Wednesday, September 10, 2025

अपोलो ने निरोगी वृद्धत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी उचलले महत्त्वाकांक्षी पाऊल

 अपोलो ने निरोगी वृद्धत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी उचलले महत्त्वाकांक्षी पाऊ 

 २०५० पर्यंत देशातील वृद्धांची संख्या ३१९ दशलक्ष होईल

 

नवी मुंबई, १० सप्टेंबर २०२५: भारतातील आघाडीचे मल्टी-स्पेशालिटी क्वाटरनरी केअर हॉस्पिटल, अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई (AHNM) ने आज त्यांच्या सिनियर्स फर्स्ट जेरियाट्रिक्स क्लिनिकची घोषणा केली, ही एक विशेष सेवा आहे जी रुग्णांच्या गरजा लक्षात घेऊन ज्येष्ठ नागरिकांच्या विशिष्ट आरोग्यसेवा गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेली आहे. या क्लिनिकचे नेतृत्व अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई येथील जेरियाट्रिक्समधील कन्सल्टन्ट डॉ. सायली दामले आणि डॉ. श्वेत सबनीस करतील. प्रतिबंधात्मक, पुनर्वसन आणि दीर्घकालीन काळजी समर्थन तसेच सातत्यपूर्ण काळजी एकाच छताखाली उपलब्ध असेल, मग ते रुग्णालयात असो किंवा घरी. अपोलो नवी मुंबईने ७५-९६९६-९४९४ एक समर्पित हेल्पलाइन क्रमांक सुरू केला आहे, जो ज्येष्ठ नागरिकांना कोणत्याही आरोग्यसेवेच्या गरजांसाठी वापरता येईल.

भारताच्या लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. असा अंदाज आहे की, २०५० पर्यंत देशातील वृद्धांची संख्या ३१९ दशलक्ष होईल - जवळजवळ पाच भारतीयांपैकी एक ज्येष्ठ नागरिक असेल. आज, जवळजवळ चार पैकी तीन ज्येष्ठांना किमान एका दीर्घकालीन आजाराने ग्रासले आहे, तर जवळजवळ अर्ध्या लोकांना हालचाली किंवा चालण्या-फिरण्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. तरीही, वृद्धापकाळासाठी विशेष काळजीची उपलब्धता दुर्मिळ आहे, देशात १०० पेक्षा कमी प्रशिक्षित जेरियाट्रिक्स तज्ञ आहेत, वास्तविक पाहता त्यांची गरज हजारोंमध्ये असल्याचा अंदाज आहे.

अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई येथील जेरियाट्रिक्स क्लिनिक ज्येष्ठांच्या आरोग्याच्या प्रत्येक पैलूला व्यापणाऱ्या विस्तृत सेवा देईल. यामध्ये व्यापक वृद्धरोग मूल्यांकन, दीर्घकालीन रोग व्यवस्थापन, पडणे आणि कमजोरी प्रतिबंध कार्यक्रम, गतिशीलता आणि संतुलन प्रशिक्षण, पोषण आणि आहार सल्ला, कॉग्निटिव्ह आरोग्य समर्थन आणि मानसिक आरोग्य सेवांचा समावेश आहे. शस्त्रक्रियेनंतरची काळजी, फिजिओथेरपी आणि पुनर्वसन आणि रुग्णालय भेटी सुलभ करण्यासाठी कन्सीर्ज सहाय्य देखील ज्येष्ठांना उपलब्ध असेल. अपोलो होमकेअर आणि अपोलो २४/७ यांच्या सहकार्याने, नर्सिंग केअर, फिजिओथेरपी, डायग्नोस्टिक्स आणि औषध व्यवस्थापन यासारख्या आवश्यक सेवा रुग्णालयाबाहेरही उपलब्ध असतील, ज्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी मदतीचे एक अखंड चक्र निर्माण होईल.

