शिवम यादव आणि कार्तिकी यादव यांनी केली असून, हा चित्रपट राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित आहे. त्यांच्या समाजप्रबोधनाच्या कार्याचा, कीर्तन परंपरेचा आणि ग्रामगीतेच्या माध्यमातून दिलेल्या विचारांचा प्रभावी पट या चित्रपटातून उलगडला जाणार आहे.

यावेळी बोलताना सांस्कृतिक कार्यमंत्री माननीय अॅड. आशिष शेलार म्हणाले की, महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांमधून मानवी मूल्ये, राष्ट्रभक्ती, महान व्यक्तिमत्त्वे आणि त्यांच्या कार्यावर आधारित चित्रपट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ‘खंजिरीचे बोल’ हा चित्रपट राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित असून त्यांच्या ग्रामसेवा, परोपकार आणि भक्तीमार्गाच्या विचारांना समाजापर्यंत पोहोचवण्याचे मोठे माध्यम ठरेल. अनंत महादेवन यांचे दिग्दर्शन आणि प्रसाद ओक यांचा प्रभावी अभिनय यामुळे हा विषय अधिक ताकदीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल, असा मला विश्वास आहे. या संपूर्ण टीमला माझ्या शुभेच्छा.

Tata Power Collaborates with Salesforce to Accelerate India’s Clean Energy Transition

 Tata Power Collaborates with Salesforce to Accelerate India’s Clean Energy Transition

 

L-R - Dr Praveer Sinha, CEO and MD Tata Power and Arundhati Bhattacharya, President & CEO at Salesforce - South Asia

Strategic collaboration to digitally power nationwide rooftop solar, EV charging, and intelligent energy management businesses

Enabling seamless partner and customer journeys while empowering teams to scale green energy capacity with speed and precision

Mumbai, India, March 6, 2025: Tata Power, one of India’s largest vertically integrated power companies, today announced its collaboration with Salesforce, the world’s #1 AI CRM*, to digitally transform its rapidly expanding rooftop solar (RTS), EV charging, and smart home solutions businesses. The collaboration reinforces Tata Power’s long-term clean energy roadmap aligned with India’s net-zero ambitions by establishing a secure, intelligent, and fully integrated clean energy ecosystem powered by AI, automation, and data-driven insights. The platform will enable scalable growth, deeper partner and customer engagement, and operational excellence across the renewable energy value chain.

As part of this transformation, Tata Power has deployed Agentforce Sales, Agentforce Service, and Agentforce Marketing across its renewable energy subsidiary, Tata Power Renewable Energy Limited (TPREL). The Salesforce platform powers intelligent, AI-enabled workflows that enhance visibility, accelerate decision-making, and create seamless omnichannel experiences—driving efficiency, agility, and service leadership at scale.

Agentforce Sales and Agentforce Service form the foundation of Tata Power’s best-in-class omnichannel engagement model. Salesforce serves as a strategic digital backbone for Tata Power’s high-growth renewable energy businesses. The platform enables end-to-end digitisation of partners and customer journeys, delivering streamlined lead management, inventory visibility, process automation, and real-time performance tracking. This ensures enhanced transparency, operational efficiency, and a superior customer experience across touchpoints.

Additionally, Tata Power has developed a proprietary deep learning and agentic intelligence layer built on top of Salesforce to enable a zero-touch quality and safety validation process. This digital capability facilitates instant on-site verification and automated warranty generation, reinforcing Tata Power’s commitment to quality assurance and delivery excellence under its Solaroof offerings.

Driven by strong policy momentum under the Pradhan Mantri Surya Ghar Yojana, Tata Power’s residential rooftop solar segment has delivered over 200% growth across the past two financial years. Overall, the Company’s solar portfolio has achieved a fivefold increase in revenues between FY2020 and FY2025, reflecting accelerated market adoption, digital-led execution excellence, and expanding customer trust across segments.

Looking ahead, Tata Power and Salesforce will collaborate to co-innovate high-impact, agentic AI-led workflows designed to transform omnichannel customer and partner contact centre operations - driving faster resolution, proactive service, and predictive engagement.

