Friday, November 28, 2025

लवकरच येतोय ‘मिस यू मिस्टर’ !

 लवकरच येतोय ‘मिस यू मिस्टर’ !

मंत्रा व्हिजनच्या सहकार्याने थर्ड आय क्रिएटिव्ह फिल्म्स प्रस्तुत ‘मिस यू मिस्टर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या आकर्षक पोस्टरने चित्रपटाची उत्सुकता आणखीनच वाढवली आहे.

पोस्टरकडे पाहाताच दोन वेगवेगळ्या देशात राहाणाऱ्या प्रेमिकांची छायाचित्रे नजरेत भरणारी आहेत. सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे हे फोनच्या हावभावातून संवाद साधताना दिसत असून त्या संवादांमागे काय दडलेलं आहे? लाँग डिस्टन्सचं नातं... कधी मनं जुळवणारं तर कधी मन पोखरणारं ? हा प्रश्न पोस्टर पाहाताच मनात घर करतो.

दिग्दर्शक समीर हेमंत जोशी सांगतात, “‘मिस यू मिस्टर’ ही फक्त दोन शहरांची गोष्ट नाही, ती दोन मनांची आहे. वेळेत आणि राहाण्याच्या ठिकाणांमध्ये अंतर पडलं तर नातं दुरावतं की अधिक स्थिरावतं ? 'मिस यू मिस्टर' याच चढउतारांची गोष्ट आहे.'' 

चित्रपटात मृण्मयी देशपांडे आणि सिद्धार्थ चांदेकर प्रमुख भूमिका साकारत असून त्यांच्या केमिस्ट्रीमुळे ही कथा प्रेक्षकांना अधिकच रिलेट होईल. या चित्रपटात राजन भिसे, सविता प्रभुणे, अविनाश नारकर, राधिका विद्यासागर, दीप्ती लेले यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाचे दीपा ट्रेसी आणि सुरेश म्हात्रे निर्माते आहेत.

Mpower आणि FIT India Movement यांच्या वतीने मुंबईत ३० नोव्हेंबरला भव्य सायक्लोथॉन*

 *Mpower आणि FIT India Movement यांच्या वतीने मुंबईत ३० नोव्हेंबरला भव्य सायक्लोथॉन*

राइड टू एम्पावर मुंबई सायक्लोथॉन 2025 हा लोहा फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आला असून, तो फिट इंडिया मूव्हमेंटचा भाग आहे आणि स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया (SAI) यांच्या सहकार्याने घेतला जात आहे. हा उपक्रम रविवार, 30 नोव्हेंबर 2025 रोजी बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथील एमएमआरडीए ग्राउंडवर होणार आहे. या उपक्रमाचे उद्दिष्ट सायक्लिंग प्रेमी, फिटनेस समर्थक आणि सर्व क्षेत्रातील नागरिकांना एकत्र आणून शारीरिक आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्य यामधील नात्यावर प्रकाश टाकणे आहे।

या उपक्रमातून Mpower, ज्याची स्थापना श्रीमती नीरजा बिरला यांनी केली आहे आणि जो आदित्य बिरला एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम आहे, मानसिक आरोग्याकडे पाहण्याची दृष्टी बदलणे, सामाजिक अडथळे दूर करणे आणि वेळेवर मानसिक आरोग्य सहाय्य उपलब्ध करून देणे यासाठी कटिबद्ध आहे।

हा उपक्रम फक्त फिटनेस चळवळ नाही तर एक व्यापक जनजागृती संदेश आहे - की मानसिक आरोग्यही शारीरिक आरोग्याइतकंच आवश्यक आहे आणि मदत मागणे हे दुर्बलतेचं नव्हे तर शक्तीचं आणि सजगतेचं प्रतीक आहे.