डॉ.सायली दामले, जेरियाट्रिक मेडिसिन कन्सल्टन्ट, अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई म्हणाल्या,“वृद्धत्व हा आजार नाही-हा एक नैसर्गिक जीवन प्रवास आहे ज्यासाठी करुणा, समजूतदारपणा आणि अनुकूल वैद्यकीय काळजी आवश्यक आहे. या समर्पित जेरियाट्रिक्स क्लिनिकद्वारे आम्हाला एपिसोडिक उपचारांच्या पलीकडे जाऊन समग्र, प्रतिबंधात्मक आणि सातत्यपूर्ण देखभालीकडे जायचे आहे. प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला त्यांच्या आयुष्यातील सोनेरी वर्षे आरोग्य, आत्मविश्वास आणि स्वातंत्र्यासह जगण्याची संधी मिळाली पाहिजे आणि आमचे क्लिनिक त्यांच्यासाठी एक मजबूत सहयोगी ठरेल."

डॉ. श्वेत सबनीस, जेरियाट्रिक मेडिसिन कन्सल्टन्ट, अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई म्हणाले,“वृद्धांच्या गरजा अनेकदा जटिल आणि एकमेकांमध्ये गुंतलेल्या असतात - जुनाट आजार आणि हालचाली, चालण्या-फिरण्याच्या चिंतांपासून ते मानसिक आरोग्य आणि पुनर्वसनापर्यंत विविध गरजा असतात. हे क्लिनिक वन-स्टॉप सोल्यूशन म्हणून डिझाइन केले आहे, जे सुनिश्चित करते की ज्येष्ठ आणि त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येक गरजेसाठी स्वतंत्र काळजी घेण्याच्या त्रासाला सामोरे जावे लागणार नाही. आमचा दृष्टिकोन वैद्यकीय कौशल्य आणि सहानुभूती यांना एकत्र आणतो, जेणेकरून त्यांना जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आवश्यक असलेला आधार मिळत राहील.”

श्री विशाल लाठवाल, सीईओ, अपोलो होमकेअर म्हणाले,“अपोलो होमकेअर आणि सीनियर्स फर्स्ट जेरियाट्रिक्स क्लिनिकच्या जोडीने, आम्ही आता ज्येष्ठ नागरिकांच्या घरी रुग्णालयासारखी दर्जेदार देखभाल उपलब्ध करवून देत आहोत. घराच्या परिचित वातावरणात बरे होण्याचे चांगले परिणाम मिळतात हे सिद्ध झाले आहे आणि ज्येष्ठ नागरिक आधीच आमच्या ग्राहक समुदायाचा एक मोठा भाग असल्याने, ही गरज स्पष्ट आणि महत्त्वाची आहे. आमचा व्यापक पोर्टफोलिओ घरामध्ये देखभालीच्या बहुतेक गरजा पूर्ण करतो. हा एकात्मिक काळजी दृष्टिकोन अतिरिक्त सोयी आणि सुधारित परिणामांसह काळजीची सातत्य सुनिश्चित करतो.”

अल्लू अर्जुन अभिनीत अपनी अगली फिल्म AA22xA6 के लिए लिवा ओएसिस पहुँचे एटली ने फिल्म को लेकर दिया बड़ा अपडेट

                               अल्लू अर्जुन अभिनीत अपनी अगली फिल्म AA22xA6 के लिए                                                                     लिवा ओएसिस पहुँचे एटली ने फिल्म को लेकर दिया बड़ा अपडेट 

क्रांति की दहलीज़ पर खड़े भारतीय सिनेमा के साथ दूरदर्शी निर्देशक एटली ग्लोबल सुपरस्टार अल्लू अर्जुन के साथ आ रहे हैं अपनी बहुप्रतीक्षित बड़ी फिल्म AA22xA6 को लेकर। माना जा रहा है कि यह फिल्म भारतीय सिनेमा की अब तक की सबसे बड़ी वैश्विक इवेंट फिल्म बननेवाली है, क्योंकि अपनी प्रतिभा का लोहा मनवा चुके जानेमाने निर्देशक इसे ख़ास बनाने का कोई भी मौक़ा छोड़ना नहीं चाहते, फिर चाहे उन्हें शूटिंग के लिए किसी रेगिस्तानी जगह पर ही क्यों न जाना पड़े।