Comments on the news:

Dr Praveer Sinha, CEO and MD Tata Power said, “Tata Power is leading India’s green energy transition by scaling rooftop solar nationwide, expanding EV charging infrastructure, and advancing intelligent energy management solutions. As we accelerate this growth, digital capability is a critical enabler of scale, speed, and customer trust. Leveraging Salesforce’s AI-powered platform, we are transforming customer and partner journeys with greater transparency and agility, while strengthening operational excellence. Together, we are building a future-ready clean energy ecosystem that advances India’s net-zero ambitions.”

Arundhati Bhattacharya, President & CEO at Salesforce - South Asia, said, "The path to a sustainable future is being paved by visionary enterprises that are embedding intelligence, agility, and customer-centricity into the core of their operations. Tata Power’s digital-first approach to accelerating India’s green energy mission exemplifies how technology can be a powerful catalyst for national transformation. At Salesforce, we are proud to partner with Tata Power in building a future-ready energy ecosystem—one that harnesses the power of data, AI, and automation to drive scalable impact, inclusive growth, and long-term climate resilience.”

About Salesforce

Salesforce helps organizations of any size become agentic enterprises - integrating humans, agents, apps, and data on a trusted, unified platform to unlock unprecedented growth and innovation.

Visit https://www.salesforce.com/in/ for more information.

Wednesday, March 4, 2026

पोलिसांच्या वर्दीत पूजा सावंतचा जबरदस्त अंदाज*

 *पोलिसांच्या वर्दीत पूजा सावंतचा जबरदस्त अंदाज*

मराठी चित्रपटसृष्टीत आघाडीच्या नायिकेला पोलिसांच्या वर्दीत पाहणं हे तसं दुर्मिळच. मात्र आगामी *‘सालबर्डी’* चित्रपटात ही चौकट मोडत पूजा सावंत एका करारी, निर्भीड आणि तडफदार पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे. पी.आय.मनोरमा प्रधान असं  तिच्या व्यक्तिरेखेचं  नाव आहे. नुकताच *'सालबर्डी'* या चित्रपटाचा दमदार टिझर आणि कलाकारांचे प्रभावी पोस्टर दिमाखात प्रदर्शित करण्यात आले असून, त्याने प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढवली आहे.

या सोहळ्यात पूजाने डॅशिंग एंट्री घेत आपल्या भूमिकेची झलक दाखवली. पोलिस अधिकाऱ्याच्या व्यक्तिरेखेसाठी तिने विशेष मेहनत घेतली असून, पोलिसांची देहबोली,अधिकारपूर्ण संवादशैली आणि शिस्तबद्ध वर्तन यांचा सखोल अभ्यास करत ही भूमिका पूजाने साकारली आहे. वास्तवदर्शीपणा जपण्यासाठी तिने प्रत्यक्ष पोलिस अधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या कामकाजाचे बारकाईने निरीक्षण केले.

आपल्या भूमिकेबद्दल बोलताना पूजा सांगते, ‘वर्दी अंगावर चढताच एक वेगळाच रुबाब आपोआप येतो. तो वेगळा दाखवावा लागत नाही. वर्दीतच एक ताकद असते. माझी ही भूमिका प्रत्येक स्त्रीला प्रेरणा देणारी ठरेल.’ चित्रपटातील थरारक स्टंट्स आणि दमदार अ‍ॅक्शन सीन्स हे *'सालबर्डी'* चे खास आकर्षण असणार आहेत. येत्या १७ एप्रिलला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

महाराष्ट्रातील दुर्गम भागात वसलेल्या *‘सालबर्डी’* गावात घडणाऱ्या रहस्यमय, भयावह आणि अस्वस्थ करणाऱ्या घटनांचा थरारक शोध घेणारा हा चित्रपट नेब्यूला फिल्म्सच्या बॅनरखाली साकारण्यात आला आहे. या चित्रपटाची निर्मिती अनिल देवडे पाटील, डॉ. गजानन जाधव आणि राम जाधव यांनी केली असून, दिग्दर्शनाची धुरा रमेश साहेबराव चौधरी यांनी सांभाळली आहे. 