मानसिक आरोग्याच्या महत्त्वाबद्दल बोलताना, संस्थापक व अध्यक्षा, Mpower, आदित्य बिरला एज्युकेशन ट्रस्ट श्रीमती नीरजा बिरला म्हणाल्या:

“राइड टू एम्पावर मुंबई सायक्लोथॉन हा केवळ एक सायक्लिंग इव्हेंट नाही - तो एक सामाजिक चळवळ आहे, जी मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या परस्पर संबंधांची जाणीव करून देते. आमचे उद्दिष्ट मानसिक आरोग्याबद्दलची चर्चा चार भिंतींपलीकडे आणून समाजात खुल्या संवादाला वाव देणे आहे. Mpower मध्ये आम्ही विश्वास बाळगतो की मानसिक स्वास्थ्य हे जीवनाचा अभिन्न भाग आहे. या उपक्रमाद्वारे आम्ही सर्वांना हे स्मरण करून द्यायचे आहे की मदत मागणे हा धैर्याचा निर्णय आहे आणि समाज म्हणून एकत्र येऊन आपण मानसिक आरोग्याला योग्य सन्मान मिळवून देऊ शकतो.”

माननीय रेस डायरेक्टर व मुख्य सल्लागार श्री कृष्ण प्रकाश, IPS (ADG, Force One – Planning & Coordination) म्हणाले:

“सायक्लिंग ही केवळ एक क्रिया नाही - ती शिस्त, तंदुरुस्ती, धैर्य आणि दृढ मनोबलाचे प्रतीक आहे. या सायक्लोथॉनद्वारे आपण फक्त सायकल चालवत नाही, तर मानसिक आरोग्य जागरूकतेकडे पुढचे जबाबदार पाऊल टाकत आहोत. हा उपक्रम मुंबईच्या आत्म्याचा – एकता, जिद्द आणि परिवर्तनाचा – उत्तम प्रतिबिंब आहे.”

या सायक्लोथॉनमध्ये विविध श्रेण्या असतील: 100 किमी, 50 किमी, 25 किमी, 10 किमी आणि विशेष व्हीलचेअर राइड. कार्यक्रम सकाळी 4:00 ते 8:30 या वेळेत पार पडेल।

सहभागींना जर्सी, मेडल, गुडी बॅग, वैयक्तिक फोटो, ई-टायमिंग प्रमाणपत्र, वैद्यकीय आणि हायड्रेशन सपोर्ट उपलब्ध असेल। कार्यक्रमात झुंबा, लाईव्ह म्युझिक, हेल्दी ब्रेकफास्ट आणि मानसिक आरोग्य सेवांना समर्थन देणारा खास “Charity BIB” सुद्धा असेल।

मुंबईतील प्रसिद्ध डबेवाले आणि पोस्टमन यांचा सहभाग हा कार्यक्रमाचा विशेष आणि प्रेरणादायी भाग असेल।

या उपक्रमाचा संदेश:

Ride for your Mind, Ride for your city, Ride for change

*कार्यक्रम तपशील*:

• ठिकाण: एमएमआरडीए ग्राउंड, BKC, मुंबई

• दिनांक: 30 नोव्हेंबर 2025

• वेळ: सकाळी 4:00 पासून

• नोंदणी: https://www.townscript.com/e/ride-to-empower-mumbai-cyclothon-season-3-2025-020144

🔗 https://mpowerminds.com/

महाराष्ट्रात धुमाकूळ घालणारे ‘द फोल्क आख्यान’ चे संगीतकार आता पहिल्यांदाच मराठी चित्रपटाला देणार संगीत !

 महाराष्ट्रात धुमाकूळ घालणारे ‘द फोल्क आख्यान’ चे   संगीतकार आता पहिल्यांदाच मराठी चित्रपटाला देणार संगीत 

क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’ मधील पाच दमदार गाणी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला 

शाळेच्या आठवणींना पुन्हा उजाळा देणाऱ्या ‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. याच उत्साहात भर घालत दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी आपल्या सोशल मीडियावर 'क्रांतिज्योतीचे संगीत कारभारी...' अशी एक खास पोस्ट शेअर करत चित्रपटाच्या संगीत टीमची घोषणा केली. हेमंत ढोमे यांच्या पोस्टनंतर आता चित्रपटाबद्दलची चर्चा आणखीच वाढली आहे. 