फ़िलहाल 'जवान', 'थेरी' और 'मर्सल' जैसी शानदार मास एंटरटेनर फिल्में बना चुके चर्चित निर्देशक एटली अपनी इस फिल्म के हाई-ऑक्टेन सीक्वेंस को शूट करने के लिए अबू धाबी के लिवा ओएसिस को संभावित लोकेशन के रूप में चुना है। गौरतलब है कि यहाँ के सुनहरे रेत की टीले, प्राकृतिक नज़ारे और भव्य परिदृश्य एटली के उस विजन से पूरी तरह मेल खाते हैं, जिसमें वह AA22xA6 को सिर्फ एक फिल्म नहीं, बल्कि दुनिया भर के दर्शकों के लिए एक खूबसूरत अनुभव बनाना चाहते हैं।

फिलहाल निर्देशक ने जब से फिल्म से जुड़ी यह बड़ी अपडेट साझा की है, उनके फैंस और दर्शक बेहद उत्साहित हैं। वे खुश हैं कि सन पिक्चर्स के साथ मिलकर उनके लोकप्रिय निर्देशक एटली और अल्लू अर्जुन एक ग्लोबल इवेंट लेकर आ रहे हैं। इसमें दो राय नहीं है कि 'पुष्पा: द रूल' की ग्लोबल सफलता के बाद अपनी अगली बड़ी स्क्रीन पर धमाल मचाने को तैयार अल्लू अर्जुन, अपनी स्टार पावर और लोकप्रियता के साथ एटली की भव्य कहानी को ग्लोबल परिदृश्य के साथ जोड़ते हुए इस प्रोजेक्ट के साथ आसमान छूने को तैयार हैं।

तो ये बात तय है कि एटली की रोमांचक कहानी कहने की शैली और अल्लू अर्जुन की लार्जर दैन लाइफ उपस्थिति मिलकर फिल्म AA22xA6 के साथ एक सिनेमाई तूफ़ान खड़ा करने वाली हैं, जिसमें ग्लोबल तकनीशियनों की भागीदारी के साथ चौंकाने वाले एक्शन सीक्वेंस और भारतीय संवेदनाओं पर आधारित पूरी दुनिया को केंद्र में रखकर बनाई गई कहानी होगी। ऐसे में AA22xA6 एक मील का पत्थर साबित हो सकती है, जो भारतीय ब्लॉकबस्टर्स के भविष्य को नए आयाम देगी।

Tuesday, September 9, 2025

‘वडापाव’ चित्रपटाचं टायटल ट्रॅक प्रेक्षकांच्या भेटीला

                                                      गाणं कडकडीत.. प्रेम झणझणीत..!!                                                          ‘वडापाव’ चित्रपटाचं टायटल ट्रॅक प्रेक्षकांच्या भेटीला

“प्रेमात पडायचं तर कडकडीतच आणि प्रेमात पाडायचं तर झणझणीतच… वडापावसारखंच!”, या भन्नाट ओळींसह ‘वडापाव’ चित्रपटाचं टायटल ट्रॅक प्रदर्शित झालं असून प्रेक्षकांच्या मनाला झणझणीत चव देत आहे. मुंबईचा जीव असलेला वडापाव जसा सर्वांचा लाडका आहे, तसाच हे गाणंही प्रेक्षकांना तुफान आवडत आहे.

गाण्याचं आकर्षण म्हणजे कुणाल–करण यांचे भन्नाट शब्द आणि मस्त बिट्स, नकाश अझीझ यांचा दमदार आवाज. यामुळे या गाण्याची रंगतदार रेसिपी तयार झाली असून ती प्रेक्षकांना चविष्ट अनुभव देते. 

दिग्दर्शक प्रसाद ओक म्हणाले, “आमचं लक्ष्य फक्त गाणं बनवणं नव्हतं, तर मुंबईचा आत्मा टिपायचा होता. हे टायटल ट्रॅक प्रत्येकाला नाचवणार, यात अजिबात शंका नाही.”

संगीतकार, गीतकार कुणाल - करण म्हणाले, ''हे गाणं लिहिताना आणि संगीत ठरवताना आमच्या डोक्यात एकच विचार होता, वडापाव जसा साधा असूनही झणझणीत आहे, तसंच हे गाणं असावं. शब्द साधे, तरीही थेट मनाला भिडणारे आणि संगीत असं की, ऐकताच पाय आपोआप थिरकायला लागतील. हे टायटल ट्रॅक म्हणजे फक्त गाणं नाही, तर मुंबईतील प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय आहे.”

