Monday, February 2, 2026

*खवैय्ये आवडत्या चिकनक्रिस्परचा आस्वाद घेऊ शकतात, केवळ 99 रुपयांत*

*खवैय्ये आवडत्या चिकनक्रिस्परचा आस्वाद घेऊ शकतात, केवळ 99 रुपयांत*

KFC इंडियाचे चिकन क्रिस्पर मील आता फक्त 99 रुपयांत

चिकनप्रेमी फ्राईज आणि पेप्सीसह त्यांच्या आवडत्या चिकनक्रिस्परचा आस्वाद घेऊ शकतात, केवळ 99 रुपयांत~

India, 2025: या वर्षाची अखेर आणखीनच कुरकुरीत, खुसखुशीत आणि चविष्ट झाली आहे!

KFC आपल्या खवैय्यांचे आवडते चिकन क्रिस्परच्या रूपातले जेवण केवळ 99 रु. इतक्या अशक्यप्राय किंमतीत घेऊन आले आहे. 

चिकनप्रेमी खवैय्ये एका मऊ तिळाच्या बनमध्ये रसाळ पेरी पेरी चिकन स्ट्रिप्स, क्रीमी, टँगी सॉस आणि लेट्यूस ठेऊन बनवलेले आपले आवडते चिकन क्रिस्पर आणि जोडीला कुरकुरीत, सोनेरी फ्राईज आणि थंडगार पेप्सीचा मनमुराद आस्वाद घेऊ शकतात.

केवळ 99 रु. किंमतीचे चिकन क्रिस्पर मील आता महाराष्ट्र (मुंबई वगळून), चंदीगड ट्रायसिटी आणि हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील निवडक शहरांमध्ये डाईन-इन आणि टेकअवे या दोन्ही पर्यायात उपलब्ध आहे.

KFC मध्ये डाईन-इन करतानाच तुम्ही KFC अॅपवर प्री-ऑर्डर करून झटपट तुमचे आवडते चिकन क्रिस्पर मील मागवू शकता आणि केवळ 99 रुपयांत आपल्या आवडत्या चिकन क्रिस्पर मीलवर ताव मारू शकता.

डॅशिंग जोडीच्या प्रेमाचा संघर्ष सांगणारे ‘रुबाब’चे शीर्षक गीत प्रदर्शित

डॅशिंग जोडीच्या प्रेमाचा संघर्ष सांगणारे ‘रुबाब’चे शीर्षक गीत प्रदर्शित 

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेत असलेल्या ‘रुबाब’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाचे शीर्षक गीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या डॅशिंग जोडीच्या प्रेमकथेची झलक याआधीच प्रेक्षकांनी आधीच्या गाण्यांमधून अनुभवली. आता या शीर्षकगीतातून त्यांच्या नात्यातील नवा टप्पा उलगडतो. प्रेमात आलेले अंतर, बदललेली परिस्थिती आणि तरीही न डगमगणारी भावना या गाण्यात पाहायला मिळते. 

परिस्थितीमुळे एकमेकांपासून दूर गेले असले, तरी त्यांचे प्रेम मात्र तितकेच ठाम आणि आत्मविश्वासाने भरलेले आहे. आपले प्रेम पुन्हा मिळवण्यासाठी, कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही मार्गाने आपले प्रेम मिळवायचे, हा निर्धार या शीर्षकगीतातून ठळकपणे समोर येतो. रोमान्ससोबतच ॲटिट्यूड, ठामपणा आणि रुबाब यांचा मिलाफ या गाण्यात पाहायला मिळतो. 

‘रुबाब हा प्रेम जगण्याचा’ ही ओळ गाण्याचा आत्मा ठरते. ठामपणे, अभिमानाने आणि स्वतःच्या अटींवर जगणे म्हणजे प्रेम ही भावना या एका ओळीतून प्रभावीपणे मांडण्यात आली आहे. या ओळीमुळे संपूर्ण गाण्याला एक वेगळी ओळख मिळते. या शीर्षकगीतात डॅशिंग जोडीचे प्रेम क्षणांपुरते मर्यादित न राहाता, त्यामागील ठामपणा, आत्मविश्वास सादर करणारे आहे. 

या गाण्याला मुकुंद सुर्यवंशी यांचा प्रभावी आवाज लाभला असून, चिनार - महेश यांनी संगीत दिले आहे. गाण्याचे आशयपूर्ण बोल मंगेश कांगणे यांनी लिहिले आहेत. शब्द, संगीत आणि गायन यांचा अचूक मेळ साधत हे शीर्षक गीत चित्रपटाच्या एकूण भावविश्वाला अधिक गहिरे बनवते.  