सध्या महाराष्ट्रात प्रचंड चर्चेत असलेल्या आणि लोककलेला मानाचा मुजरा देणाऱ्या आणि संपूर्ण राज्यभरात धुमाकूळ घालणाऱ्या ‘द फोल्क आख्यान’ या प्रभावी टीमकडे या चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्या ठसकेबाज सादरीकरणाने आणि लोककलेला मांडण्याच्या शैलीमुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. ‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’ हा त्यांचा पहिलाच चित्रपट असून, या चित्रपटासाठी त्यांनी खास पाच दमदार, खणखणीत आणि रंगतदार गाणी तयार केली आहेत. ‘द फोल्क आख्यान’च्या हर्ष-विजय यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्यांना गीतकार ईश्वर ताराबाई अंधारे यांचे शब्द लाभले आहेत. त्यामुळे आता ‘द फोल्क आख्यान’ची संगीतशैली आणि हेमंत ढोमे यांच्या कथा सांगण्याच्या ताकदीचा संगम पाहाण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. 

दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, “क्रांतिज्योतीसाठी ‘द फोल्क आख्यान’ यांची निवड केली, कारण त्यांची ऊर्जा, लोककलेविषयीची समज व त्यांचे जमिनीशी असलेले नाते या चित्रपटाच्या विषयाला अगदी जुळणारे आहे. या पाच गाण्यांतून मराठी मातीतली ममता व्यक्त होईल. त्यांच्या प्रत्येक सादरीकरणात असलेली ताकद, लय आणि प्रामाणिकपणा हा त्यांचा सर्वात मोठा गुण असून आमच्या चित्रपटासाठी आम्हाला अशीच उर्जा आणि असाच ताजा दृष्टिकोन हवा होता.”

संगीतकार हर्ष-विजय म्हणतात, “आमचा ‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’ हा पहिलाच चित्रपट असून ही आमच्यासाठी खूप मोठी भावना आहे. आम्ही महाराष्ट्राच्या लोककलेत वाढलो, त्याच मातीच्या आवाजात गाणी बनवली आणि आता तीच कला मोठ्या पडद्यावर नेण्याची संधी मिळणं, ही आमच्या आयुष्यातली खास गोष्ट आहे. आम्ही हेमंत ढोमे यांचे खूप आभारी आहोत की, त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला ही संधी दिली.”

येत्या नवीन वर्षात म्हणजेच १ जानेवारी २०२६ पासून ही मराठी शाळा चित्रपटगृहात भरणार आहे. या चित्रपटात मराठी कलाकारांची दमदार फौज झळकणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते सचिन खेडेकर या चित्रपटात मुख्यध्यापकाच्या भूमिकेत दिसणार असून अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपुटकर या कलाकारांसोबतच मराठी चित्रपटात पहिल्यांदाच प्राजक्ता कोळी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. 


हेमंत ढोमे लिखित-दिग्दर्शित क्षिती जोग यांच्या चलचित्र मंडळी निर्मित, ‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’ या चित्रपटाचे सहनिर्माते विराज गवस, उर्फी काझमी (क्रेझी फ्यू फिल्मस्) आणि अजिंक्य ढमाळ हे आहेत.

आशा’चे प्रेरणादायी गाणं प्रेक्षकांच्या भेटीला संघर्ष आणि जिद्दीची गर्जना करणारे गीत प्रदर्शित

आशा’चे प्रेरणादायी गाणं प्रेक्षकांच्या भेटीलासंघर्ष आणि जिद्दीची गर्जना करणारे गीत प्रदर्शित 

चालत रहा पुढं... चालत रहा पुढं... अशी अस्मितेने भरलेली हाक देत ‘आशा’ चित्रपटाचे प्रेरणादायी गाणं नुकतेच प्रदर्शित झाले असून ते प्रेक्षकांच्या मनाला भिडताना दिसत आहे. गीतकार वलय मुळगुंद यांनी लिहिलेल्या शब्दांना संगीतकार आशिष झा यांनी प्रभावी संगीत दिले असून गायिका प्राची केळकर यांच्या दमदार आवाजाने हे गाणे अधिकच सशक्त झाले आहे. या गाण्यात संघर्षाची ठिणगी, आशेची ज्योत आणि प्रत्येक पावलागणिक उलगडणाऱ्या प्रकाशाची नवी चाहूल जाणवते. मनाला उभारी देणारे हे ॲंथम साँग केवळ ‘आशा’ सेविकेचे नसून त्या प्रत्येक स्त्रीचे आहे, जिचा अंतरंगात दडलेल्या उजेडावर विश्वास आहे. 