२ ऑक्टोबरला प्रदर्शित होणारा ‘वडापाव’ हा पूर्णपणे कौटुंबिक चित्रपट आहे. गोड नात्यांची चवदार गोष्ट यात पाहायला मिळणार असून, टायटल ट्रॅकने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. या चित्रपटात प्रसाद ओक, अभिनय बेर्डे, गौरी नलावडे, रसिका वेंगुर्लेकर, शाल्व किंजवडेकर, रितिका श्रोत्री, समीर शिरवाडकर, सिद्धार्थ साळवी, अश्विनी देवळे-किन्हीकर आणि सविता प्रभुणे यांच्या भूमिका आहेत.

एबी इंटरनॅशनल फिल्म्स एलएलपी, मर्ज एक्सआर स्टुडिओ, व्हिक्टर मुव्हीज लिमिटेड, अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट आणि मोहसीन खान प्रस्तुत, सिनेमॅटिक किडा बॅनरअंतर्गत हा चित्रपट निर्मित झाला आहे. निर्माते अमित बस्नेत, प्रजय कामत, स्वाती खोपकर आणि निनाद नंदकुमार बत्तीन असून सहनिर्माते तबरेझ एम. पटेल आणि सानीस खाकुरेल आहेत. छायाचित्रण दिग्दर्शक संजय मेमाणे तर लेखन सिद्धार्थ साळवी यांनी केलं आहे.

मल्टीस्टारर ‘थप्पा’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच होणार चित्रीकरणाला सुरुवात

                                                   मल्टीस्टारर ‘थप्पा’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला                                                  लवकरच होणार चित्रीकरणाला सुरुवात

मराठी चित्रपटसृष्टीत ‘थप्पा’ हा एक भव्य आणि हटके मल्टीस्टारर चित्रपट आता दाखल होणार आहे. हिंदी मल्टीस्टारर चित्रपटांनाही टक्कर देईल, असा बिग बजेट, दमदार कथानक आणि ताकदीची कास्टिंग घेऊन हा चित्रपट प्रेक्षकांसमोर येणार आहे. सिड विंचूरकर दिग्दर्शित या चित्रपटाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे.



‘थप्पा’चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याची ड्रीम स्टारकास्ट. वैदेही परशुरामी, रिंकू राजगुरू, सिद्धार्थ बोडके, गौरव मोरे, डॅनी पंडित, सखी गोखले आणि साईंकित कामत हे लोकप्रिय आणि दमदार कलाकार एकत्र पडद्यावर झळकणार आहेत. या सर्व कलाकारांनी पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर केली असून इतकी मोठी स्टारकास्ट एकत्र पाहाण्याची संधी या निमित्ताने प्रेक्षकांना मिळणार आहे. नवे चेहरे, नवे जोडीदार असल्याने यात नवीन केमिस्ट्री पाहायला मिळेल, त्यामुळ हा अनुभव खऱ्या अर्थाने ताजा, वेगळा आणि थरारक ठरणार आहे.

स्टुडिओ लक्स आणि फिफ्टी टू फ्रायडे निर्मित या चित्रपटाचे मेहुल शाह आणि अमित भानुशाली निर्माते असून, निर्मितीमूल्यांच्या बाबतीतही ‘थप्पा’ हा मराठीतील मोठा आणि समृद्ध सिनेमा ठरणार आहे. यापूर्वी फिफ्टी टू फ्रायडेच्या सहयोगाने ‘मुंबई पुणे मुंबई’, ‘मुंबई पुणे मुंबई २’, ‘मुंबई पुणे मुंबई ३’, ‘गर्ल्स’, ‘प्रेमाची गोष्ट’, ‘स्माईल प्लीज’ असे अनेक सुपरहिट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. तर ‘फोटो प्रेम’ या मराठी चित्रपटाचे आणि ‘शिकायतें’ या हिंदी वेब सीरिजचे मेहुल शाह निर्माते आहेत. 