चित्रपटाचे छायांकन व संकलन सिद्धेश संतोष मोरे यांचे आहे. पटकथा व संवाद रोहित शुक्रे यांचे असून, गुरु ठाकूर आणि मुकुंद भालेराव यांच्या गीतांना पद्मनाभ गायकवाड यांचे संगीत लाभले आहे. पार्श्वसंगीताची जबाबदारी अमर मोहिले यांनी सांभाळली आहे. अजय गोगावले, जावेद अली आणि आनंदी जोशी यांच्या आवाजाने चित्रपटातील गाणी सजली आहेत. नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकर आणि आशीष पाटील यांनी केले आहे. कार्यकारी निर्माते दीपक कुदळे पाटील असून, वेशभूषा प्रणिता चिंदगे, रंगभूषा श्रीनिवास मेनूगे आणि कलादिग्दर्शन प्रदीप गुरव यांचे आहे.

Sunday, March 1, 2026

मेघालयने मुंबईतील पहिल्या महोत्सवात भारतातील उदयोन्मुख सेंद्रिय मसाला केंद्र म्हणून आपली ठाम ओळख निर्माण केली

मेघालयने मुंबईतील पहिल्या महोत्सवात भारतातील उदयोन्मुख सेंद्रिय मसाला केंद्र म्हणून आपली ठाम ओळख निर्माण केली

मेघालय स्पाइस फेस्टिव्हल २०२६ च्या प्रमुख दिवशी मोठी उपस्थिती, सक्रिय व्यापारी संवाद आणि धोरणात्मक चर्चा

मुंबई, १ मार्च २०२६: मुंबईतील मुंबईमधील जिओ वर्ल्ड ड्राईव्ह, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे आज पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या ‘मेघालय स्पाइस फेस्टिव्हल’चे उद्घाटन झाले. या निमित्ताने मेघालय राज्याच्या झपाट्याने वाढणाऱ्या सेंद्रिय मसाला अर्थव्यवस्थेचे राष्ट्रीय स्तरावर भव्य प्रदर्शन घडले. आपल्या ठाम भूमिकेचा प्रत्यय देत शेतकरी, उद्योजक, सहकारी संस्थांचे नेते आणि वरिष्ठ अधिकारी अशा १४० सदस्यीय प्रतिनिधीमंडळाने मेघालयहून मुंबईत येऊन खरेदीदारांशी थेट संवाद साधला.

उद्घाटनाच्या दिवशी मोठी गर्दी, खरेदीदार-विक्रेता यांच्यात सातत्यपूर्ण संवाद तसेच मसाले आणि पर्यटन क्षेत्रातील संरचित बी२जी (बिजनेस-टू-गव्हर्नमेंट) बैठका पार पडल्या. ‘मेघालयच्या सेंद्रिय मसाला परिसंस्थेतील संधी’ या विषयावरील उच्चस्तरीय मंचाने धोरणात्मक चर्चेला दिशा दिली. प्रत्यक्ष प्रक्रिया प्रात्यक्षिके, चव चाखण्याचे काउंटर आणि विशेष रिटेल प्रदर्शनांमुळे संपूर्ण स्थळ एका सक्रिय बाजारपेठेत रूपांतरित झाले. खरेदी करार, निर्यात चौकशी आणि भागीदारीविषयी चर्चा दिवसभर सुरू राहिल्या, ज्यातून गंभीर व्यावसायिक रस दिसून आला.

मेघालय स्पाइस फेस्टिव्हलचा उद्देश राज्यातील उच्च दर्जाच्या सेंद्रिय मसाल्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे. पहिल्याच आवृत्तीत मुंबईसह देश-विदेशातील खरेदीदारांचे लक्ष वेधण्यात यश आले आहे. भारताची व्यापारी राजधानी असलेल्या मुंबईत हा महोत्सव आयोजित करून मेघालय सरकारने आपल्या मसाल्यांना प्रीमियम देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेत स्थान मिळवून देण्याचा स्पष्ट प्रयत्न दर्शविला आहे. तसेच या वाढीचा थेट फायदा शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीत व्हावा, यासाठी हा महोत्सव राज्यातील शेतकरी आणि मसाला उद्योजकांना राष्ट्रीय किरकोळ विक्रेते, संस्थात्मक खरेदीदार आणि जागतिक निर्यातदारांशी जोडणारे एक धोरणात्मक व्यासपीठ म्हणून संकल्पित करण्यात आला आहे.