चित्रपटाचे दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे म्हणतात,  '' 'रुबाब' हा चित्रपट एक विचार आहे. हे शीर्षकगीत चित्रपटाचा सार सांगतो. प्रेम कसे असावे, ते कसे जगावे आणि त्यात असलेला आत्मसन्मान किती महत्त्वाचा आहे, हे या गाण्यातून आम्ही सांगायचा प्रयत्न केला आहे. या शीर्षकगीतातून नायक आणि नायिकेमधील अंतर, संघर्ष आणि तरीही न संपणारी भावना दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रेक्षकांना हे गीत नक्कीच भावेल.” 

झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित ‘रुबाब’ या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन शेखर बापू रणखांबे यांनी केले असून संजय झणकर आणि गौरी झणकर हे चित्रपटाचे निर्माते आहेत. उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर यांनी चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. या चित्रपटात संभाजी ससाणे आणि शितल पाटील प्रमुख भूमिकेत झळकणार असून, ही नवी जोडी प्रेक्षकांसाठी नक्कीच उत्सुकतेचा विषय ठरणार आहे. ६ फेब्रुवारीपासून ‘रुबाब’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.डॅशिंग जोडीच्या प्रेमाचा संघर्ष सांगणारे ‘रुबाब’चे शीर्षक गीत प्रदर्शित 

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेत असलेल्या ‘रुबाब’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाचे शीर्षक गीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या डॅशिंग जोडीच्या प्रेमकथेची झलक याआधीच प्रेक्षकांनी आधीच्या गाण्यांमधून अनुभवली. आता या शीर्षकगीतातून त्यांच्या नात्यातील नवा टप्पा उलगडतो. प्रेमात आलेले अंतर, बदललेली परिस्थिती आणि तरीही न डगमगणारी भावना या गाण्यात पाहायला मिळते. 

परिस्थितीमुळे एकमेकांपासून दूर गेले असले, तरी त्यांचे प्रेम मात्र तितकेच ठाम आणि आत्मविश्वासाने भरलेले आहे. आपले प्रेम पुन्हा मिळवण्यासाठी, कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही मार्गाने आपले प्रेम मिळवायचे, हा निर्धार या शीर्षकगीतातून ठळकपणे समोर येतो. रोमान्ससोबतच ॲटिट्यूड, ठामपणा आणि रुबाब यांचा मिलाफ या गाण्यात पाहायला मिळतो. 

‘रुबाब हा प्रेम जगण्याचा’ ही ओळ गाण्याचा आत्मा ठरते. ठामपणे, अभिमानाने आणि स्वतःच्या अटींवर जगणे म्हणजे प्रेम ही भावना या एका ओळीतून प्रभावीपणे मांडण्यात आली आहे. या ओळीमुळे संपूर्ण गाण्याला एक वेगळी ओळख मिळते. या शीर्षकगीतात डॅशिंग जोडीचे प्रेम क्षणांपुरते मर्यादित न राहाता, त्यामागील ठामपणा, आत्मविश्वास सादर करणारे आहे. 

या गाण्याला मुकुंद सुर्यवंशी यांचा प्रभावी आवाज लाभला असून, चिनार - महेश यांनी संगीत दिले आहे. गाण्याचे आशयपूर्ण बोल मंगेश कांगणे यांनी लिहिले आहेत. शब्द, संगीत आणि गायन यांचा अचूक मेळ साधत हे शीर्षक गीत चित्रपटाच्या एकूण भावविश्वाला अधिक गहिरे बनवते.  

चित्रपटाचे दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे म्हणतात, '' 'रुबाब' हा चित्रपट एक विचार आहे. हे शीर्षकगीत चित्रपटाचा सार सांगतो. प्रेम कसे असावे, ते कसे जगावे आणि त्यात असलेला आत्मसन्मान किती महत्त्वाचा आहे, हे या गाण्यातून आम्ही सांगायचा प्रयत्न केला आहे. या शीर्षकगीतातून नायक आणि नायिकेमधील अंतर, संघर्ष आणि तरीही न संपणारी भावना दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रेक्षकांना हे गीत नक्कीच भावेल.” 

झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित ‘रुबाब’ या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन शेखर बापू रणखांबे यांनी केले असून संजय झणकर आणि गौरी झणकर हे चित्रपटाचे निर्माते आहेत. उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर यांनी चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. या चित्रपटात संभाजी ससाणे आणि शितल पाटील प्रमुख भूमिकेत झळकणार असून, ही नवी जोडी प्रेक्षकांसाठी नक्कीच उत्सुकतेचा विषय ठरणार आहे. ६ फेब्रुवारीपासून ‘रुबाब’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आई–मुलींच्या नात्याचा हळुवार प्रवास सांगणारं सोनू निगम यांचे ‘हास जराशी’ गाणं प्रदर्शित

आई–मुलींच्या नात्याचा हळुवार प्रवास सांगणारं सोनू निगम यांचे ‘हास जराशी’ गाणं प्रदर्शित 

'तिघी'मधील भावस्पर्शी गाणं प्रेक्षकांच्या भेटीला 


आई आणि मुलींचं नातं हे केवळ जन्माने जोडलेलं नसतं, तर ते आयुष्यभर साठत गेलेल्या आठवणींनी, संस्कारांनी, न बोललेल्या भावनांनी आणि एकमेकांसाठी असलेल्या मूक समजुतींनी घडलेलं असतं. कधी त्या नात्यात हसरे, हलके क्षण असतात, तर कधी अपेक्षा, वेदना आणि अंतरही… तरीही मनाच्या खोल कुठेतरी हे नातं कायम घट्ट गुंफलेलं असतं. अशाच भावनांचा, नात्यांच्या नाजूक छटांचा हळुवार वेध घेणारा आगामी मराठी चित्रपट म्हणजे ‘तिघी’. या चित्रपटातील ‘हास जराशी’ हे भावनिक गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून, अल्पावधीतच ते मनाला स्पर्श करून जात आहे. आई आणि मुलींच्या नात्यातील हळवे, आनंदी, कधी वेदनांनी ओथंबलेले, तर कधी आशेने उजळलेले क्षण या गाण्यात सुंदरपणे उलगडताना दिसतात. दुःख आणि सुख, अंतर आणि आपुलकी या सगळ्यांचा एक भावनिक प्रवास हे गाणं मांडतं.

जितेंद्र जोशी यांच्या संवेदनशील आणि अर्थपूर्ण शब्दांना अद्वैत नेमळेकर यांचं हृदयाला भिडणारं संगीत लाभलं असून, सोनू निगम यांच्या जादुई आवाजामुळे हे गाणं अधिकच भावस्पर्शी झालं आहे. भारती आचरेकर, सोनाली कुलकर्णी आणि नेहा पेंडसे बायस या तिघींवर चित्रित झालेलं हे गाणं त्यांच्या नात्यातील भावनिक बंध, हसरे क्षण आणि न बोललेली वेदना प्रभावीपणे समोर आणतं.

चित्रपटाच्या दिग्दर्शिका जीजिविषा काळे सांगतात, '' ‘हास जराशी’ हे गाणं आई आणि मुलींच्या नात्यातील अतिशय नाजूक भावविश्व उलगडतं. या गाण्यात मोठे प्रसंग नाहीत, परंतु आयुष्य घडवणारे छोटे क्षण आहेत. एकमेकांसाठीचं न बोललेलं प्रेम, मनात दडवलेली वेदना, आणि तरीही कठीण काळात एकमेकांसाठी उभं राहाण्याची ताकद. या तिघींचं नातं कधी मैत्रीचं वाटतं, कधी संघर्षाचं, तर कधी फक्त एक शांत आधार बनून राहातं. ‘हास जराशी’ हे गाणं म्हणजे या नात्याचा एक हळवा श्वास आहे, जो प्रेक्षकांच्या मनाला नकळत स्पर्श करून जातो.”

सुप्री मीडिया प्रस्तुत आणि कोक्लिको पिक्चर्स निर्मित ‘तिघी’ या चित्रपटात भारती आचरेकर, सोनाली कुलकर्णी आणि नेहा पेंडसे बायस यांच्या प्रमुख भूमिका असून, चित्रपटाची कथा व दिग्दर्शन जीजिविषा काळे यांनी केलं आहे. निर्मितीची धुरा निखिल महाजन, सुहृद गोडबोले, स्वप्निल भंगाळे आणि नेहा पेंडसे बायस यांनी सांभाळली आहे. आई–मुलींच्या नात्याकडे प्रगल्भ, संवेदनशील आणि वेगळ्या नजरेतून पाहाणारा ‘तिघी’ हा चित्रपट येत्या ६ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, त्याआधीच ‘हास जराशी’ हे गाणं प्रेक्षकांच्या मनात खास जागा निर्माण करत आहे.

*खवैय्ये आवडत्या चिकनक्रिस्परचा आस्वाद घेऊ शकतात, केवळ 99 रुपयांत*

*खवैय्ये आवडत्या चिकनक्रिस्परचा आस्वाद घेऊ शकतात, केवळ 99 रुपयांत* KFC इंडियाचे चिकन क्रिस्पर मील आता फक्त 99 रुपयांत चिकनप्रेमी फ्राईज आणि ...