हा चित्रपट मैत्रीवर आधारित आहे का, एखादी प्रेमकथा मांडणार का की, फसवणूक, सूड किंवा काहीतरी वेगळं रहस्य उलगडणार, हे अजून गुलदस्त्यातच आहे. त्यामुळेच प्रेक्षकांच्या कुतूहलात अधिक भर पडली असून, नेमकं काय पाहायला मिळणार आहे यासाठी सर्वांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

दिग्दर्शक सिड विंचूरकर म्हणतात, “ सध्या तरी अनेक गोष्टी गोपनीय असून ताकदीच्या स्टारकास्टमुळे हा सिनेमा प्रेक्षकांवर भव्य ठसा उमटवेल, याची खात्री आहे. चित्रीकरण लवकरच सुरू होणार असून संपूर्ण टीम अत्यंत उत्साही आहे. प्रेक्षकांसाठी काहीतरी नवीन आणि प्रभावी घेऊन येत आहोत.”

’दशावतार’ मधील हृदयस्पर्शी ‘रंगपूजा’ ही भैरवी रसिकांना अर्पण गुरु ठाकूर, अजय गोगावले आणि ए. व्ही. प्रफुल्लचंद्र हे भन्नाट त्रिकूट एकत्र !

 कला आणि भक्तीचा संगम!

’दशावतार’ मधील हृदयस्पर्शी  ‘रंगपूजा’ ही भैरवी रसिकांना अर्पण

गुरु ठाकूर, अजय गोगावले आणि ए. व्ही. प्रफुल्लचंद्र हे भन्नाट त्रिकूट एकत्र ! 

मराठी सिनेसृष्टीतील सर्वाधिक चर्चेत असलेला झी स्टुडिओज प्रस्तुत ‘दशावतार’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाचे वेध प्रेक्षकांना लागले आहेत. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशातील अनमोल ठेवा असलेल्या दशावतार परंपरेला मोठ्या पडद्यावर भव्यतेने मांडणाऱ्या या चित्रपटातील हृदयस्पर्शी ‘रंगपूजा’ ही भैरवी नुकतीच रसिकांच्या भेटीस आली आहे.

या गाण्यातून एका निस्सीम कलावंताची कलेवरील नितांत श्रद्धा, भक्ती आणि समर्पणाची भावना मांडली गेली आहे. हे गीत म्हणजे कलावंताच्या रंगभूमीवरील कलाप्रवासाला भावपूर्ण अभिवादन आहे. विशेष म्हणजे गीतकार गुरु ठाकूर, गायक अजय गोगावले आणि संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र हे  त्रिकुट प्रथमच या गाण्यात एकत्र आलं असून हे गाणं या चित्रपटाचं, नायक बाबुली मेस्त्रीच्या आयुष्याचं मर्म मांडतं.

गुरु ठाकूर यांची अर्थपूर्ण शब्दरचना , त्याला अजय गोगावले यांचे आर्त स्वर यामुळे गाण्याला अनोखा आयाम मिळाला आहे. तर ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांच्या सुमधुर सुरावटींनी गाण्यात खास रंगत आणली आहे. 

गायक अजय गोगावले म्हणाले, ‘’दशावतार नाटकांमध्ये जितके नांदीला महत्व आहे तितकेच ‘रंगपूजा’ ह्या भैरवी भैरवीला! भैरवी झाल्याशिवाय नाटकातील कुठलाही कलावंत आपल्या चेहऱ्यावरील रंग उतरवत नाही. म्हणूनच ‘दशावतार‘ चित्रपटातील ही ‘रंगपूजा’ ही भैरवीसुद्धा तितकीच महत्त्वपूर्ण आहे. गुरु ठाकूरच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेली ही भैरवी प्रत्येक कलाकाराचं मर्म आहे. ही भैरवी मलाही खूप रीलेट करुन गेली. गुरु ठाकूरचे शब्द नेहमीच भावोत्कटता आणतात. आणि ए. व्ही. प्रफुल्लचंद्रने त्याला संगीताचं उत्तम कोंदण केलंय. त्यामुळे ती गाताना वेगळं समाधान मला मिळालं. या भैरवी मुळे मीसुद्धा या चित्रपटाचा भाग होऊ शकलो, याचा मला खरोखर आनंद आहे.”

संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र म्हणाले, “अजय गोगावले यांच्यासोबत काम करायची माझी खूप आंतरिक इच्छा होती आणि ‘दशावतार’मुळे ती पूर्ण झाली. हा माझ्या संगीतप्रवासातील सर्वात आनंदाचा क्षण आहे.”