मेघालय सरकारचे मुख्य सचिव डॉ. शकील पी. अहमद, आयएएस यांनी राज्याच्या कृषी पायाभूत व्यवस्थेची प्रामाणिकता अधोरेखित करत उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींना उत्पादकांशी थेट संवाद साधण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “आपण आमच्या उद्योजकांशी आणि शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला तर प्रामाणिकता, निष्ठा आणि दर्जा काय असतो हे जाणवेल.” ते पुढे म्हणाले, “मुळात आमचे शेतकरी निसर्गाचा आदर करतात आणि त्याचे संरक्षण करू इच्छितात; म्हणूनच आमच्याकडे सर्वात स्वच्छ नद्या, स्वच्छ गावे आणि स्वच्छ नेतृत्व आहे.”

मेघालय सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे आयुक्त व सचिव डॉ. विजय कुमार डी., आयएएस यांनी राज्याच्या वाढत्या बाजारपेठीय उपस्थितीवर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की मेघालयची हळद सध्या देशांतर्गत बाजारपेठेसोबतच अमेरिका, मध्यपूर्व आणि युरोपमध्येही पोहोचली आहे, तसेच यंदा आल्याची निर्यात सिंगापूरला करण्यात आली आहे. शाश्वत भागीदारीवर भर देत ते म्हणाले, “आम्हाला शाश्वत शेतीवर विश्वास ठेवणारे खरेदीदार हवे आहेत. आमची उत्पादने योग्य बाजारपेठेत नेऊन शेतकऱ्यांना योग्य दर देणारे भागीदार आम्हाला हवे आहेत.”

सहभागाच्या प्रमाणाचा उल्लेख करत त्यांनी ठामपणे सांगितले, “जगातील सर्वोत्तम हळद आमच्याकडे आहे. आम्ही जिथेही जातो, तिथे हीच कथा सांगतो.” तसेच राज्यातील सर्वात मोठ्या मसाला-प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन येत्या काही महिन्यांत होणार असल्याची माहिती देत त्यांनी मूल्यवर्धन आणि बाजारपेठीय तयारी अधिक बळकट होणार असल्याचे नमूद केले.

उपस्थित मान्यवरांमध्ये डॉ. शकील पी. अहमद, आयएएस, मुख्य सचिव, मेघालय सरकार; श्री विकास चंद्र रस्तोगी, अतिरिक्त मुख्य सचिव, कृषी विभाग, महाराष्ट्र सरकार; डॉ. विजय कुमार डी., आयएएस, आयुक्त व सचिव, कृषी व शेतकरी कल्याण विभाग, मेघालय सरकार; सौ. एन. भवानी श्री, आयएएस, सचिव, नॅशनल टर्मेरिक बोर्ड; श्री आर. नैणामलई, आयएफएस, सचिव, कृषी व शेतकरी कल्याण विभाग, मेघालय सरकार; तसेच श्री बिस्वजीत चक्रवर्ती, सहाय्यक महासचिव, फिक्की यांसह इतर मान्यवर अधिकारी व संबंधित हितधारकांचा समावेश होता.



Friday, February 27, 2026

दोन कुटुंबं, एक गोंधळ आणि भरपूर धमाल ! ‘सुपर डुपर’चा टीझर चर्चेत

        दोन कुटुंबं, एक गोंधळ आणि भरपूर धमाल !         ‘सुपर डुपर’चा टीझर चर्चेत 

झी स्टुडिओज प्रस्तुत ‘सुपर डुपर’ या बहुचर्चित मल्टिस्टारर आणि कौटुंबिक महासोहळ्याच्या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांची उत्सुकता आता चांगलीच शिगेला पोहोचली आहे. पोस्टरपासूनच या चित्रपटाची चर्चा रंगली होती आणि आता या टीझरने त्या उत्सुकतेत आणखी भर घातली आहे. यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमधील ही खास मनोरंजनाची मेजवानी ठरणार असून, भव्यदिव्य स्टारकास्ट असलेला हा कौटुंबिक सिनेमा ३ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत संपूर्ण कुटुंबाने एकत्र येऊन अनुभवावा, असा हा चित्रपट असल्याची झलक टीझर देतो.