या गाण्याबद्दल दिग्दर्शक दिपक पाटील म्हणतात, '' ‘आशा’मधील हे गाणं म्हणजे प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे. ही केवळ आशा सेविकांची गोष्ट नाही, तर कुटुंबासाठी झगडणाऱ्या, स्वप्नांसाठी लढणाऱ्या आणि कोणत्याही संकटात न डगमगणाऱ्या प्रत्येक बाईची प्रेरक धडाडी आहे. या गाण्यातून आम्ही तिच्या ताकदीला आणि तिच्या अविरत प्रवासाला सलाम केला आहे.”

‘आशा’मध्ये महिलांची झगडणारी दुनिया आणि समाजाप्रती असलेली त्यांची अमर्याद जबाबदारी अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत रिंकू राजगुरू, सायंकित कामत, उषा नाईक, शुभांगी भुजबळ, सुहास शिरसाट, दिशा दानडे, दिलीप घारे आणि हर्षा गुप्ते यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 

दिपक पाटील दिग्दर्शित ‘आशा’चे कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, निलेश कुवर, दैवता पाटील आणि दिपक पाटील निर्माते आहेत. तर मुरलीधर छतवानी आणि रवींद्र औटी सहनिर्माते आहेत. पॅनोरमा स्टुडिओजच्या माध्यमातून सर्वत्र प्रदर्शित होणारा हा चित्रपट येत्या १९ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

एक्वस लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री बुधवार 3 डिसेंबर 2025 पासून होणार सुरू

एक्वस लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री बुधवार 3 डिसेंबर 2025 पासून होणार सुरू

प्रति इक्विटी शेअर 118 रुपये ते 124 रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित.   


इक्विटी शेअर्सच्या दर्शनी मूल्याच्या (प्रती शेअर 10 रु.) 11.80 पट फ्लोअर किंमत आणि 12.40 पट कॅप किंमत 

बोली/ऑफर बुधवार 3 डिसेंबर 2025 रोजी खुली होईल आणि शुक्रवार, 5 डिसेंबर 2025 रोजी बंद होईल (“Bid Dates”). 

प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक मंगळवार 02 डिसेंबर 2025 आहे. 

बोली किमान 120 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 120 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल (“No. of Bids”)

रेड हेअरिंग प्रोस्पेक्टस (“RHP”) लिंक: https://live.jmfl.com/od/UploadedFiles/D0456858-180C-4361-83F0-946D0B04EDA6.pdf

राष्ट्रीय, 28 नोव्हेंबर 2025: एक्वस लिमिटेड (“कंपनी”)ने इक्विटी शेअरसाठी बुधवार 3 डिसेंबर 2025 पासून प्राथमिक समभाग विक्री बोली/ऑफर खुली करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे.

प्रति इक्विटी शेअर 118 रुपये ते 124 रुपये पर्यंतचा किंमतपट्टा (“Price Band”) निश्चित करण्यात आला आहे. बोली किमान 120 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 120 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल (“Minimum Bid Lot”). 

प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअर्सच्या प्राथमिक समभाग विक्रीमध्ये (“Total Offer Size”) 67०० दशलक्ष रु. (670 कोटी रु.) पर्यंतचे फ्रेश इश्यू आणि ऑफर फॉर सेल अंतर्गत प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेले एकूण 2,03,07,393 पर्यंतचे इक्विटी शेअर्स समाविष्ट आहेत. 

प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक मंगळवार, 2 डिसेंबर 2025 आहे. बोली/ऑफर बुधवार 3 डिसेंबर 2025 रोजी खुली होईल आणि शुक्रवार, 5 डिसेंबर 2025 रोजी बंद होईल. कंपनीचे रेड हेअरिंग प्रोस्पेक्टस द्वारे हे इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड (“BSE”) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE” आणि BSE बरोबर एकत्रितपणे “Stock Exchanges”) वर सूचीबद्ध करण्याचे प्रस्तावित आहे. ऑफरच्या उद्दिष्टासाठी NSE हे निर्देशित स्टॉक एक्सचेंज राहील. जे एम फायनान्शियल लिमिटेड, आयआयएफएल कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड आणि कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड हे बुक रनिंग लीड मॅनेजर्स (“BRLMs”) आहेत.