गीतकार गुरु ठाकूर म्हणाले, “कलावंताच्या आयुष्यावरचा हा सिनेमा आहे. कुठलीही कलाकृती तुम्ही करता, असं म्हणण्यापेक्षा, त्यासाठी तुमची निवड होणे, हे तुमच्या भाग्योदयात लिहिलेलं असतं, असं मी मानतो. या चित्रपटाचे संवाद, गाणी दिग्दर्शक सुबोध खानोलकरने माझ्याकडून लिहून घेतली आणि एकेक योग जुळत गेले. गीतकाराने फक्त शब्द लिहिणे पुरेसे नसते, तर ते शब्द आणि त्यातील भावना रसिकांपर्यंत पोहोचवणारा आवाज महत्त्वाचा असतो. आणि माझ्या गाण्यांना अजयचा आवाज लाभतो तेव्हा मी आश्वस्त होतो. अजय गोगावलेने आजवर मी लिहिलेली कित्येक गाणी अजरामर केली आहेत. रेकॉर्डिंग स्टुडिओत अजय ही भैरवी गात होता तेव्हा मी आणि सुबोध अक्षरशः हळवे झालो होतो. 

झी स्टुडिओज प्रस्तुत, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊस निर्मित ‘दशावतार’चे लेखन, दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केले आहे. दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शिनी इंदलकर, विजय केंकरे, रवी काळे यांसारखे दिग्गज कलाकार यात भूमिका साकारत आहेत. येत्या १२ सप्टेंबरला ‘दशावतार’ जगभर मोठ्या दिमाखात प्रदर्शित होणार असून, अजय गोगावलेंच्या आवाजातील ‘रंगपूजा’ ही भैरवी  हा या चित्रपटाचा कळसाध्याय आहे!

विवेक वासवानी ने डियर फ्रेंड शाहरुख से की ‘मन्नू क्या करेगा?' स्टार व्योम की तुलना

 “जब मैं पहली बार शाहरुख से मिला था, तो उनकी आँखों में मैंने एक चमक देखी थी, व्योम में भी मुझे वही स्पार्क दिखा है।” विवेक वासवानी ने डियर फ्रेंड शाहरुख से की ‘मन्नू क्या करेगा?' स्टार व्योम की तुलना

क्यूरियस आइज़ सिनेमा की आने वाली फिल्म मन्नू क्या करेगा, जो 12 सितंबर 2025 को बड़े पर्दे पर रिलीज़ होने जा रही है, पहले ही दर्शकों के बीच चर्चा का विषय बन चुकी है। फिल्म में डेब्यू कर रहे व्योम और साची बिंद्रा मुख्य भूमिकाओं में हैं और उनके ट्रेलर लॉन्च के बाद से ही फिल्म को लेकर उत्साह बढ़ता जा रहा है।

इस कार्यक्रम में इंडस्ट्री के दिग्गज विवेक वासवानी—जिन्होंने शाहरुख़ खान को उनके करियर के शुरुआती दिनों में मार्गदर्शन दिया था—ने व्योम और शाहरुख के बीच गहरी समानता दिखाई। उन्होंने व्योम की तारीफ़ करते हुए कहा, “जब मैं पहली बार शाहरुख से मिला था, तो उनकी आँखों में भूख, अनुशासन और जुनून देखा था और यही चीज़ उन्हें खास बनाती थी। इत्तेफाक से जब मैं व्योम से मिला, तो मैंने उनमें भी वही सब चीजें देखीं। हालांकि शाहरुख की तरह व्योम भी बाहरी हैं और उनमें भी सबसे अधिक मेहनत करने की ताकत के साथ सीखते रहने की विनम्रता भी है। हालांकि मैं दो लोगों की तुलना करना पसंद नहीं करता, लेकिन मैं यह ज़रूर कह सकता हूं कि व्योम के रूप में आज एक नए सितारे ने जन्म ले लिया है।”

फिल्म का निर्माण शरद मेहरा द्वारा क्यूरियस आइज़ सिनेमा के बैनर तले किया गया है और निर्देशन संजय त्रिपाठी ने किया है। फिल्म में नए कलाकारों के साथ-साथ विनय पाठक, कुमुद मिश्रा, राजेश कुमार, और चारु शंकर जैसे अनुभवी कलाकारों की भी दमदार उपस्थिति है।