टीझरमध्ये पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन भिन्न कुटुंबांची झलक पाहायला मिळते. एका बाजूला परंपरा जपणारे कुटुंब, तर दुसऱ्या बाजूला आधुनिक विचारांची तरुण जोडी, दोघेही काहीतरी ‘प्लॅन’ आखताना दिसत आहेत. नेमका हा प्लॅन कशासाठी आहे? हा गोंधळ नेमका कशाचा आहे? या दोन विचारसरणींची टक्कर कोणत्या वळणावर जाऊन भिडणार आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच उलगडणार आहेत.

एका घराच्या उंबरठ्यावर उभा राहिलेला हा संघर्ष केवळ दोन कुटुंबांची नसून दोन पिढ्यांचा, दोन विचारसरणींचा आणि दोन जीवनशैलींचा आहे, हे टीझरमधून दिसतेय.

नाईंटी नाईन प्रॉडक्शन्स आणि सिद्धिविनायक प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन समीर आशा पाटील यांनी केले आहे. विजय शिंदे आणि नरेश बोर्डे या चित्रपटाचे निर्माते असून उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर सादरकर्ते आहेत. तर छायांकन संजय जाधव यांनी केले आहे. या चित्रपटात निर्मिती सावंत, शशांक शेंडे, हृषिकेश जोशी, नम्रता संभेराव, कुशल बद्रिके, प्रतीक्षा कोते यांच्यासह ललित प्रभाकर आणि विदुला चौगुले मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. एवढ्या भल्या मोठ्या कलाकारांच्या फौजेमुळे ‘सुपर डुपर’ हा खऱ्या अर्थाने मल्टिस्टारर ठरणार असून, प्रत्येकाची वेगळी शैली आणि विनोदी टायमिंग चित्रपटाला अधिक रंगतदार बनवणार आहे.

दिग्दर्शक समीर आशा पाटील म्हणतात,

“टीझर हा आमच्या चित्रपटाच्या स्वभावाची पहिली खरी झलक आहे. एका घरातल्या दोन भिन्न विचारसरणी जेव्हा समोरासमोर येतात, तेव्हा निर्माण होणारा गोंधळ, विनोद आणि त्यामागची भावनिक बाजू आम्ही हलक्या-फुलक्या पद्धतीने मांडली आहे. ‘सुपर डुपर’ हा विनोदी चित्रपट आहे, याशिवाय नात्यांमधल्या आपुलकीचा, पिढ्यांमधल्या अंतराचा आणि त्या अंतरावर मात करण्याच्या प्रवासाचा चित्रपटही आहे. प्रेक्षकांनी संपूर्ण कुटुंबासह थिएटरमध्ये येऊन हा अनुभव घ्यावा, हीच अपेक्षा.”

या चित्रपटाबद्दल झी स्टुडिओज् मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणाले की, ‘’ ‘सुपर डुपर’ ही अतिशय वेगळ्या धाटणीची धमाल कौटुंबिक कथा आहे . यातील एकाहून एक मातब्बर कलाकारांची फौज हे या चित्रपटाचं बलस्थान आहे. लेखन, दिग्दर्शन, संगीत आणि निर्मिती मूल्ये या सर्वच पातळ्यांवर हा चित्रपट सरस झाला आहे. यामुळे यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत मनोरंजनाचं एक परिपूर्ण पॅकेज यातून प्रेक्षकांना मिळेल हे नक्की."

पोस्टरनंतर आता टीझरनेही सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगवली असून ३ एप्रिलपासून ‘सुपर डुपर’ प्रेक्षकांच्या मनावर कब्जा करण्यासाठी सज्ज झाला आहे. यंदाच्या उन्हाळ्यातील हा कौटुंबिक महासोहळा ठरणार, यात शंका नाही.

Zam Zam Perfumers brings 35 years of non-alcoholic fragrance heritage to Mumbai with first store launch

Zam Zam Perfumers brings 35 years of non-alcoholic fragrance heritage to Mumbai with first store launch Mumbai, June 20, 2026: Zam Zam Perfu...