येथे वापरल्या गेलेल्या परंतु परिभाषित न केलेल्या सर्व कॅपिटलाइज्ड शब्दांचा अर्थ आरएचपी मध्ये नमूद केल्यासारखाच असेल. ही ऑफर SCRR, च्या नियम 19(2)(b) आणि SEBI ICDR नियम 31 च्या अनुषंगाने केली जात आहे. ही ऑफर बुक बिल्डिंग प्रक्रियेच्या माध्यमातून केली जात असून, SEBI ICDR सुधारित नियम 6(2) च्या नियमनात आहे. त्या अंतर्गत SEBI ICDR नियमांनुसार, ऑफरच्या किमान 75% भाग पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (“QIBs” आणि तो हिस्सा “QIB Portion”) प्रमाणबद्ध वाटपासाठी उपलब्ध असेल. तथापि आपली कंपनी, BRLMs सोबत सल्लामसलत करून, SEBI ICDR नियमांनुसार विवेकाधीन आधारावर QIB Portion पैकी 60% पर्यंत हिस्सा प्रमुख गुंतवणूकदारांसाठी (“Anchor Investor Portion”) वाटप करू शकते. त्यापैकी किमान एक तृतीयांश हिस्सा देशांतर्गत स्थानिक म्युच्युअल फंडांसाठी उपलब्ध राहील. त्यासाठी स्थानिक म्युच्युअल फंडांकडून प्रमुख गुंतवणूकदार वाटप किंमतीच्या बरोबरीने किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीसाठी वैध बोली प्राप्त व्हायला लागतील. जर प्रमुख गुंतवणूकदार भागामध्ये कमी सदस्यता किंवा वाटप न झाल्यास, उर्वरित इक्विटी शेअर्स (प्रमुख गुंतवणूकदार भाग वगळून) नेट QIB Portion मध्ये (“Net QIB Portion”) समाविष्ट केले जातील.

ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास QIB च्या एकूण हिश्शापैकी 5 % फक्त म्युच्युअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध असतील आणि QIBचा उर्वरित हिस्सा म्युच्युअल फंडांसह अन्य सर्व QIB बोलीधारकांसाठी (प्रमुख गुंतवणुकदार वगळून) उपलब्ध करून दिला जाईल. जर नेट ऑफरच्या किमान 75% चे वाटप QIBs ला करता आले नाही, तर संपूर्ण अर्ज रक्कम तत्काळ परत केली जाईल. पुढे, नेट ऑफर पैकी 15% पेक्षा जास्त नसलेला हिस्सा बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (“Non-Institutional Investors” किंवा “NIIs”) (म्हणजे “Non-Institutional Portion”) उपलब्ध असेल. बिगर संस्थात्मक भागापैकी एक तृतीयांश भाग 0.20 दशलक्ष रु. पेक्षा जास्त आणि 1.00 दशलक्ष रु. पर्यंत अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल आणि दोन तृतीयांश भाग 1.00 दशलक्ष रु.पेक्षा अधिक अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल. अर्थात त्यासाठी अशा कोणत्याही उप-श्रेणीतील सबस्क्राईब नसलेला भाग बिगर-संस्थात्मक बोली लावणाऱ्या दुसऱ्या उप-श्रेणीतील अर्जदारांना सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार वाटप केला जाऊ शकतो. ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास हे लागू होईल.

प्रत्येक बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारासाठीचे वाटप हे बिगर संस्थात्मक भागामधील इक्विटी शेअर्सच्या उपलब्धतेच्या अधीन राहून, किमान अर्ज आकारापेक्षा कमी असणार नाही आणि उर्वरित उपलब्ध इक्विटी शेअर्स असल्यास SEBI ICDR नियमनाच्या शेड्युल XIII मध्ये नमूद केलेल्या अटींनुसार प्रमाणानुसार वाटप केले जातील. सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार Retail Individual Bidders (RIBs) साठी निव्वळ ऑफरच्या (“Net Offer”) 10% पेक्षा अधिक भाग वाटपासाठी उपलब्ध राहणार नाही. ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास हे लागू होईल. तसेच, पात्र कर्मचाऱ्यांकडून कर्मचारी आरक्षण भागांतर्गत केलेल्या अर्जांवर आणि त्यांनी ऑफर प्राईस (लागू असल्यास कर्मचारी सवलत) वर किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीवर वैध बोली असतील तर त्यांना इक्विटी शेअर्सचे वाटप प्रमाणानुसार करण्यात येईल.