इसके साथ ही, फिल्म का संगीत तैयार किया है ललित पंडित ने, जो पहले ही चार्ट्स में धमाल मचा चुका है। ट्रेलर को मिली व्यापक सराहना के साथ, 'मन्नू क्या करेगा ?' व्योम और साची के बॉलीवुड में कदम रखने का शानदार अवसर बनकर उभर रही है।

Monday, September 8, 2025

श्रीलंका टुरिझमचे भारताला आमंत्रण स्वर्गापेक्षाही सुंदर ठिकाणी लग्न साजरे करा

 श्रीलंका टुरिझमचे भारताला आमंत्रण स्वर्गापेक्षाही सुंदर ठिकाणी लग्न साजरे करा 

श्रीलंकेने मल्टी-सिटी लक्झरी वेडिंग शोमध्ये यशस्वीरित्या दाखवून दिले आहे की त्यांचे बेट एक प्रीमियर वेडिंग डेस्टिनेशन आहे

श्रीलंका टुरिझमने डेस्टिनेशन वेडिंगसाठी आपले दरवाजे अधिकृतपणे उघडले आहेत, भारतीय जोडप्यांना आणि कुटुंबांना जगातील एका सर्वात चित्तथरारक ठिकाणी त्यांच्या आयुष्यातील सर्वात खास क्षण साजरा करण्यासाठी अतिशय आपुलकीचे आमंत्रण दिले आहे. या प्रसंगी, श्रीलंका टुरिझमने संपूर्ण भारतात मल्टी-सिटी लक्झरी वेडिंग शोच्या मालिकेची यशस्वी सांगता केली, ज्यांना अविस्मरणीय विवाह अनुभव हवा असतो अशा जोडप्यांसाठी हे बेट एक प्रमुख पर्याय कसे बनू शकते हे यामध्ये दाखवले गेले.


या शोकेसमध्ये श्रीलंकेतील आघाडीची हॉटेल्स, रिसॉर्ट्स, हेरिटेज साइट्स आणि वेडिंग सर्व्हिसेस प्रोव्हायडर्स, मोठमोठे भारतीय वेडिंग प्लॅनर, ट्रॅव्हल एजंट आणि मीडिया प्रतिनिधी सहभागी झाले होते. प्रत्येक कार्यक्रमात विशेष नेटवर्किंग सत्रे, तल्लीन करणारे अनुभव आणि खास तयार केलेल्या, अनोख्या लग्न संकल्पनांचा समावेश होता - पारंपारिक भारतीय समारंभ आणि आधुनिक लक्झरी उत्सव दोन्ही आयोजित करण्याची श्रीलंकेची अतुलनीय क्षमता यामध्ये दर्शविली गेली.

श्रीलंका टुरिझम प्रमोशन ब्युरोचे अध्यक्ष बुद्धिका हेवावासम यांनी सांगितले, “श्रीलंका आता डेस्टिनेशन वेडिंगसाठी खुले आहे आणि आम्ही भारताला आमच्यासोबत प्रेम साजरे करण्यासाठी आमंत्रित करत आहोत. संपूर्ण भारतातून मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे आमचा विश्वास दुणावला आहे आहे की, श्रीलंका भारतीय जोडप्यांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण करेल. स्वच्छ, रम्य समुद्रकिनारे आणि चहाच्या तजेलदार मळ्यांपासून ते कोलोनियल वाड्या आणि ऐतिहासिक वारसा दर्शवणाऱ्या किल्ल्यांपर्यंत, हे बेट संस्मरणीय विवाह समारंभ आयोजित करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी इथे आहेत.”

*खवैय्ये आवडत्या चिकनक्रिस्परचा आस्वाद घेऊ शकतात, केवळ 99 रुपयांत*

*खवैय्ये आवडत्या चिकनक्रिस्परचा आस्वाद घेऊ शकतात, केवळ 99 रुपयांत* KFC इंडियाचे चिकन क्रिस्पर मील आता फक्त 99 रुपयांत चिकनप्रेमी फ्राईज आणि ...