प्रमुख गुंतवणूकदारांखेरीज (Anchor Investors) सर्व संभाव्य गुंतवणूकदारांनी आपापल्या ASBA खात्यांचा तपशील आणि यूपीआय अर्जदारांसाठी यूपीआय आयडीसह जाहीर करून अर्जाची विहित रक्कम अॅप्लीकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक अमाऊंट (“ASBA”) प्रक्रियेद्वारे करून ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार योजनेत सहभागी करून घेण्यासाठी सर्व बोली रकमा या सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँक्स एससीएसबीतर्फे किंवा यूपीआय यंत्रणे अंतर्गत स्पॉन्सर बँकेतर्फे ब्लॉक करून ठेवण्यात येतील. प्रमुख गुंतवणूकदारांना त्यांच्यासाठीच्या हिश्शात “ASBA” प्रक्रीयेनुसार सहभागी होण्याची परवानगी नाही. 



Tuesday, November 25, 2025

मैत्री, वडिल -मुलगी नात्याची अनोखी सांगड घालणारं ‘शंकर जयकिशन’ लवकरच रंगभूमीवर!

 मैत्री, वडिल -मुलगी नात्याची अनोखी सांगड घालणारं ‘शंकर जयकिशन’ लवकरच रंगभूमीवर!

भरत जाधव - महेश मांजरेकर पहिल्यांदाच एकत्र झळकणार 

मराठी रंगभूमीवर एक विनोदी, हृदयस्पर्शी आणि नातेसंबंधांचा वेध घेणारं नाटक ‘शंकर-जयकिशन’ लवकरच नाट्यरसिकांच्या भेटीला येत आहे. वडिल- मुलीचे गुंतागुंतीचे नाते, वर्षानुवर्षे दडलेली कटुता आणि अचानक जीवनात घडलेल्या अनपेक्षित व्यक्तीच्या आगमनाने बदलणारे समीकरण अशी या नाटकाची कथा आहे. कथानकात वडिल मुलीच्या नात्यात कोणी तिसरा येतो. त्याच्या येण्यामागंच नेमकं कारण काय ? की त्याच्या आयुष्यात काही गूढ रहस्य दडलंय? याचं उत्तर नाट्यरसिकांना नाटक पाहूनच मिळणार आहे. 

 हे मजेदार, हटके आणि भावनिक नाटक विशेष ठरणार आहे, कारण पहिल्यांदाच भरत जाधव आणि महेश मांजरेकर हे दोन प्रभावी कलाकार रंगभूमीवर एकत्र दिसणार आहेत. त्यातही महेश मांजरेकर तब्बल २९ वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन करत आहेत. त्यामुळे महेश मांजरेकर यांच्यासाठीही आणि प्रेक्षकांसाठीही हा एक खास क्षण असणार आहे. 

दिग्दर्शक सुरज पारसनीस म्हणतात, ‘’हे नाटक फक्त हसवणारं नाही तर नात्यांमधल्या अदृश्य धाग्यांना भिडणारं आहे. मैत्री आणि पित्याच्या नात्याची वेगळी बाजू यातून प्रेक्षकांसमोर येईल.”

निर्माते, अभिनेते भारत जाधव म्हणतात, ‘’महेशजी आणि मी अनेक वर्षे एकाच इंडस्ट्रीमध्ये काम करत आहोत, त्यामुळे आमची चांगली मैत्री आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या अनेक चित्रपटांमध्येही मी भूमिका केल्या आहेत. एकमेकांना कामामध्ये काय अपेक्षित असतं, हे आम्ही उत्तम जाणतो. त्यामुळेच त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव हा नेहमीच अनोखा असतो आणि आता तर आम्ही एकत्र रंगमंचावर झळकणार आहोत. त्यामुळे आम्हाला एकत्र पाहाण्यासाठी प्रेक्षक जितके आतुर आहेत. तितकीच उत्सुकता आम्हालाही लागून राहिली आहे. मला खात्री आहे, आमची केमिस्ट्री रंगभूमीवर वेगळी जादू निर्माण करेल.”

तर महेश मांजरेकर आपल्या या प्रवासाबद्दल म्हणतात, ‘’ २९ वर्षांनंतर रंगभूमीवर परत येणं ही माझ्यासाठी भावनिक गोष्ट आहे. नाटक हे माझ्यासाठी नेहमीच अग्रस्थानी आहे. मात्र चित्रपटांमुळे मला नाटकाला वेळ देता आला नाही. परंतु आता जितका जमेल तेवढा वेळ मी रंगभूमीसाठी देणार आहे. ‘शंकर जयकिशन’चं कथानक वाचताना मला जाणवलं, हे नाटक रंगभूमीवर आलंच पाहिजे. भरतसोबत मी अनेकदा काम केलं आहे, मी त्यांच्या अभिनयाचा आदर करतो. तो प्रामाणिक, संवेदनशील आणि ऊर्जा असलेला कलाकार आहे. आता रंगभूमीवर आम्ही एकत्र येतोय. एकमेकांच्या अनुभवांची देवाणघेवाण रंगमंचावर एक वेगळाच रंग उमटवेल, याची मला खात्री आहे.”

भरत जाधव एण्टरटेन्मेंट निर्मित सुरज पारसनीस दिग्दर्शित या नाटकाचे लेखन विराजस कुलकर्णी याने केले आहे. क्षितिज पटवर्धन यांचे गीत लाभलेल्या या नाटकात शिवानी रांगोळे, भरत जाधव आणि महेश मांजरेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. विनोद, भावना आणि नात्यांचे सुंदर मिश्रण असलेल्या ‘शंकर-जयकिशन’ या नाटकाचा शुभारंभ १९ डिसेंबर रोजी विलेपार्ले येथील दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथे होणार आहे.



चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’* *नाटकाला रसिक प्रेक्षकांची दाद*

 चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’* *नाटकाला रसिक प्रेक्षकांची दाद

वन्समोअरची दाद अन कलाकार गोंधळले

रविवार २३ नोव्हेंबर रात्री ८.३०वा. गडकरी रंगायतन,  ठाणे येथील चिरंजीव परफेक्ट बिघडलाय नाटकाच्या प्रयोगाला रसिक प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. नाटकातील एका प्रसंगामध्ये कलाकार श्रेयस जोशी आणि वैभव रंधवे यांच्या जुगलबंदीला प्रेक्षकांनी वन्समोअर अशी दाद दिली. दोघेही व्यावसायिक रंगभूमीवर नवीन असल्यामुळे त्यांना अश्या प्रकारची दाद मिळाल्यावर ते गोंधळून गेले त्यांना काय करावे ते क्षणभर कळले नाही,  त्यांनी नाटक तसेच पुढे सुरू ठेवले.

रसिक प्रेक्षक नाटक संपल्यावर आत मेकरूम मध्ये त्यांना भेटायला आले. ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ नाटकाच्या प्रयोगावर ते सगळेच खूप खूष होते आणि त्यांनी त्या दोघांना विनंती केली की, ‘या पुढील प्रयोगांमध्ये जर तुम्हाला तुमच्या गाण्यांना प्रेक्षकांनी वन्समोअर दिला तर तो तुम्ही नक्की घ्या’.

तुम्ही तिघेही अतिशय छान कामं करत आहात.  आम्हा प्रेक्षकांना तुमची ही फ्रेश लूक मधली कॉमेडी बघून खूप मज्जा आली. आम्ही हे नाटक खूप एन्जॉय केलं. त्यांनी नाटकातील कलाकारांना पुढील प्रयोगांना आणि त्यांच्या यशस्वी वाटचालीला शुभेच्छा ही दिल्या आणि नाटकातील कलाकारांबरोबर फोटो ही काढले.


*खवैय्ये आवडत्या चिकनक्रिस्परचा आस्वाद घेऊ शकतात, केवळ 99 रुपयांत*

*खवैय्ये आवडत्या चिकनक्रिस्परचा आस्वाद घेऊ शकतात, केवळ 99 रुपयांत* KFC इंडियाचे चिकन क्रिस्पर मील आता फक्त 99 रुपयांत चिकनप्रेमी फ्राईज आणि ...